subhash inamdar

subhash inamdar

Monday, March 26, 2012

ग्रेस सरांची एक आठवण-चंद्रशेखर गोखले


सांगावीशी वाटते... आमची प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधी आला नाही पण त्याना कायम माझी खबरबात कळायची, त्याची सूरूवात झाली ते मी `सामना`त सदर लिहायला लागलो तिथपासून, म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी...माझा एक मित्र मला `सामना`मधे घेऊन गेला आणि माझं पान नावाचं एक सदर मी दर शनिवारसाठी लिहायला लागलो.

अल्पावधीतच ते सदर अपेक्षेपेक्षा लोकप्रियं ठरलं मग ज्याला मी माझा मित्र समजत होतो त्यालाच
त्याचा त्रास व्हायला लागला. थोडक्यात पोटात दुखायला लागलं आणि घाणेरडं राजकारण करून त्याने माझं सदर
परस्पर रद्द करून टाकलं.

त्या नंतर एकदा ग्रेससर राऊत साहेबांना भेटले तेंव्हा त्यानी आवर्जून माझ्य़ा सदराबद्दल विचारलं म्हणाले का बंद केल? फार वेगळं लिहित होते ते वगैरे वगैरे.. राऊत साहेबानी मला हे आवर्जून सांगितलं आणि पून्हा मी `सामना`मधे नियमाने लिहायला लागलो...नंतर माझा कथासंग्रह आला मनोगत, तेंव्हाही ग्रेस सरानी संग्रह वाचल्यावर मला लगेच निरोप पाठवला कथा वाचल्या आवडल्या... पवईला आम्हा दोघाना शेजारच्याच इमारतीत सदनिका मंजूर झाली होती सात वर्ष आम्ही तिथे राहिलो पण तरी भेट झाली नाही पूढे आम्ही ते घर विकून चारकोपला स्थाईक झालो आणि काही दिवसातच मेहेंदळे सरांबरोबर निरोप आला चारकोप आवडल का?

मी हो म्हणत त्याना आगत्याचं घरी यायचं निमंत्रण दिलं ... पण योग नव्हता... गेला आठवडा मी आणि उमा
" वा-याने हालते पान"या त्यांच्या संग्रहाचे पारायणच करतोय...
भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे पठडीतली भाषा त्याना रुचायची नाही...त्यांचं स्मरण हिच त्याना श्रद्धांजली ठरेल..

विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी

स्वतःच्या कोषात दंग राहून विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी-माणूस . ग्रेस.


दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.

ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.

आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.

त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...

आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.

त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..

आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...

त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...

मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...

ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276