subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, September 23, 2020

सैनिकांसाठी जेव्हा..व्हायोलिन गाते तेव्हा...!'



फेब्रुवारी १७ , २०१९...रविवारची संध्याकाळ, 
स्थळः निवारा सभागृह पुणे. 

सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी कंबर कसलेल्या #SIRF संस्थेला मदत करण्यासाठी चारुशीला गोसावी आणि आम्ही सहकारी यांनी व्हायोलिन गाते तेव्हा...!'' हा कार्यक्रम सादर केला.
#SIRF संस्थेचे संस्थापक प्रमुख योगेश चिथडे, सुमेधा चिथडे यांनी त्यांच्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. 
संस्थेच्या माध्यमातून अनन्यसाधारण कार्य करणारे हे पती-पत्नी जवानांसाठी काय करता येईल या निस्वार्थी विचारातून गेले अनेक वर्षं काम करत आहेत. योगेश चिथडे हे स्वतः भारतीय हवाई दलातले निवृत्त अधिकारी असून, त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात 'मेजर' या पदावर कार्यरत आहे. आपल्या झेंड्यामधला पाचवा अदृश्य रंग हा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा रंग आहे हे विसरून चालणार नाही, हे त्यांचं वाक्य नक्की विचार करायला लावणारे आहे.

कार्यक्रमाची सुरवात 'सूर निरागस हो' या गणेश वंदनेनी झाली

कोहिनूर या यित्रपटातले..मधुबन मे राधिका .हे गीत पुण्याच्या व्हायोलीनवादिका चारुशीला गोसावी यानी असे सादर केले..


आणि त्यानंतर भजन, भावगीत, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत, युगुलगीत, ठुमरी, लावणी, कव्वाली, देशभक्तीपर गीत अशा अनेक ढंगाची, अनेक बाजाची गाणी एकामागून एक सराईतपणारे व्हायोलिनवर सादर केली गेली. 

टाळ्या, शिट्ट्या, वन्स मोअर चा जल्लोष झाल्यावर शेवटच्या 'ए मेरे वतन के लोगो...' गाण्याच्या सुरवटींनी कवी प्रदीप यांचे शब्द डोळ्यासमोर उभे केले आणि अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. 'भारत माता की जय' च्या नाऱ्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. नीरजा आपटे यांनी निवेदन केले.

-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com


१७ फेब्रुवारी, २०१९

समाधानाचा पेला पुरता भरलाय..!




सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..
नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..





साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..
तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..
जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..
भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..





नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. 










आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या...

 भालबा केळकर
नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..
कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका 
आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.
साहित्यविशारद झालो..
प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर .








आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..






मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..

एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..



वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 






www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले..  
काही सांस्कृतिक  कार्यक्रमाना यातून प्रसिध्दी दिली गेली..

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..





सोशल मीडिया मधून सतत नोंद करीत गेलो..





आयुष्य सोपे झाले..संसार स्थिरावला.. मुले ,सून आपापल्या कामात व्यग्र आहेत.. सौभाग्यवतीची साथ खंबीर आहे..तिची चाकरी आजही सुरू आहे..नात मनाला उभारी देत आहे..





संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..













जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..






आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!
रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..









समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!
तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!



आपलाच,







सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com