subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, December 21, 2010

पुणेरी `गोडबोल्याची` एकसष्टी

जन्मजात पुणोरी बाणा अंगात आणि स्वभावात रूजविणारा तमाम मराठी रसिकांच्या समोर असणारे नाव म्हणजे सुधीर गाडगीळ. आम्ही काही जण त्यांला गोडबोलेही म्हणतो.सदाशिवपेठी पुणेरी भाषा सुधीर गाडगीळ यांच्या नसानसातून फिरत असल्याने त्यांच्या सा-या मुलाखत तंत्रात पुणेरी स्पष्टपणा डोकोवणे सहाजिकच नाही काय ?
पंचवीशीपर्यत मुंकुंदराव किर्लोस्करांच्या साप्ताहिक मनोहरात पत्रकारितेची उमेदीची वर्षे सुधीर गाडगीळांनी घालविली...नाही त्यामुळेच ते घडले.. दिसले आणि सर्वत्र संचारु लागले.  कॉलेजमधल्या नायकासारखे उमदे रुप. झकपकीत पोषाखी ऐट. दिमाखदार बोलणे आणि सतत रूपेरी पडद्याच्या जवळ जाणा-या या तरूणाला साप्तकाहिकाच्या रुपाने संपर्कमाध्यमच साध्य झाले. अनेक मुलाखती शब्दात उमटू लागल्या. त्यांची वाहवा मिळाली. खरे तर हीच संधी पुढे रंगमंचीय स्थिर झाली ती स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या गदिमा गीतांच्या कार्यक्रमातील निवेदॉकाच्या भूमिकेत. सुधीर मोघेंनंतर सुधीर गाडगीळ या निवेदकाच्या भूमिकेत रुजले आणि सजलेही.
या निमित्ताने महाराष्ट्राला एक सूज्ञ . पुणेरी भाषेचा. सुसंस्कृत मुलाखतकार मिळाला.
रंगमंचावरचे निवेदन भावेनेच्या भरात श्रोत्यांच्या घरा-घरापर्य़ंत जाउन पोचले. अस्सल मराठी सुसंस्कृत किस्से आणि विनोदाचा बाज घेऊन `सुधीर गाडगीळ` नावाला वयल येत गेले. रंगमंचावर गदिमा, बाबुजी यांच्याशी गप्पांचा फड मारता मारता दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर गाडगीळांची वाणी प्रकट होउ लागली. आशा भोसले आमि सुधीर फडके यांच्या मुलाखतीच्या रूपातून गाडगीळ मराठी माणसांच्या जवळचे झाले.
विषयाचा अभ्य़ास आणि तात्काळ व्यक्त होण्याची हातोटी साधल्याने त्यांचे ते प्रश्न कलावंतांमधली प्रतीमा अधीक उजळ करायला मदतच झाली. पण पुढे गाडगीळ काय चिमटे काढतील याचा नेम नसल्याने कलावंतही सावध होत. भाषेतला मवाळपणा आणि शब्दातले बोचरे वळण यातून मुलाखत रंगत जायची. मुलाखत घेणारा आमि रसिक यातले अंतर कमी होण्यास यामुळे मदतच झाली.पुढे कार्यक्रमा वाढले. वाहिन्यात वाढ झाली. तरी गाडगीळ तेच राहिले. साधे आणि तेवढेच खोचक पुणेरी बोलणारे.
नोकरी केव्हाच सोडून दिलेली. निवेदक आमि मुलाखतकाराची झूल अंगावर घेतली आणि हा शब्दभ्रमाचा खेळाडू महाराष्ट्रातच काय जगभरातल्या मराठी माणसांच्या जवळ गेला. उड्डाण झाले. परदेश पाहिला. मनमुराद आनंद घेतला. त्यांनाही तो दिला. दिवाळी पहाट म्हणू नका, समारंभातले साधे सोपे वाटणारे निवेदन म्हणी नका जिथे-तिथे त्यांचीच मोनॉपॉली झाली. त्यांच्या वाणीने जग जिंकले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणूनच सुधीर गाडगीळ एक सांस्कृतिक संस्थान ठरले. अनेक संदर्भ. अनेक इतिहास आणि अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली आहेत.

तसा हा गप्पीष्ट माणूस. पण संसारात वहिनिंच्या आजाराने खचलेला आणि आता एकला चालो रे च्या धोपट मार्गावर वाटचाल सुरू आहे. कलावंत मित्र झाले. संस्था मिळाल्या. राजकीय नेत्यांच्या जवळीक लाभली.  पण कधी हाततल्या लेखणीची आणि वाणीचा कधीही दूरोपयोग केला नाही. सात्वीकता आणि प्रेमळता आजही एकसष्टीच्या उंबठ्यावर झिरपत आहे.
घराला घरपण आलेय. मुलांनी पंख मोठे केलेत. नातवांनी घरात पसारा केलाय. भिंती रंगवल्यात. पण हा आजोबा झालेला सुधीर आजही तेवढाच हसतमुख आहे. चेह-यावरची तुकतुकी कमी झालीय. थोड्या अस्पष्ट रेषाही उमटायला लागल्यात. पण मन तरूण आङे. शब्दात बळ आहे. ताकद आहे. आमच्या सर्वाचा हा मित्र असाच आनंदी रहावा. त्याला हसतमुखच पहात रहावे. त्यांच्या इच्छांना नवे बळ मिळावे..... असाच धीराचा चेहरा इतरांनाही आधार वाटावा.
काल ती व्याक्ती होती...आज ती संस्था बनली......... त्याच्या कर्तृत्वाला सलाम....आनंद देत आणि घेत रहा.........

तुझाच मित्र म्ङणवून घेणारा
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmal.com
Mob. 9552596276

वा गुरू


चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे. मूळ ईंगर्जी  कथेवरून  बेतलेल्या या कथालकातली सारी पात्रे आपले चेहरे घेऊन येतात .अस्सल मराठमोळ्या वातावरणाचा मुलामा देउन एक नवा अनुभव सुयोगच्या या नाटकाने दिला आहे.
ब-याच दिवसांनी या नाटकाच्या निमित्ताने नाटकाचा मूळ प्रेक्षक पुन्हा एकदा खेचला गेल्याचे चित्र पहिल्या प्रयोगाला दिसत होते. दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा सुदर आविष्कार पाहण्याची संधी या नाटकाने दिली . त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये ही एक वेगळी छटा पहायला मिळते. ही भूमिका निभावताना त्या व्य़ाक्तिचा बाज. त्याच्या मनाला चटका देणारे अनुभव. आणि प्रेम आणि स्पर्श या दोन भाषेतून माणसाने का बोलावे याचे गुरूजींच्या रूपातले विवेचन अगदी आत रुतुन बसते. शांततेलाही अर्थ देणारा हा हाडाचा शिक्षक जे बोलतो ते खरोखरीच ऐकत रहावेसे वाटते. ती भाषा पेलण्याची आणि संवादता भावार्थ त्यांच्या भूमिकेतून अनुभवायला हवा.  ती मानसीकता, ते शव्दातले नाते. तो जिव्हाळा , ती वेदना, ती असाय्यता , ती ओढ, ते आसुसलेले हळवे रुप. सारेच प्रभावळकरांच्या व्यक्तिमत्वातून उलगडत जाते. वेदनेला सोसताना ज्यापध्दतीने बोलण्यातून आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा एखादा हाडाचा शिक्षक जशी माया लावेल तसे ते व्यक्तित्व दिलीप प्रभालकर यानाटकातून प्रेश्रकांसमोर आणतात. त्यांच्या भूमिकेला अनुभवताना म्हणूनच ओठा शब्द येतो...वा गुरु.

छोट्या-छोट्या प्रसंगातून खुलत जाणारे हे नाटक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवित नेते. विजय केंकरे यांनी अगदी व्यक्तिरेखेला साजेशी भाषेची ढब कलाकारांच्या उत्तम टिमकडून साकारुन समोर ठेवली आहे. आपण आता यापुढे काय होणार या उत्सुकतेतू प्रत्येक प्रसंग निरिक्षणपूर्वक टिपत रहातो. शिक्षकाच्या व्यक्तिरेखेतून मानवी मनाचे सामान्य वाटणारे असामान्य क्षण नेमके ठळकपणे बाहेर काढून ते प्रेक्षकांसमोर उलगडण्यात केंकरे यशश्वी झाले आहेत.
कोणेएकेकाळी आपल्या हाताखाली शिकून गेलेल्या विद्यार्थ्य़ांच्या आठवणीत रमता रमता जिवनाचे तत्वज्ञानच या नाटकातून लेखकाने नेमके मांडले आहे. त्यात सत्यता तर आहेच पण ते कधी कधी जिव्हारी लागेल इतके झोंहते देखील.
दिलिप प्रभावळकरांच्या जोडीला अतुल परचुरे सारखा हुन्नरी कलावंत या नाटकातून रसिकांसमोर येतो. शब्दांच्या सुरेल मैफलीतील ती नेमकी तान घेतो आणि दादही घेतो तो अतुल परचुरे. व्यवसायाच्या धकाधकीतही भावभावनांचे नाते घट्ट करताना आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतो. सहजता आणि तेवढीच ओढ निर्माण करून अतुल परचुरे सोळावर्षांनंतर भेटणा-या शिक्षकांविषयींची कृतज्ञताही तेवढ्याच नम्रपणे जेव्हा साकारते तेव्हा टाळ्याही भरभरुन येतात.
ब-याच कालावधीनंतर गिरीजा काटदरे संगीत नाटकांची परंपरा असलेल्या भूमिकातून गद्य नाटकात आल्या. नुसत्याच आल्या नाहीत तर ते सूरही आळवून दाद घेउन गेल्या. पूर्णीमा तळवलकरांनीही साकारलेली तरूणी विविधअंगानी आमच्यासमोर आणली. करीयरकडे लक्ष देता देता लग्नाला वेळच नसणा-या आजच्या पीढीला तीच्याकडून शिकायला मिळते.
स्वतःची छाप पाडणारे. दिलिप प्रभावळकर आणि अतुल परचुरेंच्या आभिनयाने सौंदर्यवान बनविलेले चंद्रशेखर फणळकरांचे हे नाटक विजय केंकरेंच्या दिग्दशर्नातून पहाताना मजा आला.
आजचा प्रगल्भ होत असलेला प्रेक्षक `वा गुरू`ला दाद देईल अशा आशा आहे.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276


गंधर्व नाटक मंडळी-बालगंधर्वात

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दिवाळीनंतचा दिपोत्सव सुरु होता. रंगमंचावर गंधर्व नाटक मंडळीतल्या कलाकारांची मैफल रंगली होती. आमंत्रीत अशा नाट्यसंगीताच्या जाणकांरांच्या सहवासातल्या मैफलीचे चित्रिकरण सुरू होते. वातावरणात संगीत नाटके पाहणारा तो उल्हसित पुणेकर दाद देत होता. बालगंधर्वातल्या बालगंधर्वाच्या चित्रकार देउस्करांनी रेखाटलेल्या प्रतिमेजवळ बालगंधर्वांची भूमिका करणारा करणारा कलावंत सुबोध भावे प्रसिध्दी माध्यमांना बाईट देत होता. निमित्त होते. एके काळी संगीत रंगभूमिवर सुवर्णकाळ आणणा-या महानायकाच्या चरित्रावरच्या चित्रपटाचे शुभारंभी चित्रिकरण. गंधर्व नाटक कंपनीच्या सेटवर मंगळवारी ९ नोह्बरला चित्रपटाचा मूहूर्त साधला गेला. आणि जमलेल्या शेकडो रसिकांनी नितिन चंदर्कांत देसाई निर्मित बालगंधर्व चित्रपटला शुभेच्छा दिल्या.

तीन महिने बालगंधर्वाचे मिळेल ते साहित्य वाचनाचा झपाटा लावून सव्वा-दोन तासाच्या चित्रपटाद्वारे गंधर्व एक कलावंत आणि गंधर्वांच्या चरित्राला मराठी भाषेतून साकार करणारी कथा, पटकथा आणि संवादाच्या साच्यात बंदिस्त केली ती अभिराम भडकमकर यांच्या शब्दरूपाने. गंधर्व गायकीचे साक्षिदार . त्यांच्यासोबत काम करणारे जयमाला शिलेदारांसारखे कलाकार . लता मंगेशकरांच्या आठवणीतले बालगंधर्व. बालगंधर्वांच्या आयुष्यातला पत्नीचा आणि गोहरजान यांचा प्रभाव. यातून संगीत रंगभूवर त्यांना स्कारलेली नाटके . त्यातले नाट्यसंगीत. सा-यातून असे बालगंधर्व आता न होणे असे पुलं नी म्हटले असतानाही बालगंधर्वयूग  शोधण्याचा प्रयत्न करणारे नितिन देसाई यांच्या कलाकृतीतून मराठी महानायकाची ही कथा पडद्यावर साकारली जाणार आहे.
भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने या चित्रपटाचा मूहूर्त करताना गंधर्व परिवाराला पुण्याच्या रसिकांनी दाद दिली तशीच  चित्रपटाला दाद देतील असा विश्वास चंदर्कांत प्रॉडक्शन प्रा. लि. चे नितिन देसाई यांनी व्यक्त केला.
नारायण श्रीपाद राजहंस यांच्या संगीताने आणि अभिनयाने भारलेल्या काळाला साकारताना हा चित्रपट बनविणे हे शिवधनुष्य पेलण्याचा आपण प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवि जाधव सांगतात.
आपल्या संगीताची मोहिनी घालणा-या या महानायकाला पडद्यावर साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. बालगंधर्वांच्या वेषात तो आज वावरत होता. खरी कसोटी आहे स्त्री वेषातले बालगंधर्व साकार करताना. आपल्या वाट्याला ही भूमिका आली याचा आनंद व्यक्त करताना ती भूमिका पेलण्याची संधी मिळाली याचे समाधान  सुबोधच्या चेह-यावर दिसत होते.
बालगंधर्वांच्या पत्नीची भूमिका विभावरी देशपांडे साकारणार आहेत. त्यांच्या मते आपल्या पतीला सतत प्रेत्साहन देणारी आणि तरीही पडद्यामागे राहिलेली ही बाई बालगंधर्वांच्या जवळ जेव्हा गोहरजान आल्या तेव्हापासून ढासळली. बालगंधर्वांच्या आयुष्यातले  लक्ष्मीचे स्थान काय होते ते तुम्हाला पडद्यावर दिसेल. मला ही भूमिका मिळाली याचा आनंद झाल्याचे विभावरी सांगते.
जुने संगीत. त्यातही ऑर्गनचा स्वर. भारावलेले संगीत. आणि संगीतावर प्रेम करणारा प्रेक्षक यासा-यांतून या चित्रपटाच्या संगीताचा बाज निर्माण करणे हे जबाबदारीचे आणि जोखमीचे होते. संगीतातला भराव देताना कुठेही अधुनिक काळाशी सुसंगत असे कांही घडता कामा नये याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आज नांदी ऐकली ना... चित्रपटातल्या नाट्यसंगीताही तसाच प्रय्तन केला आहे. कौशल इनामदार बोलत होते. आनंद भाटे या पं. भीमसेन जोशा यांच्या शिष्याने गंधर्व गायकीची ढब हुबेहुब निर्मिण केली आहे. स्वानंद किरकिरे यांच्या दोन गाण्यांनीही या चित्रपटाला वेगळेपण पुरविले आहे. पारंपारिक संगीत नाटकातले तेच वातावरण संगीतातून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे कौशल सांगतो.
भारलेल्या वातावणाने पुन्हा एकदा संगीत नाटकांचा काळ जिवंत झाल्यासारखे भासले. एके काळी रंगभूमी गाजविणा-या कलावंताचे जीवन रुपेरी पडद्यावर येते आणि आजकाल खंडीत झालेली संगीत नाटकांची परंपरा पुन्हा वाढच रहावी अशीच इच्छा अनेक जण इथे बोलून दाखवत होते. कलावंताचे माहेरघर असणा-या पुण्यात गंधर्वयुग घडले. त्यामुळे बालगधर्वांच्य़ा चित्रपटाला इतके सुयोग्य वातावरण दुसरीकडे कुठे मिळणार....
पुण्याच्या सुवर्णमय पेढीचे दाजीकाका गाडगीळ यांच्या सुवर्णमयी उपस्थितीने संगीताचा सुवर्णकाळ देणा-या महानायकाचा परिसस्पर्श घडला. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, जयमालाबाई शिलेदार , किर्ती शिलेदार, लता भोगले, भास्करबूवा बखले यांची नातसून शैला दातार, , लंडनचे अनिल नेने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, बालगंधर्वांच्या नात्यापैकी काही आणि संगीत रसिक यांच्या साक्षीने साकारलेल्या गंधर्वातल्या त्या संगीत पर्वाने काय सांगावे  पुन्हा संगीत नाटकांची पुन्हा चलती व्हावी. मराठी रंगभूमीवर जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचे सुनिल बर्वे यांनी मनी घेतले आहे. तसे कुणीतरी संगीत नाटकांना रसिकाक्श्रय मिळव्ण्यासाठी पुढे येईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करीत आहे.

बालगंधर्व या चित्रपटातून पुढच्या पीढीला काही जुनी जाणती व्यक्तिमत्वे पहायला मिळणार आहेत. यात व्ही. शांताराम (ओमकार कुलकर्णी), शंकरराव मुजुमदार (विद्याधर जोशी), गणपतराव बोडस ( किशोर कदम), देवल मास्तर (श्रीरंग गोडबोले), गोविंदराव टेंबे (आदित्य ओक), कृष्णाजी खाडीलकर (क्षितीज झारापकर), राम गणेश गडकरी (मनोज कोल्हटकर), बाबुराव पेंटर ( अभय कुलकर्णी), भास्करबूवा बखले ( अजय पुरकर), मास्टर कृष्णराव ( विक्रंत आजगावकर) छत्रपती शाहू महाराज ( राहूल सोलापूरकर) आणि गोहरजान ( प्राची मेहेत्रे- सध्या ती बाजीराव मस्तानी मध्ये मस्तानी करत आहे).
चित्रपटाच्या माध्यमातून का होईना संगीत रंगभूमिचा आणि त्यातल्या कलावंतांचा इतिहास जपला जाईल याचा आनंद अधिक आहे.


सुभाष इनामदार, पुणे
Mob- 9552596276




सांस्कृतिक घटनांचा साक्षिदार

सांस्कृतिक पुणे
कालच्या आजच्या आणि उद्याच्या सांस्कृतिक घटनांचा साक्षिदार
काल, आज, उद्याच्या सांस्कृतिक घडामोडींचा आलेख
सांस्कृतिक घटनांचा भाष्यकार