subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, February 19, 2013

अभंगरचनातून भीमसेनजीच्या स्मृतींना अभिवादन



 ज्यांनी कित्येकांना प्रेरणा दिली आणि जे भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर अढळ सूर्याप्रमाणे आपल्यात नसूनही तळपत आहे त्या पं. भिमसेन जोशी यांच्या जयंतीची आठवण ठेऊन ( ४ फेब्रुवारी १९२२) त्यांच्या संगतीत गायन शिकलेले आणि स्वतःच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमातून तो वसा सादर करतात ते पुण्याचे राजेंद्र दिक्षीत. यांनी शनिवारी` नाट्यरंग-अभंग `हा एक वेगळा अनुभव रसिकांसमोर सादर केला. 

 भारतरत्न स्वरभास्कर पं . भीमसेन जोशी यांच्या जन्मतिथी निमित्त श्रीगुरु संगीत प्रसारक मंडळ  आणि  मैत्री  परिवार संस्था, (पुणे शाखा ) यांच्या सहकार्याने   "नाट्यरंग अभंग" हा कार्यक्रम दि. १६ फेब्रु वारी २०१३ ला टिळक स्मारक मंदीर, पुणे  इथे आयोजित करण्यात आला होता.    भक्ती पागे   पं . भीमसेन जोशी यांचे शिष्य राजेंद्र दीक्षित यांनी नाट्य संगीत  पंडीतजींनी अजरामर केलेल्या अभंग  रचनां सादर  करून  पंडितजींच्या स्मृतींना अभिवादन केले.  

   भक्ती पागे  यांनी गायलेल्या' नरवर  कृष्णा समान ...', 'उगवला चंद्र पुनवेचा...',' हे सुरांनो चंद्र व्हा... 'या रचनांना श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्या.   
अतिशय समर्थपणे व सुरेल स्वरात राजेंद्र दीक्षित यांनी सादर केलेल्या 'रूप पाहता लोचनी...', 'माझे माहेर पंढरी...', 'तुका आकाशा येवढा...', 'कान्होबा तुझी घोंगडी चांगली...' या  रचनांनी  श्रोत्यांना  पंडितजींची आठवण झाली.    

पंडीतजींच्या धाटणीची गायनशैली आत्मसात करुन राजेंद्र दीक्षित यांनी ते स्वर अभंगातून पुढे दाखविण्याचा प्रयत्न केला. तर भक्ति पागे यांनी आपल्या नाट्यसंगीत आणि अभंगातून आवाजाची जादुमयी सुरावट निर्माण करुन श्रोत्यांकडून पसंती मिळविली...
राजेंद्र दीक्षित व भक्ती पागे  यांनी गायलेल्या बाजे मुरलिया ... ऐकून  श्रोते विशेष आनंदित झाले.  शेवटी 'अगा  वैकुन्ठीच्या राया...'  या संत रचनेनंतर पंडितजींची  'जो भजे हरी को सदा....' या भैरवीच्या ध्वनिमुद्रीकेने कार्यक्रमाची सांगता झाली.  
कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. असे कार्यक्रम सतत ऐकण्यास मिळावेत अशी अपेक्षा  श्रोत्यांनी  व्यक्त केली. 

 कार्यक्रम रंगला तो साथीदारांमुळे. पेटीवर होते संजय गोगटे, पांडुरंग मुखडे यांनी तबल्याची साथ केली. तर पखवाजवर नाद धरला तो मनोज भांडवलकर यांनी. व्हायोलीनवर होत्या चारुशीला गोसावी. टाळांचा स्वर कानात साठवून ठेवत श्रोते घरी गेले ते माऊली टाकळकरांच्यामुळे. ..

या संस्थेचा नवीन कलावंतांना व्यासपीठ आणि त्यांना रसिकांसमोर आणणे आणि पं. स्वरज्योत पुढे तेवत ठेवण्याचा मानस आहे.
   
      
-दुर्गा दिक्षित, पुणे