subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 29, 2012

निळू फुले अकादमी पुण्यात



चित्रपट-नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला... ते बहुआयामी, बहुरूपी व्यक्तिमत्त्व होते... खरेतर अभिनयाचे विद्यापीठच होते... ते होते निळू फुले अर्थात, निळूभाऊ. त्यांच्या नावाची अकादमी पुण्यात उभी राहतेय.

"सामना', "सिंहासन', "जैत रे जैत' हे मराठी चित्रपट असोत किंवा "कुली', "सारांश', "मशाल'सारखे हिंदी चित्रपट असोत अथवा "सखाराम बाईंडर'सारखे नाटक असो. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी, नव्या पिढीला "अभिनय' समजण्यासाठी सेवा दलाने त्यांच्या नावाची अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
निळूभाऊंच्या अभिनयाचा प्रवास सेवा दलातील कलापथकापासून झाला.राष्ट्र सेवा दलाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, १५ एप्रिलपासून या अकादमीचा प्रारंभ होत आहे.



Nilu Phule was an Indian actor known for his roles in the Marathi language movies and Marathi theatre. Nilu Phule had acted in around 250 Marathi and Hindi movies during his film career.Nilu Phule began his theatrical career with the Marathi folk performances (loknatya).His first professional drama was Katha Akalecha Kandyachi, which went on to have over 2000 shows. It was based on this success that he was offered his first movie Ek Gaav Baara Bhanagadi, by Anant Mane in 1968.Nilu often played villains; most notably his portrayal of Sakharam Binder, an exploiter of women for sexual desires.Some of his notable film roles include: a power-drunk politician in Mahesh Bhatt's Saaransh, a political journalist in Jabbar Patel's Sinhasan, and a sugar tycoon in Jabbar Patel's Saamna.One of Phule's most notable theatrical performances include his role as the eponymous hero of Vijay Tendulkar's Sakharam Binder.Kamlakar Sarang, who directed the first production of the play in 1972, was apprehensive of Phule's reticence. However, he was convinced that Phule would be fit for the role, when Vijay Tendulkar reminded him of Phule's aggressive performance as a minister in another play, Katha Aklechya Kandyachi.According to Phule, his acting style was influenced by Hollywood films like Double Life, Gone With The Wind and Roman Holiday.Nilu Phule died on 13 July 2009, aged 78, from esophageal cancer. He is survived by his wife, Rajani Phule, and their daughter, Gargi Phule Thatte.

Wednesday, March 28, 2012

मृगजळाचे बांधकाम करणारे कवी ग्रेस


ग्रेस कुणाला कळले आणि कुणाला कळले नाहीत या युक्तिवादात आता तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण हा संध्यासूक्ताचा यात्रिक आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. तो निघून गेला आहे महानिर्वाणाच्या दिशेकडे. त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारणार्या अनेकांचे डोळे ते गेल्याने भरून आलेले असतील. ते मान्य करण्यासाठी सुद्धा दिलदारी लागते.

ग्रेस यांची कविता मला एक दिवस सहज भेटली. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि त्यातील गर्भितार्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्यानंतर हळूहळू जाणवत गेलं. कविता कुठलीही असू दे, त्यातील गूढरम्यता, भावविश्वता आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि सहसा तिथवर पोचू शकणार नाही अशा अमर्त्य भावविश्वाचं दर्शन घडवते.
हृदय कोरून बाहेर काढावं, त्याचे ठोके आपल्या समोर पडतांना पहावेत आणि आपण जिवंत आहोत का निवर्तलोय या असल्या संभ्रमात आपण पडावं असं काहीसं देखणं, मोहून टाकणारं, बर्याकच अंशी ठाव न लागणारं किंबहूना ठाव न लागु देणारं लेखन हे खूप आतूनच उमटावं लागतं. म्हणजे...

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
नभातूनही मंद तार्यावप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

ही कविता असू दे किंवा

देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही कारूण्याची धार


ही असू दे, त्यातील गांभीर्य आणि भावानुभुती हा केवळ अनुभव नाही. तो साक्षात्कार आहे. अनुभव शिळे होतात, साक्षात्कार नव्हेत.

अगदी त्यांच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सुद्धा ग्रेस म्हणतात...

संध्यामायेच्या शुभमकरोती ओंजळीतून सांडताना
तू अचानक, अवाक होऊन,
दरदरून थरथरलीस... मला प्रयाणाची दिशा दाखवीत...
तू थांबली असतीस तर या मृगजळात
एखादा रंगीत मासा तरंगू शकला असता...
तिरीप एकदा बुबुळात शिरली की मग ती
अश्रूंच्या आदेशानेही पापण्यातून खाली
सांडतच नाही; या सबब, शरमेवर तू नाही
थांबलीस !
पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे
शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच
अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पणही
यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ
असतात काय ? संभवतात काय?

माझ्या मते भाषेनी बहाल केलेली चौकट बर्या च वेळेला वर्तुळाकार असते. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कौशल्य स्वतःला अभिमन्यू समजणार्याट बर्यायच साहित्यिकांकडे नसतं. तीच करामत या भाषेच्या जादूगाराने करून दाखविली. वेदनेला केवळ दु:ख समजणार्याि महाभागांना ग्रेसची कविता समजायची नाही. अ़ज्ञाताच्या तळाशी बुडी मारण्यासाठी साहस लागतं. मनस्वीता लागते.

पुन्हा कवितेचं गाणं झालं, तरी गाणं त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यात शब्दकाराचा विजय आहे. तो विजय आहे या अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरूषाचा. ग्रेस जिंकले. मृत्युंजय ठरले ते त्या अर्थीसुद्धा.

ग्रेस म्हणजे एक गूढ. एखाद्या शापीत देवाच्या टेकडीवरील, वार्याववर किंचितही न हलणार्याा एका पोक्त, अनासक्त वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी ओलेती दिवा लावून जाते तसं काहीसं!



-केदार केसकर
keskarkedar@gmail.com




Tuesday, March 27, 2012

व्हायोलिन गाते तेंव्हा... कोल्हापूरात

कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत

दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे कोल्हापूरातल्या कै. केशवराव भोसले नाट्यगृहात
८ एप्रिल २०१२ रोजी ``सांस्कृतिक पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.

पुण्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ १२ फेब्रुवारीला झाला.त्यातून जमा झालेल्या रकमेतून
खर्च वजा जाता रुपये ५८,००० लोकबिरादरी प्रकल्पासाठी देण्यात आले.

सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.


वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी
येणारा अपेक्षित खर्च रु. ४०,००० (चाळीस हजार) एवढा आहे.
आपल्या सारख्या जाणकार आणि उदार संस्थांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.

`व्हायेलिन गाते तेव्हा.. `या आणि इतरही कार्याला व उपक्रमांना आपण
आपल्या सढळ आर्थिक सहकार्याची अपेक्षा बाळगून इथेच विराम घेतो.

आपला विश्वासू,



सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
9552596276

*( त्यांचा परिचय देणारी माहिती जोडत स्वतंत्रपण देत आहोत)

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशीला गोसावी

कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या
वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या
चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा
होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा
व्यक्तल करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही
ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत.
गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण
झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी
वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या
वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी
यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची
गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर
आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव
झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती
त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर"
आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी
एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी
दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र
शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार
व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे
महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार
म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन
मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले.
त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून
व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता
नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर
मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे
व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा
होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या
स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या
त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या
आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या
स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या
या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे
तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा
मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा
असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा
अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे





सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत

दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे कोल्हापूरात ८ एप्रिल २०१२ ला कै. केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता ``सांस्कृतिक पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.


सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.

वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत.

आपल्या सारख्या जाणकार आणि उदार रसिक आश्रयदात्यांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.या साठी आपणतर मदतीचा हात द्यालच.
पण इतरांना सांगून स्व.बाबा आमटेंनी स्थापन केलेल्या कार्यासाठी आपल्या मित्रांना
आणि माहितीच्या संस्थांनाही मदतीचे आवाहन कराल याची खात्री बाळगतो.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीही मदत स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे.




सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, March 26, 2012

ग्रेस सरांची एक आठवण-चंद्रशेखर गोखले


सांगावीशी वाटते... आमची प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधी आला नाही पण त्याना कायम माझी खबरबात कळायची, त्याची सूरूवात झाली ते मी `सामना`त सदर लिहायला लागलो तिथपासून, म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी...माझा एक मित्र मला `सामना`मधे घेऊन गेला आणि माझं पान नावाचं एक सदर मी दर शनिवारसाठी लिहायला लागलो.

अल्पावधीतच ते सदर अपेक्षेपेक्षा लोकप्रियं ठरलं मग ज्याला मी माझा मित्र समजत होतो त्यालाच
त्याचा त्रास व्हायला लागला. थोडक्यात पोटात दुखायला लागलं आणि घाणेरडं राजकारण करून त्याने माझं सदर
परस्पर रद्द करून टाकलं.

त्या नंतर एकदा ग्रेससर राऊत साहेबांना भेटले तेंव्हा त्यानी आवर्जून माझ्य़ा सदराबद्दल विचारलं म्हणाले का बंद केल? फार वेगळं लिहित होते ते वगैरे वगैरे.. राऊत साहेबानी मला हे आवर्जून सांगितलं आणि पून्हा मी `सामना`मधे नियमाने लिहायला लागलो...नंतर माझा कथासंग्रह आला मनोगत, तेंव्हाही ग्रेस सरानी संग्रह वाचल्यावर मला लगेच निरोप पाठवला कथा वाचल्या आवडल्या... पवईला आम्हा दोघाना शेजारच्याच इमारतीत सदनिका मंजूर झाली होती सात वर्ष आम्ही तिथे राहिलो पण तरी भेट झाली नाही पूढे आम्ही ते घर विकून चारकोपला स्थाईक झालो आणि काही दिवसातच मेहेंदळे सरांबरोबर निरोप आला चारकोप आवडल का?

मी हो म्हणत त्याना आगत्याचं घरी यायचं निमंत्रण दिलं ... पण योग नव्हता... गेला आठवडा मी आणि उमा
" वा-याने हालते पान"या त्यांच्या संग्रहाचे पारायणच करतोय...
भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे पठडीतली भाषा त्याना रुचायची नाही...त्यांचं स्मरण हिच त्याना श्रद्धांजली ठरेल..

विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी

स्वतःच्या कोषात दंग राहून विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी-माणूस . ग्रेस.


दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.

ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.

आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.

त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...

आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.

त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..

आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...

त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...

मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...

ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, March 25, 2012

कशीदाकाम केलेली साडी मन मोहवून घेते..

एके काळी घराघरात कशीद्याने काढलेले हातरुमाल, पडदे, टेवलक्लॉथ, इतकेच काय उशावरचे अभ्रे असायचे...पण आज ह्या सा-या घरगुती कला फारशा दिसत नाहीत. सारे काही.. नव्या दिशेला धावणारो..रंग, कलाकुलर आणि संगणकीय कळीतून उमटलेली डिझाईन...


आपण नव्याने तयार केलेल्या साडीवरचे कशीदाकाम दाखवून त्याचे टाके कसे असतात ते सांगत आहेत,,,पुष्पाताई बाक्रे.

अर्थात घरात नित्यकाळ असणारी महिला मंडळी आता फारशी घरात राहातात कुठे..?
प्रत्येक जण नोकरीच्या . काहीतरी मिळविण्याच्या मागे. म्हणूनच कदाचित या सा-यांकडे तेवढे लक्ष जात नाही. उन्हाळ्यात करायची कामे. वाळवणे. पापड. कुरडया. गव्हाचा चिक सारेच आता बाजारातून रेडिमेड आणले जाते. त्यासाठीची मेहनतही आता होत नाही..खरे ना?

आज आमच्या स्नेही कलावंत सौ. शैला दातार यांचा फोन आला..की की पुष्पाताई बाक्रे यांनी तयार केलेल्या कशीदा कामाचे प्रदर्शन आहे. जरा येशील काय...आता माझा दैनंदिन पत्रकारितेशी फारसा संबंध नसल्याने थोडे आढेवेढे घेतले..मात्र आज रविवारी दुपारी चक्क फिल्म इन्स्टिट्यूटच्या दाराच्या पुढच्या राजकमल बंगल्यापुढच्या बाक्रे बंगल्यात दाखल झालो.

सौ. अनिता बेदरकर आणि पुष्पाताई बाक्रे आपल्या नविन साडीजवळ

सुमारे पंच्च्याहत्तरीच्या बाक्रे बाई आणि त्यांच्या दोन सहकारी भगिनी सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर यांच्यासह उत्साहाने बंगल्यात लावलेल्या कशिदा कामाचे वर्णन सांगत फिरत होत्या. काही काळाने बेदरकरांशी शैला दातारांनी ओळक करुन दिली. ज्यासाठी हे प्रदर्शन भरविले ती खजुराहो मधील वैष्णवमंदीरातील दशावतारांचा कशिदा काढून तयार केलेली साडी.. दाखविली..पाहिली...`ती एकमेव आहे. तिच्यासारखी दुसरी तयार करायची नाही. ती जगातील एकमेव असेल. `...बाक्रेबाई सांगत होत्या.



रुमाल, मोठे कापड. पडदा, आणि साड्यांवर काढलेली विविध चित्राकृती कशीदांचे नमुने मन मोहरुन घेणारे होते. तिथली रंगसंगती आणि विणकामातले कौशल्य कलेची उंची सिध्द करणारे होते. नक्कीच...

आज नवी पीढीतल् महिल्या या कशिदा कामासाठी फारश्या उत्सुक नसल्याचेही त्या सांगतात.

आधी कागदावर डिझाईन काझून मग त्यानुसार नेट लावून जाळीदार हे काम केले जाते.

सारी कशीद्यातूल रुपे भारतीय संस्कृतिचे महान प्रतिकेच समोर आणतात. ही शेली विशेषतः कर्नाटकातून आली. त्यावर कै. अहिल्याबाई किर्लास्करांनी तीन पुस्तके लिहली आहेत. चौथे आणि पाचवे पुस्तक स्वतः पुष्पाताई बाक्रे यांनी लिहली आहेत.

बाक्रे यांच्या माहेरी शंभर वर्षापासून कर्नाटकी कशीदा काम त्यांच्या आजी काशीबाई किर्लोस्करांपासून केले जाते. आईकडून वारसा घेऊन त्या आज साड्यांवर कशीदा काढून त्यांचे वेगळेपण जपत आणि ते पुढे नेण्याचा यत्न करीत आहेत. या कलेच तोच तो पणा येऊ नये म्हणून त्यांनी देशी-परदेशी संग्रहालयातली नमुने पाहिले. त्यांच्या कारीव काम, जुनी चित्रे , शिल्पकला यांचा अभ्यास केला. त्यातले काही चांगले ते आपल्या हाती आणले आणि आता ते नवीन पीढीकडे सुपूर्द केले आहे.


वीरशैव पंथाच्या देवळांमधले वैशिष्ठ्य त्यांना एका साडीवर उतरवून ती साडी एका परिचितांसाठी तयार केली. त्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला. हंपीतील विठठ्ल मंदिराच्या भिंतींचे स्केच बघुन त्याला कशीदात तयार केले ते फ्रेम स्वरुपात उतरविले आणि ते घरातल्या भिंतीवर दिमाखात उभे आहे.


अनेक ठिकाणी प्रदर्शने भरवून हे कशीदा काम दाखवावे..यातून कांहीना स्फूर्ती यावी. आणि ही भारतीय कला प्रगत देशात जावी आणि त्यासाठी अब्यासक्रम करावा त्यांचा विचार सुरु आहे.

त्यांची ही कला आज सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर या दोन सहकारी जपत पुढे नेत आहेत. ती अशीच वाढत राहणार आहे याची त्यांना खात्री आहे....

हे नमुने पाहताना जुन्य़ा सुंदर देवळातील शिल्पे पाहण्याचे समाधान मिळाले..ते तुम्हीही जमेल तेव्हा अनभवून घ्यावे हेच वाटते.



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Friday, March 23, 2012

`व्हायोलीन गाते तेव्हा...`आता कोल्हापूरात


लोकबिरीदरी प्रकल्पास ५८ हजारांची मदत

प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलीन गाते तेव्हा...` या कार्यक्रमातून जमा झालेला ५८ हजार रुपयांचा निधी हेमलकसा इथल्या डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधी साठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने पाठविला गेला. हाच कार्यक्रम कोल्हापूरच्या कोशवराव भोसले नाट्यगृहात ८ एप्रिल २०१२ ला रात्री ९ वाजता आयोजित केला आहे. लोकबिरादरीच्या कार्यासाठी तो आयोजित केला आहे. त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल अशी खात्री सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांना वाटते.

फेब्रुवारीच्या १२ तारखेला पुण्यात व्हायोलीन वरील मराठी-हिंदी गीतांचा सौ. चारुशीला गोसावी यांचा `व्हायोलीन गाते तेव्हा... `हा शुभारंभाचा कार्यक्रम लोकबिरादरीच्या निधीसाठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने आयोजित केला होता. त्यातून खर्च वजा जाता राहिलेला ५८,३०६ रुपयांचा निधी लोरबिरादरीसाठी जमा झाला.

कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद आणि समाजिक कार्यसाठी केलेल्य़ा कलासेवेचे काही प्रमाणात का होईना चिज झाल्याचे समाधान चारुशीला गोसावी व आयोजक सुभाष इनामदारांना वाटते. कोल्हापूर शहरातील जाणकार व मदत करु इच्छीणा-यांनी आर्थिक सहभाग द्यावा असो आवाहन सुभाष इनामदार यांनी केले आहे.

पुण्यातल्या पहिल्या १२ फैब्रुवारी २०१२ च्या कार्यक्रमाचा ऑडियो एकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

http://soundcloud.com/subhash-vishwanath-inamdar/violin-gaate-tenvha-now-in?fb_action_ids=10150656465448172&fb_action_types=soundcloud%3Alisten&fb_source=recent_activity&code=AQChzPT-2tcWbSATv0fQs1hE71WSpNeCQoim5MrJ3pyGaaAje_Ruk4mL8nMg4kSl9Yuy__lvkLgLN2L6M5il8LsUxMVe1qDQda8KP9ofkH1ckrxYICXu3IMJPBwNsZYbeyOUOJSg-DGB4Nwhe_KWy1FWGBsey5gNEZPkGnVPZEI7zd3fFv8S5C6URfyLpBZFlaA#_=_

Friday, March 9, 2012

विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतीला खरे अभिवादन


`जेथ राघव तेथे सिता`

गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा यांच्यामागे आपल्या गाण्याची आवड बाजुला ठेऊन कुणी खंबीर साथ दिली असेल तर त्या विद्याताई माडगूळकर यांनी. पूर्वाश्रमीच्या त्या पद्मा पाटणकर. उत्तम आवाजाची देणगी असूनही आपल्या पतीचे कर्तृत्व बहरावे. त्याला आपली अबोल साथ मिळावी यासाठी माउलीने लग्नानंतर केवळ गदिमांच्या पत्नीच्या रुपात स्वतःला झिजविले. त्यांची म्हणजेच आपल्या आईच्या अबोल प्रेमाच्या आणि आईच्या आणि वडिलांच्या स्नेहमय जीवनाच्या आठवणी रंगवीत आणि त्याला गीतरामायणातील गीतांची जोड जुळवित जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ७ मार्चला पुण्यात सादर झालेला कार्यक्रम म्हणजे सौ. जयश्री कुलकर्मी यांनी सादर केलेला `जेथ राघव तेथे सिता` हा कार्यक्रम.

विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हा खास कार्यक्रम केवळ

गीते. या रामाच्या आयुष्यातील प्रसंगाचे चित्रण शब्दात करणा-या थोर महाकवीचे ते महाकाव्य. त्यातून केवळ स्त्रीयांच्या विविध स्वभाव आमि भावनांचे वर्णन यथार्थ शब्दात गदिमांनी ती गीते रचली.


आणि सुधीर फडके यांच्या ध्येयवादी , श्रेष्ठ संगीतकाराने दिलेल्या चालीतून ती अजरामर झाली.

पाहुनी वेलीवरची फुले, राम जन्मला ग सखी, सावळा ग रामचंद्र, मोडू नका वचनाला नाथा, निरोप कसला, कोण तू कुठली राजकुमार, सूड घे त्यांचा लंका पती पासून, डोहाळे पुरवा रघुतीलका माझे पर्यंत सारीच गाणी आपल्या सुस्वर आवाजात मूळात बार्शीच्या पण गेली अनेक तपे पुण्यात रुळलेल्या नावाजलेल्या गायीका सौ. जयश्री कुलकर्णी यांनी हळूवारपणे आणि प्रसंगी तेवढ्याच झोकात. दमदार आणि टेचात सादर करुन रसिकांची मने जिंकून घेतली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा खालचा सारा प्रेक्षागृह त्या गीतांना दाद देत माना आणि हाताने ताल देत डोलत होता.
राजेंद्र दूरकर (तबला), जयंत साने (हार्मानियम) आणि दर्शना जोग (सिंथेसायझर) यांनी गीताला साज उत्तम देऊन गाणी अधिक श्रवणीय केली.

मात्र वेगळेपण उमजले ते गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांचे. त्यांची ओघवती भाषा. जीवंत अनुभव. त्यातून गदीमांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची गुंफण . एवढेच नव्हे तर गीतरामायणातल्या त्या त्या गीताला पुरेसे पोषक भाष्य. सारेच अप्रतिम आणि सहज. यातून स्त्रीची वेदना, तीचे अबोल श्रम आणि आपल्या आईने गदिमांना दिलेल्या साथीचे यथार्थ दर्शन उलगडत त्यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवविले.

मध्यंतरात `नामाची आवडी` या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ्य़ पत्रकार अनंत दिक्षित यांच्या हस्ते करुन एक वेगळा आनंद रसिकांना देऊ केला. प्रा. मिलिंद जोसी यांनीही जयश्री कुलकर्णींच्या गायनातल्या तयारीचे कौतूक करुन गदिमा महती आळविली.

एक वेगळा गान-आनंदाचा सोहळा अनुभवताना रसिक यात पूर्णपणे दंग होऊन गेले. गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रात विविध गाण्यांनी रसिकांचा परिचित असलेल्या या गायिकेने स्वतःचे वेगळेपण यातून सिध्द केले.




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, March 4, 2012

कोश ४५३ संगीतकारांचा

नावाजलेल्या तब्बल ४५३ संगीतकाराचा समावेश असलेला कोश तयार झाला आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संगीतकारांवर अशा प्रकारचा कोश प्रथमच तयार झाला आहे. त्याचे प्रकाशन प्रभाकर जोग, अशोक पत्की आणि आनंद मोडक या तीन संगीतकारांच्या उपस्थितीत शनिवारी झाले.

प्रतीक प्रकाशनातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी कोशाचे लेखक मधू पोतदार आणि अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे उपस्थित होते. पत्की म्हणाले, 'कोश तयार करणे हा कटकटीचा विषय आहे. पण, तो पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. इतिहास समजण्यास कोश उपयोगी ठरतात.''

मोडक म्हणाले, 'ध्यास, कामावर निष्ठा आणि उत्तमतेची निष्ठा असेल तरच असे कोश तयार होऊ शकतात. कोश काही वर्षांत तयार होत नसतात, त्यासाठी आयुष्य वेचावे लागते.'' पोतदार म्हणाले, 'एका-एका संगीतकारावर पूर्ण ग्रंथ लिहावा, इतक्‍या ताकदीचे कलावंत मराठी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. त्यांची दखल योग्य वेळी घ्यायला हवी.''