
१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..` या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली..
श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.
`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या
ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या
सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी
या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...` तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी
भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी
कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री
वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध
आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली.
`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.
`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..
त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..

श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...`आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...
ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...
`बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती..
ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..

........
आणि प्रसाद जोशी यांचा तबला बोलाप्रमाणे नाद काढतो..तेव्हा रंगत अधिक वाढते...हे मान्यच करायला हवे.

एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276