subhash inamdar

subhash inamdar

Monday, March 19, 2018

सूरांशी शरणांगती घ्या..मग गाणं सोपे होईल






-डॉ. भरत बेलवल्ली


रियाज डोळसपणे केला पाहिजे. गाणं सतत आतमध्ये चालू असते. मी झोपतो तेव्हाही ते आत चालू असतं. भीमसेनजी रियाज का करायचे कारण त्यांनी त्यांचा गळा ओळखला होता. अभिषेकी बुवा भिमसेन जोशींसारखा रियाज करत नसत. त्यांची रियाजाची पध्दत वेगळी होती.  आपण रियाजाची कॉपी करू शकत नाही.  आपली ओळख आपल्याला होणं फार गरजेचे आहे. कुठल्याही कलाकाराला कुठल्याही पध्दतीची गायकी सादर करायची झाली तर त्याला आपली स्वतची ओळख होण फार गरजेची आहे. ती ओळख झाल्याने माध्यम स्पष्ट होतं. ते स्पष्ट झालं की तुम्हाला साधन मिळतं. तुमची कला मांडायची. ते साधन जेव्हा परिपक्व असतं तेव्हा त्याला अधिक रियाज करून त्रास देऊ नये.
मला वाटते मला काळी चारवर गायचे..जेव्हा मला जेव्हा असं समजेल की माझा तो सूर लागणार नाही. त्या दिवशी तो सूर कसा लागेल यासाठी मी रियाज करतो. रियाजाची प्रत्येकाची पध्दत वेगळी असतो..कुणाला अठरा तास तो रियाज प्रसन्न होतो. कुणाला तो एक तास पुरेसा होतो. कुणाला कार्यक्रमा आधी एक तास पुरेसा होतो. हे होण्यासाठी जर सतत ते सूर आणि ती श्रुति सतत आपल्या अंगावर खेळत असेल तर त्याचा अंदाज आपल्याला घेता येतो.. पंडित कुमार गंधर्व यांच्या घरी सतत तंबोरा सुरु असायाचा. ते सतत त्या सुरातच रहात असत.
सूर हा एक बिंदू आहे. अवकाशातला तो बिंदू कुणी माणूस पकडू शकत नाही. ती आस पकडायाला जातो. माझे गाणं माझ्या सुरात यावे यासाठी मी हा ऑर्गन बांधून घेतला आहे. पांढरी चार पासून पुढे पाच सप्तकाचा माझा ऑर्गन आहे.
तेव्हा माझे माध्यम स्पष्ट असल्याने मी शाररिक मर्यादा विसरुन जातो. तुम्ही घरी असताना काळी चारचा षडज् लावा म्हणालात तर ते शक्य होत नाही. तेो दिसतो तेव्हा  गळा पटकन त्या सूराला स्पर्श करून परत येतो. मग मी विचार करत नाही माझा गळा तिथपर्य़त जाईल की नाही. मग तो सूर बेसुर होईल का नाही याचा विचार करायचा नाही..तो दिसतो..तेव्हा तिथे जाऊन त्याला स्पर्श करून परत यायाचं.  जर माध्यम स्पष्ट असेल तर गाणं होऊ शकतं. हा माझा अनुभव आहे. मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो आहे..प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो..
सूर तुमच्यावर प्रसन्न झाले पाहिजेत. सुरांंशी मैत्री असली पाहिजे. माझी कधी कधी अशी परिस्थिती येते तो सूर सांगतो हे शक्य नाही त्याला हात लावणं. स्वराला  स्वत्व सोडून तुम्हा शरणागती घेता तेव्हा तो आपणहून तुमच्याजवळ येतो. तो जेव्हा जवळ येतो..तेव्हा आपली मेहनत असते की आपण त्याला हात लावून परत येणे. हा माझा प्रवास सोप्या शब्दात मांडला..हे माझ्या बाबतीत प्रत्येक सूर लावताना माझ्या बाबतीत घडत असतं..



मास्टर दिनानाथ मंगेशकांचे दैवी गाणे गाणारा गायक म्हणून संबोधला जाणारा गायक भरत बेलवल्ली आपले आणि सूरांचे नाते सांगताना सारं काही मनमोकळेपणाने रसिकांना सांगत होता.
निमित्त होते..मैत्र फाउंडेशनच्या स्वरयज्ञ या मैफलीचे. रविवारची संध्याकाळ टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृहातले रसिक त्यांचे दैवी गाणे ऐकताना..त्यांचे रियाज आणि सुरांचे नाते याविषयी तल्लीतेने ऐकत होता.. तेव्हा लक्षात येते की ह्या तरूण गायकाने किती उंची गाठली आहे याचा.

सुमारे दिडशे मित्रांनी चालविलेली ही मैत्र फाउंडेशन गुढी पाडव्याच्या दिवशी माधव थत्ते या रंगभूषाकाराला दहा हजाराची मदत दिली. दर  मैफलीचे आयोजन करताना एका वयोवृध्द कलावंताला आर्थिक मदत ते आपणहून देतात.
भरत यांच्या मते त्यांचा हा पुर्नजन्म नसून गुणजन्म आहे. आपण य़शवंतबुवा जोशी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले .ते वयाच्या आठव्या वर्षापासून..मात्र अकरावी नंतर आपली कंठ फुटला तेव्हा आपल्याला आपल्या गळ्याची जात उमगली..मग अभ्यासून आपण गाण तयार केले आणि लोकांना ते दिनानाथांसारखे भासते. मास्टर दिनानाथांना समोर अवकाशात  स्वर मला घ्या म्हणून विनवित असतात..तेव्हा त्या स्वरांची मजा घेत तडफेने ते गाणं सादर करत. आपणही त्या स्वरांशी खेळत, कधी स्पर्श करत गाणं गातो..इतकेच.. असा विनम्रपणा त्यांच्या गाण्यात आणि बोलण्यात जाणविला.




कार्यक्रमाची सुरवात त्यांनी पं. बलवंतराय भट रचित रागमालेने केली. सतरा रागंची ही रचना गाताना त्यांनी श्रोत्यांना आपल्या सोबत कधी नेले ते कळलेच नाही.
नंतर दिनानाथांच्या आकेक नाट्यपदांची बरसात करत त्यांचा दैवी स्वर टिपत दिव्य स्वातंत्र्य रवी, मर्मबंधातली ठेव ही, युवती मना, शूरा मी वंदीले अशी पदे गाऊन आपल्या आक्रमक शैलीत ती रसिकांच्या मनात उतरवली.
श्रीनिवास खळे यांची कबीरांची रचलेली रचना.. किवा हरी म्हणा, अशा लोकप्रिय अभंगातून  त्यांनी आपण किती सहजपण सारे प्रत्ययी देउ शकतो..ते सहजसाध्य अशा स्वरांची बरसात  करत चकित करून सोडले.
सुकताची जगी या या सावरकरांच्या पदांने त्यांनी मैफलीची सांगता करताना ते सूर आठवत रसिक घरी परततील याची काळजी घेतली.
अतिशय नेटके आणि नेमके निवेदन करत मोहन कान्हेरे यांनी ही मैफल आपल्या शब्दांनी जिंकली. तर प्रसाद करंबेळकर यांचा तबला आपल्या आर्विभावात बोलत होता. तर दादा परब यांचा पखवाज तेवढाच ऊत्तम साथ देत होता. सुनील अवचट
 यांची मधुनच सुरीली बासरी निनादत होती. तर मकरंद कुंडले यांचा ऑर्गन सतत भरतच्या सुरांची सांगड घालत आपल्या वादनाचे कौशल्य पणाला लावत रसिकांच्या पसंतीला उतरत होता..

या मैफलीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे..गायक सारा आपला गायकीचा थाट माट तालाकडे न बघता तो सूरांशी थेट संवाद साधत प्रसन्नपणे करित होता. ताल त्यांच्या अंगात भिनलेला होता जणू.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment