subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, November 15, 2017

नादरूपच्या नृत्याविष्काराने रसिक भारावले



अनेकदा कलाकारांच्या सत्कार समारंभानंतर त्यांचे कलेतील स्थान आणि त्यांनी केलेले कर्तुत्व दाखविण्यासाठी रंगमंचीय आविष्करण केले जाते..पण मिडीयामध्ये सत्कार समारंभाची दखल घेतली जाते..पण ज्या कलावंतांनी मेहनत घेऊन नंतर केलेले सादरीकरणाचा फक्त एका वाक्यात उल्लेख होतो..ते त्या कलावंताच्या कलागुणांना काही प्रमाणात मारक ठरते..तारक नाही..





रविवारी टिळक स्मारक मंदिरात गानवर्धनच्या वतीने ख्यातनाम कथ्थक गुरू शमा भाटे यांना डॉ. विजया भालेराव पुरस्कार नृत्यगुरू सुचेता नातू यांच्या हस्ते दिला गेला..सन्मान समारंभानंतर  `नादरूप `,या शमा भाटे यांच्या नृत्यालयामार्फत त्यांच्या शिष्यवर्गाने जो अविस्मरणीय आनंद दिला त्याची नोंद एक रसिक म्हणून घ्यावीशी वाटली.





पंडिता रोहिणी भाटे यांच्या शमा भाटे ह्या नात्याने सून. पण मला रोहिणी भाटे य़ांच्या पहिल्यापासूनच्या शिष्यात गणल्या जातात. डेक्कनवर पूर्वीच्या कॉफि हाऊसच्या मागे रोहिणी भाटे यांचा नृत्यवर्ग.तर टिळक रोडवर शमा भाटे यांची `नादरूप `ही संस्था कथ्थक थडे देणारी संस्था..काळओघाप्रमाणे रोहिणीताई गेल्या आणि त्यांचे अस्तत्व नादरूपने मनोमन जपले..ते आपल्या शिष्यवर्गाच्या उत्तम सादरीकरणाने काल पुन्हा एकदा सिध्द झाले.

त्या बोलतात त्या आपल्या कलेतून आणि विद्यार्थ्यांच्या कलेतून..
काल प्रेक्षागृहात दर पाच मिनिटांनी टाळ्यांचा नाद घुमत होता..याचे सारे श्रेय जाते.ते शमा भाटे यांना आणि त्यांच्या उत्तम तयारीने सादर केलेल्या शिष्यवर्गाला.



नादरूपच्या वतीने अर्पिता पाटणकर यांनी सुजाता नातू, शमा भाटे आणि उपस्थित सर्व रसिकांचे स्वागत करताना जी मने जिंकली..ती पुढच्या सर्व कार्यक्रमाची नांदीच होती. नृत्यकार्यक्रमाची सुरवात भगवान शंकरांचे वर्णन असणारा शिववंदना सादर करून..



रंगमंचावर उत्तम रित्या दर्शन घडवून खिळवून ठेवणारी हालचाल करत रसिकांची मने जिंकली. सादर केलेल्या सगळ्याच मोहक रचना..त्याचा सामूहिक आविष्कार आणि आपल्या उत्तम आणि प्रसन्न आविष्काराने रसिकांची पावती मिळविली.


पुढे ताल रुपक..नंतर केदार चतरंग...कालिया थाडे आवे मोहन..अर्थात कालिया मर्दन सर्व नर्तकांचा सुंदर आविष्कार पहाणे एक मन प्रसन्न करणारी गोष्ट होती.



द्रुत तिनतालात काही शिष्यांनी  आपल्या तरल अशा नृत्याविष्कारातून केलेली नृत्य आराधना किती प्रगल्भ होत गेली आहे याचे प्रतिक देत होती. हाताची मोहक हालचाल..गिरक्या, पदन्यास आणि केवळ  पायातल्या घुंगरातून साधलेली तपळाई.. सारचे कौशल्य दाखवित होती.


समुद्रमंथन  करणारा सर्व कलावंताचा आविष्कार केवळ अनुभवणे महत्वाचे होते. एकमेकांच्या उत्तम संगतीने तो सादर होताना..त्याला लाभलेली संगीत आणि  गायनाची साथ अंगावर रोमांच ऊभे करीत होती.


शेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील लालित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते.





अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, कृपा तेंडूलकर, भार्गवी सरदेसाई, इषा नानल, निखिल परमार, निकिती कराळे, गिरीश मनोहर


या नृत्यनिपुण कलाकारांचा सहभाग होता. यात प्रत्येक कलाकाराचे योगदान तेवढेच मोलाचे होते.


त्यांच्या उत्तम गुणग्राहक कालाविष्काला प्रत्यक्षात आणणारे शमा भाटे यांच्या सारखे गुरू हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे खरे पाईक..त्यांनी आपली सांस्कृतिक परंपरेची विरासत आपल्या खांद्यावर मोठ्या हुकमतीने पेलली आहे..हा कार्यक्रम याचेच ठळक उदाहरण होताशेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील सासित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते.


गानवर्धन संगीत , संगीतावरची चर्चा आणि नृत्यकलेलाही किती महत्व देते ते अशा कार्यक्रमातून ठळकपणे सिध्द होते.



- सुभाष इनामदार, पुणे
9552596276


Wednesday, November 8, 2017

नवोदितांचे पथदर्शक प्रा. प्रकाश भोंडे



मित्रवर्य प्रकाश भोंडे,

आपल्या सत्तरीच्या निमित्ताने शनिवार अकरा नोव्हेंबरचे स्नेहमय आमंत्रण मिळाले आणि माझ्या मनातील आपल्या विषयीच्या विचारांचे मंथन सुरू झाले.. आपल्या तरतरीत आणि लोभस व्यक्तिमत्वाने पुण्यातील सांस्कृतिक मंच नेहमीच उजळून निघाला आहे..

स्वरांनंद...या संगीत क्षेत्रातल्या नवोदित कलावंतांना आपल्या संस्थेच्या मंचावरून अनेक वार आपली कला सादर करता आली..करताहेत..

हौसेतून हा छंद आपण जपला.. स्वरांनंद उभी केलीत..जोपासली..वाढविली..आणि वेळोवेळी नव्या विचारांचे मार्गदर्शक मिळविलेत..त्यांची गाणी ..त्यांच्या कविता..रसिकांना ऐकविल्यात..मोहून तृप्त केलेत..आपल्या सत्तरीच्या पर्दापणाबरोबरच स्वरांनंदचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे..हे आपले सौभाग्य आणि रसिकांचे भाग्य..



ऐन उमेदिच्या काळात भरपून मेहनत घेउन स्वरांनंदची टूर महाराष्ट्रभर काढलित..त्यांचे नियोजन आणि संयोजन उत्तम केलेत. नेवे गायक..वादक..संगीतकार..कवी हेरून त्यांच्या गीतांना आपल्या संस्थेमार्फत मराठी रसिकांसमोर सुंरेलपणे पोहचवलेत..आपली आवड, मंतरेलेल्या चैत्रबनात, बाबुजी, गदिमा, पुल, पाडगावकर, खळे काका, यशवंत देव..अशा संगीतकारांची गाणी नव्या पिढीकरून घोकून घेउन रसिकांना हा सुरेल नजराणा अनेक ठिकाणी बहाल केलात..

आपण केवळ स्वरांनंदचा संसार मांडलात, थाटलात..आणि सजविलात. आपले हे कर्तृत्व मराठी रसिक विसरू शकणार नाही..हे ही तितकेच खरे..

खरेतर आपण वाणिज्य विषयाचे अध्यापक..पण बी एम सी सी च्या नोकरीत रस घेऊन..मुलांना धडे दिलेत..पण चाकरी बजावतानाबी मनातला ताल कायम सांभाळलात.. प्राध्यापकी करताना विद्यार्थी घडविलेत.. त्यांना सुयोग्य मा्रगदर्शन केलेत..

आपण नकालाकार भोंडे यांचे नातू..त्यांची नकला करण्याची पंरपराही आपण जपलीत.. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या आवाजातील नकला करण्याचे कौशल्य आम्ही जाणून आहोत..



आपण गात नाही..काही वाद्यही वाजवित नाहीत..पण आपण संगीताची सेवा करणारी स्वरांनंद ही संस्था चालविता..आधी बिज एकले..सारखे आधी सारे पुण्यात सादर करायाचे मग त्यात सुधारणा करून ते इतर शहरात न्यायचे.. ही किमया स्वरांनंदच्या मार्फत आपण केलीत.




आपल्या व्यवस्थापनातून..स्वरांनंदचे नाव..बोलते केलेत..आणि अनेक उपक्रमांना आपण आपले मोलाचे सहकार्य करता..अनेकांचे आपण सल्लागार बनता..त्यांचे उपक्रम अधिक रुजावेत..त्यांची दखल घेऊन अनेकांना ते सादर करण्यासाठी उपकृत करता..

भोंडे कॉलनीतले आपले अस्तित्व आज उणीपुरी सत्तर वर्ष टिकवून ठेवलेत..आपल्या स्वभावाने अनेक कलावंतांचे पहिले कार्यक्रम तुम्ही केलेत..त्यांना प्रथम मंच तुम्ही दिलात..पण कुठेही मीपणाचा वास नाही..


आमच्यासारख्या असंख्य मित्रांचे मार्गदर्शक आहात..आपल्या प्रतिसादाने आणि प्रोत्साहनाने आम्हालाही  काही नवे करण्याची उर्मी मिळते ती तुमच्यामुळे..





असाच आमचा हा मार्गदर्शक पथप्रमुख शतायुषी व्हावा..निरोगी आयुष्याची बळकट दोरी घेउन नव्या क्षितीजाकडे झेपावत जावा..हिच सदिच्छा..आपल्यासाराखे मित्र मिळविलेत हीच आमची कमाई..
अशा सगळ्यांकडून आपल्याला सत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभकामना..
शुभंभवतू....



* मंदार जोगळेकरांच्या ग्लोबल मराठी या वेबसाईटच्या निमितात्ताने प्रकाश भोंडे यांनी आचार्य अत्रे यांच्या आवाजात केलेली ही प्रस्तावना..त्या्च्या नकलांच्या प्रदर्शनाचे प्रतिक आहे..ती लिंक मुद्दाम देत आहे..**







-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, October 4, 2017

`मत्स्यगंधा'ला लाभला तरूण कलावंताचा कस्तुरीगंध






संपदा जोगळेकर-कुलकर्णी,नचिकेत लेले,केतकी चैतन्य आणि राहूल मेहेंदळे यांनी संधीचे सोने केले



सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि गुजराथमधील दीडशेहून गायकांच्या मधून नचिकेत लेले आणि केतकी चैत्यन या तयारीच्या कलावंतांची अंतिम निवड करून..संपदा जागळेकर कुलकर्णी आणि संगीत मार्गदर्शक पं. रामदास कामत यांनी घालून दिलेल्या मार्गावर पावले टाकत त्रेपन्न वर्षांनी 

 संगीत `मत्स्यगंधा' 
हे वसंत कानेटकरांचे नाटक रंगमंचावर अवतरले.. 

नाटकाने अनेक कलावंतांना एकत्र करून त्यांच्या कलेला संधी दिली..आणि पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पाहिलेल्या नाटकात त्याचे लखलखीत सोने केल्याची जाणीव पुरती मनोमनी पटली.


धी गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग आणि नाट्यसंपदा कला मंच यांनी संयुक्तपणे पुन्हा रंगमंचावर आणलेले नाटक त्याच आत्मविश्वासाने  रसिकांनी स्विकारले आहे. पदांना मिळणारा वन्समोअरची दाद आणि भिष्मकाच्या संवादाला मिळणारी दाद..सारे काही सांगून जाते.
आपल्या धारदार आणि पल्लेदार संवादानी नटलेले हे महाभारतकालीन युगाची आठवण देणारे नाटक..आणि सत्यवतीला आपल्या नादी लावणारा तो पराशर ऋषी पुरषी अहंकारात आपले वचन विसरतो..आणि हिमालयाचा साधक बनून त्या स्त्रीला कसा सोडून देतो...एकूणच पुरूष अबला असलेल्या सौंदर्य़वतीला मोहात पाडतो..तिच्याशी संबंध ठेवतो..आणि वेळ आली की तिला विसरून निघून जातो..
पण एक महापुरूष असाही असतो..तो आपले राजपद सोडून आपल्या वडिलांसाठी नव्या आईला दिलेला शब्द वचन समजून आपली प्रतिज्ञा अखेरपर्य़त पाळतो..दिलेल्या शब्दासाठी आपले मरणही स्विकारतो..

दोन मानवी शक्तिचे दर्शन घडविणारी ही महाभारतातली पराशर आणि सत्यवतीची ही कथा...आणि शब्दाला जागाणारा तो भीष्म ..या तिन प्रमुख पात्रांवर आधारित हे नाटक कानेटकरांनी अभ्यासपूर्ण उभे केले..त्यातल्या गीतांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेल्या चाली आजही रसिकांच्या मनात रुजल्या आहेत याची प्रतिची नाटक पहाताना त्यापदांना मिळणारी दाद यातून कळते..


संपदा जोगळेकर कुलकर्णींना मुजरा

अनंत वसंत पणशीकर यांनी आपल्या नाट्यसंपदेच्या कला मंचच्या वतिने शब्दांची जाण असणारी आणि रंगमंच भारून कसा जाईल याचा अभ्यास असलेली कसदार अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी हिच्या कल्पनेतून साकारलेल्या या नाटकाच्या रंगावृतीला मान्यता देऊन त्यांच्याच दिग्दर्शनाखाली दोन अडिच महिन्यांची बारा तासांची तालीम घेऊऩ ही मत्स्यगंधा ..देखण्या आणि आकर्षक पध्दतीने रंगमंचावर आणली. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या हातून एक उत्तम कलाकृती रंगमंचावर अवतार घेते यात शंका नाही..त्याच्या कर्तुत्वाला सलाम.

अवघा रंग एकची झाला..या नंतर नाटक जुने असूनही जुन्या परंपरा जपत ही संगीत रंगभूमिची परंपरा लखलखीतपणे पुन्हा उभी राहिली ती या मत्स्यगंधाच्या रुपाने. यासाठी अनंत वसंत पणशीकर यांना रसिकांनी धन्यवाद दिले पाहिजेत.

नेपथ्यासाठी विविध कलामहाविद्यालयाचे विर्द्यार्थी बरोबर घेतले .विकास गावकर यांच्या नेतृत्वाखाली नवा सेट घडविला.. अशाक पत्की यांच्याकडून उत्तम पार्श्वसंगीत तयार करून घेतले..शितल तळपदे यांनी प्रकाशयोजनेवर भर दिला..
सकाळी रामदास कामत यांनी केतकी चेतऩ्य आणि नचिकेत लेले यांच्याकडून पदांतील सहजता स्वरातून कशी येईल याक़डे कटाक्षाने पाहिले.. मकरंद कुंडले आणि केदार भागवत यांच्या साथीने त्या लोकप्रिय पदाची रंगत वाढविली.
संगीत नाटकाला उत्तम साज चढविला. व्यावसायिक परिपक्वता येण्यासाठी सारे काही निर्माण केले..नविन कलावंतांना पुरेसा वेळ दिला..नाटकाची भाषा तोंडात घोळविली . मग त्यांची सोशल मिडीयांतून माहिती देऊन..त्यांची टिमकी मिरवत जाहिरात करून नाटक रंगभूमिवर आणले.
नाटकाचे सरळ सरळ दोन भाग पडतात..एक सत्यवती आणि पारशराचा अधिक सहभाग असलेला पहिला अंक आणि आपल्या वचनाला जागत भिष्मकाने उभारलेले मानवी मुल्यांवर विचार करायला लावणारा दुसरा अंक..
काळा प्रमाणे बदल करत नाटकाची मर्यादा तीन तास केली . काही गोष्टी ध्वनीमुद्रित संवादातून निवेदन करून स्पष्ट केल्या.. पडद्यामागे काही प्रसंग दाखवून काम भागविले.


नचिकेत लेले
 
आजही पहिल्यांदा रंगमंचावर अवतरणारा पराशर म्हणजे निचिकेत लेले जेव्हा टाळ्या घेतो..तेव्हाच नाटकाची निर्मिती आणि त्यातल्या कालवंताची निवड किती योग्य आहे याची रसिक पावती देतात असे वाटते..नचिकेतच्या देवाघरचे ज्ञात कुणाला तर पुन्हा एकदाचा गजर झाला..बालगंधर्वात या नाटकाला शिट्ट्याही मिळाल्या.
केवळ नाटकातली पदे उत्तम सादर करून नट बनू शकत नाही..त्यासाठी हवी अभिनयाची जाणीव..ती पुरेपुर तयारी संपदाने करून घेतल्याने..निचिकेत मध्ये पराशराचा विश्वास आलेला अनुभवता आला..गुंतता ह्दय हे, आणि साद देती हिमशिखरा ही पदे त्यांने प्रेक्षकांकडे बघून उत्तम रंगविली.. इतका उमदा तरुण मराठी कलावंत यामुळे मराठी संगीत रंगभूमीला सापडला..त्याला कायम रंगमंचावर या ना त्या नाटकातच गुंतून ठेवायला हवे..



केतकी चैतन्य
पण जी दिसली छान.. भूमिकेची ताकद ओळखून सत्यवतीला नटविले. आपल्या अभिनयाने नटविले ते केतकी चैतन्य या मूळच्या राजापूरच्या तरूण गायक अभिनेत्रीने. . तिने आपल्या लोभसवाण्या चेहरेपट्टीतून घडविलेली सत्यवती किती सहज काम करते आणि रसिकांच्या ह्दयात कशी पाहोचते ते पाहण्यासाठी तरुण मंडळींनी आणि संगीत नाटक पाहणारे सारे रसिक नाट्यगहापर्यंत यावेत ही अपेक्षा आहे..
 सहज संवाद फेक आणि कसदार गायनाची फवारणी करून तिने रसिकांना मोहित केले.. तिच्या गायनात गोडवा आहे.तिचा चेहराही बोलतो तो डोळ्यातून .  अंगीक आणि वाचिक अभिनयाबरोबरच तिचे स्वरही पदांना डुलवत होते.. अर्थशून्य भासे हा कलह जीवनाचा हे पद तर तिच्या अस्सल गायनाची साक्ष देते.  तिने संगीत नाटके अशीच करत रहाणे ही काळाची गरज आहे.
राहूल मेहेंदळेची कमाल
इतर सारेच कलावंत नाटक खेळतात. अगदी नेटकेपणाने... नाटकाचा तोल कायम ठेवतातकौतूक करण्यासारखे काम  राहूल मेहेंदळे  याने केले..तौ शोभून दिसला देवव्रत म्हणून आणि भिष्म म्हणूनही..त्यांने नाटकाला गांभीर्य दिले..कानेटकरांनी लिहलेली कोरून ठेवलेली वाक्ये त्यांने ज्या लिलया सादर केली..त्याला खरच दाद द्यायला हवी..
नाटकाचा दुसरा अंक केवळ भीष्माचा.. आणि  काही प्रमाणात अंबाचा आहे..बाकी पात्रे गौण वाटतात..पण जीवनात आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहून आपले मरणही हवाली करणारा हा भीष्म रसिकहो तुम्ही पहाच. जरूर.

अंबेचा तोरा...तिचे अंबेपण  तिचा संताप..सारेच  आणि आपल्यावर अन्याय केलेल्या भिष्माशी तिने केलेला समाना पहाताना..पूजा राईबागीची अभिनयातली ताकद लक्षात येते..तिच्या जोरकस अभिनयाने तिने भूमिकेचा डौल उभा केला.

अमोल कुलकर्णी यांनी चंडोल बनून प्रेक्षकांना झुलवीत ठेवले..नाटकात चेतना निर्माण केली.



तर धिवर बनलेले संजीव तांडेल याची तळमळ आणि तगमग पुरेशी बोलकी होती. शशी गंगावणे यांचा प्रियदर्शनही उठून दिसतो..
करिश्मा नानावटी यांच्या वेशभुषेतून साकारलेली ही नाटकातली पात्रे वैविध्य अशा वेशभुषेने शोभून दिसली.. देवव्रताचे राजेपण आणि भिष्मकाचा राजसत्ता गेल्यानंतरचा गेटअप आणि सत्यवतीची धीवर कन्या आधीच्या अंकात आणि नंतरची  काळ उलटून निष्प्रभ झालेली माता सत्यवती..दोन्ही चेहरे वेगळेपणाने खुलून दिसत होते..ते रंगभूषेच्या माध्यमाने..
धी गोवा हिंदू असोशिएशन निर्मित आणि नाट्यसंपदा कलामंच प्रकाशित संगीत मत्स्यगंधा हे नाटक म्हणजे संगीत रंगभूमिला तरूण कलावंतांनी दिलेली उत्तम देणगीच आहे.


यातला खरा नायक आहे..तो यातले संगीत..ते पं. जितेंद्र अभिषेकीबुवांचे.. 






तर नाटकाचे लेखक प्रा. वसंत कानेटकर..त्यांची भाषा करारी..काळाला ओळखणारी आणि माणसातला मी पण हलविणारी..या दोन्ही तपस्वींना अभिवादन.








नाटकाची ताकद आणि  संगीत नाटकाला पुन्हा अवतार घ्यायला लावणारे सारेच कलावंत, सहकारी त्यासाठी कौतुकास  पात्र आहेत.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276