subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, January 4, 2011

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशे


ती पडघवली..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.

निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....
ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.


सुभाष इनामदार,पुणे
Mob. 9552596276