subhash inamdar

subhash inamdar

Friday, July 27, 2012

`शिवरायांचे आठवावे रुप`

महाराष्ट्राच्या मातीचा गंध म्हणजे मावळा गडी. महाराष्ट्राच्या भूमिचा कर्ताकरविता म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. कोणत्याही भूमिकेतून त्यांचे जीवन दर्शन घडविले तरीही ते तेवढेच रोमहर्षक आणि मनात शौर्य निर्माण होते. असाच काहीसा एक आविष्कार नव्याने पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित `शिवरायांचे आठवावे रुप` यातून झाला आहे. हृषिकेश परांजपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग रेखाटून त्याला पोवाडे आणि त्यांची स्फूर्तीगाथा सांगणारे लोकसंगीताचे प्रकार वापरून आपल्या लेखनातून शब्दरुपात मांडले आहेत.


इतिहासात नोंदल्या गेलेल्या प्रमुख घटनांपैकी कांहीचा ओझरता उल्लेख निवेदनात करुन आणि काही प्रसंगांची गाथा पोवाड्याच्या माध्यमातून दाखवून मोजक्या प्रसंगातून हे शिवराय इथे दिसू लागतात.

लोकसंगीतातून पुढे नेणारी ही एक वेगळी कथाकथन शैली असल्याचे मला वाटते..त्याला नाटक म्हणणे योग्य नाही. कधी प्रसंग प्रत्यक्ष सादर होतात..कधी निवेदन ऐकू येते..तर कधी मागच्या स्क्रीनवर विविध चित्रे दिसतात...कधी गोंधळी तर कधी शाहीर डफावर थाप मारून शिवाजीराजांची मर्दुमकी वर्णन करतात..

लेखकाने आधी सांगीतल्याप्रमाणे हा शिवाजीमहारांच्या कारकीर्दीचा इतिहास नाही...तर त्या घटनांच्या आधारे चितारलेले प्रसंग होत...खरयं..


भरतच्या या प्रसंगनाट्य दर्शनातून जे दिसते..ते फारसे परिणामकारक नाही..त्याची मालिका मधुनच लोकसंगीताच्या आणि इतर तांत्रिक कारणांनी खंडीत होते.. एक शिवाजीच्या भूमिकेतले दिपक रेगे आणि काही प्रमाणात मंजूषा जोशी हे कलावंत सोडले तर इतरजण पोशाखात दिसतात..पण त्यांच्या परिणाम दिसत नाही. जीजाऊंच्या भूमिकेत नटल्या आहेत लीना गोगटे ठिक पण त्यांचा आवाज, भाषा बोलण्याची पध्दत सारे काही कोकणस्थी..त्यात ठसका..मराठमोळेपणा नाही...त्यांच्या वावरण्यात आणि कधी कधी बोलण्यातही कृत्रिमता जाणवते.

दिग्दर्शक संजय डोळे यांनी हे सारे प्रसंग नाट्य उभे केले आहे..स्वतः एका प्रसंगात जिवा महाला बनून शिवाजीच्या वेशात पहताना अधिक बरे वाटते.
.
नेपथ्य, संगीत (अशोक काळे), वेशभूषा आणि मेकअप सा-यामुळे शिवराय आठवला सहज जातो..पण तो काही काळानंतर मनात रेंगाळत नाही..पुसटसा..अंधुकसा होत विरुन जातो..




-सुभाष इनामदार,पुणे

No comments:

Post a Comment