subhash inamdar

subhash inamdar

Sunday, June 26, 2011

भक्तिची शक्ती

रविवारी पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या मुक्कामी दाखल झाल्या...लाखो वारकरी भावभक्तीची पताका हाती घेऊन.. मुखाने विठ्ठल नामाचा गजर करीत मिळेत त्या जागी आपली मुक्कामाची दिंडी घेऊन...पुणेकरांच्या विशाल मनाचे...पुण्यनगरीतल्या दानशूरांचे दर्शन घडवत .... वारक-यांची सगळी सोय करीताना पहाणे.....हा दुर्मिळ योग....या शहरात अनुभवला गेला.



संख्या कितीही असली तरी या निमित्ताने राजकीय, सामाजिक, सेवाभावी आणि विविध संघठनांचे फलक गल्लोगल्ली फडकत होते. उद्देश एकच वारक-यांची सेवा...
दरवर्षी प्रत्येक दिंडीचा मुक्कामाचा पत्ता एकच असतो.. कुणी बंगल्यात..तर कुणा आपल्या चाळीत..तर नाना पेठेतल्या मशीदतही मुक्कामाची, रहाण्याची आणि भोजनाची सोय केली जाते...
जात धर्म पंथ नसे उरे कांही
भक्तांची सेवा हाची उद्देश
पालखी आली की पांडुरंग पाऊस आणिल याची वारक-यांना खात्री असते...यंदा आता तरी पावसाने चिंब केले नसले तरी आपली उपस्थिती दर्शविली...
दिंडीत दरवरर्षी वाढ होत असते.. यंदा तर आयटीची दिंडी निघाली.. वारक-यांचा उत्साह पाहिला...त्यांचे हरिभक्तित गुंतलेले रूप पाहिले की, हे चैत्यन्य देणारी शक्ति नक्की चराचरात आहे याची खात्री होते.
तुम्ही साधे किलोमिटर चाला तुम्ही दमाल . थकाल..
पण हे भक्तिचे वारकरी हातात तुळशी वृंदावन..खांद्यावर आपले ओझे..हातात टाळ...अशा अवस्थेत रोज ३० ते ५० किलोमिटरचा प्रवास करत पंढरपूरकडे आनंदात नाचत, गात मोठ्या भक्तित तल्लीन होत चालत असतात...
कधी रिंगणात..तर कधी आपल्या दिंडीत नाचत असतात...
एके काळी यात वृध्द जास्त दिसत..पण आज तरूण... नोकरदार,,,स्त्रीवर्ग ..डोईवर मुलाला घेऊन निघालेला शेतकरीही दिसेल....यातच भर म्हणून की काय याचे आकर्षण वाटणारा परदेशी पाहुणा वारकरीही सहभागी होताना पाहिले की हे काही विलक्षण आहे.. वेगळे रसायन आहे.. हा भक्ति शक्तिचा वेगळा जिवंत आविष्कार घडतोय याची खात्री पटते.
महागाईचा राक्षस आवासून असताना... सारी चिंता..सारी भिती...सारी काळजी दूर सारून हा एवढा जनसमुदाय पंढरीच्या वाटेवर चालत निघालाय..हे चैत्यनमयी चित्र..प्रेरणादायी आहे...
एका बाजूला रोजचे जगणे हाच एक चिंतेचा विषय असताना असा लाखोंचा भक्तिसागर टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत विठ्टलाचा धावा करत पंढरपूरच्या दिशेने चालतो..धावतो आहे....काय आहे हे?
चाल त्यांची एकच ध्याती
अवघी विठ्ठल मुखी म्हणती
भावभक्तिचा सारा तो सुकाळ
मोहमाया दूर पळून जाय
काय वर्णू खुंटती ते शब्द
पंढरीच्या पाडुरंगी ठाव देवा
पालख्यांच्या मुक्काम सोमवारी सासवडच्या दिशेने चालू लागेल... जनांचा हा प्रवाह असाच पुढे चालू लागेल...हिच शक्ति ठरलेल्या वेळी...मुक्कामी दाखल होईल...चिंता चित्ती नाशवंत देहीचा हा प्रवास कित्येक शतके सुरू आहे....सुरू राहणार...
या शक्तिचे विराट दर्शन घडविणा-या त्या वारक-यांचा भक्तिला प्रणाम...


त्याच्या बहुरंगी व्यासंगाला प्रणाम...
घडो हिच सेवा...मज वाटे भास
होऊन भक्तरूप...घेई ध्यास

सुभाष इनामदार, पुणे
Mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, June 22, 2011

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे

आज रविवार! जेवून दुपारी झोपलो आणि उठलो तेव्हा संध्याकाळचे ६:०० वाजले होते.
उगाच मग थोडा वेळ टंगळ मंगळ केली. गरम पाण्याने एक वॉश घेतला आणि फ्रेश होऊन घराबाहेर पडलो.
रविवारची संध्याकाळ, शांत, निवांत, आळसावलेली... अशा संध्याकाळी करण्यासारखं काही विशेष नसलं की पावलं आपसूक वळतात तुळशी बागेकडे. तुळशी बागेतील राममंदिर म्हणजे माझं श्रद्धास्थान!

आम्ही जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा हटकून तुळशीबागेला भेट द्यायचो.
खेळण्यांच्या दुकानात ठिय्या मारून बाबांकडे नाहीतर काकाकडे हव्या त्या खेळण्यांसाठी हट्ट धरायचो.
माझं आणि तुळशी बागेचं नातं आहे ते तेव्हापासून. आजही तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं.
सार्‍या कोलाहलातून मन:शांतीकडे नेणारी ती प्राचीन वास्तू, सौभाग्य अलंकारांची दुकानं, अगदी चुलबोळक्यांपासून ते खर्‍याखुर्‍या संसारमांडणीपर्यंत सार्‍या गोष्टी मिळण्याचं पुण्यातील एक हक्काचं,
आपुलकीचं स्थान!
प्रवेश करताच, चंदन, काश्याची वाटी, पूजा साहित्य, देव्हारा, पितळी वस्तू विकणारी ती छोटीशी दुकानं.
त्यात वर्षानुवर्षं घुमत असणारा चंदनाचा, उदबत्त्यांचा परिमल, कुठे दागिन्यांची दुकान, चांदीच्या मांडून ठेवलेल्या वस्तू. झगमगाटापेक्षा साधेपणात जास्त सौंदर्य असतं हे पटवून देणारी आमची तुळशी बाग! असो.
तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्‍यालाच 'गाडी' असं संबोधतो.)


दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते.
मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी,
साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!


या बाबतीत माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी. माझी मुलुंडची मावशी आमच्याकडे पुण्याला रहाण्यास आली होती. उषामावशी. त्यावेळेस मी मास्टर्स करत होतो. शिक्षण चालू असल्याने रियाज करण्यास वेळ मिळत असे.
मी पहाटे लवकर उठून तानपुरा जोडून रियाज करत बसे. त्या दिवशी सुद्धा तसाच देवघराच्या खोलीत बसलो होतो.
राग निवडला होता भैरव! भैरव कमालीचा राग आहे. जितका गोड तितकाच धीरगंभीर! पहाटेच्या वेळेस गाण्याचा हा राग. यातील कोमल रिषभ आणि कोमल धैवताची जादू काही औरच आहे. पुन्हा कोमल रिषभावर आंदोलन आहे.
आंदोलन म्हणजे त्या स्वराचं केलेलं गोलाकार आवर्तन! कोमल धैवतावरून पंचमावर उतरण्यातील आणि कोमल रिषभावरून शुद्ध गंधारावर जाण्यातील आनंद हा एक अनुभव असतो. मी गात बसलो होतो.
उषामावशीने ते ऐकलं आणि खोलीत माझ्या नकळत ती येऊन बसली. माझी आलापी चालू होती.
तानपुर्‍यातून गंधाराची निष्पत्ती अमाप होत होती. त्यात माझा गंधार सुद्धा त्या दिवशी अगदी मिसळून जात होता.
प्रत्येक स्वराला एक उंची असते. त्या उंचीचा स्वर बरोबर लागला की आपण म्हणतो frequency match झाली. एखाद्या माणसाशी frequency match होणं म्हणजे अजून काय? स्वर माणसांसारखे असतात.
त्यांच्याशी मैत्र जमले की त्या घोळक्यात कधीही एकटं वाटत नाही, एकटं असूनसुद्धा.
माझा रियाज झाला आणि मी उठलो. पहातो तर उषामावशी मागेच बसली होती. मला मजा वाटली.
तीने सुद्धा तोंड भरून कौतुक केलं आणि त्यापुढे तीने मला जे सांगितलं ते मी कधीही विसरणार नाही.
ती म्हणाली

"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."


त्यावेळेस मला कळलं की frequency match होणं म्हणजे काय? जसा रेडिओ एखाद्या frequency ला लागतो तसच हे. अगदी मनापासून देवाचं दर्शन घेत असता, मनात एखादी इच्छा यावी आणि एखादं फूल मूर्तीवरून टपकन पडावं याचा अर्थ सुद्धा माझ्या मते हाच आहे. सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो.
ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं
आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच
आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं.
स्वामी परमहंस म्हणतात...

"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.

त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.
प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.



केदार केसकर

Thursday, June 16, 2011

सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या

- विजय मागिकर साठीत



आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह
त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...

प्रिय विजय,
परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो. पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला. नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो. चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले. आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे, अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्याभूमिकेत वावरणे...कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो. आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. तात्या आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला. पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले. अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस... मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....
तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. तात्यांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली. तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली. विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.
विजय, शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पटकावलीस. चार-पाच वर्षे ती केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस. लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्तीस वर्षें.
मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे. आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.
दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास . दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव जागृत करून नवीन क्षेत्रात पुढचे पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले. हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला. खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर, विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य, आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.
मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..
पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्यकर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.
तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे. म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस. केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बांधणी करणारा सूत्रधार तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले. नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण ते कुणाला कळूही न देता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार ,मदत करणे . थोडक्यात म्हणजे....
तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले

विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी.. कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर. निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे. कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.
तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,
तुझाच,

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Wednesday, June 15, 2011

सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या- विजय मागिकर साठीत

आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...

प्रिय विजय,

परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो. पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला. नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो. चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले. आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे, अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्याभूमिकेत वावरणे...कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो. आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. नाना आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला. पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले. अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस...क्वचित मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....
तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. नानांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली. तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली. विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.
विजय, शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पत्करली. चार-पाच वर्षे केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस. लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्ती, वर्षें. मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे. आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.
दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास.दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव जागृत करून नवे क्षेत्रात पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले. हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला. खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर, विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य, आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.

मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..

पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्ककर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.
तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे. म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस. केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बाधणी करणारा सूत्रधार तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले. नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण कुणाला न सांगता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार बनलास.

तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले


विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी.. कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर. निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे. कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.
तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,



तुझाच,

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Thursday, June 9, 2011

नविन चालींवर आधारित -अमृताचा कल्लोळू

काही महिन्यापूर्वी झलक संस्थेच्या तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सादर झालेल्या अमृताचा कल्लोळू या अभंगवाणीच्या कार्यक्रमाने मला एक वेगळाच आनंदाचा धक्का दिला. त्याविषयीच मी आज लिहिणार आहे.
हा पूर्णतः नविन चालींवर आधारित कार्यक्रम असूनही प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते.सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर आणि सौ. मंजुषा पाटील. गायक कलाकार तर उत्तमच होते, परंतु मन उल्हसित झाले ते अत्यंत अप्रतिम, वेगळ्या आणि बुध्दीप्रधान चाली ऐकून.


संपूर्णपणे रागदारीवर आधारित असलेल्या त्या नाविन्यपूर्ण रचनांनी माझ्यासारख्या जयपूर गायकीचा अभ्यास करणा-या कलावंताला तर भुरळच पडली. रचनाकार प्रा. केशव परांजपे त्यांच्या रसाळ, प्रभावी, अभ्यासपूर्ण, ओघवत्या शैलीत ज्ञानदेवांच्या अभंगाचे रंग उलगडून दाखवत होते. रसिकांच्या कानांना ही एक मेजवानीच मिळाली होती.
मीही संतकवींच्या अनेक रचना गाते, परंतु रचनांमधली आशयघनता. विषयाच्या गाभ्याला ङात घालण्याची हातोटी आणि अवघड वळणे असूनही थेट ह्दयाशी संवाद साधणा-या रचना . असा सुंदर संगम पाहून भारावल्यासारखे झाले.
रचनाकारांची भेट घेतल्याशिवाय राहवेना. निरनिराळे राग, निरनिराळ्या वजनाचे ठेके. कधी लोकसंगीताचा बाज घेउन येत होते. रागदारीचा तर सखोल अभ्यास जाणवत होता. भूप रागातल्या सकळ मंगळनिधी या नामाच्या अभंगातून मूर्छना तत्वाने साकारलेले वैविध्य जाणवत होते.
त्यानंतरच्या मन तुरंबा काहो, अनुपम्य नेने, सुखाचिये आवडी, कृपाळू माझा ज्ञानेश्वर या विशेष उल्लेखनीय रचनांमध्ये तोडी, मारवा, ललत, गोरखकल्याण, केदार, भैरवी अशा अनेक रागांच्या छटा मन मोहविणा-या होत्या.
घडचक्री कुंभार घडीतसे माती, ही सात मात्रांच्या ठेक्यातली लोकसंगीताचा बाज घेऊन आलेली रचना तर खूपच मनाला भिडली.
सुरवातीचा शुध्द स्वरांचा आणि शेवटचा भैरवीमधला गजरही नेहमी आपण ऐकतो त्या गजरांपेक्षा निराळी छाप मनावर ठेऊन गेला.
तुझा आण वाहिन गा देवराया, नी तर डोळ्यात पाणी आणि अंगभर रोमांच आणले.
कॉमर्ससारख्या विषयाचे प्राचार्य असूनही सौंदर्यपूर्ण कलात्मक दृष्टी, सांगीतीक विचार इतका परिपूर्ण कसा असे आश्चर्य वाटून मी केशवजींची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. अत्यंत सुरेल आणि अगत्यशील असा परांजपे दांपत्याकडून पाहुणचार घेत असताना माहिती कळली, की इतक्या सुंदर रचनांमागे तीस वर्षांचा अभ्यास आहे. संगीतावरच्या नितांत प्रेमामुळे त्यांनी मुंबई विलेपार्ले येथे स्वरमाऊली हा शास्त्रीय संगातासाठीची संस्था स्थापन केली. ही संस्था मुख्यतः उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा वरदहस्त केशवजींना लाभला आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.


किशोरीताईंच्या गायकीचा त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या रचनांतून जाणवतो. स्वरमाऊलीच्या वतीने २५० हून अधिक कार्यक्रम. ५० पेक्षा अधिक कार्यशाळा. मुलाखती झालेल्या आहेत. सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे, हा त्यांचा हूतू सफल झाला आहे. केशव परांजपे यांनी विविध वृत्तपत्रे,. अनुभवसारख्या मासिकातून किशोरीताईं, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, शोभा गुर्टू, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारख्या दिग्गजांच्या संगीतविषयक सविस्तर मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. समीक्षालेखन, कवितालेखन हे साहित्यातील प्रांतावरही त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
अमृताचा कल्लोळू या कार्यक्रमाप्रमाणेच ज्ञानेश्वरांच्या विराण्या, अभंग, रामदास, संत तुकाराम त्याचप्रमाणे ग्रेस, बोरकर, बहिणाबाई चौधरी, आरती प्रभू, मर्ढेकर, पाडगावकर या कर्व कवींच्या काव्यांना त्यांनी चाली लावल्या आहेत.
केशवजी म्हणाले की, रांगांकडे पाहण्याची उत्कट, सुंदर, संवेदनाक्षम दृष्टी त्यांना किशोरीताईंच्या गायकीमध्ये मिळाली. एखाद्या रचनेसाठी चाल सुचणे यासाठीही जन्मजात देणगीच असावी लागते. त्यामुळे त्यांचा चालींमध्य़े आत्म्याची कहन जाणवते. प्रसरणशील, विस्तारक्षम चाली, काही भाग रांगांसाठी मोकळा तर काही भाग विविध रागांच्या pharses घेऊन येतो. त्यांचा भावनिक प्रभाव, रागांमधल्या स्वरचित्रांचा प्रभाव चालींमध्ये नक्कीच प्रतित होतो.

कवितेचे, शब्दांचे म्हणणे स्वरातून व्यक्त करण्याइतक्या समर्थ चाली केशवजींच्या आहेत. त्यांच्या मते कविता गुणगुणताना अनेक विचार सुचतात. त्यातून सर्वंकश भावना ज्यातून प्रकट होतील ती चाल तयार होते. म्हणूनच ह्यातून निर्माण होणा-या कलाकृतीला बुध्दीमत्तेच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेल्या ह्या चाली आहेत.
अनेक भावना, अनेक रंग, अशा मिश्र चाली असूनही त्यात एकजिनसीपणा जाणवत रहातो. कधी थेट संवाद तर कधी आर्त व्याकुळता त्यात जाणवते.
केशव परांजपे अत्यांत साधे, मितभाषी परंतु बहुआयामी व्याक्तिमत्व.
कधी कधी दुर्गम वाटणा-या चाली असूनही स्वतःला भावले ते मांडले, असा व्यवहारीपणाचा स्पर्शही नसलेला दृष्टीकोन.
म्हणूनच पैसा, प्रसिध्दी यांच्यामागे लाहहलेल्या आजच्या जगात कोणताही व्यावसायिक हेतू न ठोवता संगीतासाठी, संगीत करणा-या अशा लोकांचे मोल अधिक वाटते.



सौ. सानिया पाटणकर, पुणे
(शास्त्रीय गायिका)
मोबा- ९४२२५२३४९१