subhash inamdar

subhash inamdar

Thursday, December 12, 2013

पुणेकरांच्या साक्षीने स्वरयज्ञाचा आरंभ

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी सुरु केलेल्या आपल्या गुरुंच्या नावाने केलेल्या स्वरयज्ञाला गुरुवारी पुण्यात तेवढ्याच दिमाखात हजारो संगीत रसिकांच्या साक्षीने सुरवात झाली..सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव असे नामकरण करुन दोन्ही महान गुरुंचे स्मरण होते.
आता ते सारे दिग्गज संस्थापक नाहीत पण तरीही ही स्वर ज्योत अनंक हस्तांनी पुढे प्रज्वलीत होत तेवत रहाते..मानाने आणि तेवढ्याच ताकदीने.
यंदाचे याचे वर्ष आहे ६१..साठीतून पुढे जाभन आता खरी प्रगल्भता सारीकडे दिसते आहे..आता या महोत्सवाला वलय आमि वैभव दोन्ही मिळत आहे..ती सारी पुण्याई पं. भीमसोन जोशी या दृष्ठ्र्या गायकाच्या दिव्य दृष्टीची.
आता त्यांच्याबरोबरीचे कोणीच संस्थापक सदस्य फारसे दिसत नाहीत.

पण एक जातकुळीने पत्रकार पण संगीताच्या या प्रवाहात त्यांच्याबरोबरीने साथ करणारे वयोवृध्द जाणकार नाव म्हणजे रामभाऊ जोशी..आज त्यांनी ९३ वर्षात पदार्पण केले आहे..काल त्यांच्या सत्कार खास करुन या स्वरमंडपात झाला...त्यांना मायेची शाल पांघरली गेली..
त्यांना आता केवळ शब्द पुरे आहेत. स्नेह  हवा आहे..त्यांनी सवाई गंधर्व महोत्वसासाठी घेतलेले व्रत सर्वांना माहित व्हायला हवे आहे..
काल त्यांना खास मंडपात आमंत्रीत केरून त्यांचा सत्कार श्रीनीवास जोशी यांनी केलाच...

त्याबरोबरच. सवाई गंधर्वांची नातसून सौ. पद्मा देशपांडे यांच्या २८ रांगावर आधारीत स्वरपद्मा ही सीडीही प्रकाशीत केली गेली..
यावेळी आपली आठवण ठेवल्याबद्दल रामभाभ जोशी यांनी समाधान व्यक्त केले.






कालचा दिवस गाजला तो जसरंगी जुगलबंदीने..सौ. अश्वीनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या दोन भिन्न रागातल्या मजेशीर बंदीशींच्या सुरांवटींमुळे. एक सप्तकात तर दुसरा खर्जात असा दुहेरी सुरांचा सुस्वर स्वरबहार रंगवत त्यांनी वेगळीच आर्वतने सावरमंचावर सादर करून बहार आणली..

निषाद खॉ यांनी सतारवादनात वेगवेगळी स्वरआवर्तने सादर करुन त्यात चमकृती आणण्याचा सुंदर प्रयत्न रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्विकारला..त्यांना कलकत्त्यांचे निष्णाद तबला नवाज आनंदो चटर्जी यांनी जी बेमालून साथ केली तीही विस्मरणीयच होती...

अखेरीस पं. जसराज यांचे स्वरमंचावर आगमन होत आहे अशी निवेदक आनंद देशमुख यांनी घोषणा केली आणि तमम रसिकांच्या टाळ्यातून दाद मिळत गेली...त्यांचे माफक गायन मंचाला एक झळाळी प्राप्त करुन देणारे ठरले..पण आता त्यांच्या स्वरात तो पूर्वांचा जोश नसल्याचे रसिकात बोललो जात होते...

सवाई गंधर्व महोत्सव आणि आनंद देशमुख यांचे रसभरीत आणि उत्स्फूर्त निवेदन हे एक समीकरणच झाले आहे.
निवेदक आनंद देशमुख यांचे हे २५ वर्ष सलगपणे निवेदन करण्याचे रेकॉर्ड गिनिज बुकात नोंद घेण्याजोगे आहे..त्यांच्या निवेदनात कुठेही खास शब्दावरचा दाब वाही..आब राखून अतिशय विनम्रपणे ते माहीती देतात...त्यांच्या या खास निवेदनाला एका वेगळ्या खर्जीची धार आहे..यंदाचे हे एक अणखी आकर्षण चारही दिवस एेकायला मिऴणार आहे..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276