subhash inamdar

subhash inamdar

Monday, March 7, 2011

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ साकार

`कोकण विविध दिशा आणि दर्शन` पुस्तकरूपी

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!

अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?
ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.
हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे.  माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..
असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.


आता कार्यक्रमाकडे वळताना...
`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.
सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते. यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
 and