subhash inamdar

subhash inamdar

Monday, December 26, 2011

योग्य वयात तरुणांच्या पाठीवर शाबासकी थाप

`स्वरानंद` या पुण्यातल्या संस्थेने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त चार तरुण कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या कामगिरीचा गौरव पुरस्कार देऊन सोमवारी २६ डिसेंबरला (२०११) केला. यात

गायक आनंद भाटे,


संगीतकार निलेश मोहरीर,



रसिकप्रिय गायिका योगिता गोडबोले-पाठक, आणि



गिटारवादक ज्ञानेश देव

यांना संगीतकार आनंद मोडक यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी सरदेशमुख महाराज आणि युसूफभाई मिरजकर यांच्या स्मृतीनिमित्त २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती कोल्हापूरची हार्मानियम वादक मुलगी शामिम मोमिन हिला याचवेळी प्रदान करण्यात आली.



ज्यांच्या अनेक रचनांनी मराठी मनावर भूरळ घातली असे संगीतकार यशवंत देव या समारंभासाठी तब्येत बरी नसूनही हजर होते. त्यांनीही या समारंभात आपले मनोगत मांडले . त्यांच्या मते गुरू तुम्हाला मार्ग दाखवितो. पण तुम्ही स्वतः त्या मार्गावर चालायचे असते.. पुरस्कार मिळालेल्या कलावंतांच्या वतीने योगिता गोडबोले-पाठक यांनी अशा पुरस्काराने बळ मिळते. कौतुकाची थाप माठीवर पडते. त्यामुळे पुढच्या काळासाठी एक जिद्द निर्माण होते... रसिकांचे रंजन करण्य़ासाठी प्रोत्साहनही यातून मिळते...


स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी संस्थेत वीसएक वर्ष विविध कार्यक्रमातून व्हायोलिनची साथ करणारे निष्ठावान कलाकार पं. भालचंद्र देव यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्त य़शवंत देवांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती केली. भोंडे यांनी असे निष्ठावान साथीदार मिळाले हे संस्थेचे भाग्य असल्याचे सांगितले.. आणि त्यांची

पं. भालचंद्र देवांची कन्या सौ. चारुशीला गोसावी हिचाही उत्तम व्हायोलिनची साथ करणारी स्वरानंदची कलाकार म्हणून रसिकांना परिचय करुन दिला.


एकूणच सुगम संगीच्या क्षेत्रात ४१ वर्षे सातत्याने काम करणारी ही `स्वरानंद` आजही वेगवेगळे उपक्रम घेऊन मराठी रसिकांची पसंती मिळविते... दरवर्षाला नवीन आणि ज्यांची कला रसिकांनी पसंत केली आहे आणि ज्यांच्या गायनात, वादनात ,कलेत उद्याची उमेद आहे आशा तरुण कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव करते....


हे संगीतकार आनंद मोडक यांच्या शब्दात सांगायचे तर....`योग्य वयात या तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप संस्था देत आहे..हे उचित आहे. त्यांच्या प्रवासाच्या योग्य वयात त्यांना शाबासकी दिली जाते. तरुणाईत दिलेले पुरस्कार महत्वाचे वाटतात`.... असा उल्लेख केला.


पुरस्कारानंतर सर्वच पुरस्कार विजेत्या कलावंतांनी आपल्या गुणांची उधळण आपापली पेशकश सादर करुन रसिकांची दाद घेतली. या सर्वच कार्यक्रमाची सूत्रे अरुण नूलकर यांनी पुणेरी चिमटे काढत कार्यक्रम य़शस्वी करण्यात मोलाची भर घातली.



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596176

Friday, December 23, 2011

खरी कला आणि खरा कलाकार

नटसम्राटाचे चिंतन....



`कलायात्री` हा संस्कार भारतीनं
केलेला फार मोलाचा उपक्रम आहे...


कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराच्या
कलाजीवनांत खोलवर शिरुन विचार व्हावा.
करायचे ठरविले तर ते जरुर करता येईल.
वास्तविक कलाकार हा गौरवार्थी शब्द आहे.


खरा `कलाकार` म्हणजे कोण ?
तर `तो` एखाद्या कलेनं भारलेला आहे.
त्या कलेचा त्याने ध्यास घेतलेला आहे तो !
जो आपल्या कलेद्वारे आपले म्हणणे प्रभावीपणे,
परिणामकारकरित्या मांडू शकतो तो !
अंगभूत प्रतिभेचे दर्शन जो घडवू शकतो , तो !
त्याला कालाकार म्हणता येईल.

कला म्हणजे काय ?
याची व्याख्या सांगणं फार अवघड आहे.
मलाही खरं तर ते निटसं सांगता येणारं नाही.
चित्रकला पाहिली तर भिंती, पाट्या रंगविणा-या पासून
पिकासो सारख्या जगद्विख्यात चित्ररकारापर्यंत सारे कलाकारच आहेत.
मॉडर्न आर्टही त्यातच येते.

मग ख-या प्रतिभावंताचे जी कला अंगीकारली, त्यात प्रगती करावी
त्या कलेमध्ये रमून जावे. सामाजबांधिलकीची जाण ठेवून स्वतःच्या बुध्दीला पटेल तेच करावं,
ती खरी कला आणि ते खरा कलाकार !

तर, प्रामाणिकपणे स्वतःचा शोध घ्यावा. कलात्मक आनंद मिळवावा.
त्यात्तली आद्भूतता अनुभवावी, आणि निर्मिती करावी...




-डॉ. श्रीराम लागू.

कलायात्री...दैनंदिनी २०१२ मधून साभार
संस्कार भारती,(पश्चिम प्रांत)

वेळेचे भान अन् रसिकांची सल

वाढलेल्या पुणे महानगरात संध्याकाळी-रात्री ८ नंतर रिक्षा मिळणे ही एक कठीण आणि धावपळीची गोष्ट आहे. पैसा तर जातोच पण अनेकविध संवादांची देवाण घेवाण होते. याचा फटका बसतो तो पुण्यात दररोज होणा-या विविध कार्यक्रमांना. मनात इच्छा भरपूर असते पण परत घरी जायचे कसे हा प्रश्न कार्यक्रमातही सतावतो. याची दखल वाहन सेवेनी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांनी घ्यावी यासाठी लेखन प्रपंच.....




शहर वाढले. पसरले. अगदी नको तेवढ्या प्रमाणात विस्तारलेही. पण अनेकविध कार्यक्रमांच्या दृष्टीने सारे जणू एकवटले गेले ते पुणे शहराच्या महत्वाच्या भागात. पुण्यातल्या कार्यक्रम स्थळांचा विचार केला तर....

एस. एम. जोशी सभागृह,
निवारा वृध्दाश्रम,
पत्रकार संघाचे सभागृह,
लोकमान्य सभागृह, नारायण पेठ,
भरत नाट्य मंदीर, सदाशिव पेठ,
भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ,
बालशिक्षण संस्थेचे, मयूर कॉलीनीतले सभागृह,

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर आमि य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह आहेतच....

पण प्रत्येक ठिकाणापासून घरी परतणा-या रसिकांची, वाचकांची, श्रोत्यांची निरासा होते, जेव्हा कार्यक्रम संपवून ते घरी जायला निघतात.
रिक्षावाल्यांशी सुसंवाद घडून त्यांची घरी जाण्याची सोय होण्यासाठी खदी कधी तर रक्तही आटवावे लागते....मिलाली बुवा एकदा रिक्षा....असे हुश्श...व्हायला होते..पण बरेचवेळा जायची मोठी पंचाईत. आठ-साडेआठनंतर होते. कधातरी सुखद अनुभवही येतो..पण तो विरळाच...
बर- सार्वजनिक वाहने सेवा तरी धड आहे....वेळेवर आहे..की सगळ्या रुटला जाणा-या बसेस आहेत...विसरा ते सारे... इतर साधनेही तशी दुबळीच...
मात्र थोडा दिलासा यात संयोजक आणि कार्यक्रमाचे आयोजकच देऊ शकतील. जर त्यांनी ठरविले की कार्यक्रम वेळेत सुरू ,करून वेळत संपवायचा.... तरच.
अनुभव असा की ५ ची वेळ असली तर समजावे ५.३० शिवाय जाण्यात काही अर्थ नाही.
सहाचा असेल तर साडेसहा धरुन चाला..
तीच गोष्ट वेळत सुटण्याची... तिकडेही कानाडोळा होतो..कलावंताच्या आणी रसिकांच्या आग्रहामुळेही कार्यक्रम लांबतो....आणि कधी कधी संयोजकांच्या हाताबाहेरही जातो...
संयोजक मंडळी याबाबत वेळेचे बंधन पाळले..तर रिक्षाही किंवा इतर सुविधा घरी जाणा-यांना सहजपण मिळतील.
खरं म्हणजे येणारा प्रेक्षक अनेक आवडत्या मालिका टाळून ...तकर कुणी घरचे अर्धवट टाकून....तर इतर मोहातून वेळ काढून खास कार्यक्रमांसाठी गर्धी करतात..तो तन्मयतेने ऐकतात...
मात्र वेळेचे गणीत आणि नाघण्याची वेळ जुळली की सारे कसे सुरळीत..होईल...
पाहू या या आमच्या विचाराची दिशा कोण पकडतो ते...मात्र काळाप्रमाणे फार लांबलेला कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो..तर वेळेत सुरु झालेला कार्यक्रम आयत्यावेळी गुंडाळाव लागतो...
काय आमचे हे टिपण दखल घेण्यासारखे वाटते काय...?
असल्यास प्रतिक्रिया कळवा..मी ते संयोजकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 22, 2011

किरणांच्या छेडीत तारा....




पुण्याच्या प्रतिभा इनामदार यांनी दोन प्रतिभावंतांना वाहिलेली ही स्वरांजली...अतिशय बोलकी आणि हळवी आणि शब्द स्वरांच्या दोन नायकांना त्यांच्या आठवणी जागवून सादर केलेली आदरांजली.

महांबरेंच्या तिस-या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिभा संपन्न कवीला आदरांजली वाहतांना त्यांचे स्मरण करत खळे काकांच्या प्रतिभेचा साक्षात्कार घडविला तो या पुण्याच्या कलावंतांनी आणि प्रतिभा इनामदार यांच्या सहगायकांनी...

किरणांच्या छेडीत तारा..कंठातच रूतल्या ताना..पूर्वेच्या देवा तुला..देवाघरच्या फुला..धुंद धुंद ही हवा..पाण्यातले पाहता..आणि रसिका तुझ्याचसाठी सारखी एकापेक्षा एक श्रेष्ठ काव्ये जी पुढे गीते झाली ता सारी इथे लोेकमान्य सभागृहात गुरुवारी सादर झाली. पुणेकरांनीही त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.





श्रीनिवास खळे आणि गंगाधर महांबरे यांची मैत्रीही तेवढीच..निरंतर...खळे बरेच वेळेला आजारी असायचे...पण महांबरे गेल्यानंतर महांबरेंच्या पत्नीला फोन करुन दिलासा देताना त्यांनी आवर्जून विचारले कशानं गेले हो....बोलतानाही त्या आठवणीत स्नेह होता.....

खळे काका आमच्या घरातलेच होते. लता मगंशकर आणि भीमसेन जोशी या दोघांनी आपली गीते गायल्याचे समाधान दोघांनाही होते.जाहल्या कांही चुका या गीतांच्या रेकॊर्डिंग वेळी बरे नव्हते तरी खळे काका हॊस्पीटलमधून कसे आले याची आठवण श्रीमती महांबरे यांनी सांगीतली.
जुने विसरताना दुःख होते...पण ते स्मरतानाही आनंद होतो...या कार्यक्रमाने तो दिला.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, December 21, 2011

शास्त्रीय वाद्यवृंद रचनांचा आविष्कार

शास्त्रीय संगीतावर आधारित व्हायोलिन, सतार, हार्मोनियम, बासरी आणि तबला अशा वाद्यातून सादर केलेला आविष्कार शुक्रवारी पुरुषोत्तम गोडबोले यांच्या संकल्पनेवर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालयात ( शनिवार पेठ, मेहुणपुरा) संध्याकाळी ६ वाजता सर्वासांठी सादर होत आहे.

गांधर्व महाविद्यालयाच्या ८० व्या वर्षातील विविध उपक्रमांतर्गत हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे.


वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा जपत आणि संगीत नाटकात आपल्या गायनाने छाप पाडणारे गायक नट कै. उदयराज गोडबोले यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन संगीताची ही परंपरा पुरुषोत्तम गोडबोले यांनी जपली, वाढविली. वडिल एके काळी सांगली संस्थानचे मातब्बर गायक. त्यांनी १९४६ साली वालचंदनगरला वाद्यवृंद रचनांचा कार्यक्रम केला होता. पुरुषोत्तम गोडबोले यांच्या वयाच्या १० व्या वर्षीचा तो ठसा पक्का बसला. स्वतः व्हायोलिन, हार्मोनियम तरुण पिढीला शिकवताना आपणही असा शास्त्रीय संगीतावर वाद्यवृंद तयार करावा अशी संकल्पना आली. त्यातूनच वाद्यशिकणारे कलावंत एकत्र करुन त्यांनी हा रागदारीवर आधारित वाद्यवृंद रचना बसविल्या. अनेक ठिकाणी या कार्यक्रमानंतर मिळालेली पसंती पाहून तोच पुढे नव्या रचनांची भर घालीत त्यांनी तो सिध्द केला आहे.

`स्वर संवाद`, प्रस्तुत या वाद्यवृंद रचनांच्या कार्यक्रमात सहभागी कलावंत आहेत – पुरुषोत्तम गोडबोले, अशोक पटवर्धन, निकिता गुंदेचा (व्हायोलिन), निलिमा कुलकर्णी, कांचन खाडीलकर (सतार), माधवी करंदीकर, देवेंद्र पटवर्धन, हेमा कुलकर्णी (हार्मोनियम), अजरुद्दीन शेख (बासरी), अनिल दोशी, अभिजित पानवलकर (तबला) आणि निवेदक आहेत ज्योती परांजपे.

वयाच्या ८०व्या वर्षीही पुरुषोत्तम गोडबोले नविन कल्पना या माध्यमातून साकार करुन रसिकांची दाद घेत आहे. य़ापूर्वी १९८१ ला गानवर्धनच्या मंचावरही त्यांचा असाच आविष्कार गाजल्याचे रसिकांच्या लक्षात असेल.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276

Saturday, December 17, 2011

कविता माझी अवस्था- मयुरेश कुलकर्णी

`एकांतील ओळी` केपटाऊनला संशेधनसाछी वास्तव्य असलेल्या मयुरेश कुलकर्णी यांच्या चारोळीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा घाट पुण्यात काल्हापूरच्या मुक्ता पब्लिकेशनच्या वतीने शक्रवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात घातला होता.

लग्नाच्या धामधुमीचे दिवस असल्यामुळे वाचक, रसिक मोजकेच होते. पण जे होते ते मयुरेशच्या शब्दांच्या प्रेमतच पडले....

साधी भाषा. थेट भिडणारी साधी बोली. जे सांगायचे ते मोजक्याच पण तकेवढ्याच तिडकीने सांगणा-या ओळी...अशा मस्त मजेशीर शब्दांची ओंजळ घेऊन तो सभागृहाच्या व्यासपीठावर एकटा लढत होता. प्रेक्षकही तेवढेच मश्गुल होऊन..प्रेम, वेदना, राग, हुरहुर, दुखः, एकाकीपण आणि आई-वडीलांविषयीच्या आदराच्या भावना ऐकत होते..आणि दादही देत होते.

आपण कविता करतो कारण सांगता तोच म्हणतो....

कविता माझी अवस्था
जे बोलता येत नाही
ते लिहितो मी
अशीच आहे व्यवस्था


असाच मैफलीतून एकोक चारोळी आणि कवितांची पामे उलगडत मयुरेश शब्दांवहोवर रसिकांच्या मनॉतले भावही टिपत होता जणू. पीएचडी करण्यासाठी वास्तव्य करणारा हा मयुरेश केपटावूनमध्ये बसून मराठी भाषेतल्या संवेदना तेवढ्याच उत्कटपणे चारोळींतून सागत होता...

ग्रंथासाठी लिहितो न मी
पुस्ककासाठी मी ना लिहितो
माझ्या मनातले मी
माझ्यासाठी लिहितो



कवितांचा खेळ पुस्तकरुपाने मुक्ता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलाय. यापूर्चाही `शोध मनाचा` हे पुस्तकही त्यांनीच त्याच्या रचनांवर भारावून जावून काढले होते. मुक्ताच्या वतीने संचालिका विजया पाटील .यांनी त्यांचे कौतूक करताना `मराठी भाषेवर तिथे राहून प्रेम करणारा मुलगा `म्हणून खास शब्दात ओळख करुन दिली. आम्ही काही पुस्तके व्यवसायाचा विचार न करता वेगळी पण तरुण, नवोदितांना संधी देण्यासाटी काढतो असेही त्या म्हणाल्या.

एकांतातल्या ओळीचे प्रकाशन मयुरेशच्या आजी श्रीमती विजया कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
एक भावपूर्ण पण मराठी भाषेवर प्रेम करणा-या उद्याच्या पिढीसाठी आणि पिढीच्या भावनांसाठी झाले ,
याचे वेगळेपण हेच सांगावे लागेल.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


मयुरेश कपलकर्णीचा हा ब्लॊग पहा...

(http://mayureshkulkarni.wordpress.com)

Friday, December 16, 2011

नानामय पुलोत्सव

पु. ल. देशपांडे, विजयाबाई मेहता, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या नावाने घटकेत हळवा होणारा... त्यांनी दिलेले भरभरून वेचणारा तरीही, आपण कितीसे घेऊ शकलो हा प्रश्‍न पडलेला... समाजाला आपण दिलेच पाहिजे, देतो म्हणजे उपकार करत नाही, हे ठामपणे ऐकवणारा आणि नाटक-चित्रपट करताना घडलेले किस्से सांगताना प्रेक्षकांना खळाळून हसविणारा... नानाची नाना रूपे... त्यातीलच काही रूपांना श्रोत्यांनी आज पुन्हा पाहिले आणि पुन्हा नानामय होण्यात धन्य मानले. निमित्त होते पु. ल. स्मृती सन्मानचे...

"

तरुणाई'चे उद्‌घाटन व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांना पु. ल. स्मृती सन्मान व आर. के. लक्ष्मण यांना विशेष पुरस्कार रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत गद्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानाचा एकपात्रीचा अनुभवच रसिकांनी घेतला. काव्यवाचनात आपल्या तरल मनाचे प्रतिबिंब उमटविणारा, पूर्वाश्रमीच्या देण्याने कृतार्थ असल्याची भावना व्यक्त करणारा आणि दुसऱ्याची टोपी उडविणारा खट्याळ अशा नाना रंगात रसिक रंगून गेले. आपल्या शिष्याला पुरस्कार देताना मेहता यांनीही गुरूच्या अधिकाराने पहिल्यांदा कान पिळले आणि नंतर प्रेमाने जवळही घेतले. पाटेकरही मग लहान झाले. पाया पडलेच होते; पण बाईंच्या उंचीपेक्षा लहान दिसावे म्हणून गुडघ्यात वाकून "बाल' झाले.

वडलांच्या नावाने पुरस्कार मिळाला, असे कृतार्थतेने सांगत पाटेकर म्हणाले, ""पितृसमान असलेल्या पुलंच्या लेखनावर आमचा पिंड पोसला गेला. त्यांनी पुस्तकात जी माणसे लपविली, ती मला कधी एकटे पडू देत नाहीत. पुलंच लेखन कधीच एकपदरी वाटले नाही. विजयाबाई या चालतीबोलती शाळा आहेत. आम्ही नेमके कोण आहोत, हे माहीत नसताना आमच्याकडून त्यांनी काढून घेतले.''

नाटकाच्या तालमी, दौऱ्याचे किस्से केवळ ऐकवत नव्हे; तर उभे राहून रंगमंचावर साकारत त्यांनी रसिकांना जणू आपल्याबरोबर त्या काळात नेले. पुरुष नाटकावेळी बायका माझ्यावर खूप चिडायच्या असे सांगत, 5-6 वेळा रंगमंचावर आलेल्या चप्पल "पुरस्कार' म्हणून जपल्याचे मनमोकळेपणे सांगितले.
परकाया प्रवेश करतो तो चांगला अभिनेता, असे सांगत, नानाला हे जमले अशी शाबासकीही मेहता यांनी दिली.

http://www.esakal.com/eSakal/20111217/5158034451279370942.htm

Wednesday, December 14, 2011

माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......

आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला. कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.

ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.

---------------------------------------------------------------------------------





चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................


गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...

या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.

मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.

माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.

माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.

आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.

याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....

पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....

लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.




डॉ.मोनिका गजेंद्रगडकर,
मुंबई

माणूस आत्मकेंद्री होत चाललाय-मोनिका गजेंद्रगडकर

गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात नाही
गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..




आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले.


ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला.


कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.

यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.

ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.

डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`

आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
---------------------------------------------------------------------------------





माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......









चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................


गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...

या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.


डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई

Saturday, December 10, 2011

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव -२०११

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातल्या २०११ कांही यूट्यूबवरच्या लिंक्स...यात शंकर महादेवन यांचे भजन


सवाई गंधर्व २०११ महोत्सवात सगळ्या त टॊपला होता तो शंकर महादेवन...त्याच्याच काही यूट्युब लिंक्स







यात पुण्याचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन...



अमजदअली खान यांना वेळ कमी मिळाला..पण त्यांनी कमाल केली...

भारतीय संगीताबद्दल विशेष आस्था असणाऱ्या पाश्‍चिमात्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचीही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महोत्सवात परदेशी पाहुण्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. संगीताच्या अभ्यासकापासून कानसेनांपर्यंत अनेक पाहुणे भारतीय संगीताने तृप्त होत आहेत.

फ्रान्सहून आलेल्या कॅपियन संगीतातील प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या, 'मी थोडेफार गाणे, पियानो शिकले आहे. पण व्यवसायाने किंवा रूढ अर्थाने मी कलाकार नाही. पण मला संगीत ऐकण्यास खूप आवडते. पुण्यात एका मित्राच्या लग्नासाठी आले होते. तेव्हा मला या महोत्सवाबद्दल कळले. महोत्सवाची महती ऐकून येथे येण्याचे ठरवले आणि या संगीताच्या प्रेमातच पडले. गायक सुरवातीला जी आलापी करतात, ती खूप शांत, सुखद असते. त्यामुळे ऐकणारा स्वत:च्या मनात डोकावू शकतो. किंबहुना मला भारतीय संगीताचे हेच वैशिष्ट्य वाटले. ते मनाच्या खोलवर पोचले. मला जमिनीवर बसायची सवय नाही; पण महोत्सवात संगीत ऐकताना माझे पाय दुखत आहेत किंवा अशाप्रकारे बसणे मला अवघड जात आहे, हे जाणवतही नाही आणि हीच मला भारतीय संगीताची ताकद वाटते. तुमचे दु:खही तुम्हाला विसरायला लावते.''

पुण्यात आल्यापासून इथले लोक खूप घाईत, धावपळीत असल्यासारखे वाटतात; पण महोत्सवात त्यांना इतक्‍या शांत चित्ताने बसलेले पाहून खूप आश्‍चर्य वाटले. त्याचबरोबर इथे सर्व स्तरांतील रसिक एकत्र बसून गाणे ऐकतात. श्रीमंतासाठी वेगळी सोय, गरिबांसाठी वेगळी, असा प्रकार नाही हे पाहूनही खूप आनंद झाला, असेही कॅपियन यांनी नमूद केले.

मूळचे कॅनडाचे, पण आता सिंगापूर येथे राहणारे व पुणेकर तबलावादक नवाझ मिरजकर यांच्याकडून शिक्षण घेणारे ब्लेअर मिलर या कार्यक्रमांकडे अभ्यासक दृष्टीने पाहतात.

तबल्याचे शिक्षण नऊ वर्षे घेतल्यामुळे, तसेच दिल्लीत काही वर्षे राहिल्याने त्यांचे कान भारतीय संगीतासाठी तयार झाले आहेत. ते म्हणाले, ""इथला रसिक मला जास्त आवडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन भारतीय संगीत ऐकणे, हा अनुभव खूपच छान आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या अनेक ध्वनिफिती मी ऐकल्या आहेत. त्यांच्या आवाजात जबरदस्त ताकद होती. महोत्सवातील वाद्यसंगीत मला अधिक भावले.''
पुण्यात मिरजकर यांच्या घरी जाऊन आपले गुरू नवाझ मिरजकर यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

कॅनडात भारतीय संगीत शिकणाऱ्या रॉबिन कॅरिगन या खास महोत्सवासाठी पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नीरजा आपटेकर या त्यांच्या कॅनडातील गुरू आहेत. कॅरिगन म्हणाल्या, ""मी गाण्याबरोबर पियानो, ऑर्किडियनही शिकते. या महोत्सवात मला अश्‍विनी भिडे देशपांडे, शैला दातार यांचे गाणे अधिक भावले. सॅक्‍सोफोनवर भारतीय संगीत ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. मी जॅझही शिकते. त्यामुळे हा प्रयोग मला अधिक भावला. कॅनडात विविध देशांतील संगीत क्षेत्रातील लोक राहतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते.''

http://www.esakal.com/esakal/20111211/5733657263938939740.htm

आनंदपंढरीचा विठ्ठल
















भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.


आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.

आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.

`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच श्रीचरणी प्रार्थना...

साश्रुनयनांनी....

आपले पुणेकर रसिक.



शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464

Tuesday, November 22, 2011

सचिन करंबेळकर... काही आठवणी

सचिन करंबेळकर यांचे दुखःद निधन २, डिसेंबर २०१० ला झाले याला यंदा वर्ष पूर्ण होईल. त्यांची स्मृती जपली जावी यासाठी "अक्षय लावणी " चा विशेष कार्येक्रम २, डिसेंबर २०११ ला संध्या. ५.३० वाजता कलावंतांच्या वतीने पुण्यात भरत नाट्य मंदिरात आयोजित केलाआहे.
एक कलावंत आणि एक माणूस म्हणून त्यांच्या विषयीच्या माझ्या मनात येतात.


तो केवळ एक गायकच नव्ह्ता तर अनेक कला त्याच्या ठाई होत्या. एक उमदा परंतु
तेवढाच हळव्या मनाचा कलाकार होता. एखाद्या कलाकाराची कला फुलण्याचे खर तर त्याचे वय होते.

सचिनला जेंव्हा मी प्रथम बघितले ते मराठी रंगभूमीच्या "शाकुंतल" या नाटकाच्या तालमीच्या वेळेस तेंव्हा तो अगदी लहान म्हणजे फार तर ६-७ वर्षाचा असेल. "भरत" म्हणजे सर्वदमन ही भूमिका तो करायचा.आणि ती ही शेवटच्या अंकात.होती. संगीत नाटक असल्याने कितीही उशीर झाला तरी तो कंटाळायचा नाही.उलट न अडखळता, न भिता, खणखणीत पणे आपले संवाद चोख बोलायचा. गाणी मात्र आवडीने ऐकत बसायचा.

" संगीत शारदा" मधे शारदेच्या छोट्या भावाची जयंताची भूमिका तो अतिशय विनोदी पद्धतीने करायचा आणि भरपूर टाळ्या आणि हंशे मिळवायचा. टाळ्या मिळाल्या की खुशीने ओठातल्या ओठात हसणारा सचिन आजही डोळ्यासमोर येतो. तो एक उत्तम अभिनेता होता. बालकलाकार होता.


त्या नंतर ४-५ वर्षापूर्वी सचिन मला भेटला तो माझ्या "अक्षय लावणी" या लावणी गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तीस वर्षानंतर आणि आश्चर्य म्हणजे जुन्या आठवणी काढताना नाटकातल्या त्याच्या संवादा बरोबरच बरोबर त्या वेळचे आमचे संवादही त्यांनी इतक्या वर्षांनी चोख म्हणून दाखवले. त्यावेळेच्या तालमीच्या आणि बाहेरगावच्या कार्येक्रमाच्या अनेक गमतीजमती त्याला आजही आठवत होत्या.त्याच्या स्वभावामुळे ४-५ वर्षात तो माझा धाकटा भाऊ कधी झाला ते मला कळलेही नाही. त्याला स्टेज ची भीती कधीच नव्हती.त्याच्याकडे जबर आत्मविश्वास आणि दांडगी स्मरणशक्ती होती.
गातानाही स्टेजवर त्याला कधीही वही समोर ठेवण्याची गरज भासली नाही

बघता बघता कार्यक्रमाचे निवेदनही आयत्या वेळेस तो सहजपणे करे. पुण्यातील अनेक गुणी गायक-वादक कलाकारांना त्याने त्याच्या कार्येक्रमातून स्टेज मिळवून दिल्यामुळे त्यांची नावेही आज मोठी झाली आहेत. आणि ते कलाकारही हे मान्य करतात.
अनेकांना सदैव कुठल्याही मदतीला तत्पर असलेला सचिन सर्वांनाच आपलेसे करायचा.
प्रेमळ स्वभाव आणि मनाचा हळवेपणा असल्यामुळे कोणी तोडून बोलले किंवा विश्स्वासघात केला की मात्र सहन करणे त्याला अवघड जायचे अभिनया बरोबरच एक उत्तम गायक म्हणून तर दूरदर्शन आणि अनेक स्टेज शो केले. सूर-ताल, नक्षत्रांचे देणे, ग.दिमा गीते या मधून त्यांनी महाराष्ट्र भर नावलौकिक मिळवला.
सुधीर फडके यांच्या सारख्या जेष्ठ कलाकारांनीही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.अनेक जुनी जुनी अनवट गाणी शोधून काढून ती कार्येक्रमात घेऊन रसिकांची दाद मिळवायचा.

वाचनाच्या आवडीपोटी अनेक पुस्तके तो वाचत असे आणि त्यावर चर्चाही करत असे..शिवाय त्याने अनेक उच्च दर्जाच्या कविता लिहिल्या असे त्यांची बहिण वैशाली सांगते.
त्याच्या हातात तर विलक्षण जादू होती. अनेक प्रकारच्या पगड्या, टोप्या, जिरेटोप , फेटे तो बनवत असे. अनेक ऐतिहासिक नाटकांना, मालिकांना , चित्रपटांना त्या भूमिकेचा अभ्यास करून तो टोप, जिरेटोप बनवून देत असे.

खरोखरीच ! सचिन म्हणजे जमिनीवर पाय असलेला आणि अंगी अनेक गुण आणि कला असलेला एक हरहुन्नरी कलाकार होता.



सौ. धनश्री तुळपुळे (भोगले )
११०३ अ/४ शिवाजीनगर
पुणे -४११०१६
9881128386

Saturday, November 19, 2011

त्यांच्या चारोळ्यांनी पुन्हा केले घायाळ..

`माझे शब्द`च्या निमित्ताने चारोळीकार चंद्रशेखर गोखल्यांनी केला रसिकांशी मनमोकळा संवाद





`मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
ऐकताना गुंतून तुझ्यात
माझा कधीच उरत नाही`


अक्षरधाराच्या ४२१ व्या माय मराठी शब्दोत्सवात चंद्रशेखर गोखले आले..बोलले..आणि आपल्या अर्थपूर्ण गप्पातून आणि सादर केलेल्या भावस्पर्शी चारोळ्यातून चटका लावून गेले...
शनिवारची संध्याकाळ ..१९ नोव्हेंबर २०११.. अकरा वर्षांनी जाहिर कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांसमोर आले ते पुण्यातल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने.

पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणा-याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत
या सहज सुचलेल्या पहिल्या चारोळीच्या अनुभवविश्वात नेवून इथं चंद्रशेखर गोखल्यांनी आपण अनुभवेलला अद्ष्य झालेला काळ पुन्हा दृष्य केला..आपल्या तेवढ्याच भावूक शब्दांतून..

आयुष्य जगताना येणा-या विरोधाभासातून या सहज सुचलेल्या चारोळ्यांनी त्यांच्या आयुष्याच जे परिवर्तन घडविले..विशेषतः `प्रिया तेंडूवकरांनी आपल्या पिशवी तपासताना माझा कवितेची वही उलगडून पाहिली आणि ती वाचतच गेली. तिने भराभर फोन केले...आणि लोकसत्ताच्या कार्यालयात माधव गडकरी यांनी आपल्या सर्व सहका-यांना केबीनमध्ये बोलावून जेव्हा या चारोळ्यांचे वाचन केले तेव्हा..आणि लौकप्रभेत ह.मो. मराठे संपादक असताना चारोळ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिध्द केले तेव्हा झालेला बदल`....ते आनंदाश्रुंच्या मदतीने सांगत गेले आणि रसिक टाळ्यांनी त्याला दाद देत गेले..

शाळेत शिक्षक हुशार मुलाला पुढे बसवितात..त्यांना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची पार्सलिटी करतात....मात्र अभ्यासात कच्च्या असलेल्य़ा माझ्यासारख्या मुलाला वर्गात मागच्या बाकावर बसवू काय बैलोबा..म्हणत..जेव्हा विचारतात..तेव्हा त्यावेळी येणारे नैराश्य..कधी कधी अनेकांच्या जिव्हारी लागते...मला ही ते बोचायचे...म्हणूनच उपस्थितातल्या शिक्षकांनी त्यांनी विनंती केली की, हुशार नसलेल्या मुलातही काही चांगले गुण असतात त्यांना सारखे हिणवू नका...त्यांनाही माणूस म्हणून वागविण्याचे आवाहन केले.

`संघर्ष, कष्ट आणि आयुष्यात नोकरी करायची नाही..या लिखणावर जगायचे ठरविले..आजपर्यंत तेच केले..मात्र ज्यांनी सतत अवहेलना केली त्यांच्या शेजारी मान्यवर म्हणून बसायचा मान मिळतो..तेव्हा..माझे मलाच आश्चर्य वाटते.. आणि असे वाटते ...त्यांनी त्यावेळी आपल्याला योग्य प्रोत्साहन दिले असते तर अधिक कांही माझ्याहातून घडले असते असे वाटते...` ;गोखले सांगत गेले.

आपल्याला इंग्रजी जमत नाही.. आणि तरीही माझे अजूनही कधी अडले नाही...मी नापास झालो..तरीही भावना व्यक्त करण्यात कमी पडत नाही...हुशारात गणला गेलो नाही....तरीही कलेतल्या मान्यवरांचे आशिर्वाद....क्वचित त्यांनी माझ्या सह्या घेतल्या.... सारेच ते बोलत असताना..

मधुनच..एखादी चारोळी सांगतात आणि त्यापाठीमगचे घटना ऐकवतात तेव्हा तर हे यांना कसे सुचते असेच जाणवत रहाते..
अंधरीला माईकडे रहायलो गेलो..पण आई-वडिल पार्ल्यांला...एके दिवशी माझी पावले सहजपणे जुन्याच पार्ल्याच्या घराकडे वळली..गोखलेच्या घरात सगळे दिवे सुरु होते.. तेव्हा ध्यानात आले..मी चुकीनं इथं आलो..मी माईकडे अंधरीला रहातो...दारातच पावलं थबकली आणि चालतो झालो...आणि ओळी आल्या

प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रतेकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी

आपल्या मित्र नव्हते..आणि फारसे नाहीतच...म्हणून आयुष्यभर मी शब्दांशीच बोललो..आणि लेखनाचे व्यसन लागलं...

घरात पालक सांगतात..मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं रहावं...मुलीला म्हणतात..काय नाचायचं ते त्या घरी जावून नाच... चेद्रशेखर गोशले यांना या वाक्यांचा तिटकारा आहे..ते सांगतात... पालकहो..मुलाच्या पायात बळ देण्याचे सोडून त्याला स्वतंत्रपण सोडून देणं किती बरोबर...मुलीलाही फुलायचे ..उमलायचे..बहरायचे नाचायचे..ते माहेरी..तिला स्वतः अस्तित्व ..जग मिळायला पालकांनीच मदत केली पाहिचे..जग पाहण्याचे आणि अनुभवण्याचे बळ त्यानीच दिलं पाहिजे....

१८ एप्रिल १९९० ला माईंच्या आर्थिक बळावर `मी माझा` पहिले पुस्तक प्रकाशित झालं...मग मात्र आपण मागे वळून पाहिले नाही...

तसा मी लाजरा, बुजरा...इथंही येण्याबूर्वी आपण बोलू शकू की नाही..अशी भिती मनात होती...
मात्र असे म्हणतानाच स्वतःचे आयुष्य उसवत ते मागे मागे..काय घडलं..माणसं कशी भेटली...एका स्टुडिओच्या लिफ्टपाशी माझ्या देवता असलेल्या आशा भोसले यांनी माझ्या समोरचर `मी माझे` पुस्तक पुढे करुन यावर `सही कर` म्हणून दरडावले..तो क्षण आपण आयुष्यात विसरु शकणार नाही..असेच कांही सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे आज वयाची पन्नास वर्ष पूर्ण करताना ( ८ जानेवारी २०११) पाणावताना पाहिले..की आपणही हळवे बनतो...
त्यांचे एकच सांगणे होते माणसाला माणूस म्हणून समजावून घ्या...त्याच्यात लपलेल्या गुणांना शोधा..त्याला प्रोत्साहन द्या....

ही संध्याकाळ बोलती करणारे आमचे मित्र संजय बेंद्रे यांनीही `तू नसतास आलास तर चालले असते... कारण तूझ्या जाण्याचे दुःख अधिक होते...असे सांगून हूरहूर व्यक्त केली.


शनिवारी पुण्यात१९ नोव्हेबरला अकरा वर्षानंतर चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी वाचकांशी
मुक्तसंवाद केला..त्याप्रसंगी त्यांच्यासोबत अक्षरधाराचे संचालक रमेश राठिवडेकर सौ. रसिका राठिवडेकर आणि मी...


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, November 18, 2011

'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'-७ ते ११ डिसेंबरला


सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या शीर्षकात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' यंदापासून 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' म्हणून ओळखला जाणार आहे.

जानेवारीत पंडितजींचे निधन झाल्यानंतर होणारा हा पहिलाच सवाई गंधर्व महोत्सव आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पंडितजी महोत्सवात कार्यरत नसले, तरी एखादा दिवस आवर्जून हजेरी लावायचे. गुरुसेवेसाठी ५० वर्षांहून अधिक काळ महोत्सवासाठी सर्वस्व देणाऱ्या पंडितजींच्या स्मृती चिरंतन राहाव्या, यासाठीच त्यांचे नाव महोत्सवाशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे 'आर्य संगीत प्रसारक मंडळा'चे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

यंदाच्या ५९ व्या वर्षी हा महोत्सव प्रथमच पाच दिवस होणार असून, सात ते ११ डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर हा महोत्सव रंगेल. महोत्सवात एक दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Saturday, November 12, 2011

मुलाच्या स्मृतिसाठी ...एक आदर्श पुरस्कार


मुलाच्या स्मृतिसाठी ...कलावंतांना पुरस्कार
अनंतरंग आर्ट फौंडेशनचे कला गौरव पुरस्कार आणि त्यामागची भूमिका


रविवारी १३ नोव्हेबरला पुण्यात भारत गायन समाजात असंख्य संगीत श्रोत्यांच्या साक्षीने बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते समारंभपूर्वक श्रीपाद भावे आणि सौ. अस्विनी गोखले यांना तो दिला गेला.
प्रथम तो ३०० रुपयांचा. मग ५०० आणि नंतर ७५० रुपयांचा झाला. आणि गेली काही वर्षे तो १००१ रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन वितरीत केला जातो. त्यासाठी काही लोक स्वेच्छेने पैसे देतात..पण न मागता...पण त्यासाठी स्वबळावर तो देण्याची परंपरा भिड़े कुटुंबीय जपत आहे.

या `अनंतरंग आर्ट फौंडेशनचे` कार्यवाह चित्रगुप्त भिड़े सांगतात... पुरस्कारासाठी आम्हीच नावे ठरवितो. काहींचा सल्लाही घेतो. आत्तापर्यं दिल्या गेलेल्या पुरस्कारात मधुवंती दांडेकर, विजय कोपरकर, कै. शरद गोखले, मुकुंदराज गोडबोले, रविंद्र कुलकर्णी, प्रभाकर करंदीकर, अश्विनी भिडे, सानिया पाटणकर, संजीव मेहेंदळे, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे, आनंद भाटे, राजीव परांजपे, सुचेता अवचट, संपदा थिटे ,उदयन् काळे, मानसी खांडेकर, बिल्वा द्रविड अशा अनेक गायक-वादकांचा समावेश आहे.

अनंत भिडे. हे ज्येष्ठ चित्रकला शिक्षक. अनंतरंग आर्ट फौंडेशन यानावानं ते वयाच्या ७७व्या वर्षी आपली कला जपत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होत असतात. आपल्या मिळालेल्या कमाईतला काही वाटा ते आवर्जुन समाजोपयोगी कार्यासाठी दरवर्षी वापरतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या श्री नृसिंह मंदिरात ते गेली दहा वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला ३०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करतात. यंदा तर त्यांनी पितळी निरांजने विकत घेऊन त्या १५० कायमस्वरुपी प्रकाशांनी मंदिर उजळून निघाले होते.

त्यांचा तिसरा मुलगा जन्मापासूनच मेंदुच्या पक्षघाताने आजारी असायचा. त्याला कुठलाही उपचार नाही. तो उठून बसणेही शक्य नाही. हाताच्या आधाराने बसायचा. मोजकेच अन्न भरवायचे. आई, बाबा, काका आणि आमा एवढेच चार शब्द तो उच्चारु शकायचा. सर्व उपचारानंतर तो जन्मभर तसाच रहाणार. उठणे आणि चालणे शक्य नाही. कधी झटका येईल याची खात्री नाही. त्याही अवस्थेत अनंतराव भिडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली रोजची कामे , नोकरी सांभाळून या मुलाला..त्याचे नाव विश्वजित ...सांभाळले. अगदी २२ वर्षे. बुध्दीत वाढ होणार नाही..म्हणून शाळेत नाव नाही.. केवळ जन्म दाखला..एवढेच... त्या काळात दोघांनी आणि घरातल्या दोन्ही मुलांनी या `विश्वजीत`ला जपले. पेरुगेट भावे हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षकाचे काम ध्यासाने केले. विश्वजीतच्या काळात..कुठे सभा-समारंभात जाणे नाही... नाटक, सिनेमा पहायचा नाही. सारा वेळ मुलाच्या पालनपोषणात...घालविला...

विश्वजीतला बोलता..येत नव्हते..मात्र.. क्रिकेटचे वेड अफाट..टीव्हीवरची सगळी मॅच तो पहायाचा..मात्र लंच झाला की तो संतापायचा...भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत त्याला फार प्रिय होते. गाणे बंद झाले की तो अस्वस्थ असायचा..ते संपण्याआधी ते वडिलांना खुणेने सांगायचा..

आयुष्यातली २३ वर्षे..जपल्यानंतर तो १९९७ साली गेला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही..गेल्यानंतर महिन्याभराने अनंत भिडे यांच्यासमोर हजर झाला आणि मी दुस-यांकडे उत्तम असल्याचा साक्षात दृष्टांत दिला. भावाला `तुम्ही समारंभाला जाता पण माझे पोटाचे काय? `, असे स्वप्नात विचारले..त्यानंतर रोज सकाळी त्याला वरणःभाताचा नैवैद्य दाखवून मगच आम्ही जेवतो...अनंतराव भिडे सांगत होते..

तो तसा मासाचा गोळाच जणू..पण आमच्याकडे जन्माला आला हे भाग्य..आमच्याकडून सेवा व्हायची होती..म्हणून...त्यांचे नाव कुठेच नाही..केवळ जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यापुरते उरले..त्याचे अस्तित्व आणि नाव जागविण्यासाठी त्याला आवडत असलेल्या संगीतात काम करणा-या कलावंतांना गेली १३ वर्षे त्याच्या नावे पुरस्कार देण्य़ाचे व्रत हे कुटुंबीय करतात. स्वतःच्या पैशातून..हे कायम रहावे यासाठी एक लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी दोन कलाकारांना कलागौरव पुरस्कार दिला जातो.

आपल्याकडून समाजासाठी काही करावे यातूनच हा एक वस्तुपाठ अनंत भिडे आणि त्यांचे कुटुंबीय जपत आहेत. आपल्या मुलाचे हाल तर पाहिले..सोसले...त्याला बळ दिले..जगायला दोन हात दिले...आणि तो गेल्यावर त्याचे नाव अशा त-हेने पुरस्कार देऊन समाजासमोर ठेवले..

हा एक आदर्शच आहे..त्यासाठी यात राबणा-या सा-याच हातांचे आभार....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276

Thursday, November 10, 2011

जगण्यासाठीची धडपड –पाऊलवाट

सांगलीच्या अनंत देव या गायकाची ही कथा. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा. वेगळ्याप्रकारची आणि विविधतेने संगीताच्या बाजानी नटविलेली गाणी..हे या चित्रपटाचे वेगळेपण. चित्रपटात ६ गाणी आहेत. नरेंद्र भिडेंसह सात मराठी तरुणांनी एकत्र येवून केलेली ही निर्मिती. नरेंद्र भिडेयांच्या सांगण्यानुसार आशा भोसलें यांच्या गाण्यांच्या वेळी ते स्वतः भारावून गेले होते. यातल्या शेवटच्या कडव्याची ओळ गाताना आशाताईंच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहिले आहे.

दीड वर्ष लागले ही पाऊलवाट पूर्ण व्हायला. पण मराठी रसिकांची दाद नक्की मिलेल अशी आशा सारेच तंत्रज्ञ, कलावंत आणि चित्रपटासाठी आपलेपणाने झटणारे सर्वच करीत आहेत.

पाऊलवाटच्या पत्रकार परिषेदेत सुबोध भावे, ज्योती चांदेकर, मधुरा वेलणकर, किशोर कदम, हषीकेश जोशी, आनंद इंगळे सारेच उपस्थित होते.

आदित्य इंगळे यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट.

नरेंद्र भिडे यांच्या मते ह्षीकेश मुखर्जी आणि राजा परांजपे यांच्या पठडीतला वाटावा असा चित्रपट आदित्य इंगळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून साकारला आहे.




आपली वेगळी भूमिका या चित्रपटात आहे, हे सांगताना ...हा आपल्या आयुष्यातला स्ट्रगलचाच हा भाग आहे असे ज्योती चांदेकर बोलून गेल्या. पुण्यातून मुंबईकडे जाणारा हा प्रवास चार तासांचा..पण मला माझ्या आयुष्यात तो करायला तब्बल ४० वर्षे लागली....ही खंत त्या व्यक्त करतात. त्यातला अर्थ जाणकार नक्कीच ओळखू शकतील.

हा चित्रपट म्हणजे कलेसाठी जगण्याचा मार्ग दाखवितो असे मधुरा वेलणकर सांगतात. सुबोध भावे यांनाही हा आपलाच प्रवास वाटतो.. कलाकारांच्या स्ट्रगलचे हे चित्रण पुष्पांग गावडे यांनी केले आहे. सींमा देव यांनी सारंगीया उस्मान खॉं यांच्या पत्नीचा छोटा रोल केला आहे. तो सारंगीया झालाय किशोर कदम. त्यांना सीमा देव यांच्यासोबत काम करण्याचा वेगळा अनुभव गाठीशी आलाय.


अभिराम भडकमकरांची कथा असून त्यांचा पटकथा व संवादातही सहभाग आहे. वैभव जोशी या कवीच्या विविध कविता वेगवेगळ्या मूडमधल्या या चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.

१८ नोव्हेंबरला पुण्यासह मुंबई, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक इथं १७२ चित्रपटगृहात एकाचवेळी प्रदर्शत होतो आहे.. प्रतिक्षा आहे. या मनोरंजनाच्या बाजारु जगात पाऊलवाट...स्वतःचे स्थान कसे निर्माण करते ते.


सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276



Narendra Bhide

'Music is life' for Narendra Sadashiv Bhide (Creative Director, DSPL), one of the paramount contemporary music directors in the Marathi Film, Tele and Theatre Industry. His Civil Engineering degree has nothing to do with his profession as he has composed and arranged music for numerous films, serials and plays in his career.



Narendra comes from a family of great repute in Pune.

Narendra Bhide
Creative Director,
DAWn Studios Pvt Ltd.

His father, Shri. S.D. Bhide is a renowned teacher and was instrumental in setting up the Karve Stree Shikshan Sansthas' Cummins Engineering College .

Narendra's mother comes from a family, which has made a solid mark in the world of Marathi Theatre. Celebrated actor and director, Shri. Chintamanrao Kolhatkar is Narendra's great grandfather. Distinguished playwright Shri. Bal Kolhatkar and noted actor Shri. Chittaranjan Kolhatkar are his grandfathers. Eminent director and actor Shri. Dilip Kolhatkar is his uncle (Mama). Narendra's elder brother, Mohan lives in Vancouver , Canada and is an excellent classical harmonium player. He is a software engineer by profession and accompanies stalwarts like Pt. Jasraj, Sanjeev Abhyankar, Upendra Bhat, and many others when they tour the US and Canada. It is this traditionally strong institution which has infused talent and nurtured the art of music in Narendra.

Such a strong family structure can only be countered by Narendra's other half, Mukta Narendra Bhide (Managing Director, DSPL). Her great grandfather, Shri. Purshottamshastri Nanal was a leading Vaidya in Pune. The tradition of Ayurved runs in the Nanal family from the days of early Peshwai. Her grandfather, Shri. Madhuanna Nanal too was an esteemed name in the Indian medical field. Her father, Shri. Ramesh Nanal and uncle, Shri. Vilas Nanal are walking on similar paths and are considered to be extremely talented in the world of Ayurved.

Mukta's mother, Smt. Madhavi Nanal is a well known singer mainly of the Gwalior Gharana of Hindustani Classical Music. She has won the coveted Sur Singar Parishad's Soormani Award. She is extremely engrossed in the activities of the Sangeet Shikshak Sangh. She is the founder of Madahavi Prakashan, a publication dedicated to Classical Music and Ayurved. Narendra is an accomplished man in both Hindustani and Western classical music. He started learning Harmonium from Shri Balasaheb Mate at an early age. He sat at the feet of prima donnas such as Ustaad Mohammad Hussein Khan, Shri Sudhir Datar, Sou. Shaila Datar and Shri Suhas Datar and mastered Hindustani Classical vocals. He got his training in Western Classical Music from Shri Hemant Godbole. He had an opportunity to get valuable guidance from noted Indian Classical vocalist and a reputed name on Marathi theatre Swararaj Chhota Gandharva. Since then, Narendra is on his musical journey as a composer, music arranger and the Creative Director of 'Dawn Studios Pvt. Ltd.', a studio based in Pune. He is also an 'Approved Composer' for All India Radio.

A person who pays his dues certainly gets rewarded in life. Similarly, Narendra has won several accolades and awards for his work including the esteemed Ashtapailu Sangeetkar Puraskar (2000-01) by Akhil Bharatiya Sugam Sangit Sammelan, Ma Ta Sanman and Zee Gaurav Puraskars for the music of Makdachya Hati Champagne and another Zee Gaurav for the 2008 play 'Khelimeli'. And after all this, he definitely still has a long way to go through the rhythmic paths in life; on and on and on…

Apart from his love of music, Narendra enjoys travelling and is an avid reader. He is a keen lover of Marathi literature and poetry as well. He has composed many poems of Kusumagraj, Ba Bha Borkar, Govindagraj, Anil, Na Gha Deshpande, Grace, Shantabai Shelke, Na Dho Mahanor, Sudheer Moghe, Aruna Dhere and many others.These compositions are included in a show called Shrutichitre which is well appreciated in Pune and Mumbai. A concert of his compositions was recently telecast on a well known Marathi TV Channel 'Saam TV'
Awards & Achievements

- ‘Ashtapailu Sangeetkar’ Puraskar - 2000-01
By Akhil Bharatiya Marathi Sugam Sangeet Sammelan
- ‘Keshavrao Bhole’ Puraskar by Swaranand Pratishthan.
- ‘Zee Gaurav’ Puraskar -2007
(Best Music for the play ‘Maakadachya Hati Champagne’)
- ‘Ma–Ta Sanman’ - 2007
(Best Music for the play ‘Maakadachya Hati Champagne’)
- 'Shrikant Thakray' Puraskar
by ‘Kalarang’, Pimpri-Chinchwad.
- Best Music Award in ‘Madrid Film Festival’–2007
in all categories, for the film ‘Bayo’.
- ‘Zee Gaurav’ Puraskar -2008
(Best Music for the play ‘Khelimeli’)
- ‘Yatna’ Puraskar, by ‘Smruti Gandh’ Pune

Wednesday, November 9, 2011

“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी”


“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” याची पहिली प्रत माझ्या हातात पडली आणि गेले काही दिवस हे लेखांचे संकलन झपाटल्यासारखे वाचून काढले. जयवंत दळवी, अरूण टिकेकर, श्री. पु. भागवत, वसंत बापट, शांताबाई शेळके, भारतरत्न भीमसेन जोशी किती म्हणून नावे घ्यायची? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व विंदा तर समीक्षानिपुण नाडकर्णी व कुळकर्णी अशा अनेक मनसबदारांची ही मांदियाळी आहे.

पु.लं.च्या पुस्तकांशी माझे नाते मॉडर्न हायस्कूलच्या खाकी हाफ पॅंटमध्ये असताना गुंफले गेले आहे. कोकणची पहिली ओळख अंतू बर्वेतून मला झाली. चितळे मास्तरांसारखे शिकवण्याचे वेड असणारे मास्तर आमच्याही शालेय जीवनात आम्हाला लाभलेले आहेत. टापटीप आणि मुंबईची शान म्हणजे काय मला नंदा प्रधानमुळे समजले. सोकाजी त्रिलोकीकर “ ए साला, कोचरेकर तू तो एकदम इडियट आहे रे”. यांच्यातून मला पारसी समाजाची पडछाया जाणवली .
बबडू व मुंबईंचे नाके यांचे अतूट नाते समीकरण पुण्यात राहून मला पु. लं. मुळे समजले. पुलंनी आमचे बालपण ख-या अर्थाने श्रीमंत केले.

मला माझे पुण्यातले लहानपण आठवते. त्या वेगवेगळ्या आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा, रानडे वक्तृत्वस्पर्धा, नगरची हिवाळे स्पर्धा अशा विविध भाषणबाजीच्या व्यासपीठावरुन पुलंच्या व तात्कालीन साहित्यिकांच्या दाखल्यामधून आम्ही मुलांनी वक्तृत्वाची मूळाक्षरे गिरवली आहेत. पण प्रतिभावान लेखक, भावनासमृध्द कवी अशा छापील खिळ्यांमधून व ठश्यांमधून पुलंची मुद्रित ओळख होऊच शकत नाही.



ते रंगमंचावर आले व नुसते उभे जरी राहिले तरी हास्याची लकेर पसरत असे. का कोण जाणे मला तर ते साक्षात श्री गणेशाचे रुपच दिसत असे.थोडेसे पुढे आलेले सशासारखे दोन दात, लुकलुकणारे बुध्दिमान असे डोळे. हे पाहिल्यावर हा माणूस जीवनाकडे व चराचर जीवांच्या अस्तित्वाकडे किती विलक्षण दृष्टीने पाहात होता याची साक्ष पटते. नेमकी शब्दयोजना, तीही नेमक्या वेळेस करणे हे कुशल लेखकाचे प्रमुख असे अस्त्र आहे. पु.लंचा भाता अशा अनेक दिव्य अस्त्रांनी सदा संपन्न होता. चितळे मास्तरांच्या आर्थिक विपन्नवस्थेचे वर्णन करताना, “ मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोत्ये पडली नाहीत, पण डोळ्यात पडली”,..पुल सहज लिहून जात.

पुलंचे लिखाण ६०-८०च्या दशकांत घरा-घरात नव्हे तर मराठी मना-मनात पोहोचले याला कारण त्याची बैठक सच्चा, मध्यमवर्गातील जीवनमूल्यांवर आधारलेली होती. फ्लॅट सांस्कृतीचा उदय होत होता आणि मानवी वस्तीचा भूगोल जरी अपार्टमेंटमध्ये बंदिस्त होत असला तरी माणुसकीच्या मनाचा इतिहास मात्र चाळीतच अडकला होता. ते प्रेम, सौदार्ह, बंधुभाव पुलंनी अजरामर केले.

त्यांचा विनोद मर्मबध्द असायचा. त्या केवळ शाब्दिक कोट्या नव्हत्या. आजच्या दूरदर्शनवरच्या विनोदाचे दुर्दैवी दशावतार त्यांच्या साहित्यात कधीच दिसले नाहीत. त्या विनोदाला कारुण्याची झालर होती, उच्छृंखलतेची झूल पुलंनी कधीच पांघरली नाही.. काव्य, रसग्रहण, नाटक, चरित्र, व्यकितचित्रण... पारिजातकाचा सडा पडावा अन् नेमके कुठले फूल उचलावे याचा संभ्रम पडावा अशी अवस्था होती. पुणे-ते-मुंबई यापलिकडे जग न पाहिलेल्या आमच्या विश्वाला पुलंमुळे लंडन कळाले. अपूर्वाई, पूर्वरंग, निळाई या सा-या निर्मितींनी आम्हाला परदेशाची चटक लावली.



त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी त्यांना एक पत्र पाठविले होते. कालांतराने त्या पत्राचे टंकलिखित पोस्टकार्ड रुपाने उत्तर प्राप्त झाले. पत्राच्या अखेरीस पुलंनी स्वतःच्या हस्ताक्षरात “ उत्तम डॉक्टर हो हीच श्रीचरणी प्रार्थना”, असा आशिर्वाद दिला होता. गेल्या २५ वर्षात मुंबईत सार्वजनिक रुग्णसेवेतर्फे जे काही कमावले त्याच्या मूळाशी पुलंचा हा आशिर्वादच आहे अशी माझी श्रध्दा आहे.

देवाघरच्या या दूताने दोन्ही हातानी मराठी शारदेच्या ओंजळीत मौक्तिकमणी घातले. “घेता किती घेशील दोन कराने” अशी आम्हा वाचकांची अवस्था करणारा हा अवलिया साहित्य दरबारातला सम्राट होता.

परचुरे प्रराशनाने संकलित व संपादित केलेल्या या पुस्तकामुळे आम्हाला केवळ पुलच नव्हे तर, आज हयात नसलेले अनेक श्रेष्ठ नाटककार, लेखक, कवी भेटले व खरोखर “तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” ही श्री चरणी प्रार्थना करावी असे मनापासून वाटते.

जोपर्यंत मराठी घरात मराठी वाचले जाते, संग्रह केला जातो, तोपर्यंत “ पु.ल. एक साठवण “ नंतर एक दुसरीही आठवण म्हणून हे पुस्तक संग्रही असणे आवश्यक आहे.


डॉ. संजय ओक
(“मला काही सांगायचय्” चे लेखक)


पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुण्यात परचुरे प्रकाशनने ८ नोव्हेंबर २०११ ला समारंभपूर्क तीन पुस्तकांची प्रकाशने कवीवर्य मंगेश पांडगावकरांच्या हस्ते केली. त्यात मला काही सांगायचय या पुस्तकाताही समावेश होता. या निमित्ताने डॉ. संजय ओक यांनी केलेल्या भाषणातील मनोगतातून..साभार...

Saturday, November 5, 2011

राजनभैय्या ६०

`गुरुकी कृपासे शब्द आ रहे है, तो वो उन्हीको अर्पित करना चाहिए`- या भावनेनं, स्वतः तरुणवयात रचलेल्या बंदिशींमध्ये आपले गुरू गायनाचार्य पं. बडे रामदासजी यांचे नाव गुंफणारे...पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांनी २८ आक्टोबरला एकसष्ट वर्षात पदार्पण केले.. या निमित्त रविवारी पुण्यात त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने जाहिर सत्कार समारंभ झाला...त्यानिमित्ताने लेख..


अमानतअलि-फतेअलि, सलामत-नजाकतअलि, लताफत-शराफत हुसेन अशा सहगायकांच्या नामांकित व्दयी शास्त्रीय संगीतात होऊन गेल्या. एकेकाळी बनारस घराण्यातही अमरनाथ-पशुपतीनाथ ही व्दयी सहगायनासाठी प्रसिध्द होती. नंतरच्या काळात बनारस घराण्यानं ठुमरी- कजरीचं गाणं इतकं समृध्द केलं की त्या घराण्याची ख्याल गायनाची महान परंपरा कमी होते आहे की काय असं वाटू लागलं. त्याचवेळी पं. राजन व पं. साजन मिश्रा या बंधुव्दयानं ती महान गायकी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आणि सर्वार्थानं ती पुढं नेली. मातृ-पितृ दोन्हीही घराण्याच्या रक्तातून आलेला संगीताचा वारसा त्यांना दुसरं काही करुन देणारच नव्हता.

पं. सामताप्रसाद, पं. किशनमहाराजजी, आजोबा बडे रामदासजी, काका सारंगीस्रमाट पं, गोपाल मिश्रा, वडिल पं. हुनुमानप्रसाद मिश्रा अशा थोर गुरूंकडून राजन-साजन या बंधुंकडे संगीत विद्या आली आणि कठोर लगन आणि मेहनतीनं त्यांनी ती आत्मसात केली.


भारतरत्न पं. भीमसेनजींना पं. गोपाल मिश्रा सारंगीची साथ करीत. भीमसेनजींचा मुक्कामही बनारसला त्यांचेच घरी असायचा. त्याचवेळी गुरुंच्या सेवेप्रमाणे राजनभैय्या भीमसेनजींची सेवा करीत..अगदी पाय चेपून देण्यापर्यंत... साधारण १९७५ साली भीमसेनजींनी रेडिओवर मिश्राबंधुंचं गाणं ऐकलं आणि पं. गिरिजादेवींकडे ही कोण मुलं गाताहेत याची चौकशी केली. ते दोघे पं. गोपाल मिश्रांचे पुतणेच आहेत हे कळल्यावर त्याच वर्षी पुण्याच्या `सवाई-गंधर्व महोत्सवात` राजन-साजन मिश्रांचे सहगायन ठेवलं. त्यावेळी स्वतः भीमसेनजींनी मागे बसून तानपुरे जुळवून दिले....ही घटना सांगताना दोन्ही भावांचे डोळे पाणावले नवाहीत तरच नवल. पुढे या व्दयींचं गाणे पुण्यात असल्यावर काळी दोनची तानपु-याची जोडी भीमसेनजींकडून जात असे.

राजन-साजन मित्र परिवारात अफाट आणि समाजाच्या सगळ्या थरातील व्यक्ति आहेत....आमचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या उमद्या स्वभावामुळे...त्याचं मैत्रीत कधी रुपांतर झालं व त्यांच्यामधल्या पद्मभूषण. पंडित अशा अनेक बिरुदावल्यांचा दबदबा कधी गळून पडला हे कळलचं नाही. आमच्यासाठी ते फक्त राजनभैय्या- साजनभैय्या होऊन गेले.
गेल्या सवाई-गंधर्व महोत्सवात,,रिहर्सलमध्ये पं. राजन-साजन बिभासचे स्वर आळवीत असताना, एक बाई बरीच मिनतवारी करून आत आल्या व त्यांनी पंडितजींना ..` मी इंदौरहून मुद्दाम आले आहे. २५ वर्षापूर्वी इंदौरला ऐकलेला तोडी परत ऐकण्याची इच्छा आहे`, अशी विनंती केली. त्यांच्या रसिकतेचा मान ठेबून दोघांनी ऐनवेळी अप्रतिम असा गुजरी तोडी सादर केला.

गेल्याच वर्षी कोल्हापूरला देवल क्लबच्या `अल्लादियॉ` संगीत महोत्सवात` राजन-साजनजींचं गाणं होतं. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ११ ला पोचणारी फ्लाईट संध्याकाळी साडेपाचला आली. माझ्या गाडीतून आम्ही तडक कोल्हापूरला निघालो. तरी पोचायला ९ वाजले. तोपर्यंत सोलो तबलावादन करुन अरविंदकुमार आझादजी यांनी खिंड लढविली होती. पण १० वाजता कार्यक्रम बंद करण्याचा निर्बंध असल्यामुळे रसिकांची निराशा होणार होती. राजन-साजन भैय्यांनी स्वरमंचावर जावून उशीर झाल्याबद्दल संयोजक व रसिकांची माफी मागितली आणि दुस-या दिवशी संपूर्ण वेळ कार्यक्रम करण्याचं कबूल केलं. दुस-या दिवशी त्यांनी सादर केलेल्या `जोगकंस`ने तुडूंब भरलेल्या श्रोतृवर्गाचे डोळे वारंवार पाणावत होते. आजही रसिक त्या मैफलीची आठवण काढतात.

राजन-साजन हे पराकोटीचे अव्दैत आहे हे त्यांचं गाणं ऐकताना तर जाणवतंच पण त्यांच्याबरोबरच्या प्रवासात, गप्पांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. कोणतीही गहन चर्चा असो की विनोद ही बंधुव्दयी त्यात रंगून जाते आणि तीही मैफल रंगवून टाकते. `सूरसंगम`या चित्रपटासाठी `धन्य भाग्य सेवा का अवसर पाया` हे गाणं फक्त राजनभैय्यांना गायलं आहे..श्रेयनामावलीत आग्रहानं राजन-साजन मिश्रा असं नमूद करण्यास भागं पाडलं आहे..हेच ते अव्दैत.
गेली ५० वर्ष हे बंधू सहगायनच करत आहेत. अनेकदा मनात योजलेला राग बाजूला ठेऊन रसिकांनी फर्माईश केलेला राग ते गातात आणि..” आम्ही गात नाही तर आमचे गुरुजन व ईश्वर आमचा माध्यम म्हणून वापर करुन तो राग प्रगट करतात”..असं विनण्रतेनं सांगतात. गुरुकृपेमुळं राजनभैय्यांचे सुपूत्र रितेश व रजनीश हेही सहगायन करत आहेत.
अजूनही एकत्र कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवून, मुलांबाळांसह सर्व कुटुंब बनारसला एकत्र नांदते आहे. यात त्यांच्या पत्नींचीही त्यांना मोलाची साथ आहे. अजूनही आमची चूल एकत्रच आहे हे दोघेही अभिमानाने सांगतात.

संगीताप्रमाणे इतर बाबतीतही राजनभैय्या अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या खेळांच्या आवडीप्रमाणे ( कॉलेजमध्ये ते क्रिकेटचे कप्तान होते ) जंगलात-निसर्गात मनमुराद भटकण्याची त्यांना आवड आहे. त्याविषयाचेही ज्ञान आहे. ओशांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन मकरंद ब्रम्हे यांनी या बंधूंच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारित `अव्दैत- संगीत` ह्या ९० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या डॉक्युमेंटरी भागाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे.

एकमेकांच्या घराण्याविषटी अत्यंत आदर बाळगणारे असे महान कलाकार पाहिले की, जाणवतं की विविध घराणी- विविध गायवप्रकार असोत पण त्यांना बांधून ठेवणारं भारतीय संगीत हेच मूळात एक `अव्दैत` आहे.
राजनभैय्या!( आणि साजनभैय्याही) तुमच्याकडून ही संगीतसेवा अशीच वर्षानुवर्षे घडत राहो...अनेक उत्तमोत्तम शिष्यही त्यातून तयार होवोत..आणि तुमच्यातले हे संगीत अव्दैत अखेरपर्यत अखंड राहो..हिच इच्छा.....

-विजय मागिकर, पुणे
मोबा- ०९४२३५७७७५३

Monday, October 31, 2011

काळाप्रमाणे घडणारी नवी पीढी

- निर्मला गोगटे
आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..



“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...


सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.

वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.


नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.

आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे. माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.

सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..

पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.
निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....


गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276

कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते

"कशी जाऊ मी यमुना, अडवितो कान्हा' या गवळणीनंतर हौसाबाईंच्या "शहर बडोदे सोडून दिधले वर्षे झाली बारा' या पारंपरिक बैठकीच्या लावणीतून लोककलेच्या सम्राज्ञीचे सौंदर्य उलगडले.

लता मंगेशकर यांची गजल ऐकून हा गानप्रकार शिकण्याची मिळालेली प्रेरणा आणि एकेक शब्द वीस-वीस वेळा घोटून पाठांतर केल्यावर शिकलेली "राजाओं का राज न रहा, न सुलतानोंकी शान, माटी में मिल जाएगा एक दिन माटी का इन्सान', ही गजल त्यांनी सादर केली. "गेले पयल्यानंच मी नांदाया', "जीव लावून माया कशी तोडली, सांगा पुरुषाची रीत ही कुठली', "बोल कन्हैया का रुसला राधेवरी', ही गवळण त्यांनी गायली.

लावणीगायनाला उस्ताद अल्लारखॉं यांनी केलेली तबलासाथ, पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी झालेली मैफल, वैजयंतीमाला यांनी केलेले कौतुक या आठवणींना याप्रसंगी उजाळा मिळाला. घोटकर यांच्यासमवेत हौसाबाईंनी सादर केलेल्या तमाशातील "झगडा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "श्‍यामसुंदर मदनमोहन जागो मोरे लाला' या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

डोक्‍यावरून घेतलेला साडीचा पदर, कपाळावर बंद्या रुपयाएवढे कुंकू, अशा सोज्वळ पेहरावातील वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या हौसाबाईंनी खड्या आवाजातील बैठकीच्या लावण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलेच; पण साळंत चार बुकदेखील न शिकलेल्या हौसाबाईंनी केवळ पाठांतरातून जतन केलेल्या गजल आणि कव्वाली सादर करीत उर्दू भाषेचा लहेजा गायकीतून उलगडला.

एका अपघातात पाठीच्या मणक्‍याला झालेल्या दुखापतीनंतर चालणे बंद झालेल्या हौसाबाईंच्या औषधोपचारासाठी मोठा खर्च येत असल्याची माहिती दादा पासलकर यांनी दिली. मात्र, या प्रतिकूलतेवर मात करून "कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते', हेच हौसाबाईंनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. रसिकांनी स्वयंस्फूर्तीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेला 16 हजार रुपयांचा निधी त्यांना प्रदान करण्यात आला.

"भरत नाट्य संशोधन मंदिर'तर्फे "गुजरा हुआ जमाना' कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत हौसाबाई जावळकर यांच्या गायनाची मैफल आयोजित केली होती. शाहीर दादा पासलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या कलावतीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश पडला. हौसाबाईंना सुधीर जावळकर यांनी हार्मोनिअमची, पांडुरंग घोटकर यांनी तबल्याची, जयराम जावळकर यांनी ढोलकीची त्याचप्रमाणे सुलक्षणा जावळकर, पद्मा जावळकर आणि बेबीताई कोल्हापूरकर यांनी सहगायनाची साथ केली.

Friday, October 28, 2011

पुणेकर न्हाले स्वरांच्या नादात

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज या दिवशी पुणे शहरात अनेक ठिकाणी 'दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी झालेल्या संगीत, नृत्य यांच्या रंगारंग कार्यक्रमाला रसिकांनी अतिशय उत्साहाने प्रतिसाद देऊन ते संस्मरणीय केले.

'बाबूजी आणि मी'
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके व श्रीधर फडके या पितापुत्रांतील सांगीतिक प्रवास उलगडणारा 'बाबूजी आणि मी' हा आगळा कार्यक्रम 'रंगयात्रा'चे शिरीष कुलकर्णी यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी या दोघांच्या स्वररचना श्रीधर फडके आणि शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केल्या. त्यांना सचिन जांभेकर, केदार परांजपे आदींनी वाद्यांची साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

नवा सण नवा प्रकाश, नव्या या दिवशी उजळू दे आकाश, नवी चाहूल नवी आशा, प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा, असा शुभेच्छा संदेश पं. जसराज व माधुरी जसराज यांनी पुणेकरांना दिला.

'स्वरनूपुर'ला उत्साही प्रतिसाद
युवराज शहा, महावीर जैन विद्यालय आणि सॅटर्डे क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'स्वरनूपुर' या पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. गोवर्धन दूध यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
स्वरनूपुरचे केतन गोडबोले, प्राची ओक यांनी गणेशवंदनेने कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर त्याची रंगत वाढतच गेली. त्याच्या मेणबत्ती नृत्याला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला.

सारसबागेत नेत्रदीपक दीपप्रज्वलन

दिवाळीचा पाडवा आणि नववर्षानिमित्त सारसबागेत नागरिक, सारसबाग मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच विविध संघटना यांनी 'दीपोत्सव' साजरा केला. पहाटे ४पासून सारसबागेत हजारो नागरिक जमले होते. आकर्षक रांगोळ्या आणि आकाशकंदील यांमुळे हा परिसर उजळून निघाला. सारसबाग मित्र मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या 'दीपोत्सवा'चे हे १६वे वर्ष होते.
सचिन वठारे ग्रुप, वंदेमातरम कबड्डी संघ, कलाअकादमी ग्रीनरी सीकर्स, पुणे एव्हरेस्ट, विश्‍व प्रतिष्ठान, वुई फॉर एव्हरीवन या संघटनांतर्फे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.

हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजक अनिल गेलडा, सारसबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष अँड. एन. डी. पाटील, कार्यवाहक अँड. शिरीष शिंदे, राणी गावडे, माधवराव चिरमे, पल्लवी जाधव, कल्पना रावळ, पोपट ओस्तवाल, शिवाजीराव भागवत, दिलीप तातुसकर, नितीन काकडे, शिवाजीराव डावळकर, दिलीप रायसोनी, अजित लुणावत, सुलक्षणा नाईक यांनी प्रयत्न केले.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात संगीत समारंभ

सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई उद्यानात 'दिवाळी पहाट' साजरी करण्यात आली. सुनीता गोकर्ण, श्रीकांत कुलकर्णी आणि नरेंद्र डोळे यांनी या वेळी सुरेल गाणी सादर केली. त्यांनी भाव-भक्तिगीते, भजने ते लावणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली. त्यांना रेवती समुद्र, अभिजित जायदे आदींनी वाद्यांची साथ केली. ज्योती घोडके यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, वा. हे. कुमठे, कैलासराव कोद्रे, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

अरण्येश्‍वर मंदिरात भावगीते

अरण्येश्‍वर मंदिराच्या परिसरात वॉर्ड ६७च्या वतीने भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर, सिंधूताई सपकाळ, उल्हास पवार, राजेंद्र ढुमे, अशोक तावरे, जांभोरकरगुरुजी यांच्या हस्ते महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी महिलांना साड्यावाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, मंजूषा गोडसे उपस्थित होत्या. नीला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


कस्तुरी पायगुडेंचा 'दीपस्वर'

निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहातली 'सांस्कृतिक पुणे'च्या सुभाष इनामदार यांनी आयोजलेली 'दिवाळी पहाट' कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या अहिर-भैरव स्वरांच्या आवर्तनाने रंगत गेली.
कस्तुरी या प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम,भक्तिगीतेही त्या तेवढय़ाच तयारीने सादर करतात. नुकताच त्यांचा 'मी प्रेमिका' हा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
या कार्यक्रमात त्यांनी 'रसिया म्हरो' ही बंदिश सादर केली. त्यानंतर 'बेग बेगा आओ मंदिर'द्वारे आपल्या आवाजाचा उत्तम आविष्कार सादर केला. शास्त्रीय गायनानंतर त्यांनी निगरुणी भजने सादर केली. 'अवघारंग एकचि झाला'ने त्यांनी मैफिलीची समाप्ती केली.
त्याना हार्मोनियमची साथ स्वानंद कुलकर्णी यांनी, तर तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली. तंबोरा साथीला कल्याणी शेटे, आभा पुरोहित होत्या. सुभाष इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी 'रंगतरंग' या दिवाळी अंकाचे प्रकाशन रवी चौधरी यांच्या हस्ते झाले.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=42&querypage=8&boxid=25846398&parentid=4485&eddate=10/29/2011