subhash inamdar

subhash inamdar

Friday, March 11, 2011

कणखर आणि कोमलता म्हणजे कुसुमाग्रज

अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावरचा कार्यक्रम त्यांच्याच स्मृतींना उजाळा देउन केला गेला. ज्ञानपीठ विजेते वि. वा शिरवाडकर साहित्यिकांच्या अभ्यासक डॉ. माधवी वैद्य यांनी स्वतःच्या कुसुमाग्रजांच्या आठवणींनी पुन्हा एकदा जागृत केले. त्यांच्या मते कुसुमाग्रजांच्या आठवणी बकुळीच्या फुलासारख्या आहेत. आपण सहजच त्या सुगंधांचा दरवळ मनात घेत रहातो.
यातून उमजलेले कणखर आणि तेवढेच कोमल कुसुमाग्रजांमधील काही कट्ट्यावरून घरी आलेले काही मुद्दे-
-          कवीचे शब्द बदलण्याचा हक्क बदलण्याचा कुणालाच नाही, ह्या ठाम मताचे कपसुमाग्रज.
-          अत्यंत स्वागतशिर व्यक्तिमत्व.
-          तात्यासाहेबांच्या घरी दरबार रोज भरत असे. यात कवी, कलावंत, साहित्यिक, विद्यार्थी यांचेबरोबर माळी, रिक्षावालेही असत.
-          नाशिकला त्यांनी सांस्कृतिक, साहित्यिक रूप दिला. नाशिकनेही त्यांना आपले मानले.
-          त्यांचे आयुष्य म्हणजे आळवावरचे पाण्यासारखे थेंब..सगळ्यात असूनही कशातच नसल्यासारखे.
-          त्यांचा सहवास..त्यांचे घर म्हणजे देवघरासारखे...जिथे तुम्ही सहजच नम्र होता.
-          त्यांना पाहिल्यानंतर आपलं दुःख, वेदना सहजपणे हरपून जायचे.
-          ओळखलतना सर मला..या कवीतेचा खास उल्लेख... त्यांच्याकडून अनेकांनी आशिर्वाद घेतले.
-          पाठीवरती हात ठेऊन..तुम्ही फक्त लढ म्हणा..हा मेत्र मनसेचे राज ठाकरे यांनाही भावला.. त्यांचे आशिर्वाद...
-          माती आणि आकाशाशी संवाद साधणारे शब्द-भावनांचे नाते ते आपल्या लेखनात फार वेगळे व्यक्त करीत असत.
-          त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास होता.
-          कणखर आणि तेवढेच कोमल असे त्यांचे लेखन आणि व्यक्तित्वही होते.


आज कुसुमाग्रज वेगवेगळ्य़ा घटनांमधून व्यक्त झाले. पुण्यातल्या बाजीराव रोडवरच्या बुक गॅलरीच्या सुंदर पुस्तक दालनासमोर..अक्षरधाराच्या कट्ट्यावर... वाचकांची गर्दी फार नव्हती..पण होते माजकेच साहित्यप्रेमी.
आजुबाजूच्या परिसरातही त्यामुळे आपोआपचा साहित्याचा दरवळ पसरला गेला. आत येण्याचे न लक्षात येणारा श्रोता बाहेर उभा राहून कोण काय बोलतोय हे टिपत होता. तसा बाहेर  उभा राहूनही तो हा अनुभव घेत होता.
पिंपळाच्या पारावर..पायरीवर अंथरलेल्या बैठकीवर बसून आज तो कुसुमाग्रज अनुभवीत होता..
उद्या दुसरा कोणी... नक्कीच या उपक्रमाला वाचक प्रतिसाद मिळेल..तो साहित्यिकांना आणि वाचकांनीही खेचून आणेल...राठिवडेकर बंधूंना शुभेच्छा....


करीन म्हणतो सेवा...वाचकांची
त्याला देईन म्हणतो..शब्द..जगण्यासाठी
जिवन अधिक सुंदर करण्यासाठी
वाचायला लावेन... वाचकांना
बोलते करेन लेखकाला...त्याच्या भावनेला
करीन की संसार..
हाच..
पुस्तकांचा....प्रदर्शनाचा
आहे की नाही हा छान उपद्व्य़ाप !

सुभाष इनामदार, पुणे.
Mob- 9552596276