subhash inamdar

subhash inamdar

Friday, April 26, 2013

शिवचरित्रातून आपण काय घेतले...?

 शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे य़ांचा सवाल..



गेल्या काही वर्षात मी १० ते साडे-दहाहजार व्याख्याने शिवचरित्रावर दिली. मात्र आज मला असे वाटते की, लोकांनी ती करमणूक म्हणून ऐकली. टाळ्या दिला. प्रसंगी जयजयकार केला..छत्रपती शिवाजी की जय..आणि त्यांच्या कर्तृत्वाची नोंद केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात दिली..अश्वारूढ पुतळे पुण्यात सात आहेत..
पण त्या शिवचरित्रातून आपण काय घेतले...

आज मी व्यथित आहे. मध्यतरी मी इंग्लंडला गेलो असताना विल्स्टन चर्चिलचा पुतळा तुमच्या देशात नाही..असा प्रश्न माझ्या इंग्रजी मित्राला विचारला..त्याने काही काळ थांबून सांगितले...चर्चील आमच्या रक्तात आह..पुतळ्यांची गरज काय...

आज मला ते आठवते कारण...आज रोज टीव्ही आणि वृत्तपत्रातून लहान मुलींवर बलात्काराच्या बातम्या दिसतात. काय चालले आहे हे..तुम्हाला आणि मलाही पेटून उठावे वाटत नाही...
काय घेतले तुम्ही शिवचरित्रातून केवळ करमणूक करुन घेतली.

आज मला स्वतः बद्दलही चिड येते..आणि मी फुकट उतकी वर्षे वाया घालविली असे वाटते.

आपण फक्त शिवाजी महाराजांच्या गुणांची चर्चा करतो. त्यांच्या मोगलांशी केलेल्या लढाया पाहताना त्यांच्या धाडसी वृत्तीला दादा देतो.

मात्र, प्रत्यक्षात आपल्याला चंगळवाद आवडतो. अशी आपली वृत्ती असेल तर आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल?
पुतळे उभारून आणि जयजयकाराच्या घोषणा देऊन आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी शिवचरित्राचे वेड आपल्या रक्तात भिनण्याची आवश्‍यकता आहे.

माझी व्याख्याने लोकांनी करमणूक म्हणून ऐकली. त्यामुळे त्यांचा आणि माझा वेळ वाया गेला, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, शिवचरित्र वाचून किंवा ऐकून आम्ही नेमके काय मिळवले याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी श्रीनिवास कुटुंबळे लिखित, "विधाता हिंदवी स्वराज्याचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते खूपच व्यथित झाल्याचे दिसत होते. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


त्यावेळी त्यांनी काढलेले शब्द आजही मला आठवतात..तसेच्या तसे देण्याचा मी यत्न केला आहे....आपण सर्वजण याचा विचार कराल अशी अपेक्षा करतो..




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 22, 2013

संधीकाली रमणा-या त्या तीन यात्रा..

अगदी उन्हाळा असला तरी पुणेकरांसाठी सुखद असा हा काळ आहे. सध्या तापमानही ३६ पर्यत असते..रात्री तर थंडीही जाणवते..त्यातच भर म्हणजे संध्याकाळचे सुरेल वारे..
त्यातही अधिक सुखावह काळ म्हणजे रोज नवेनवे सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या डेव्हीड ससून वृध्दाश्रम चालवीत असलेल्या निवारा संस्थेने (१८६५ मध्ये पुणे येथे "डेव्हिड ससून इन्फर्म असायलम' ही संस्था स्थापन झाली. ही संस्था "निवारा' या नावाने आजही वृध्दांसाठी मदतकार्य करते आहे. )मराठी भावसंगीताची वाटचाल हा एक सर्वांना आवडेल असा भावगीतांचा नजराणा पेश केला.
`स्वरानंद `संस्थेने आपल्या अपर्णा संत, संजीव मेहेंदळे या दोन गायकांच्या संगतीत अरुण नूलकरांच्या निवेदनातून रंगत नेलेला हा कार्यक्रम रंगला..तो पराग माटेगावकर, अनय गाडगीळ, राजेंद्र साळुंखे आणि राजेंद्र दूरकर यांच्या दमदार साथीमुळे. तुडुंब भरलेल्या निवाराच्या सभागृहात वन्समोअरची अनेक गाणी मराठी चित्रपटांची ती जुनी मोहिनी किती होती याची साक्ष पटविणारी होती.
अपर्णा संत यांच्या  सुरेल आवाजाची जादूच या कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिक पडल्याचे प्रतिसादातून दिसते होते.
काही रसिकांनी दूरकरांच्या ढोलकीच्या नादावर फिदा होऊन दौलतजादाही उधळली.

`राजा माणूस ......

राजा परांजपे जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे एक से एक चित्रपटाची उधळण होत असताना..२१ एप्रिलला `राजा माणूस`या अनिल बळेल लिखित आणि स्नेहल प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन अवघे ८८ वर्षांचे तरुण नायक रमेश देव यांच्या हस्ते ऐतिहासिक केसरी वाड्याच्या सभागृहात झाले.
राजा परांजपे यांनी आपल्याला कुंभाराच्या मडक्याप्रमाणे घडविले असे अभिमानाने सांगणारे आणि ज्यांच्या नावातच राजा असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या आठवणींने हेलावत समारंभ फुलत गेला.

रेसकोर्सवर राजा परांजपे यांची पहिली गाठ कशी पडली याचे साद्यंत वर्णन ऐकवून राजा परांजपे यांच्या पुस्तकाचे नाव देव माणूस असायला हवे..असे सांगून त्यांनी माडगूळकर आणि बाबुजी यांच्यात सुवासिनी चित्ररपटात कसे भांडण लावून ..दिवसामागू दिवस चालेले ऋतू मागूनी ऋतू..जिवलगा कधी रे येशील तू..हे अजरामर गीत कसे तयार झाले याची आठवण रंगवून सांगून राजा परांजपे हे दिग्दर्शक तर मोठे होतेच पण माणूस म्हणूस किती श्रेष्ट होते  याचे दर्शन घडविले.
रविन्द्र घाटपांडे यांनी राजा परांजपे यांच्या चित्रपटातल्या दोन गीतांना संपदा थिटे आणि  हेमंत आठवले यांच्या आवाजात सादर करुन त्या काळाचल्या चित्रपटांची आठवण करुन दिली.

वाहवा..क्या बात है..



आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे..
 किंवा

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे ..
जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे..


हे लिहणा-या कवी रमण रणदिवे यांच्या `स्वर चांदणे ` उमलविणा-या मराठी गझल रुजविणा-या कवीत ज्यांचे नाव सुरेश भट यांनी  पुढे आणले त्या या कवीच्या प्रतिभेचा आविष्कार...रंगला तो सोमवारी एस एम जोशी सभागृहातल्या रसिकांच्या साक्षीने.
हल्ली कलाकारांचेही मार्केटींग करावे लागते...पण ते न जमणारे दर्जदार कवी यांना आवलाच कार्यक्रम करण्यासाठी कांही मित्रांना गळ घालून तो घडवावा लागतो..ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...


उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे.  त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. गेली ४० वषेर् ते एका श्रद्धेने कविता आणि गझला लिहीत आहेत.


राजेश दातार आणि प्रियल साठे यांनी त्यांच्या गझलांना इतके सुरेल पेश केले की त्यातले शब्दन् शब्द सूरमयी पैठणी नेसून रसिकांच्या मनात घर करुन राहिले..संपल्यावर टांळ्यांच्या कडकडाटात आनंदही व्यक्त केला.
 


मात्र तरल.स्पर्शून जाणा-या शब्दांना मानणारे संगीतकार आणि त्यांच्या गझलांचे चाहते तरुण संगीतकार कौशल इनामदार यांची हजेरी..


केवळ उपस्थित नाही तर त्यांच्या दोन रचनांना अतिशय सुरेल असे सादरीकरण करुन रमण रणदिवेच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन घडविले.
खरं तर हा सारा खेळच रणदिवे कुटुंबीयांनी रंगला...हार्मोनियमवर होते मेकॅनिकल इंजिनीअर असलेले एक पुत्र आणि दुसरा मुलगा  अतिशय उत्तम तबला साथ करत होते.




स्वतः संगीताचे ज्ञान असेलेल्या रमण रणदिवेंच्या रचना यामुळेच छंदबध्द होत असतील. त्यांना सुरातच शब्द सुचत असतील... विनय़ा देसाई यांनी या गझलकाराला बोलते केले आणि मुक्त छंदातल्या काही रचना त्यांच्या कडून आठवून सादर करायला भाग पाडले. तसे ते पेटी घेऊनच बोलत होते म्हणूनच एका गझलेची प्रचिती त्यांच्या आवाजातही ऐकायला मिळाली...आणि शब्द आले..वाहवा..क्या बात है..

आज जे सुरांचे चांदणे रसिकांनी टिपले तसे त्यांच्या रचनांचे अनेक कार्यक्रम व्हायला हवेत...आणि ते होतील याची खात्री वाटते.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Saturday, April 20, 2013

पाडवा ते रामनवमी सांस्कृतिक महोत्सव..

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता .
त्यात पहिल्या दिवशी गीत रामायणाने महोत्सवाची  सुरवात झाली. तो सादर केला दता चितळे यांनी..... सौ. मृणालिनी चितळे यांच्या निवेदनाने कार्यक्रमात गदीमांच्या गीतरामायणातली एकेक गीते उलगडू लागली..तुषार रिठे, प्रार्थना पटवर्धन, पूजा गाजरे या गायकांची संगत आणि चारुशीला गोसावी, श्रीरंग चासकर आणि अनघा वैशंपायन याच्या साथीने लक्षात राहणारा आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला.
 
दुसरा दिवस केदार मोरे यांचा वाद्यवृन्द जुन्या नव्या हिंदी गीतांचा रंगारंग नजराणा "जल्लोष २०१३" गायक हिम्मत कुमार पंडया, सुजित सोमण ,मंजुषा देशपांडे, ह्यांच्या  गायनाने व केदार मोरे,मंदार देव , अभिषेक काटे ह्यांच्या वादनाने गाजवला . 

तिसरा दिवस हा सदानंद चांदेकर ह्यांच्या "हसरी उठाठेव " ह्या अप्रतिम एकपात्री प्रयोगाने साजरा झाला.

चवथा दिवस सौ .चारुशीला गोसावी यांचा "व्हायोलिन गाते तेव्हा " हा कार्यक्रम होता. तबला –रविराज गोसावी, सिंथेथायजर -अमृता ठाकुर देसाई तालवाद्य - राजेंद्र साळुंखे व निवेदन सुभाष इनामदार यांच्या साथीने लक्षात राहणारा अप्रतिम आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला .

पाचवा  दिवशी "स्वरांजली" हा मराठी भावगीते, भक्तिगीते, ग़जल गीतांचा कार्यक्रम होता. सौ.सई पारखे,उमेश साळुंखे ,कल्याणी  शेटे यांचे दमदार गायन तबला-महेश साळुंखे ,सिंथेथायजर- किशोर कांबळे देसाई,बासरी - अजरुद्दीन शेख यांची बहारदार वादन साथ यामुळे रंगत गेला.
 
सहावा दिवस शिल्पा  नृत्यालय ट्रस्ट यांचा कथक  नृत्य अविष्कार  "परिक्रमा " हा देखणा कार्यक्रमास  रसिकांनी प्रचंड दाद दिली  त्यानंतर रत्नाकर शेळ्के डान्स अकादमीचा वेस्टर्न डान्स परर्फोर्मन्सेस सादर  करण्यात आले  
 
सातवा दिवस महिलांचे पारंपरिक खेळ शर्वरी दाते व १५ महिला सहकारी यांचा " जागर चैत्रागौरीचा " अतिशय पारंपरिक महिलांच्या खेळाची माहिती करून देणारा  देखणा नृत्य अविष्कार .
 
आठवा दिवस ख्यातनाम जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला संत रामदासांच्या जिवनावर आधारित रचनांचा " रामदास गुणगान " हा कार्यक्रम सादर झाला.  लवकुश रामायण गाती ह्या गीतानी कार्यक्रमाची सुरवात झालि या कार्यक्रमात कानडा राजा पंढरीचा, खेळ मांडियेला, दशरथा घे हे पायसदान,पायोजी मॆने, रामा रघुनंदना त्याचप्रमाणे यासारखी एकापेक्षा एक सुमधुर गीते व डॉ.राहुल देशपांडे यांनि स्वरबद्ध केलेल्या व जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या " रामदास गुणगान " या सिडी मधील गीते श्री राहुल घोरपडे, सौ धनश्री गणात्रा, श्रीपाद भावे यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ.राहुल देशपांडे यांनी केले .

याच कार्यक्रमात "रामदास गुणगान" या सिडिचा प्रकाशन समारंभ  "मनोरंजन पुणे" चे श्री मनोहर कुलकर्णी यांचे शुभह्स्ते संपन्न झाला. यातील गीते डॉ.राहुल देशपांडे यांची असुन याला जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केले आहे व या सीडीमधील १० गाणी असुन ह्या गाण्यांना गायक रविन्द्र साठे ,सौ धनश्री गणात्रा,श्रीपाद भावे यांनी स्वरसाज चढविला आहे . संगीत संयोजन योगेश तपस्वी यांनी केले असून निवेदन राहुल सोलापूरकर यांचे आहे.

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता.

रामनवमीला या "संगीत ,नाट्य,नृत्य " सांस्कृतिक महोत्सवाची सांगता स्थानिक  कलावंताच्या  कला -प्रदर्शनाने झाला यामध्ये की-बोर्ड वादन,गायन यामधे सौ .ललिता  मुळे, सौ.रेखा धंदरे कु.समृद्धि सोलंकी,कु निहारिका कदम,प्रीटी देशपांडे  ह्यांनी गायन व कु. याना निबजिया ,कु मिली  निबजिया,शॊनक देव ,यश धोका ,यांनी  की बोर्ड वादन  प्रकारात आपले कौशल्य दाखिवले  यानंतर  लहान  मुलांच्या    "झाली काय गम्मत"   या सई परांजपे लिखित नाटकाचा प्रयोग  समावेश होता.यामधे कु. सिद्धि पारखे,कु.अंजोर खोपड़े  ,कु. रुतुजा मोरे , कोमल डिकोळे,श्रुष्टि जगताप ,रिया चव्हाण ,कश्मीरा कोपरे,प्रीटी देशपांडे, शॊनक देव ,देवयानी तोष्णिवाल,नरेंद्र डिकोळे ,पद्मजा डिकोळे,शंतनू कदम,नंदिनी तोष्णिवाल,दुर्वा चोपड़े,अंतरा महाजन या बालकलाकाराचा सहभाग होता या नाटकाचे दिग्दर्शन सौ.प्रतिभा पारखे  व संगीत  सौरभ पारखे यांनी केले होते.

या कलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले व चित्रपट अभिनेते श्री. सुनील देव उपस्थित होते . या प्रसंगी  युवा संदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पारखे यानी आभार मानले . हा  महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशांत डिकोळे,ओमप्रकाश जैन ,पंकज कुलकर्णी , अविनाश चोपडे , अभिजित रानडे , भालचंद्र जोशी,प्रियदर्शी नरंजे, सतीश काळे,प्रमोद मोहिते ,महेश लादे ,कृष्णा मेहकरे ,विठ्ठल संगमे या कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.