subhash inamdar

subhash inamdar

Monday, August 27, 2012

`विभोर` या कविता संग्रहाचा `देखणा` समारंभ


हिशोब करता
आयुष्याचे
हाती उरतो
एक कवडसा...


असे म्हणत म्हणत मूळच्या पुण्याच्या पण पतीच्याबरोबर तीन खंडात ( त्रीखंडातही म्हणायला हरकत नाही) फिरस्तीपणाने जीनव जगलेल्या ...
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाची पदवी संपादन करुन आता केवळ शब्दांत इमले उभारणा-या...
उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या `विभोर` या कविता संग्रहाचे कालच्या आणि आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवीयत्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झोकात प्रकाशन तर झालेच..




मराठी भाषेपासून दूर जाउनही नवे शब्द..नवी चाहूल
देत मराठी कवींच्या मांदायळीत एक आश्वासक नाव घेऊन आपल्या याच संग्रहातल्या कांही कवीतांना घेऊन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबध्द केलेल्या मराठी अल्बमचे साग्रसंगीत अगदी दणक्यात पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते याच समारंभात अनावरण केले गेले.

अगदी अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगाय़चे म्हणजे `देखणा` समारंभ पुणेकरांच्या साक्षीने `विभोर`मय झाला होता.

नवखेपणाच्या खुणा त्यांच्या कवीतेते जवळजवळ नाहीत असा आश्वासक सूर लावून अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवीतेतल्या विलक्षणपणाची स्तुती केली... ती करताना त्या सांगतात, ` त्यांच्या कवीतेतून कानांना आणि डोळ्यांना पंचेद्रियांची ताकद मिळते, जगण्यातले बारकाने शांतपणे कवीतेतून व्यक्त करण्याची उज्जला अन्नछत्रे यांची तडफड त्यांच्या कवीतेत जाणवते..जगण्यातले हरवलेपण या कवीतेत पकडणारी ही कवीता असल्याचे सांगून त्यांच्याकडून अधिक मागणी करावी अशी विलक्षण ताकद स्पष्ट होत असल्याचे त्या सांगतात. शब्दातला अनुभव संगीतकार मिलिंद जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने पोचविल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

यानिमित्ताने या कवीता संग्रहाला प्रस्तावना लिहिणा-या डॉ. निलिमा गुंडी, पं. प्रभाकर जोग, उत्कर्षचे सुधाकर जोशी, सीडीचे निर्मीते फाऊंटन म्युझिक कंपनीचे संचालक कांतीभाई ओसवाल, रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, आणि यामागचे महत्वाचे नाव म्हणजे अरुण अन्नछत्रे सा-यांनी समारंभाला रंगत आणली.




मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेल्या चार गीतांची झलकही संगीताच्या ट्रॅकवर उपस्थितांना ऐकता आल्यामुळे कवीतेचा पोत आणि त्याला लाभलेले सुरेलपण अनुभवता आले. रुद्रतांडव अशा शंकराच्या विविध तालवाद्यातून निघालेले निनिद आणि त्याला सुयोग्य अशी दमदार , तडफदार शब्दांची जोड देऊन रघुनंदन पणशीकरांनी ते इतके सुंदर नटविले आहे की, त्या गाण्यासाठी का होईना ही सीडी विकत घ्यावीशी वाटेल...एकूणच संगीत देताना शब्दानां अधिक सुरेल करताना भारतीय वाद्यमेळीतून वातावरणाला आणि शब्दांना पोषक अशा सूरावटी तयार करुन त्या तेवढ्याच ताकदीच्या गायकांकडून गाऊन घेऊन हा अल्बम ऐकण्यासारखा सजविला आहे...


रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, अन्नछत्रे यांची सध्या रोमानियात बारावीत शिकत असलेली कन्याका चैतन्या हिने या सीडीत एक नवोदित गायिका म्हणून घेतलेला सहभाग हा अभिमानाचा भाग होता..तिनेही यातल्या दोन कवींतांना आपल्या आवाजात सादर केले.



स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी या सीडीत आपल्या आवाजत कवीतेचे वाचन करुन त्यातली तरलता आणि शब्दमाधुर्य रसिकांपर्यत पोचविले आहे.




उज्ज्वला अन्न्छत्रे यांची कालची अवस्था त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणेज..

स्निग्ध सावळ्या अंधारी मी
माझी मजला सापडते
माझ्याशी हो ओळख माझी
नाते मजसी मम जुळते...




अशी झाली होती...आपल्याच कवीता ऐकताना त्या मलाच समजावून सांगताहेत असा भास होत असल्याचे त्या सांगतात.
संगीतकाराने कवितेचा आवाज व्हायचे असते.. एका ओळीत संगीतकाराचे या सीडीतले स्थान समर्पक शब्दात मिलिंद जोशी यांनी मांडले.

आपल्या प्रस्तावनेत डॉ. गुंडी या कवितांचे आणि कवयीत्रीचे मर्म सांगतात. त्या लिहितात, कवयित्रीकडे कवीतालेखनासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, रचनेला चैतन्याचा स्पर्श देणीरी उत्स्फूर्तता आणि कवितेला आशयाची डूब देणारी चिंतनशीलता असल्याची ग्वाही यातील प्रत्येक कवितांमधून मिळते. या कवितांमध्ये आई आणि मुलगी असा आधिच्या आणि नंतरच्या पिढ्य़ांशी असलेला स्त्रीत्वाचा अनुबंध व्यक्त करणा-या रचना आहेत. निसर्गचित्रांनीही हे विश्व संपन्न आहे. यातील निसर्गचित्रे तरल आणि भावविभोर आहेत...( स्वत कवयित्री उत्तम चित्रकार असल्यामुळे पुस्तकाचे कव्हर आणि आतली चित्रेही त्यांनीच रेखाटली आहेत.)

`विभोर`च्या निमित्ताने मराठी भाषेची नाळ कायम ठेवणा-या असंख्य कलावंतांना आणि साहित्यिकांना तसेच कवींना मनोमन सलाम करावासा वाटतो...इथे आम्ही इंग्रजाळलेपण जपत भाषेचे मूळ सौंदर्य विसरत चाललो आहोत..पण उज्ज्वला अन्नछत्रेंसारखे अनेकजण ती भाषा..तीचे आपले पण संस्कृती आणि तिचा लहेजा सांभाळतातहेत..वाढवित आहेत.....आम्हाला त्यांचा अभिमान आहे.



`विभोर`च्या समारंभात गायक रविंद्र साठे, संगीतकार मिलिंद जोशी, पडद्यामागचे सूत्रधार अरुण अन्नछत्रे, सौ. उज्ज्वला अन्नछत्रे, नव्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली चैतन्या अन्नछत्रे आणि गायक व संगीतकार रघुनंदन पणशीकर....




सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596726

Monday, August 20, 2012

कीर्ति शिलेदार




बालगंधर्व रंगमंदिरी मंगळवारी एक खास समारंभ साजरा होत आहे..त्यानिमित्त...

संगीत सौभद्रचा प्रयोग विमलाबाई गरवारे हायस्कुलच्या संमेलनात त्यांनी प्रथम केला आणि मराठी रंगभूमिची पताका आपल्या खांद्यावर घेतल्याचे तेव्हा जाणविले..तो झेंडा घेऊन आज पन्नास वर्षे झाली...संगीत नाटकांची आणि स्वतःची कीर्ति एकांड्या शिलेदारासारखी मिरवत आजही त्या डौलाने मिरवत आहेत...

त्यांच्या उमेदीच्या काळातल्या भूमिकांनी संगीत रसिक वन्स मोअरची दाद देत...
दादा ते आले ना...हे वाक्य अशा काही थाटात उच्चारत की आठवण यावी ती बालगंधर्वांची .आठवण व्हावी आपली आई आणि मार्गदर्शक जयमालाबाईंची.....



जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकतल्या नामवंत कलावंतांच्या घरी दोन कन्या रत्ने जन्माला आली ती म्हणजे लता आणि कीर्ती.....त्या दोघींनी आपल्या कलासेवेचा वारसा केवळ जपलाच नव्हे तर वाढविला..सजविला आणि नटविलाही...



आज कीर्ती शिलेदार त्या कारकीर्दीच्या पन्नाशीच्या प्रवासात अखंड मिरवित आहेत. जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनासारखा दुसरा गुरु नाही हे त्या जाणतात..मानतात..म्हणूनच संगीत नाटकांची पताका आपल्या शिरावर घेऊन त्या आजही रसिकांच्या तृप्त जेह-यावर समाधान सहजपणे आणण्यात यशस्वी होत आहेत...



मायबाप प्रेक्षक हेच आपले सारे काही हे मानून ही संगीत सेवा करत अनेक शिष्यांना त्या तयार करीत आहेत..पण आज संगीत नाटकांचा वर्गच कमी होत आहे...इच्छा असूनही प्रयोग कमीत कमी कालावधीत सादर केले जात आहेत...आजूनही ती धग रसिकांच्या मनात आहे..तिचे जतन करत कीर्ती शिलेदार आणि त्यांची संगीत संस्था करीत आहे..




त्यांच्या यशामागे कष्टाची परंपरा आहे...गुरुंचे मार्गदर्शन आहे...रसिकांची पावती आहे आणि आई-वडिलांची पुण्याई आहे..
स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शाकुंतल, एकच प्याला, विद्याहरण, स्वरसम्राज्ञी, सौभद्र किती नावे घ्यावीत तेवढया नाटकात त्यांच्या भूमिका आहेत...शिवाय नाट्यसंगीत ऐकणारा चाहता वर्गही निर्माण झाला आहे...
परंपरेची जोपासना यापुढेही उत्तम घडावी हिच नटेश्वरापाशी इच्छा..




सुभाष इनामदार ,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, August 17, 2012

एक रविवार एक चित्रकार- रवीमुकुल

' एक रविवार एक चित्रकार ' चा पहिला रविवार प्रसिद्ध चित्रकार रवीमुकुल यांच्या सोबत....


' अक्षर मानव ' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'एक रविवार एक चित्रकार ' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर रविवारी एक नवा आणि नामवंत चित्रकार आपल्या शैलीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधेल, काही प्रात्याक्षिके चित्रकार करून दाखवेल आणि विद्यार्थाकडूनही करून घेईल. हा उपक्रम सलग सात रविवार चालणार आहे.

या उपक्रमाला १९ ऑगस्टच्या रविवार पासून सुरुवात होत आहे.

पहिल्या रविवारी प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल हे मुलांमध्ये मिसळून चित्रकलेबद्दल संवाद साधतील. मुलांनी घरून आणलेला डबा सुद्धा ते खातील. अतिशय खेळीमेळीच्या आणि मोकळ्या वातावरणात मुलांना चित्रकलेचा निखळ आनंद देणारा हा उपक्रम आहे. चारुहास पंडित, मेहबूब शेख, ल. म. कडू, देविदास पेशवे, अनिल उपळेकर, गिरीश सहस्त्रबुद्धे हे नामवंत चित्रकार अनुक्रमे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १६ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. आठव्या रविवारी मुलांची चित्रकलेची स्पर्धा घेतली जाईल आणि उत्कृष्ट चित्रकारांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

रविमुकुल यांच्याविषयी -


मुखपृष्ठांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन हा प्रकार आपल्याकडे नाहीच. मी स्वतः त्यासाठी एक थोडासा प्रयत्न करतो आहे. स्लाइड्सच्या माध्यमातून मुखपृष्ठनिर्मितीची माहिती देणारा, त्यातील आव्हानं सांगणारा मुखपृष्ठाची गोष्ट, हा कार्यक्रम मी सादर करत असतो. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शिवाय यावर आधारित एक पुस्तकही मी लिहीत आहे. माझ्या मते तरी मराठीत हा असा पहिलाच प्रयत्न असावा. मुखपृष्ठ काढणं हे एक आव्हान असतं आणि दर वेळी त्यात काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळते असं मला वाटतं. मुखपृष्ठ काढण्याआधी पुस्तक वाचायलाच हवं ते वाचलं की आपल्या मनात त्याची एक प्रतिमा तयार होते. ज्यात आपले तसेच लेखकाचे अनुभव मिसळले जातात व यातून एक चांगलं मुखपृष्ठ तयार होतं. प्रत्येक मुखपृष्ठामागे एक गोष्ट असते. कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करण्याचं काम जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते तयार करण्याआधी मी मुद्दाम येरवडा तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या कोठड्या पहायला गेलो होतो. त्यामुळे मला नेमकं काय करायचं आहे याची जाणीव आली. अशाच वेगवेगळ्या प्रक्रियेतून हे मुखपृष्ठ तयार होत असतं. या कलेला अनुल्लेखाने मारणं थांबवायला हवं.

रविमुकुल हे नामवंत मुखपृष्ठकार, ग्रंथ सजावटकार, क्यालीग्राफर, छायाचित्रकार आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास ३००० पुस्तकांची मुखपृष्ठे केलेली आहेत. 'मुखपृष्ठाची गोष्ट' हा दीड तासाचा कार्यक्रमही ते सदर करतात.



स्थळ : श्री शिवाजी मराठा संस्थेचे जिजामाता मुलींचे हायस्कूल , ४२५ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरीच्या समोरची गल्ली, शिवाजी रस्त्याजवळ,
पुणे - ४११००२
दिनांक : रविवार, १९ ऑगस्ट २०१२
वेळ : सकाळी १० ते १


------

हेतू काय ?

या उपक्रमाला पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील विविध शाळांमधील ९ ते १५ या वयोगटातील १०० विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
दर रविवारी चित्रकार नवे असतील विद्यार्थी मात्र तेच असतील. मुलांमध्ये चित्रकला या विषयाची आस्था वाढावी, त्यांच्यातील चित्रकाराला चालना मिळावी, चित्रकलेची समाज वाढावी, चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा आणि चित्रकलेचा सलग संस्कार मुलांवर व्हावा, हा हेतू यामागे आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नाही.

-------