subhash inamdar

subhash inamdar

Saturday, January 29, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात

नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी 
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.

वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून  ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा  आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.

नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक  वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते  ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद  दिला.

देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....

मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली 

देऊळ 
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....

सुभाष इनामदार,पुणे. 

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
http://www.culturalpune.blogspot.com/
Mob. 9552596276

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त!

मन अस्वस्थ झालं.  काय करू काही सुचेना.  बाइकवर टांग टाकली आणि थेट 'कलाश्री' गाठला.
अण्णांचं दर्शन घेतलं. त्यांच्या नावामागे 'कैलासवासी' लावण्याइतका मी अजून सावरलेलो नाही. सावरणारही नाही.

ती गर्दी, ते हुंदके, ते डोळ्यातून आपसूक ओघळणारे पाणी, पोलीसांची अमाप गर्दी,
मिडीयाच्या मोठ्ठी डिश .टपावर लावलेल्या गाड्या,  कलाकारांची झुंबड, रसिकांची हळहळ....
आणि बरेच काही.

सुन्न होऊन बराच वेळ इथे तिथे फिरत राहीलो.  त्या सगळ्या गर्दीत जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा मनात अश्रुंचे कढ घेऊन फिरत होतो.
अण्णांना वैकुंठात नेले. तिथे त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात सुरू झाला.
 त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ बंदूकीच्या फैरी झाडल्या, मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या
आणि हे सगळे संपल्यावरती त्यांना हळूहळू विद्यूत दाहीनी कडे घेऊन चालले.

माझ्या डोळ्यांसमोरून जेव्हा त्यांचं पार्थिव जाऊ लागलं त्यावेळेस मात्र माझा धीर सुटला
आणि मी ढसाढसा रडू लागलो.
ते थोडे पुढे गेल्यानंतर तसाच मागे वळलो.
मनात विचारांचे काहूर माजले होते.
आज मावळतीच्या सूर्याबरोबर स्वरभास्कर लोप पावला. सूर्य सूर्याला मिळाला.
चंद्राची आभा आता अजूनच धीरगंभीर अन् अधिक वलयांकीत भासेल.

अण्णा स्वप्नांतून त्यांच्या सुरांच्या चांदण्याची रात्ररात्रभर पखरण करतील.
मायेनं सांगतील, बाळांनो, स्वरांतील सच्चेपणा जपा, सच्चेपणानी जगा!
पं. सी. आर. व्यास त्यांच्या एका सत्कार समारंभात म्हणाले होते.

भीमसेनजींनी 'तोडी'तला पंचम असा काही लावला की मला 'अहम् ब्रम्हास्मि' चा प्रत्यय आला.

आज त्यांना निरोप देतांना, त्यांचं शेवटलं दर्शन घेत असते वेळी
मलासुद्धा अगदी तोच अनुभव आला.
स्वर ना कोमल होते ना तीव्र होते.
भीमण्णांनी यावेळेस 'पंचम'ही लावला नव्हता.
ते निघाले होते निरामय षड्जाच्या वाटेवर...

तुमचा,
केदार केसकर , पुणे

Monday, January 24, 2011

मोठ्या मनाचे स्वरभास्कर

बाजीराव रोड पुणे शाखेत असताना एक दिवस संगीतप्रेमी विजय दीक्षित यांचा फोन आला.
भीमसेन जोशींना वीस हजार रुपयाचं कर्ज बँकेकडून हवं आहे. अट एकच आहे.
आत्ता त्वरित हवंय.
देतो. बँकेत या. तुम्ही या कर्जाला जामीनदार राहा.
ठीक आहे. अध्र्या तासात पोहोचतो.
अर्जदार नामवंत होते. त्यांना कर्ज देणं हे त्यांना सेवा देण्याची बँकेला
मिळालेली संधीच होती. अशा वेळी मन दोन प्रकारे विचार करीत होतं.
एक म्हणजे कर्जाविषयी फारसं बोलणं हे या महान व्यक्तिमत्त्वाच्याबाबतीत
बरं दिसणार नाही. तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना कर्जाचे कारण, परतफेड
कालावधी असले काहीही विचारायचे नाही. कर्ज हा विषयच काढायचा नाही.
सन्मानाने पौसे सुपूर्त करायचे.
दुसरं व्यवहारी मन सांगत होतं. अर्जामध्ये कर्जाचे कारण काय लिहिणार?
मग वौयक्तिक कारण लिहायचं ठरवलं. कागदपत्रात फक्त प्रॉमिसरी नोट घ्यायची
व कोणतेही तारण घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. माझ्या मंजुरी अधिकारात
एकाच्या सहीनं हे कर्ज देता येत नव्हतं. त्यासाठी दीक्षित यांना जामीनदार
म्हणून घेतलं. सर्व कागदपत्रे तयार ठेवली. कॅशिअरना रु. 20,000च्या
कोर्या नोटा घेऊन माझ्या केबिनमध्ये बोलवलं. एक गुलाब मागवून घेतला.
स्वरभास्कर शाखेत येणार यामुळे आम्हा कर्मचार्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
निर्माण झालं होतं.
स्वरभास्कर भीमसेन जोशी केबिनमध्ये आले. मी उभं राहून त्यांना अभिवादन
केलं. त्यांना बसण्याची विनंती केली. ते बसताच मी व कॅशिअरने मिळून
रु.20,000च्या कोर्या नोटा असलेले बंद पाकीट व गुलाब त्यांना दिले.
त्यांनी ते स्वीकारले. मी चहा मागविला होताच. तो येईपय|त अगदी मोजक्या
अशा कागदपत्रांवर सह्या घेऊन टाकल्या. बँकेच्या आठवणी, सवाई गंधर्व
महोत्सव अशा विषयांवर बोलणं झालं. कोठेही कर्जाबद्दल विषयही काढला नाही.
चहापानानंतर स्वरभास्कर गेले.
एका महान व्यक्तिमत्त्वाला सेवा दिल्याचा आनंद मला मिळाला. थोड्याच वेळात
आमच्या हेड आॅफिसमधून फोन आला. बँकेचे जनरल मॅनेजर ही. बी. गांधीसाहेब
बोलणार होते. काही काम करायचे राहिले की साधारणत: त्यांचा फोन यायचा.
थोड्याशा विवंचनेतच फोन घेतला. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं अभिनंदन
करण्यासाठी फोन केला होता. माननीय भीमसेन जोशी यांनी गांधीसाहेबांना फोन
करून बँकेत उत्कृष्ट सेवा मिळाल्याचं सांगितलं होतं.
भीमसेन जोशींकडून झालेलं कौतुक सदैव स्मरणात राहील.
वेळेपूर्वीच कर्जाची परतफेड झाली होती. बँकेने वौयक्तिक कर्ज देण्याचे
अधिकार दिलेले असल्यामुळे अशी सेवा देता आली.
मी केवळ उत्सुकता म्हणून हे पैसे कशासाठी घेतले याची माहिती मिळविली.
भीमसेनजींना चांगल्या गाड्या वापरायला आवडत. ते स्वत: कौशल्यानं गाडी
चालवत. ते विलंबित रागात गाणारे असले तरी गाडी मात्र द्रुतगतीनं चालवत.
गाड्यांची देखभाल व्यवस्थित होते ना हे पाहण्यास स्वत: मोटर गॅरेजमध्ये
जात. त्यामुळे गॅरेजमधील मेकॅनिक मंडळींमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता.
या मेकॅनिक लोकांना बक्षिसी म्हणून ती रक्कम त्यांनी दिली होती.
केवढ्या मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्त्व!


श्याम भुर्के, पुणे

(श्याम भुर्के यांच्या `आनंदाचे पासबुक` या मेहता पुब्लीशिंग हाउसने
प्रकाशित कलेल्या पुस्तकातून साभार )

Sunday, January 23, 2011

एक संगीत पर्व संपले

भारतरत्न  पुण्याचे भूषण ,  महान गायक पंडित भीमसेन जोशी गेले. एक संगीत  पर्व कळाच्या गर्भात विलीन झालं. आज सारे  संपले . आत्ता या आठवणी राहिल्यात . त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली .......
<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/kdbvcbZdxtI" frameborder="0" allowFullScreen></iframe>

<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/8R2yZ6y3hh4" frameborder="0" allowFullScreen></iframe>

http://www.globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=Bhimsen%20Joshi&tids=0,5506712509135488087,5060566011251361294,5447696554755719603,5170635957767812886,5127359839747431259,5548366103156939539,5604804497845949342,5101812270810349130,4640785095341005123,5675418674567738575,4730031326987350216,4780720166056020515,4628038796222279931,5198858104487289086,5674668785249559224,5558074667278302018,5172064834922574394,5621702332139356724,4725697195635068073,5558925546597756296,5369305732371131333,5602772693526687996,5588948344007405878,5561211668557565560,4810319213738758682,5661161630309330377,5312962015630323190,5515997034722889046,5188397739653955290,4823246810731913828,5320844758689228211,4749239412603676997,5344266290381956696,5137212310423852887,5725003225769350762,5532498561920983606,5764352281756257896,5120882183704419468,5601993655609600935,4729040589313981387,5673544752702928854,5749543917518204904,4703408697083575156,4783576594666806986,4976462172605039391,5743443892838652993,5134092423991276153,4754

Wednesday, January 19, 2011

चंगळवादाच्या विळख्यात कलांची अवस्था बिकट

 डॉ. अरूणा ढेरे
डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठानामार्फत दिला जाणारा, साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा एक लक्ष रूपयांचा पुरस्कार डॉक्टर अरूणा ढेरे यांना रविवारी १६ जानेवारीला ज्येष्ठ समीक्षक-साहित्यिक चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आला. याप्रसंगी अरूणा ढेरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी हे प्रतिष्ठान साहित्याच्या गौरवाबरोबरच सामाजिक भान ठेवून ही परदेशस्थ माणसे कृतिशिल स्वायत्त संस्थांचा एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत याबद्दल अभिनंदनही केले.  त्यांच्या भाषणातला काही भाग मुद्दाम सर्वांसाठी देत आहे....


प्रेमाच्या पहिल्या उच्चाराइतकचं उत्कट गाईन म्हणते मी सारे काही स्वतःमधून
आणि देवाची फूलसुपारी पदरात न्यावी जपून, वारीच्या लोटत्या गर्दी मधून
तशी नेईन म्हणते कविता भवतीच्या कोलाहालातून...
ही दिंडी खरं तर अजून पंढरपूरला पोचलेली नाही. वाटेतच आहे. पण वाटेत कुणीतरी थांबते. ते जेऊ घालतं, पाणी पाजतं आणि म्हणतं, ` बाई, इथवर आलिस ! शाबास तुझा ! आता धरला नेम सोडू नको. `
आज मिळालेला हा पुरस्कार असा आहे... अशा पुरस्काराचं जसं व्यक्ति म्हणून लेखकाच्या वैयक्तिक वाटचालित स्थान असतं तसं आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जगातही एक स्थान असतं. एखादी मोठी पडझड चालू असताना जो गोंगाट आणि कोलाहाल असतो, त्यातून घातल्या गेलेल्या या दिलाशांच्या हाका असतात. काही चांगलं टिकलेलं आहे, वाचलेले आहे, काही सांभाळलं गेलं आहे, काही नव्याने निर्माण होत आहे- ह्यासाठी समाजाला हाक मारून हे सांगणं आहे.
पडझड तर गेल्या १००-१५० वर्षात अनेक प्रकारची झाली. घट्ट आणि चिरेबंदी कुटुंबव्यवस्थेची झाली. घातक आणि अन्यायी जातिव्यव्स्थेची झाली. आग्रही आणि एकाधिकारी धर्मव्यवस्थेची झाली. स्त्रीच्या कृतिम प्रतिमेची झाली. तिच्यासाठी निषिध्द अशा व्यवस्थेतल्या अनेक परिसरांमध्ये तिच्या अस्तित्वाला जागा निर्माण करून देण्यासाठी झाली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये झाली. साहित्य आणि इतर कलांमधल्या संकुचित भूमिकांचीही झाली.
ही पडझड आवश्यकच होती. पण त्याचबरोबर काही विधायक गोष्टींनाही धक्का लागला आहे. नुसत्या भौतिकवादाच्या नव्हे तर चंगळवादाच्या विळख्यात वाड्मयाची आणि खरे तर सर्वच कलांची अवस्था बिकट होत चालली आहे. जीवनाच्या संदर्भात कलेच्या निर्मितीचा आणि परिणामकतेचा विचार गौण ठरतो आहे आणि साहित्याला काय आणि इतर कलांना काय विक्रयमूल्य देण्याच्य़ा प्रक्रियेला गेल्या दोन दशकांमध्ये कमालीचा वेग आला आहे.
माणसाच्या जगण्यातही नैसर्गिकता नष्ट होण्याची प्रक्रिया काही आजच सुरू झालेली नाही. मानवी संस्कृतिच्या विकासात लगटूनच मानवेतर सृष्टीपासून माणूस दूर होण्याची प्रक्रिया अखंड सुरू आहे. आपला सांस्कृतिक विकास म्हणजे एका बाजूनं प्रचंड भौतिक प्रगतिचा इतिहास आहे. दुस-या बाजूने मानवजातीनं मानवेतर सृष्टीवर मिळवलेल्या वर्चस्वाचा इतिहास आहे.
आपण जीवनाच्या जवळ असण्याला, सृष्टीच्या लयीत असण्याला, चैतन्याचा विस्तारशील अनुभव घेण्याचा उर्मिला कसे पारखे आणि विन्मुख होत आलो आहोत याचा इतिहास आहे. आपण सर्जनाच्या प्रवाहांची मुखं बंद करीत आलो आहोत. शतकानुशतकं आपण स्त्रियांचा, आदिवासींच्या, व्यवस्थेच्या तळाशी असणा-या माणसांचा आवाज दडपत आहोत. आपण अत्यंतिक व्यक्तिवादाच्या टोकावर चढताना सामूहिक जगण्याचं वळण नव्हे तर भानही गमावत चाललो आहोत.
साहित्यिक म्हणून या भौतिक वास्तवाचा आवाज शब्दात उमटवण्याची जबाबदारीही आम्हा लेखकांची आहे. भोवतालच्या सपाटीकरणाच्या गजबज गर्दीत आपला आवाज आणि आपला अनुभव यांचं प्रामाण्य ठेवून मनुष्यकेंद्री निर्माणात गुंतलेला साहित्यकार हे काळानं निर्माण केलेल्या संहारप्रधान प्रश्नांना सगळ्यात समर्पक आणि सर्जक उत्तर असू शकते ,असा माझा विश्वास आहे.
माणसाला जगायला, टिकायला, समृध्द व्हायला उपयोगी पडणारा या जगातला प्रत्येक लहान मोठा स्त्रोत वाचवू पाहणा-यांची जी एक अल्पसंख्य जमात आहे त्यात मी अभिमानानं सामिल आहे.
यासाठी माझ्याजवळ मदतीला आहे तो शब्द आहे.  शेवटी आपलं साहित्य किती टिकेल किंवा किती गाजेल याचा विचार करून आपण लिहित नसतोच. समाजातल्या उदार, समन्वयशील, विधायक रीतीने बंडखोर आणि कसदारपणे परिवर्तनशील अशा विचारधारांचा, संस्थांचा आणि व्यक्तिंचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अभिजतांच्या संस्कृतिला बळ देणा-या लोकसंस्कृतीक बंध-अवबंधांचा शोध घेते आहे. परंपरेच्या जड अशा संदर्भाचौकटीतून भारतीय स्त्रीला बाहेर काढून तिचा जिवंत, संवेदनशील चेहरा न्याहाळण्यासाठी धडपडते आहे.
माझ्या कवितांमधून, कथांमधून, ललित-गद्यामधून—एकूणच सगळ्या लेखनातून स्त्रीविषयक आस्थेचा एक पाझर आहे असं इतरांप्रमाणे मलाही कळतं. पण मला असं खात्रीनं वाटतं की, प्रेम आणि सर्जन या दोन्ही गोष्टींशी आतड्यानं बांधली गेलेली स्त्री आजच्या अस्थिर, पोखरलेल्या आणि तुटलेपणाचा शाप भोगणा-या जगात निर्माणाच्या बाजूनं ठामपणे उभी राहू शकते.
साहित्य ही माणसाला माणूस बनवणारी गोष्ट आहे यावर माझा विश्वास आहे.
आण तूझ्या लालसेची, आण लोकांची आभागी
आण माझ्या डोळियांची, पापणी ठेवीत जागी
मर्ढेकरांच्या या शपथेवर माझा विश्वास आहे. कविता ही आयुष्याचा चेहरा उजळून टाकणारी सोबत आहे यावर माझा विश्वास आहे. माणसांमधल्या आणि माणूस आणि सृष्टी यांच्यामधल्या संवादाच्या शक्यता शोधत राहण्यावर माझा विश्वास आहे.
जातिवंत कार्यकर्त्यांप्रमाणेच जातिवंत लेखकालाही काळानं समोर उभ्या केलेल्या दुःखांचं आणि संकटांचं भय वाटता कामा नये. फक्त त्यातला मनुष्यमैत्रीचा स्पर्श घडविणारी दुःखं नेमकी हेरता आली पाहिजेत. चैतन्यशील संकटं हेरता आली पाहिजेत आणि इतिहासाचा कौल आपल्या बाजूनं मागता आला पाहिजे.
हे शब्द तुमच्या पर्यत पोचविणारा मी नाममात्र....
सुभाष इनामदार,पुणे
<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="440" height="240" src="http://www.youtube.com/embed/AY_Qd0-i7X4" frameborder="0" allowFullScreen></iframe>




-

Thursday, January 13, 2011

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला !

मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे. कट्यार सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे.....आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे....ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांचे निधन झाले...

आणि रंगभूमिवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.


तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...

ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले,,, काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.



नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक.....सारेच....पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले..सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी..इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोहा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रेंयांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.

पुरुषोत्तम दारव्हेकर..पं. वसंतरांव देशपांडे...पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले...याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच...

असा कलावंत...असा निर्मिता... फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे...नाट्यरिषदेला स्वतःचे बळ देणारे सामाजिक भान आणि मराठी समस्कृतीवर प्रेंम करणारे कलावंत म्हणून ...

आणि अवघ्या काही प्रयोगाचून तो एक राजहंस हे कर्णीच्या जीवनावरचे नाटक धाजसाने निर्माण करणारे....ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी...

सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने....

आज नाट्यसंपदा अवघा रंग एकची झाला...ने कार्यरत..आहेच

पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही...

मराठी रंगभूमिवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत...आज काळाच्या पडद्याआड गेला....
त्यांच्या आठवणीतून तो दिसणार...

त्यांच्या तो मीच... या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील...त्यांच्या भुमिकांची आठवण मनात साठवूल

या निर्माता, कलावंत आणि नाटकासाछी आयुष्य वेचणा-या या महान साधकाला....श्रध्दांजली.........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

www.culturalpune.blogspot.com

www.subhashinamdar.blogspot.com

Mob. 9552596276

Monday, January 10, 2011

www.culturalpune.blogspot.com

उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि  विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.
भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी  साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे...
हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद.

सुभाष इनामदार, पुणे

Thursday, January 6, 2011

मटा संस्कृतीचा `स्मार्ट` उदय

शुकवार पासून पुण्याच्या वृत्तपत्रसृष्टीत नवी मटा संस्कृती उदयाला आली आहे. तिचे अस्तित्व काही पारंपारिक पायंड्यांना कदाचित धोका निर्माण ठरू शकेल. याचे उत्तर काळच देईल. पण एक नक्की अशा नव्या रूपाची.. नव क्षितीजांची गरज पुण्याच्या वाढत्या शहराला नक्कीच होती. ती गरज महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीने ओळखली आहे.
तिचे रूप आकर्षित आहे.. तिचा चेहरा सुंदर मेकअप केलेल्या पुणेरी मुलीने अधुनिकतेचे पण साजेलशे रुप घेणा-या नवरूणीसारखे मोहक आहे. तिच्या मजकुरात नव्या तरूणाईचे पडसाद आहेत. तिला ज्यागोष्टी हव्याश्या वाटतात याचे सादरीकरण आहे....
मात्र परंपरेला जपणे ती वाढविणे आणि वृध्दिंगत करणेही तेवढेच महत्वाचे आहे..याची जाणीव या नव्या पारंपारिक वृत्तपत्रांच्या कचेरीतून काम करून समृध्द झालेल्या पत्रकारांनी जाणले असेलच...
काळाचा बोजा...आता दिवसेंदिवस वाढणारा आहे...तो न पेलणारा आहे.. नवी माध्यमे आपलेही काही  ठसे तरूणाईवर कोरणार आहे...तीही काळाची गरज आहे.
आकर्षक छपाईच्या तंत्रांनी अनेक ठिकाणी होणा-या छोट्या समारंभाची दखल इथे घेतली गेली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्राचा परिपूर्ण विचार करता..
आज वाचकात तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग आधिक आहे...जो आपल्या काही नवेपणाचे क्षेय सर्वापर्यंत जावे वाटणारा... ज्याला कलांच्या नवदालनात अजून अडखळल्यासारखे वाटते. ज्याला स्थानिकातही जागा हवी असते.. ज्याचे लक्ष सदाशिवपेठी पुणेरी माणसारखे चाणाक्ष असते....
`शीला की जवानी` बरोबरच त्याला विविध ठिकाणी घडणारे चांगल्या उपक्रमाला प्रसिध्दी हवी असते. त्याला त्या पारंपारिकतेचा ..तिथल्या मक्तेदारीचा....थोड्या आगावूपणाचा तिटकारा आहे...त्या सर्वांना ही नवी मटासंस्कृति कशी सामावून घेणार आहे ?
पुण्यात नवा `आदर्श` देताना ह्या आमच्या `स्मार्ट मित्रा`ला तमाशातला नाचा म्हणून मिरवायचे नाही तर त्याचे खरे सांस्कृतिक बळ सिध्द करायचे आहे..
आमच्यासारखे असंख्य मित्र साथीला आहेतच..पण त्याला नवेपणाचा भपका आणताना परंपरेला धरून प्रसंगी त्याची संस्कृतिक मूल्ये वाढवायची आहेत.
खात्रीने तो ती पूर्ण करेल आणि असंख्य वाचकांच्या घरात केवळ अकरा रूपयात चार महिने दिसणारा हा.. हा.. मित्र आपली खरी गरज भागवून तुमच्या घरचाच सखा बनेल.. तो बनावा हिच सदिच्छा.

आपला मटाप्रेमी,
सुभाष इनामदार, पुणे
9552596276

अभिवाचनातून वेदनेचा पुन:प्रत्यय

आदरणीय वीणाताई यांस,

मी केदार केसकर. पुण्याचा रहिवासी. पुण्यातील झेन्सार या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यामुळे मराठीची ओढ शांत बसू देत नाही. वेळ मिळेल तसा काहीतरी लिहित असतो, वाचत असतो, विचार करत असतो.

गोनीदांच्या साहित्यातील 'शितू' मी सर्वप्रथम वाचली. त्यानंतर - दिवस मी भयंकर काढले. शितू डोक्यावरून खाली उतरण्यास तयारच होईना. एखाद्या मुलीशी कधी संवाद करण्याचा प्रसंग आल्यास वाटायचं, 'शितू'इतकी सोशिकता, सोज्वळपणा, सौंदर्य, समजूतदारपणा या मुलीत असेल काय? बराच काळ मनात खोलवर कुठेतरी काहीतरी अगम्य चालू होतं. आजकाल ही अशी निरागस व्यक्ती मिळणं अवघड आहे. त्यात आमची पिढी संपणार्‍या स्पर्धेमुळे, आर्थिक ओढाताणीतून, पेलणार्‍या जबाबदार्‍यांमुळे त्रस्त आहे आणि या खरं तर नको असलेल्या अतिव्यस्ततेमुळे आम्ही थकून गेलो आहोत. म्हणून बोलता समजून घेणारं कोणीतरी असावं असं खूप वाटतं.

 शितू अजुनही मनाच्या कोपर्‍यात लपून बसलेली आहे ते त्यामुळेच. गोनीदा, कुसुमाग्रज, विंदा, पुल, ना. सि.फडके, भा. रा. तांबे या सार्‍या मोठ्या लेखकांना, कादंबरीकारांना, कविंना भेटण्याची संधी मिळणं ही आमच्या पिढीची मोठी शोकांतिका आहे आणि म्हणूनच हा अभिवाचनाचा कार्यक्रम पहाण्याची संधी मला लाभतेय हे मी माझं भाग्य समजतो.

परवा "पडघवली" ऐकण्यासाठी मी आलो होतो पण जागा मिळाली नाही म्हणून काल जरा लवकरच आलो. कुणा एकाची भ्रमणगाथा ऐकली. तशी ही कादंबरी मी बरीच आधी वाचलेली आहे. ही कादंबरी लिहीली गेली त्यावेळेस मी फक्त उणे २५ वर्षांचा होतो. पण आज ह्या कादंबरीचं तुम्ही केलेलं छंदबद्ध अभिवाचन ऐकून मी त्यात पुन्हा कुठेतरी हरवून गेलो. त्यातील वेदनेच्या नितळ दर्शनाने हरखलो. हादरलो. पुरता हादरलो. या अनुषंगाने मनात घोळणारे विचार आपल्याला कळवावेसे वाटले. मी वयानी लहान आहे म्हणून माझ्या बालबुद्धीला पेलणारे काही प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरेही बहूतेक त्या प्रश्नांमध्येच दडलेली असावीत. वेळ येईल तेव्हा ती मिळतील असं वाटतं.


"
विपदस्सन्तु : शश्वत्" या मागील कुंतीची भूमिका मला काल जाणवली. कळली असे मी म्हणणार नाही. वेदना... सार्‍या सुखाचा उगम बहूतेक या वेदनेपोटीच होत असावा. म्हणजे सुख हे सुद्धा वेदनेचे रूप? आणि आनंदाश्रू म्हणजे? का ती ही वेदना? म्हणूनचं का प्रसूतीच्या वेळेस होणार्‍या दु:खाला प्रसववेदना म्हणतात?मला दहावीत एक कविता होती. कुणाची होती हे आता आठवत नाही.
दु: नको टीचभर हृदयाचे
दु: नको ओंजळभर प्रीतीचे
दु: असे द्या विशाल निजकवेत
येईल क्षितिजासह हे वर्तुळ...

दु: जेव्हा व्यापक, सर्वसमावेषक आणि उदात्त होतं त्यावेळेस वेदनेचा जन्म होतो का? खरतर वेदना हे दु:खाचं बाळ. पण कधीतरी एखाद्या समंजस पोरीने आपल्या आईबापाला समर्थपणे साथ द्यावी असं हे रूप. दु:खापेक्षा वेदना अधिक जवळची वाटते ती बहूतेक यामुळे. पुन्हा वेदनेचा हुंकार वेदनेच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतो. वेदनेची प्रगल्भता जितकी अधिक तितका हुंकार अधिक स्पष्ट आणि जितका हुंकार अधिक स्पष्ट तितकी त्यातून उमटणारी स्पंदने अधिक तीव्र. मग ती स्पंदने दुसर्‍याला जाणवतात पण तोपर्यंत परिस्थिती गंभीर होऊन बसते. यशोदेने शेवटी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गोनिदांनी यशोदेला "नाही यशोदे, मी आता मागे फिरून तुला लहान करणार नाही" असं म्हटलं या वेळेस त्यांच्या वेदनेतील प्रगल्भतेचं दर्शन मला झालं. "दुरितांचे तिमिर जावो" हे मागणं माऊलींनी मागितलं ते या अलौकिक वेदनेच्या पोटीच का?

हे असे प्रश्न  माझ्या डोक्यात घोळत आहेत. तुमच्या अभिवाचनातून या नितांत सुंदर वेदनेचा पुन:प्रत्यय तुम्ही मला दिलात म्हणून मी तुमचा ऋणी आहे. जन्मच जर वेदनेपोटी होत असेल तर ही वेदना मनुष्यजन्माला कर्णाच्या कवच कुंडलांसारखी चिकटून रहाणार हे उघड आहे. पण त्या वेदनेचा हुंकार कान देऊन ऐकणारे जगात बोटांवर मोजण्याइतके आहेत. ज्यांना तो ऐकू येतो ते जाणतात की वेदना सरून गेली की संवेदना उरते आणि माणसाचा व्यास अजूनच मोठा होतो. आकाशावेरी गेलेली ही माणसं... यांना काय म्हणायचं?

दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करायचा एवढच्!

तुमचा नम्र,
केदार केसकर

Tuesday, January 4, 2011

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशे


ती पडघवली..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.

निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....
ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.


सुभाष इनामदार,पुणे
Mob. 9552596276



Sunday, January 2, 2011

स्वप्नऋतु सीडीतून तरूणाईची गाणी

स्वप्न
हेमंतातल्या गारव्यासारखी
गोड आल्हाददायक स्वप्न
चांदराती सरून गेल्यावर
पहाटेला गुलाबी रंग देणारी ..
ही स्वप्ल
अशी हळवी, मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु

स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या  आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे
mob. 9552596276