subhash inamdar

subhash inamdar

Monday, February 7, 2011

पावले मंचावर थिरकली

'जीवन के हर मोड पे...' या गाण्यावर अमितकुमार आणि आशा भोसलेंची पावले मंचावर थिरकली, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद देऊन अख्खं मैदान डोक्‍यावर घेतले. "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा..', आशा आणि जॉली यांचे "जब अंधेरा होता है...' आणि जॉलीचे "शोले'तील "मेहबुबा...मेहबुबा...' या गाण्यांना श्रोत्यांच्या तालबद्ध टाळ्यांची साथ मिळाली. "पंचम'दांबद्दलच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील प्रसंगांचे दाखले देत या कलाकारांनी ही संगीतरंजनी रंगविली. आर. डी. बर्मन यांना अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या पंधरा कलाकारांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते. "पंचम'दांनी प्रत्येक गाणे रचताना वापरलेल्या वाद्यांसह सर्व गाणी सादर करण्यात आली.

ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात बिनाका गीतमालाद्वारे असंख्य गाणी लोकांपर्यंत पोचविणारा एक आवाजही श्रोत्यांना आज "पाहायला' मिळाला. तो आवाज म्हणजे अमीन सयानी. तेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. आर. डी. बर्मन, किशोरकुमार यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. पंचमदा आणि गुलजार हे एक अजब "कॉंबिनेशन' होते. त्या दोघांच्या मैत्रीच्या आठवणींना आशा भोसले यांनी उजाळा दिला. "दो लब्जों की है', "आपके कमरेमे कोई रेहता है', "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा' अशी एकाहून एक सरस गाणी आशाताईंनी सादर केली. "दम मारो दम'ने कार्यक्रमाचा कळस गाठला.
सौ. अरुणा नाईक मेमोरिअल फाउंडेशन आणि लायन्स क्‍लब, मुकुंदनगर यांनी आशा भोसले यांच्या "राहुल ऍण्ड आय' या सूरमयी संगीत रजनीचे शनिवारी आयोजन केले होते

No comments:

Post a Comment