subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 28, 2013

डॉ. अर्चना गोडबोले-पर्यावरणतज्ज्ञ

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले..

तीव्र इच्छेचा परिस हातात असला आणि त्याला अथक, मन:पूर्वक प्रयत्नांची जोड मिळाली तर एखादी अनवट वाटसुद्धा कशी लखलखीत होऊन उजळून निघते याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. अर्चना गोडबोले, ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’च्या (AERF) संस्थापिका... पण अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर कोकणातील देवराया आणि पर्यायाने पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरावे म्हणून अखंड काम करणारी स्त्री...

महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया आणि त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पती असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. आज कोकणातील देवरायांचा हा प्रश्न केवळ ‘लोकल’ नाही, तर ‘ग्लोबल’ पातळीवर होणारी तापमानवाढ, बदलणारे ऋतुचक्र, नैसर्गिक संसाधनांची अमाप वेगाने होणारी हानी अशा सगळ्या प्रश्नांशी त्याचे नाते आहे.

या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अर्चना कधी सावंतवाडी, कुडाळजवळच्या अगदी दुर्गम अशा छोटय़ा गावांमध्ये असतात तर कधी दोन-अडीच महिने अमेरिकेत मात्र दोन्ही ठिकाणचा अजेंडा एकच. समविचारी लोकांच्या भेटीगाठी. पर्यावरणाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काय प्रयत्न करता येईल याची आखणी आणि असेच काही.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाच्या घरात पैशाची श्रीमंती फार नव्हती, पण पुस्तक, वाचन, चर्चा अशी वैचारिक समृद्धी भरपूर होती. मोठी स्वप्नं बघण्यासाठी लागणारी हिंमत तिला तिच्या वडिलांनी दिली, अर्चना यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागलेली बघायची होती तेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता अर्चना यांनी वनस्पती नामकरणशास्त्रात एम. एस्सी. केली मग मानव वनस्पतीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी जणू झपाटलेला कालखंड होता. मनापासून आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्याचा आनंद तर होताच, पण पश्चिम घाट बचाव चळवळीच्या संपर्कात आल्याने आवडत्या विषयात प्रत्यक्ष काम करण्याचे धडेही त्याच वेळी मिळत होते. चळवळीतील सहकारी असलेले आणि पर्यावरणासंबंधात मराठी पत्रकारिता करणारे जगदीश गोडबोलेने शंभर दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालण्याचे ठरवले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कामाची दिशा अर्चना यांना या मोहिमेतून मिळाली आणि स्वत:मधील सामथ्र्य, कौशल्य याची ओळखही स्पष्टपणे झाली. या मोहिमेनंतर त्यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण खात्यात नोकरीत केली, पण त्या कामाचे समाधान फारसे मिळाले नाही, पण जंगल संरक्षण आणि संवर्धन या कामासाठी आवश्यक असलेली अभ्यास व संशोधनाची पाश्र्वभूमी मात्र तयार झाली.

देवरायांचे संरक्षण-संवर्धन करणारी संस्था स्थापण्याच्या खटाटोपाऐवजी पर्यावरण विषयातील एखादे झुळझुळीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील पद, नोकरी मिळवणे हे त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली, खडतर पण शाश्वत विकासाचे आश्वासन देणारी. जैविक विविधतेच्या संदर्भात संशोधन, या विविधतेचे रक्षण आणि संवर्धन आणि त्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन हे सूत्र घेऊन(AERF) या त्यांच्या संस्थेने काम सुरू केले. पुढे पर्यावरणासाठी इतके मूलभूत काम करणाऱ्या संस्थेला आणि माणसांना कोकणच्या जंगलाने आमंत्रण दिले...!

कोकणात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या देवराया म्हणजे निव्वळ वृक्षसमूह आणि त्यावरील प्राणी-पक्षी जीवन नाही. ती एक संपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. परस्परांना जगवणारी आणि त्यामुळे परस्परांवर अवलंबून असणारी. त्याच्या आसपास जगणाऱ्या माणसांच्या जीवनाला सर्वार्थाने आधार देणारी ही व्यवस्था... या व्यवस्थेला मूठभर लोभी माणसांपासून वाचवायची गरज आहे तर त्यासाठी लोकांचा पाठिंबा हवा, मदत हवी, लोकजागृती आणि त्यातून स्वयंस्फूर्तीने लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे त्यांचे सगळे कामच लोकसहभागाभोवती गुंफले आहे.

सध्या देवराई संरक्षणाबरोबर, खाणकाम उद्योग हे ही एक कडवं आव्हान बनतं आहे. पण त्याच्याशी लढण्यासाठीही मोर्चे काढण्यापेक्षा, नारेबाजी करण्यापेक्षा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे धोरण अर्चनाने अनुसरले आहे कारण मोर्चे काढून, आंदोलन करून, सरकारवर जबाबदारी टाकून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पूर्ण पणे थांबणार नाहीत. फार तर सरकारी आदेश निघतील हे त्यांना देवरई संरक्षणाच्या अनुभवातून कळून चुकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील असनिये गावातील खाणकाम थांबवण्यासाठी या परिसरातील जैवविविधतेचा एक वर्ष सखोल अभ्यास करून तपशीलवार अहवाल तयार केला गेला आणि गावातील लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनवाईमध्ये या अहवालाच्या आधारे प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यात आला. समाजातील सत्ताधीश, पैशाची अमाप सत्ता बाळगत निर्णय आपल्या बाजूने वळवणाऱ्यांचा विरोध पत्कारत ज्या भूमीच्या पोटात तुम्ही खणत खोल उतरता तिचे आणि तिच्या आधारे जगणाऱ्या माणसांची काही बाजू आहे व ती त्या हिरिरीने मांडते आहेत.

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं निव्वळ वाचवणं हे अर्चना यांच्या पुढील आव्हान नाही तर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं हे त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे काम आहे आणि त्यासाठी My Forest नावाचा उपक्रम त्यांनी वं त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतला आहे. जैवविविधतेच्या प्रश्नी ज्यांना आस्था आहे त्यांनी एक एकर जमीन पाच वर्षांसाठी, पाच हजार रुपये देऊन दत्तक घ्यायची. हे पैसे जंगले तोडून पैसे कमवू इच्छिणाऱ्या जमीन मालकाला दिले जातात आणि जंगल वाचवले जाते. एक जंगल वाचते तेव्हा त्याच्या अंगा-खांद्यावर जगणारे प्राणी, पक्षी, कीटक तर वाचतातच, पण हवेचे प्रदूषण काही अंशाने कमी होते आणि पावसाचे चार काळे ढग त्या जंगलाच्या माथ्यावर येण्याच्या शक्यता वाढतात.

अर्चना यांच्या आयुष्याचा साथीदार जगदीश त्यांचा हात सोडून गेल्यावर आता निसर्ग हाच त्यांचा आप्त, मित्र सर्व काही आहे. भटकंती करीत निसर्गाची तऱ्हेतऱ्हेची रूपे बघायला आवडणाऱ्या अर्चना यांना या भटकंतीतच विविधरंगी, अद्भुत निसर्ग, त्याची अनंत रूपे बघायला मिळाली.

आत्तापर्यंत जागतिकीकरणाचे वारे येण्यापूर्वीपर्यंत सामान्य माणसांचे निसर्गाशी काहीतरी नाते होते. घरातील प्रत्येकाला किमान चार झाडांची नावे ठाऊक होती. अंगणा-परसातील झाडे ओळखता येत होती. निसर्गातील शांतता त्याला हवीशी वाटत होती. या ना त्या निमित्ताने तो निसर्गाशी जोडलेला होता. त्यामुळे ‘निसर्गाला सांभाळा’ हे सामान्य माणसाला सांगणे-पटवून देणे सोपे होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या रेटय़ाने माहिती, उपभोगाची साधने याचा जो एक महापूर आपल्याकडे आला आहे, त्यात हे नाते, मूल्यविवेक फार वाहून गेला आहे. आता निसर्गाचा आदर करणे माणसं विसरलीच आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये निसर्गाबद्दलची, त्यातील संसाधनांबद्दलची कमालीची वाढलेली बेफिकिरी आणि अलिप्तपणा त्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते आहे ते फक्त ओरबाडून घेण्यापुरतेच. अशा या आव्हानांशी आता पर्यावरणासाठी लढणाऱ्या अर्चनासारख्या कार्यकर्त्यांना लढावे लागते आहे. २०११ ला डॉ. अर्चना गोडबोले आणि कोल्हापूरच्या ‘निसर्ग मित्र'चे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटाचा भाग असणाऱ्या राज्यांच्या संस्थां, पर्यावरणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरविले आहे.

हिरवाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन, हिरव्या वाटेवरचा ह्या वेगळ्या प्रवासावर असणाऱ्या अर्चना सारख्या अनेकांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांकारिता आणि पर्यावरण संवार्धानाकरिता अनेक अनेक शुभेच्छा...!!!


साभार- लोकसत्ता...



पहावा..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यासाठी



 एखादी मराठी मुलगी परदेशात राहून परत आपल्या घरी आल्यावर जसे मराठी बोलेल तसाच काहीसा संवाद इशा कोप्पिकर हिच्यामार्फत मात या चित्रपटात ऐकावा लागेल. पण तीने काम मनापासून केले आहे.व्यवसायने मॉडेल अशी ती आणि तो स्ट्रक्चरल इंजीनिअर..दोघेही आदी प्रेमात मग लग्नाच्या चौकटीत अडकतात.पुढे एक मुलगी होते आणि ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आवाजाचा मुलीवर काहीच परिणाम दिसत नाही..मग आई-वडीलांच्या लक्षात येते. ही कर्णबधीर आहे ते.

मात या चित्रपटाची कथा इथून सुरु होते..वडील..म्हणजे उच्चशिक्षीत असणारा समीर धर्माधिकारी ..हे सारे तुझ्या वडीलांमुळे घडल्याचे दुषण लावतो आणि या लॅव्हीश कुटुंबात मीठाच खडा पडतो...समीर पुढे करीयच्या मागे परदेशातच जातो..इकडे ती इशा आपले मॉडेलिंगचे करियर सोडून मुलीच्या प्रगतीसाठी पुढे सरसावते..त्याला तिच्या सासूबाईंची साथ मिळते..त्यातून हिला समजतेतीला बुध्दीबळाची जात्याच ओळख पटते आहे.मग ती एकेकाळच्या ग्रॅंड़ मास्टर असेलल्या सुहास पळशीकरकडे जातात..तिथे मिनी आता यातच गती घेणार हे दिसते..पुढे तेच होते..

खरं म्हणजे हि कथा आहे..त्या जिद्दी आई-मुलीच्या यशस्वी संघर्षाची आणि अशक्य वाटणारे सारे काही सहजपण घडू शकते जर तुमच्यात ती ताकद असेल..आत्मबऴ असेल आणि तुमच्या मागे खंबीर भूमिका घेणारे पालकांचा तेवढा सबळ आधार असेल तर...


बुध्दीबळासारखा खेळ असूनही त्यातल्या काही खेळी जर माहित असतील तर हा मध्येतरानंतर फारच बुद्दीबळाच्या खेळींनी व्यपलेला चित्रपट तुम्हाला आवडेल.नाहीतर थो़डे बोअर व्हाल..
बुध्दीबळ आवडणा-यांनी तर पहावाच..पण अंगातल्या गुणांचे चिज करणारे छत्र मिळाले तर काय होऊ शकते याचे ते एक उत्तम उदाहरण आहे.

आजच्या काळात घडणारा एक चकचकीत घरातला हा चित्रपट..वातावरणही ते तसेच...वरवर प्रेम असलेल्या कुटुंबीयासारखे.
आजही इतक्या हल्काय विटचारांचे लोक या सोकॉल्ड श्रीमंती घरात वावरतात..हे दाखविण्यात दिग्ददर्सकाबरोबर कॅमेराही तुम्हाला सांगेल..मराठी चित्रपटात का असू नये पॉश ..झगमगीत घर

समुद्र..ते किनारे...त्या गाड्यातल्या गाण्याच्यां जागा..सारे काही यात आहे...प्रथम हे सारे वरवरचे झपाटलेपण वाटते...पण जेवन्हा मीनीच्या बुध्दीबळाचे प्यादे जसे मात करु लागतात...सुहास पळशीकरांसारखा दमदार कलावंत जेव्हा सारे प्रसंग आपल्याकडे ओढत घेऊन जातात..तेव्हा ती कहाणी बनते त्या हुशार आणि जिद्दी मुलीच्या कर्तृत्वाची कहाणी..
-चित्रपट पहावासा वाटतो..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यामुळे आणि मीनीच्या हुशारीच्या चालीने..जी चाल शिकविणारे सुहास पळशीकरांच्या आत्मविश्वासात्मक संयमीत गुरुपदेशामुळे..-

-या विषयाचा पुरेसा गृहपाठ करुनच सरवणकरांनी चित्रपट वेगळा बनविला आहे..त्यांच्या दिग्दर्शनाला कलाकारांनी आणि मुख्यतः छायाकारांनी उत्तम दाद दिली आहे.

-व्यवसाय झाला तर तो कुणाला नको आहे..पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या गीत- संगीतकाराच्या जोडीने त्यांचा बाज इथे जपला आणि जपला आहे..शब्दातील भावनांचा चित्रबध्द उत्तम केले ते पडद्यावर.
प्रत्येकाबाबत लिहले नाही तरी चालेल..पण इशा कोप्पिकरचे निवडणे हिच मोठी गोष्ट..तिची मॉडल म्हणून रुळलेली वाट इथे स्पष्ट दिसते..तशी आई आणि प्रेमळ पत्नीही...

-बुध्दीबळातील प्रभावीपणाचा उपयोग करुन जन्मतःच कर्णबधीर मुलींच्या मनात आणि त्यांच्या माता-पित्यांच्या मनाला उभारी देण्याचे एक चांगले काम इश्शा कोप्पीकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने प्रभावीपणे केले आहे.


कलाकारांमध्ये उल्लेख झाला अनेकांचा पण जो राहून गेला पण आवश्यक होता तो मीनीची भूमिका पडद्यावर दाखविणा-या या बालकलाकाराचा..तेजश्री वालावलकर...रमाच्या भूमिकेचे सोने करुन तीच्या वाट्याला येतात ती सा-या भूमिकांना न्याय देते..इतेही तिची कणव आणि बुध्दीची चमक दिसते...यातले महत्वाचे म्हणजे आई-मुलीच्या खुणांच्या भाषेचे जे गुपित जमले आहे..तेही अनुभवायला हवे...आनंद अभ्यंकरांच्या छोट्या भूमिकेतही ती आनंदी वृत्ती चित्रपटाला सुसंगत असीच आहे..
मनोहर सरवणकर या दिग्दर्शकाचे या अवघड कामगीरीबद्दल मनापासून अभिनंदन.निर्माताही तेवढाच महत्वाचा अशा विषयावरचा चित्रपट इतक्या श्रीमंती थाटात तयार करुन आपली वेगळी प्रतिभाही त्यांनी दाखविली आहे..

-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 16, 2013

छाप भीमसेन जोशींची उरतेच..


गेले चार दिवस पुणेकरांनी थंडीही अऩुभवली आणि स्वरांचे तारांगणही पाहिले...१२ ते १५ डिसेंबरच्या पाच सत्रातील स्वरांचा हा यज्ञ थांबला तो किराणा घराण्याच्या गायिका आणि गायनातील सौंदर्यस्थळाची ओळख करुन देणा-या डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी आवाजाच्या स्वराने.
वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने  पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.


अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्‍या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन्‌ "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली. 
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग  साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली. 

खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते  पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आमि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.





- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 14, 2013

संतूरचे सूर माधुर्य



 संतूरचे सूर माधुर्य हे कायमच प्रत्येकालाच मोहोळ घालतात. मात्र, याला प्रयोगांची जोड व वैविध्याचे नावीन्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. पंडित उल्हास बापट यांनी संतूर या वाद्याच्या र्मयादा असूनही  त्यावर मात करून, नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.
 यंदा १४ वर्षांनंतर या स्वरमंचावर संतूर वादनाची किमया त्यांनी रसिकांना दाखविली. राग पूर्वा कल्याणने त्यांनी वादनाला सुरुवात केली. वातावरणात प्रसन्नतेची लहर पसरवत त्यांनी आलाप सादर केला. जो, झाला यानंत विलंबित झपतालातील रचना सादर करत त्यांनी सुरांची बरसात केली. त्यानंतर दृत तीनतालातील रचना सादर केली.


 'क्रोमॅटिक ट्युनिंग' याविषयी रसिकांना समजवताना ते म्हणाले, ''१२ स्वर संतूरवर असले, तरी जो राग वाजवायचा तो सतत ट्यून करावा लागतो. परंतु, क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये १२ स्वर ट्यून करून, त्यानुसार ते वाजविण्यात येतात. म्हणजे प्रत्येकवेळी ट्यून करण्याची वेळ येत नाही. अत्यंत सतर्क राहून चुकून दुसरा स्वर वाजू नये याची काळजी घ्यावी लागते.'' हे त्यांनी विविध रागांची सरगम वाजवून सहोदारण समजून सांगितले.
आसमंतात भरून राहणारी वैशिष्ट्यपूर्ण मिंड ही त्यांच्या वादनाची खासियत. यासाठी वेगळी स्टीक व तंत्र त्यांनी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या वादनाच्या वैविध्याचा अजून एक नमुना दाखवत मिश्रकाफी रागातील टप्पा त्यांनी सादर केला. 'आम्ही केवळ सूर व तालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. शब्द फक्त दिलेला पाळतो.' असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी सुरांचा एक अनमोल नजराणा त्यांनी पेश केला. त्यानंतर 'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यपद सादर करून एक सुखद धक्का देणारा आविष्कार सादर करून त्यांनी मैफलीचा समारोप केला.
त्यांना रामदास पळसुले (तबला), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

गदीमांच्या पायवाटेवरून चालण्याचा प्रयत्न



हजारो जणांच्या मनावर राज्य करतो तो खरा कवी. गदिमा तसे होते. त्यांनी कविता आणि गाण्यातील अंतर मिटवले आणि लोकसाहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, हे त्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्यासारखे लिहिणे कठीण असले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरून मी आणि माझ्यासारखे कवी चालायचा प्रयत्न करीत आहोत,अशा भावना ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केल्या.
'गदिमा प्रतिष्ठान'तर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे आज महानोर यांच्या हस्ते वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला, तर 'गृहिणी -सखी-सचिव पुरस्कार' मधुरा जसराज यांना प्रदान करण्यात आला. कवी आणि लेखक गुरू ठाकूर यांना 'चैत्रबन पुरस्कार', तर गायिका विभावरी आपटे-जोशी हिला 'विद्या-प्रज्ञा पुरस्काराने' गौरवण्यात आले. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कवलापूरचा प्रतीक फाळके यालाही गदिमा पारितोषिक देण्यात आले.

महानोर म्हणाले, ''गदिमा जातिवंत शेतकरी, अतिशय प्रतिभावान पण साधा माणूस होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत जसे आणि जितके काम केले, तसे करणारे फार कमी असतील. लावणीला खरी प्रतिष्ठा त्यांनी दिली.'' आपली आणि माडगूळकरांची पहिली भेट ६८मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनात झाली, त्या वेळी आपल्यासारख्या नवोदित कवीला प्रोत्साहन दिल्याच्या आठवणी महानोर यांनी जागवल्या. 

इंद्राणी मुखर्जी


बनारस घराण्याच्या युवा गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी  रसिकांना अभिवादन करून राग यमनने त्यांनी गायनाला सुरुवात केली.
खडा आवाज, सुरांमधील स्पष्टता आणि आर्तता यंमुळे त्यांनी सुरुवातीच्या काही वेळातच मैफल जिंकली. आलाप आणि तानांवरील प्रभुत्व दर वेळी रसिकांच्या 'वाहऽऽवा'चे मानकरी ठरले.
'मोरी नय्या पार करा..' या बंदिशीसह त्यांनी रागाचा विस्तार करून वातावरणनिर्मिती केली. 'गणपती गजानन देवा..' या बंदिशीद्वारे सुरांवरील पकड सिद्ध करीत वातावरणात पवित्रता भरली. त्यानंतर पेश केलेला दादरा 'हमसे ना बोलो..' यातील हरकती व मुरक्यांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

 रसिकांच्या आग्रहाला मान देत लोकभाषेतील पूर्वी दादरा 'हमे ना भावे यारीरे सावरिया..' सादर करून त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला.
त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पंडित रामदास पळसुले (तबला), आभा पुरोहित व नीला वैद्य (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Friday, December 13, 2013

ही छायाचित्रे जरूर पहावीत..

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वर्धापनदिनामित्ताने छायाचित्रांचे प्रदर्शन कालपासून दोन दिवस पुण्यातल्या घोले रस्त्तावरच्या कलादालनात आयोजित केले आहे.
.

पुण्यातल्या विविध वृत्तपत्रातून आणि नियतकालीकातून छायाचित्रकार म्हणून दर्जा प्राप्त केलेल्या छायाचित्रकारांनी हि संधी उपलब्ध करुन दिली आहे.











यात केवळ तेच छायाचित्रकारच नव्हे तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नुकताच प्रारंभ केलेल्या छायाचित्रांच्या अभ्यासक्रमातील विद्र्थीही यात सहभागी होऊन आपली छायायित्रे यात सामील केली गेली आहेत...




जे क्षण बातमी अधिक ठळक करतात..पण जे स्वतः एक बातमी बनू शकतात असे हे क्षण आहेत.













एक वेगळी विषय अतिशय तरल अशा छबीतून त्यांनी टिपलेोले असतात..
अतिशय भावपूर्ण तरीही कालातीत लक्षात रहावीत यासाठी ही सारी देखणी चित्रे उद्याची संस्कृती दाखवित मिरवत असातत. त्याचे महत्व कालातीत आहे.




वेळ काढून ही छायाचित्रे जरूर पहावीत..

.

-सूभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 12, 2013

पुणेकरांच्या साक्षीने स्वरयज्ञाचा आरंभ

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी सुरु केलेल्या आपल्या गुरुंच्या नावाने केलेल्या स्वरयज्ञाला गुरुवारी पुण्यात तेवढ्याच दिमाखात हजारो संगीत रसिकांच्या साक्षीने सुरवात झाली..सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव असे नामकरण करुन दोन्ही महान गुरुंचे स्मरण होते.
आता ते सारे दिग्गज संस्थापक नाहीत पण तरीही ही स्वर ज्योत अनंक हस्तांनी पुढे प्रज्वलीत होत तेवत रहाते..मानाने आणि तेवढ्याच ताकदीने.
यंदाचे याचे वर्ष आहे ६१..साठीतून पुढे जाभन आता खरी प्रगल्भता सारीकडे दिसते आहे..आता या महोत्सवाला वलय आमि वैभव दोन्ही मिळत आहे..ती सारी पुण्याई पं. भीमसोन जोशी या दृष्ठ्र्या गायकाच्या दिव्य दृष्टीची.
आता त्यांच्याबरोबरीचे कोणीच संस्थापक सदस्य फारसे दिसत नाहीत.

पण एक जातकुळीने पत्रकार पण संगीताच्या या प्रवाहात त्यांच्याबरोबरीने साथ करणारे वयोवृध्द जाणकार नाव म्हणजे रामभाऊ जोशी..आज त्यांनी ९३ वर्षात पदार्पण केले आहे..काल त्यांच्या सत्कार खास करुन या स्वरमंडपात झाला...त्यांना मायेची शाल पांघरली गेली..
त्यांना आता केवळ शब्द पुरे आहेत. स्नेह  हवा आहे..त्यांनी सवाई गंधर्व महोत्वसासाठी घेतलेले व्रत सर्वांना माहित व्हायला हवे आहे..
काल त्यांना खास मंडपात आमंत्रीत केरून त्यांचा सत्कार श्रीनीवास जोशी यांनी केलाच...

त्याबरोबरच. सवाई गंधर्वांची नातसून सौ. पद्मा देशपांडे यांच्या २८ रांगावर आधारीत स्वरपद्मा ही सीडीही प्रकाशीत केली गेली..
यावेळी आपली आठवण ठेवल्याबद्दल रामभाभ जोशी यांनी समाधान व्यक्त केले.






कालचा दिवस गाजला तो जसरंगी जुगलबंदीने..सौ. अश्वीनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या दोन भिन्न रागातल्या मजेशीर बंदीशींच्या सुरांवटींमुळे. एक सप्तकात तर दुसरा खर्जात असा दुहेरी सुरांचा सुस्वर स्वरबहार रंगवत त्यांनी वेगळीच आर्वतने सावरमंचावर सादर करून बहार आणली..

निषाद खॉ यांनी सतारवादनात वेगवेगळी स्वरआवर्तने सादर करुन त्यात चमकृती आणण्याचा सुंदर प्रयत्न रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्विकारला..त्यांना कलकत्त्यांचे निष्णाद तबला नवाज आनंदो चटर्जी यांनी जी बेमालून साथ केली तीही विस्मरणीयच होती...

अखेरीस पं. जसराज यांचे स्वरमंचावर आगमन होत आहे अशी निवेदक आनंद देशमुख यांनी घोषणा केली आणि तमम रसिकांच्या टाळ्यातून दाद मिळत गेली...त्यांचे माफक गायन मंचाला एक झळाळी प्राप्त करुन देणारे ठरले..पण आता त्यांच्या स्वरात तो पूर्वांचा जोश नसल्याचे रसिकात बोललो जात होते...

सवाई गंधर्व महोत्सव आणि आनंद देशमुख यांचे रसभरीत आणि उत्स्फूर्त निवेदन हे एक समीकरणच झाले आहे.
निवेदक आनंद देशमुख यांचे हे २५ वर्ष सलगपणे निवेदन करण्याचे रेकॉर्ड गिनिज बुकात नोंद घेण्याजोगे आहे..त्यांच्या निवेदनात कुठेही खास शब्दावरचा दाब वाही..आब राखून अतिशय विनम्रपणे ते माहीती देतात...त्यांच्या या खास निवेदनाला एका वेगळ्या खर्जीची धार आहे..यंदाचे हे एक अणखी आकर्षण चारही दिवस एेकायला मिऴणार आहे..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276





Monday, October 21, 2013

कथेत जीवन शोधतो


- गिरीष कुलकर्णी

 एखाद्या कलाकृतीचा समाजावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे
चित्रपटाच्या कथेत मी माझं जगणं शोधण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या
चित्रपटांमधून काय संदेश जातो याविषयी मी तत्पर असतो, अशी भावना
दिग्दर्शक-अभिनेता गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या युवक विभागातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी स. प. महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवा
विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संदीप जगधने या 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. 

शिल्पा पोफळे यांनी मुलाखत घेताना गिरीष कुलकर्णी यांच्या आयुष्यातील विविध पैलूं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सहकार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन,  पुष्पाताई नडे, विलास कुलकर्णी, प्रा. संजय तांबट, श्रीकांत यादव, मयूर कर्जतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीष कुलकर्णी म्हणाले, की शालेय जीवनपासूनच सगळ्या
कलांचा समुच्चय असलेलं क्षेत्र निवडायचं ठरवलं होतं त्यामुळे नाटकाकडे
वळायचा निर्णय घेतला. संस्कारभारतीनं मला एक स्वप्न आणि विश्वास दिला.
वाचनातून  मानवी मनाचे वेगवेगळे पैलू समोर आले, त्यांची अनुभूती
घेण्यासाठी लोकांना भेटलो आणि माणसं वाचायची, त्यांच्यावर प्रेम करायची
सवय लागली. माझ्या कथेत अनेक पात्रं दिसतात त्याचं कारण हेच आहे. वळू,
देऊळ, मसाला नवीन येणारा हायवे या चित्रपटांमध्ये तुम्हाला तुम्ही जे
जगता त्याचं प्रतिबिंब पहायला मिळेल. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार मयूर कर्जतकर यांनी मानले.

Saturday, October 5, 2013

हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवास आरंभ

गेली ६२ वर्षे सदाशिव पेठेतल्या शिवाजी मंदिर इथे होणारा नवरात्र महोत्सव ती सारी जागा विकासकाला दिल्याने त्यावर बहुमजली इमारत उभी रहात असल्याने पुण्यातच पण केसरी वाड्यासमोरच्या गुप्ते मंगल कार्यालयात प्रतिष्टापित झाला..हिंदू महिला सभा, पुणे यांच्या वतीने यंदाच्या म्हणजे ६३ व्या वर्षीच्या नवरात्रींचे कार्यक्रमही सुरु झाले..
पुन्हा त्या जागेत कधी सुरु होणार याची साशंकता कार्यकर्त्या महिलांच्या मनात आहे.
असो..तर आता नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी..

हिरव्या साडीतल्या व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलीन गाते तेव्हा..या कार्यक्रमाने उत्सवातील पहिल्या सुरेल आणि स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणा-या या एका कलावंत , सक्षम आणि नोकरी करुन कला जपणा-या या कलावंत महिलेची स्वराशी असलेले नाते यामुळे पुन्हा उजेडात आले.
विविध हिंदी मराठी गीतांनी त्यांनी तो सादर केला..तो रंगला हे काही सांगायची गरज नाही. त्यांची वाद्यावरची हुकमत आणि त्यांना  मिळालेली मोजक्याच साथीदारांची साथ..यामुळे गाण्यांना पुन्हा होऊन जाऊ दे (वन्समोअर) ची दाद मिळाली.
हे शारदे वागेश्वरी..ने सुरवात करून..लागा चुनरीमे दाग या भैरवीने व्हायोलीन गात राहिले.. महिला आणि रसिक ते ऐकत रहाले..ते तल्लीन झाले होते..टाळ्यांना प्रकिसाद मिळत होता.
निवेदक राजय गोसावी यांनी माफक पण आवश्यक माहिती सांगून अनेकांच्या मनात गाण्याबद्दलची ओढ निर्माण केली.

अभिजित जायदे यांची तबला साथ..तर राजेंद्र साळुंखे यांची तालवाद्यातून मिळालेली रंगत यामुळे गीते मोहक होत गेली. नचिकेत संत यांच्या की-बोर्डवरच्या नजाकतीने व्हायोलीनवरच्या गीतांमधले सुरेल पीसेस मनसोक्त आणि तंतोतंत ऐकता आले.







चारुशीला गोसावी यांचा सत्कार हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांच्या हस्ते केला गेला.
उद्यापासून शनिवारपर्यंत रोज कलावंत महिला, आणि विविधअंगी गुण असलेल्या स्त्रीला इथल्या स्ंस्थेत पाचारण केले गेले आहे.


पुण्याच्या शिवाजी मंदिराच्या परिसरात आत्तापर्यंत असलेल्या या संस्थेला आता नव्या दिशा आणि नवा मार्ग मिळेल..स्त्रीची प्रगती आणि स्त्रीचा विकास साधायची असेल विविध क्षेत्रात काम आणि कार्य करणा-या महिलांना नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम करायला हवे..ते ही संस्था करत आहे.


- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, October 3, 2013

संतदर्शन मंडळाने ठेवली म.गांधींची आठवण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कालच्या जयंती निमित्ताने श्री. राम साठे अध्यक्ष असलेल्या संतदर्शन मंडळाने ख्यातनाम आणि बुजुर्ग असा पुण्याच्याच संगीत प्रांतातले एक नाव म्हणजे फैय्याज हुसेन खान याचा सत्कार निवारा सभागृहात आयोजित केलेल्या पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन्ही श्रेष्ठ कलावंतांच्या रचनांचा कार्यक्रम सादर केला..त्यावेळी केला गेला.

स्वतः श्रीराम साठे यांनी पंडितजींच्या मागे तंबोरा साथ करुन एकलव्यासारखे त्यांची गायकी आत्मसात केली..त्याची एक झलक वयाच्या ८० व्या वर्षाही इथे सादर करुन टाळ्या मिळविल्या.


आज माहित नसलेल्या माणसांच्या वाढदिवसाचे पोस्टर चौका चौकात झळकते..पण महात्मा गांधी यांचे साधे चित्रही गांधी जयंती दिवशी दिसत नाही याची खंत फैय्याज हुसेन खान यांनी बोलून दाखविली.
यावेळी व्यासपीठावर रवींद्र दुर्वे, आणि शरदचंद्र पाटणकर, तरुण संगीतकार हर्षद अभिराज आणि स्वतः श्रीराम साठे तसेच सत्कारमूर्ती फैय्याज हुसेन खान होते..


यावेळी `मिले सूर मेरा तुम्हारा` हा संगीताचा कार्यक्रमही रंगतदार असाच झाला. यात या दोन महान कलाकारांनी गायलेल्या रचना सारद झाल्या. श्रीपाद भावे, राजेश दातार, जयश्री कुलकर्णी आणि वाकनीस या गायकांचा तर साथीला पद्माकर गुजर, राजेंद्र दूरकर, साने आणि चारुशीला गोसावी यांची साथ मिळाली. 

मंगेश वाघमारे यांच्या आगळ्या निवेदनातू कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली. 
विविध सामाजिक आणि सांस्कतिक दिवसांचे महत्व लक्षात घेऊन..ही संस्था रसिक भावीकांनी संगीताचा आनंद देत असते.

-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, October 2, 2013

अजून गदिमा...थोरवीची गाथा


गदिमांच्या ९४ व्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या थोरवीची गाथा ऐकण्याचे भाग्य..
आम्हा पुणेकरांना लाभले ते त्यांच्या अप्रकाशित कवीतांचे पुस्तक त्यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांनी लिहले आणि ते प्रकाशित केलेल कॉन्टिनेंटलच्या  देवयानी अभंय्कर यांत्या वतीने...  अजून गदिमा...या पुस्तकाच्या निमित्तानि पुन्हा एकदा गदिमांची थोरवी रसिकांच्या कानी घातली गेली..खरे पाहता पुन्हा एकदा माडगूळकर पुन्हा जीवंत झाल्यासारख्या वाटले.. 


तरुण पिढिचे लोकमान्य कवी..संदीप खरे ..यांनी माडगूळकरांच्या सहवासात यानिमित्ताने आपल्याला रहाता आले..याचा अधिक आनंद झाल्याचे सांगून आमची पिढी त्यांच्या कवीतांवर आणि गीतांचा आजही किती चाहती आहे हे स्पष्ट केले.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले.


श्रीधर माडगूळकरांनी जयंतीच्या दिवशीच गदिमांच्या जन्माची कथी जी ऐकविली..तेव्हा ड़ोळ्यातून पाणी आले..मृतसमान असलेल्या मांसाच्या गोळ्याला जेव्हा विस्तवाचा स्पर्श झाला आणि जेव्हा पहिला कौहमचा उद्गार आला तेव्हाच हा मोठा होणार याची कल्पना आली...पुरण्याची तयारी असताना सुईणीने केलेल्या या प्रयत्नातून हा महातवी उदयाला आल्याची भावना..फार निराळी आणि चटकालावून जाणारी होती..


आपल्या आईेने बबनराव नावडीकरांच्या १०८ वेळा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला बेलबागेत आपल्याला नेले..तिथेच गदिमांची महती लक्षात आली..मात्र ती गेली त्यानंतर चारच दिवसांनी गदिमा गेले..ह्या दोन्ही घटना आयुष्यात चटका लावणा-या होत्या असेही निफाडकरांनी सांगितले.  ३५ उर्दु शायरांचा परिचय करुन देणारे मै शायर हेपुस्तक आज प्रकाशित होते याबद्दल समाधान व्यक्त करुन माडगूळकरांच्या पुस्तकाशेजारी बसणायचे भाग्य म्हणजे त्यांच्या तरणाजवळ बसण्याचा हा मान आहे..असे समजतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

देवयानी अभ्येकरांच्या निवडीचेही अनेकांनी कौतूक केले. ७५ वर्षीची परंपरा असलेल्या प्रकाशन संस्थेचे आजोबा.अनंतराव, वडील. अनिरुध्द आणि आता काका.रत्नाकर कोणीही नाहित.याची वेदनाही देवयानी यांनी बोलून आपल्या भावना वाचकांसमोर उघड्या केल्या..



-सुभाष इनामदार, पुणे



subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, July 14, 2013

नाटकावरुन चित्रपट...`श्रीमंत दामोदरपंत`

पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.


१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे. श्रीमंत दामोदरपंत या मूळ नाटकात भरतने दामू ही मध्यवर्ती भूमिका केली होती. अर्थातच केदारचा चित्रपट म्हटला की सुपरस्टार भरत जाधवची भूमिका असायलाच हवी. या चित्रपटातही भरत जाधवच नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.   
 'श्रीमंत दामोदरपंत' या चित्रपटाच्या निमित्ताने काही योगही जुलून आले आहेत. सुनील बर्वे हा अभिनेता आणि केदार शिंदे हा दिग्दर्शक असे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. कॉमेडीक्वीन निर्मिती सावंत हिचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. छोटा पडदा गाजवताना लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि दिग्दर्शक केदार शिंदे प्रथमच एकत्र आले आहेत. सोनू निगमच्या आवाजातले आणि वैशाली सामंत हिने संगीत दिलेले एक गाणे यात आहे आणि ते त्याच्या खास स्टाईलमधले असल्याने नक्कीच लोकप्रिय ठरेल यात शंका नाही.

अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे  केदार शिंदे सांगतात.
नाटकात रंगभूमीच्या मर्यादामुळे दामोदरपंतांच्या वाडयात हे सगळे नाट्य घडते. हे पंत म्हणजे एक काळ गाजवलेले आणि हयात नसलेले स्वातंत्र्यसैनिक असतात, मात्र रोज संध्याकाळी सहा वाजता ते दामूच्या अंगात संचारतात. एरव्ही व्यवस्थित असलेल्या दामूचे नकळत रूप बदलते. दिवसभर आईच्या पदराआड़ असलेला दामू संध्याकाळचे सहा वाजले की रुद्रावतार धारण करतो त्यामुळे सगळ्याचीच पंचाईत होते असा नाटकातला संदर्भ आहे, मात्र या चित्रपटात दामू वाड्याच्या बाहेर कोठेही असताना असे घडते त्यामुळे तो तेथून घरी पोहोचेपर्यंतच्या असंख्य धम्माल गंमती असलेले प्रसंग घडायला लागतात,हीच या चित्रपटाची रंगत असल्याने त्यातूनच हे सारे नाट्य खास केदार शिंदे स्टाइलने रुपेरी पडद्यावर फुलत जाते.


माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी  उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`

रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.
चित्रपटाची कथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन केदार शिंदे याचे आहे. पटकथालेखन ओंकार मंगेश दत्त यांचे आहे. संजय मेमाणे आणि अनिल कटके यांची सिनेम्याँटोग्राफी आहे. महेश कुडाळकर यांचे कलादिग्दर्शन आहे. ओंकार मंगेश दत्त आणि वैभव जोशी यांचे गीत लेखन असून सोनू निगमबरोबरच अभिजित कोसंबी यांच्या आवाजात ती ऐकायला मिळतात. या चित्रपटाला वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर या दोघा जानकारांचे संगीत आहे.

श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..


`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.

वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.

सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
             
 

Saturday, June 29, 2013

नाट्यसंगीताचा बहारदार नजराणा....

पुण्याच्या ऐतिहासिक अशा हिराबागेतल्या टाऊन हॉल कमिटीच्या पेशवाई दिवाणखान्यात शुक्रवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणाचा साज बाहेर सजत असतानाच नाट्यसंगीताच्या सुरावटींचा बहर एकामागोमाग  रंगत होता...ज्या वास्तुने अतिशय वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची व्याख्याने..ऐकली ..समाजातल्या धुरंदर मंडळींचे कौडकौतूक केले..त्या या वास्तुत रंगलेल्या मैफलीची आठवण आजही ताजी आहे..संगीत नाटकांच्या वैभवशाली पंरंपरेचा भरजरी नजराणा दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वतीने पूर्वी भावे यांच्या सुरेल निवेदनातून पुणेकरांच्या पसंतीस पडला...त्यांनी वन्समोअरच्या आणि टाळ्यांच्या निनादात नाट्यसंगीताच्या या पदांना दिलखुलास दाद दिली.


१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..`  या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली.. 


श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.


 
`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...`   तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली. 

`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने  दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.



`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..
त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..
 




श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...`आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...

ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...

 `बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली  तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..

 

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती..





ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..पण त्यांना साथ करणारे आमचे पुण्याचे राजीव परांजपे यांचा ओर्गनवरचा बोलका हात जेव्हा स्वरांवर हळुवार फिरतो 







........
आणि प्रसाद जोशी यांचा तबला बोलाप्रमाणे नाद काढतो..तेव्हा रंगत अधिक वाढते...हे मान्यच करायला हवे.




एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..





- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276









Saturday, June 22, 2013

व्यंगचित्रही जिव्हारी लागते तेव्हा...

व्यंगचित्रात जो कुत्रा दाखविला आहे तो पिसाळलेला आहे..शिवसेनेकडे पाळलेला कुत्रा असल्यामुळे तो भुंकत नाही आणि कुणाला विनाकारण चावत नाही....मंगेश तेंडूलकरांच्या ७०व्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संजय राऊत यांनी राष्टवादीचे आमदार अंकूश काकडे यांना अशा कोपरखळी देऊन व्यंगचित्रही राजकीय नेत्यांना कसे लागते आणि किती खुपते याचे दर्शनच घडविले..

ही घटना घडली ती बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात...जिथे राष्ट्रवादीचे अंकूश काकडे यांनी एका व्यंगचित्राचा उल्लेख करुन यात राष्ट्रवादीचा कुत्रा तीन वेळा भुंकतो..मनसेचा नुसतीच कोल्हेकुई करतो...असे विविध राजकीय पक्षांवर काढलेल्या व्यंचित्रात शिवसेनेचा यात उल्लेखही केलेला नसल्याचे दाखवून दिले...याचा दाखला देत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशी शाब्दिक खेळी करत उत्तर दिले..

हे राजकीय लोक व्यंचित्रातला आनंद घेतानाही आपले राजकीय व्यासपीठ बिलकूल सोडत नाहीत..आम्ही तेंडूलकरांच्या व्यंगचित्राकडे पहाताना त्यातल्या आशयाकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो...आम्ही ते सारे हसत हसत पचवितो असे म्हणतो..पण प्रत्यक्षात मात्र तसे व्यंग दाखविले की तुटूनही पडतो..कुठेतरी ते चित्र डोक्यात पक्के घेतो..आणि वेळ आल्यावर त्याचाही समाचार घेतो..हेच सिध्द केले.

खुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे ही सांगत ...अनेक लेखातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते व्यगचित्र एका चित्रात करते...व्यंगचित्रात हिच परंपरा संभाळणारे आता केवळ मंगेश तेंडूलकरच शेवटचे शिलेदार उरले आहेत...त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषय माडतात...त्यांच्या कलेला सा-यां रसिकांनी असाच प्रतिसाद देऊन त्यांची कला याही वयात बहरत रहो असा आशावादी सूर आळविला..

शनिवारी सकाळी या उदघाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक या क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते..आपल्या हातून ही चित्रे काढली जातात..पण मी ती काढत नाही...आता चहा घेण्यासाठीही हात थरथरतो..पण ब्रश हाती घेतला की चित्र रेखाटना तो स्थिर रहातो...जोपर्यंत ती काढली जातात तोपर्यंत मी काढतच रहाणार...असे म्हणत...मंगेश तेंडूलकरांनी आत्तापर्यंत वाचकांनी केलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.

वयाची एंशी पूर्णकरूनही अतिशय उत्साहाने  प्रदर्शन भरवितात...रसिक-वाचकही त्याला तेवढाच दिलखुलास प्रतिसाद देतात...त्यांची याही वयातली ही उमेद तरूणांना आणि नवीन कलावंतांना याकडे आकृष्ट करेल यात शंका नाही...

पुण्यात आजही खड्डे कायम आहेत...मी त्याबाबत व्यंगचित्रकार आणि जागरूक करदाता म्हणून प्रयत्न करतो...पण पुण्याचे हे चित्र महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या अधिका-यांनी बदलण्याची गरज असल्याचे सांगत व्यगचित्रातून व्यंग दाखविले..पण ते समाजहिताचे काम व्हावे असाच उद्देश असतो...यात अनेक ठिकाणी अनेक विषयावर मी चित्राच्या भाषेतून मते व्यक्त केली आहेत...पण ती दूर व्हावीत आणि समाजहिताचे काम व्हावे ही आशादायक बाब घडावी ही तेंडूलकरांची विनंती आहे...


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, May 22, 2013

अभिनयासह नृत्याचा थाट...खो खो

सिध्दार्थ जाधवसह अनेक पूर्वज च्या आपल्या जुन्या वाड्यात रहायचे..त्या वाड्यात त्यांचा वंशज असलेला श्रीरंग देशमुख रहायला येतो..आणि एकेक पीढीचे एकेक पूर्वज आपला खेळ खेळू लागतात...
 लोच्या झाला रे... या नाटकावर आधारीत हा सिनेमा काही विलक्षण दृष्य़े..पारंपारिक पिढी बरोबर चालत आलेले लोकसंगीत आणि त्याला लाभलेला अभिनयासह नृत्याचा थाट...




केदार शिंदे यांच्या तीन वर्षाच्या खंडानंतर एक जंगी मराठी सिनेमाचा खेळ ते घेऊन येताहेत...खो खो...





हा सिनेमा हा पूर्वसुरींच्या साम्राज्यात जावून काही त्या त्या पिढ्यांचा घटना आणि प्रसंग  वेगवेगळ्या सिनेमॅटिक पध्दतीने यात दिसतात.. सारी खास दृष्ये तुमची नजर आणि मन प्रसन्न करतील..


 या महिन्याच्या ३१ तारखेला हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट वेगळीच गंमत मराठी प्रेक्षकांना या चित्रपटातून दाखविणार आहे. त्यांना प्रेक्षक आपला हा चित्रपट मनोरंजनाचा नवा खजाना म्हणून नक्कीच अनुभवतील याची खात्री वाटते.  पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास या चित्रपटाच्या प्रसिध्दी साठी उषा उत्थप यांनी तयार केलेले गीत ऐकविले..निर्मात्या शोभना देसाई यांनीही केदारच्या नेतृत्वाखालील ही टीम यांनी खो खो तून तयार केलेली कलाकृती मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद व्यक्त केला.
सिध्दार्थ जाधव यांनी एकही संवाद नसलेली भूमिका करताना केदारच्या दिग्दर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.. माझ्या थोरल्या भावासारखा असलेला  भरत जाधव मोठा कलाकार तर आहेच पण आपल्या इतर सहका-यांनीही प्रत्यक्ष चित्रिकरणात पंचेस सांगून प्रसंग खुलवितो.हे ही स्पष्टपणे सांगितले.

विजय चव्हाण यांची भूमिका काही प्रसंगातून नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणेल इतकी उत्तम सादर केल्याचे प्रशस्तीपत्रक भरत जाधव यांनी दिले. त्याच्या मते केदारच्या गोष्टीत गंमत असते. त्यात तो परिपूर्ण असतो. गोष्ट स्वतःची असल्याने त्यात अनेकविध गोष्टीची भर सहजपणे पडते...आणि सर्वात महत्वाचे म्हणचे त्याच्या चित्रपटात काम करणे म्हणजे  उत्साहाला अधिक वेगळा आकार मिळतो..




सुवासिनी या मिलिकेत दिसलेली पुण्याची प्राजक्ता माळी हिचेही या चित्रपटाद्वारे पहिले पदार्पण आहे.तिच्या मते...केवळ चांगले दिसणे..छान कपडे घालून मिरविणे नाही..यात अभिनयाला भरपूर जागा आहे..केदार शिंदे यांनी अनेक प्रसंगी `वाह क्या बात है` असे स्पष्टपणे सांगावे उत्तमपणे सादर केले आहेत. माझ्याबरोबर सारीच मोठी कलावंत मंडळी यात असूनही त्यात माझा नवखेपणा  कधीच निघून गेला..मला खूप आवडले या चित्रपटात काम करायला.. प्राजळपणे प्राजक्ता बोलत होत्या..



भन्नाट कथानक...उत्तमोत्तम तांत्रिकता ..ओठांवर रेंगाळावीत अशी गाणी..आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण..शशांक पोवार यांचे संगीत आणि चेतन देशमुख यांचे स्पेशल इफेक्ट...सारेच खो खो या चित्रपटाला मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणारेच आहे..


पाहू या ३१ मे ला प्रत्यक्ष चित्रपटगृहात...




-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 26, 2013

शिवचरित्रातून आपण काय घेतले...?

 शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे य़ांचा सवाल..



गेल्या काही वर्षात मी १० ते साडे-दहाहजार व्याख्याने शिवचरित्रावर दिली. मात्र आज मला असे वाटते की, लोकांनी ती करमणूक म्हणून ऐकली. टाळ्या दिला. प्रसंगी जयजयकार केला..छत्रपती शिवाजी की जय..आणि त्यांच्या कर्तृत्वाची नोंद केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात दिली..अश्वारूढ पुतळे पुण्यात सात आहेत..
पण त्या शिवचरित्रातून आपण काय घेतले...

आज मी व्यथित आहे. मध्यतरी मी इंग्लंडला गेलो असताना विल्स्टन चर्चिलचा पुतळा तुमच्या देशात नाही..असा प्रश्न माझ्या इंग्रजी मित्राला विचारला..त्याने काही काळ थांबून सांगितले...चर्चील आमच्या रक्तात आह..पुतळ्यांची गरज काय...

आज मला ते आठवते कारण...आज रोज टीव्ही आणि वृत्तपत्रातून लहान मुलींवर बलात्काराच्या बातम्या दिसतात. काय चालले आहे हे..तुम्हाला आणि मलाही पेटून उठावे वाटत नाही...
काय घेतले तुम्ही शिवचरित्रातून केवळ करमणूक करुन घेतली.

आज मला स्वतः बद्दलही चिड येते..आणि मी फुकट उतकी वर्षे वाया घालविली असे वाटते.

आपण फक्त शिवाजी महाराजांच्या गुणांची चर्चा करतो. त्यांच्या मोगलांशी केलेल्या लढाया पाहताना त्यांच्या धाडसी वृत्तीला दादा देतो.

मात्र, प्रत्यक्षात आपल्याला चंगळवाद आवडतो. अशी आपली वृत्ती असेल तर आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल?
पुतळे उभारून आणि जयजयकाराच्या घोषणा देऊन आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी शिवचरित्राचे वेड आपल्या रक्तात भिनण्याची आवश्‍यकता आहे.

माझी व्याख्याने लोकांनी करमणूक म्हणून ऐकली. त्यामुळे त्यांचा आणि माझा वेळ वाया गेला, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, शिवचरित्र वाचून किंवा ऐकून आम्ही नेमके काय मिळवले याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी श्रीनिवास कुटुंबळे लिखित, "विधाता हिंदवी स्वराज्याचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते खूपच व्यथित झाल्याचे दिसत होते. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


त्यावेळी त्यांनी काढलेले शब्द आजही मला आठवतात..तसेच्या तसे देण्याचा मी यत्न केला आहे....आपण सर्वजण याचा विचार कराल अशी अपेक्षा करतो..




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 22, 2013

संधीकाली रमणा-या त्या तीन यात्रा..

अगदी उन्हाळा असला तरी पुणेकरांसाठी सुखद असा हा काळ आहे. सध्या तापमानही ३६ पर्यत असते..रात्री तर थंडीही जाणवते..त्यातच भर म्हणजे संध्याकाळचे सुरेल वारे..
त्यातही अधिक सुखावह काळ म्हणजे रोज नवेनवे सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या डेव्हीड ससून वृध्दाश्रम चालवीत असलेल्या निवारा संस्थेने (१८६५ मध्ये पुणे येथे "डेव्हिड ससून इन्फर्म असायलम' ही संस्था स्थापन झाली. ही संस्था "निवारा' या नावाने आजही वृध्दांसाठी मदतकार्य करते आहे. )मराठी भावसंगीताची वाटचाल हा एक सर्वांना आवडेल असा भावगीतांचा नजराणा पेश केला.
`स्वरानंद `संस्थेने आपल्या अपर्णा संत, संजीव मेहेंदळे या दोन गायकांच्या संगतीत अरुण नूलकरांच्या निवेदनातून रंगत नेलेला हा कार्यक्रम रंगला..तो पराग माटेगावकर, अनय गाडगीळ, राजेंद्र साळुंखे आणि राजेंद्र दूरकर यांच्या दमदार साथीमुळे. तुडुंब भरलेल्या निवाराच्या सभागृहात वन्समोअरची अनेक गाणी मराठी चित्रपटांची ती जुनी मोहिनी किती होती याची साक्ष पटविणारी होती.
अपर्णा संत यांच्या  सुरेल आवाजाची जादूच या कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिक पडल्याचे प्रतिसादातून दिसते होते.
काही रसिकांनी दूरकरांच्या ढोलकीच्या नादावर फिदा होऊन दौलतजादाही उधळली.

`राजा माणूस ......

राजा परांजपे जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे एक से एक चित्रपटाची उधळण होत असताना..२१ एप्रिलला `राजा माणूस`या अनिल बळेल लिखित आणि स्नेहल प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन अवघे ८८ वर्षांचे तरुण नायक रमेश देव यांच्या हस्ते ऐतिहासिक केसरी वाड्याच्या सभागृहात झाले.
राजा परांजपे यांनी आपल्याला कुंभाराच्या मडक्याप्रमाणे घडविले असे अभिमानाने सांगणारे आणि ज्यांच्या नावातच राजा असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या आठवणींने हेलावत समारंभ फुलत गेला.

रेसकोर्सवर राजा परांजपे यांची पहिली गाठ कशी पडली याचे साद्यंत वर्णन ऐकवून राजा परांजपे यांच्या पुस्तकाचे नाव देव माणूस असायला हवे..असे सांगून त्यांनी माडगूळकर आणि बाबुजी यांच्यात सुवासिनी चित्ररपटात कसे भांडण लावून ..दिवसामागू दिवस चालेले ऋतू मागूनी ऋतू..जिवलगा कधी रे येशील तू..हे अजरामर गीत कसे तयार झाले याची आठवण रंगवून सांगून राजा परांजपे हे दिग्दर्शक तर मोठे होतेच पण माणूस म्हणूस किती श्रेष्ट होते  याचे दर्शन घडविले.
रविन्द्र घाटपांडे यांनी राजा परांजपे यांच्या चित्रपटातल्या दोन गीतांना संपदा थिटे आणि  हेमंत आठवले यांच्या आवाजात सादर करुन त्या काळाचल्या चित्रपटांची आठवण करुन दिली.

वाहवा..क्या बात है..



आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे..
 किंवा

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे ..
जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे..


हे लिहणा-या कवी रमण रणदिवे यांच्या `स्वर चांदणे ` उमलविणा-या मराठी गझल रुजविणा-या कवीत ज्यांचे नाव सुरेश भट यांनी  पुढे आणले त्या या कवीच्या प्रतिभेचा आविष्कार...रंगला तो सोमवारी एस एम जोशी सभागृहातल्या रसिकांच्या साक्षीने.
हल्ली कलाकारांचेही मार्केटींग करावे लागते...पण ते न जमणारे दर्जदार कवी यांना आवलाच कार्यक्रम करण्यासाठी कांही मित्रांना गळ घालून तो घडवावा लागतो..ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...


उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे.  त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. गेली ४० वषेर् ते एका श्रद्धेने कविता आणि गझला लिहीत आहेत.


राजेश दातार आणि प्रियल साठे यांनी त्यांच्या गझलांना इतके सुरेल पेश केले की त्यातले शब्दन् शब्द सूरमयी पैठणी नेसून रसिकांच्या मनात घर करुन राहिले..संपल्यावर टांळ्यांच्या कडकडाटात आनंदही व्यक्त केला.
 


मात्र तरल.स्पर्शून जाणा-या शब्दांना मानणारे संगीतकार आणि त्यांच्या गझलांचे चाहते तरुण संगीतकार कौशल इनामदार यांची हजेरी..


केवळ उपस्थित नाही तर त्यांच्या दोन रचनांना अतिशय सुरेल असे सादरीकरण करुन रमण रणदिवेच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन घडविले.
खरं तर हा सारा खेळच रणदिवे कुटुंबीयांनी रंगला...हार्मोनियमवर होते मेकॅनिकल इंजिनीअर असलेले एक पुत्र आणि दुसरा मुलगा  अतिशय उत्तम तबला साथ करत होते.




स्वतः संगीताचे ज्ञान असेलेल्या रमण रणदिवेंच्या रचना यामुळेच छंदबध्द होत असतील. त्यांना सुरातच शब्द सुचत असतील... विनय़ा देसाई यांनी या गझलकाराला बोलते केले आणि मुक्त छंदातल्या काही रचना त्यांच्या कडून आठवून सादर करायला भाग पाडले. तसे ते पेटी घेऊनच बोलत होते म्हणूनच एका गझलेची प्रचिती त्यांच्या आवाजातही ऐकायला मिळाली...आणि शब्द आले..वाहवा..क्या बात है..

आज जे सुरांचे चांदणे रसिकांनी टिपले तसे त्यांच्या रचनांचे अनेक कार्यक्रम व्हायला हवेत...आणि ते होतील याची खात्री वाटते.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Saturday, April 20, 2013

पाडवा ते रामनवमी सांस्कृतिक महोत्सव..

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता .
त्यात पहिल्या दिवशी गीत रामायणाने महोत्सवाची  सुरवात झाली. तो सादर केला दता चितळे यांनी..... सौ. मृणालिनी चितळे यांच्या निवेदनाने कार्यक्रमात गदीमांच्या गीतरामायणातली एकेक गीते उलगडू लागली..तुषार रिठे, प्रार्थना पटवर्धन, पूजा गाजरे या गायकांची संगत आणि चारुशीला गोसावी, श्रीरंग चासकर आणि अनघा वैशंपायन याच्या साथीने लक्षात राहणारा आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला.
 
दुसरा दिवस केदार मोरे यांचा वाद्यवृन्द जुन्या नव्या हिंदी गीतांचा रंगारंग नजराणा "जल्लोष २०१३" गायक हिम्मत कुमार पंडया, सुजित सोमण ,मंजुषा देशपांडे, ह्यांच्या  गायनाने व केदार मोरे,मंदार देव , अभिषेक काटे ह्यांच्या वादनाने गाजवला . 

तिसरा दिवस हा सदानंद चांदेकर ह्यांच्या "हसरी उठाठेव " ह्या अप्रतिम एकपात्री प्रयोगाने साजरा झाला.

चवथा दिवस सौ .चारुशीला गोसावी यांचा "व्हायोलिन गाते तेव्हा " हा कार्यक्रम होता. तबला –रविराज गोसावी, सिंथेथायजर -अमृता ठाकुर देसाई तालवाद्य - राजेंद्र साळुंखे व निवेदन सुभाष इनामदार यांच्या साथीने लक्षात राहणारा अप्रतिम आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला .

पाचवा  दिवशी "स्वरांजली" हा मराठी भावगीते, भक्तिगीते, ग़जल गीतांचा कार्यक्रम होता. सौ.सई पारखे,उमेश साळुंखे ,कल्याणी  शेटे यांचे दमदार गायन तबला-महेश साळुंखे ,सिंथेथायजर- किशोर कांबळे देसाई,बासरी - अजरुद्दीन शेख यांची बहारदार वादन साथ यामुळे रंगत गेला.
 
सहावा दिवस शिल्पा  नृत्यालय ट्रस्ट यांचा कथक  नृत्य अविष्कार  "परिक्रमा " हा देखणा कार्यक्रमास  रसिकांनी प्रचंड दाद दिली  त्यानंतर रत्नाकर शेळ्के डान्स अकादमीचा वेस्टर्न डान्स परर्फोर्मन्सेस सादर  करण्यात आले  
 
सातवा दिवस महिलांचे पारंपरिक खेळ शर्वरी दाते व १५ महिला सहकारी यांचा " जागर चैत्रागौरीचा " अतिशय पारंपरिक महिलांच्या खेळाची माहिती करून देणारा  देखणा नृत्य अविष्कार .
 
आठवा दिवस ख्यातनाम जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला संत रामदासांच्या जिवनावर आधारित रचनांचा " रामदास गुणगान " हा कार्यक्रम सादर झाला.  लवकुश रामायण गाती ह्या गीतानी कार्यक्रमाची सुरवात झालि या कार्यक्रमात कानडा राजा पंढरीचा, खेळ मांडियेला, दशरथा घे हे पायसदान,पायोजी मॆने, रामा रघुनंदना त्याचप्रमाणे यासारखी एकापेक्षा एक सुमधुर गीते व डॉ.राहुल देशपांडे यांनि स्वरबद्ध केलेल्या व जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या " रामदास गुणगान " या सिडी मधील गीते श्री राहुल घोरपडे, सौ धनश्री गणात्रा, श्रीपाद भावे यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ.राहुल देशपांडे यांनी केले .

याच कार्यक्रमात "रामदास गुणगान" या सिडिचा प्रकाशन समारंभ  "मनोरंजन पुणे" चे श्री मनोहर कुलकर्णी यांचे शुभह्स्ते संपन्न झाला. यातील गीते डॉ.राहुल देशपांडे यांची असुन याला जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केले आहे व या सीडीमधील १० गाणी असुन ह्या गाण्यांना गायक रविन्द्र साठे ,सौ धनश्री गणात्रा,श्रीपाद भावे यांनी स्वरसाज चढविला आहे . संगीत संयोजन योगेश तपस्वी यांनी केले असून निवेदन राहुल सोलापूरकर यांचे आहे.

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता.

रामनवमीला या "संगीत ,नाट्य,नृत्य " सांस्कृतिक महोत्सवाची सांगता स्थानिक  कलावंताच्या  कला -प्रदर्शनाने झाला यामध्ये की-बोर्ड वादन,गायन यामधे सौ .ललिता  मुळे, सौ.रेखा धंदरे कु.समृद्धि सोलंकी,कु निहारिका कदम,प्रीटी देशपांडे  ह्यांनी गायन व कु. याना निबजिया ,कु मिली  निबजिया,शॊनक देव ,यश धोका ,यांनी  की बोर्ड वादन  प्रकारात आपले कौशल्य दाखिवले  यानंतर  लहान  मुलांच्या    "झाली काय गम्मत"   या सई परांजपे लिखित नाटकाचा प्रयोग  समावेश होता.यामधे कु. सिद्धि पारखे,कु.अंजोर खोपड़े  ,कु. रुतुजा मोरे , कोमल डिकोळे,श्रुष्टि जगताप ,रिया चव्हाण ,कश्मीरा कोपरे,प्रीटी देशपांडे, शॊनक देव ,देवयानी तोष्णिवाल,नरेंद्र डिकोळे ,पद्मजा डिकोळे,शंतनू कदम,नंदिनी तोष्णिवाल,दुर्वा चोपड़े,अंतरा महाजन या बालकलाकाराचा सहभाग होता या नाटकाचे दिग्दर्शन सौ.प्रतिभा पारखे  व संगीत  सौरभ पारखे यांनी केले होते.

या कलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले व चित्रपट अभिनेते श्री. सुनील देव उपस्थित होते . या प्रसंगी  युवा संदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पारखे यानी आभार मानले . हा  महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशांत डिकोळे,ओमप्रकाश जैन ,पंकज कुलकर्णी , अविनाश चोपडे , अभिजित रानडे , भालचंद्र जोशी,प्रियदर्शी नरंजे, सतीश काळे,प्रमोद मोहिते ,महेश लादे ,कृष्णा मेहकरे ,विठ्ठल संगमे या कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.