subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, January 22, 2013

`सुनो भाई साधो..`पुन्हा पुन्हा अनुभवा



संत कबीर..एक धाडसी संत. आजच्या काळातही त्याचे कवित्व..त्याने लिहलेले दोहे अजरामर आहेत. ते काळाच्या ओघात नव्या संदर्भात सुसंगत वाटताहेत...हेच सारे त्यांनी स्पष्ट तर करुन दिलेच पण त्यांनी कविता खरवंडीकर यांच्या आवाजातून आणि धनंजय खरवंडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मखमली पोतडीतून निटसपणे अर्थ पोचवत रसिंकांसमोर पुन्हा जेव्हा उलगडले तेव्हा टाळ्यांची दाद मिळत गेली..रंगत जसजशी वाढत गेली तशी उत्सुकताही वाढत गेली....


हा अनुभव पुणेकर रसिकांना मिळाला एस एम जोशी सभागृहात.. रविवारी ( २० जोनेवारी २०१३) संध्याकाळी. तो अधिक मनात रुंजी घालू लागला तो डॉ. अनिल अवचट यांच्या सहज आणि प्रत्ययकारी निरुपणामुळे..त्यांनी या महान संतांच्या रचनांना स्वतःचा स्वतंत्र दृष्टीक्षेप जोडला..कुठल्याही धर्माची पताका न फडकवता त्यांनी माणसातल्या अस्सलतेचे दर्शन घडविणा-या रचना लिहिल्या. त्या १४व्या आणि १५व्या शतकात रचल्या गेल्या असाव्यात..पण त्या वरवर श्रीमंती मिरविणा-या माणसांना त्यांच्या वेदनवांवर आजही घाव घालतात. हेच तर सारे अवचटांनी पटवून दिले. त्यांची भाषा कमालीची लाघवी तर होतीच पण त्यात सहजी मार्मिकतेचे दर्शन घडत होते.


अनिल अवचट यांनी या निमित्ताने रसिकांना संत कबीर आणि त्यांच्या रचनांमागचे सार समजावून दिले. त्यांच्या दृष्टीने ते संत तुकारामांचे त्या अर्थाने पूर्वज मानावे लागेल. आजच्या काळात अनेक सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांचे विचार आजही लागू पडत असल्याचा पुरावा त्यांना आपल्या सूत्रातून सांगितला. कदाचित आजच्या समाजाला ते वाट दाखवीत आहेत असेच जणू यातून दर्शन घडले.

त्यांच्या एका अभंगात सबूरी हा शब्द आहे..सबुरी म्हणजे संयम. पण जिथे हा शब्द वापरला जातो तिथे संयमाचा पूर्ण अभाव असल्याचे दिसते..त्यांनी सबुरी तून सारे साधेल असे म्हटले आहे.
जीवनात साधेपणा महत्वाचा आहे. केवळ मोठेपणाचे दर्शन न घडता..मन मोठे करुन आहे तसे रहा असा सल्लाही दिला. सगळी माणसे सारखी आहेत. सगळ्यांचा उगम एकाच मार्गातून झाला आहे..मग जातीचे वेगळेपण कशासाठी. कबीराच्या दृष्टीने परमेश्वरापेक्षाही गुरु मोठा कारण तो परमेश्वरापाशी जाण्याचा मार्ग दाखवितो.

अहंकार सोडून इतरांमध्ये विरघळून जगायला शिका असा संदेशही कबीराच्या रचनेत असल्याचे मर्म डॉ. अनिल अवचट सांगतात.
एक अभंग ऐकविला की कविता खरवंडीकर तोच अभंग आपल्या सुरेल आणि विविध सप्तकात फिरणारा सूर आळवत शब्दांना नेमक्या मुशीत फिरवून पुन्हा समेवर आणायच्या...शब्द स्वर आणि ताल यांची ही रंगलेली मैफल प्रत्येक अभंगादरम्यान अधिक हवीहवीशी वाटू लागली..

हमन है इश्क मस्तना. ए दिल गाफिल गफलत मतकर. मन लागो मेरे यार फकिरी मे. मत करो मोह तू हरिभजन को मान रे. हम बिगडे तो बिगडे भाई, तुम बिगडे तो राम दुहाई.
किंवा
आई गवना की सारी. नैना झंकार झनकारे, झीनी झीनी बीनी चदरीया. प्रितम घर आये, रहेना नही देस बिराना है आणि शेवटी ये संसार कारे की बाही- उलझ पुलझ मर जाना है...
( कदाचित रचना मला जी ऐकू आली...त्यात बदल असू शकेल..क्षमस्व)

अनेक रचनांचा पोत त्याला धनंजय खरवंडीकर यांनी दिलेली स्वरचाल फारच मोहकपणे कविता खरवंडीकर यांनी सादर केली..त्यातला भाव..त्यातली आर्तता आणि त्याची परिणीती ती भावना नेमकी स्पष्ट सांगणारी होती.
म्हणूनच `सुनो भाई साधो..` हा एक अतिशय सुंदर कार्य़क्रम देऊन  त्यांना आपली उत्तम छाप रसिकांवर टाकली यात कोणतेही अतिशयोक्ति विधान नाही. धनंजय खरवंडीकर यांची तबला संगत आणि राजीव परांजपे यांनी तेवढीच ऑर्गनवर केलेली साथ यातून कबीररचना समजण्यास आणि त्यारचना मनापर्य़ंत पोचण्यास कार्यभूत  झाली..

जेव्हा केव्हा तो कार्यक्रम जिथे असेल..तिथे मात्र डॉ. अनिल अवचट यांची निरुपणाची साथ हवी..त्यातूनच कबीर तर समजण्यास मदत होईलच . पण आजच्या काळातही या रचना किती समर्पक आहेत याचे दर्शन होईल. पुन्हा हा कार्यक्रम व्हावा हिच अपेक्षा..आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच.


सुभाष इनामदार,पुणे
9552596276

subhashinamdar@gmail.com

पुन्हा एकदा आशा भोसले..चिंब स्वरांनी भिजवत

केवळ चारच महिन्यांपूर्वी पोटची मुलगी स्वतःच्या पायांनी या जगातून बाहेर गेल्याचं दुःख या आवाजाच्या उराशी होतं.. "ती त्सुनामी होती आणि त्यामुळे हृदयातनं शेवटपर्यंत रक्त ठिबकत राहणार आहे,'' असं एका बाजूनं म्हणणारी ही आई दुसरीकडे, "मी खंबीरपणे लढणार आहे... तुम्हीही खंबीरपणे आयुष्याचा सामना करा,' असं सांगत आपल्या चिरतरुण आवाजानं सर्वसामान्यांच्या जगण्यातील आशा जागवत होती... याचं कारण तीच "आशा' होती...

मुलीच्या जाण्याचं दुःख बाजूला सारून पुण्यातल्या मंचावरून स्वरांची बरसात करण्यासाठी आशा भोसले आल्या, त्याला कारणही तसंच होतं. एका रुग्णालयाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम घेतला होता. वारज्यातलं ते रुग्णालय होतं त्यांच्या आईच्या म्हणजे माई मंगेशकर यांच्या नावाचं. आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी "गेले द्यायचे राहून...' या नावानं ही मैफल तब्बल पाच तास सजवली. हे दोघं बहीण-भाऊही तब्बल बारा वर्षांनी एका मंचावर गाण्यासाठी आले आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गच्च भरून गेलं.

केवळ सुरवातीचं संगीत ऐकताच गीताचे बोल मनात रुंजी घालू लागले.
आशाताईंनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे, हे मधूनच निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं खरं; पण तीनही सप्तकांतून फिरणारा त्यांचा खास आवाज मात्र ते वय आपलं नसल्याचंच दाखवून देत होता. नुसता आवाजच नव्हे; तर उत्साहानं मंचावर वावरताना, नव्हे बागडताना पाहून त्यांचं शरीरही वय विसरलं की काय, असाच प्रश्‍न पडत होता.

"का रे दुरावा, का हा अबोला...' हा बाबूजींचा स्वरसाज सादर करताना त्यांनी गाडगीळांना सोबत घेऊन त्यांच्याशी लडिवाळ हरकती केल्या. "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...' म्हणताना एखाद्या तरुणीचा खरेच कुणी हात धरल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल, त्याचा स्वराभिनय त्यांनी केला आणि त्याला दाद मिळाली. "जांभूळ पिकल्या झाडाखाली...' या गीतात "बल्ले बल्ले' अशा पंजाबी ओळी मिसळून त्यांनी ओढणी उडवत भांगडाही केला. "गेले द्यायचे राहून...' हे गीत नूरजहॉं, लता मंगेशकर, गुलाम अली, हृदयनाथ यांच्या शैलीत सादर करून त्यांनी टाळ्या वसूल केल्या. "मागे उभा मंगेश', "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे', "बुगडी माझी सांडली ग...', "नभ उतरू आलं...', "केव्हा तरी पहाटे...', "रेशमाच्या रेघांनी', "तरुण आहे रात्र अजुनी', "गोमू संगतीनं...', "या रावजी', "उषःकाल होता होता...', अशा रचना एकामागून एक रसिकांना मुग्ध करीत होत्या. त्यात गीत आलं... "नाच नाचुनी अति मी दमले...', त्या गाण्याच्या वेळी आशाताईंचं मन बोलू लागलं...

 ""माझ्या आयुष्यात त्सुनामी येऊन गेली. संसाराच्या गडबडीत गाणं मी विसरत चालले होते. त्या वेळी बाळनं (हृदयनाथांनी) मला पेटी घेऊन बसवलं आणि म्हटला, "गा...' त्यानं मला सांगितलं, "जगात सगळं होत राहतं... तू स्थितप्रज्ञ हो...' त्याच्याच सांगण्यामुळे मी आज इथं उभी आहे, तुम्हाला बघू शकतेय. तो माझ्यापेक्षा छोटा असला, तरी माझा गुरूच आहे...''

'चांदणे शिंपीत जाशी' हे गाणं अठरा वर्षांच्या हृदयनाथानं "माझं गाणं गाशील का?' असं विचारलं. त्या वेळी मी मोठी होते, त्या गर्वातच मी "ठीक आहे,' म्हटलं; पण प्रत्यक्षात गाणं फारच अवघड होतं, अशी आठवणही आशाताईंनी सांगितली. त्यानंतर हंसध्वनी याच रागात हृदयनाथांनी सादर केलेलं मीराबाईंचं "करम की गति न्यारी संतो...' हे गीत वातावरण गंभीर करीत गेलं. संगीतकार सलिल कुलकर्णी यांनी हृदयनाथांना साथ करीत "त्याची बाई मज सोडवेना ओढ' सादर केले, तर कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं आणि हृदयनाथांनी गायलेलं "तव नयनांचे दल हलले ग...' हे गीत त्या दोघांनी रंगवलं. सचिन जांभेकर यांनी कार्यक्रमाचे स्वरसंचलन केले.

http://online3.esakal.com/esakal/20130122/5168654307515090508.htm

(सकाळ,पुणेच्या सौजन्याने)