subhash inamdar

subhash inamdar

Friday, April 11, 2014

गीतरामायणाची निष्ठेने सेवा ..

अभिजित पंचभाई यांचे दहा वर्षे रामनवमीला सादरीकरण

 

गीतरामायण ..गदिमा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून जनतेच्या दरबारात सादर केले...आज त्याला साठ वर्षे उलटली पण ती मोहिनी मराठी मनावर राज्य करुन आहे..याचा प्रत्यय गेले दोन दिवस मी घेत आहे. वाल्किकींचे रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..

तसाच संकल्प गेली सुमारे दहा वर्ष पुण्यात अभिजित पंचभाई आणि त्यांचे कलाकार मंडळी करताहेत. त्यासाठी स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.
मीरा ठकार या ज्येष्ठ निवंदिका अतिशय मनापासून याची महती ..त्याचा गोडवा सांगतात.
रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकदा..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके ते समर्थपणे सादर होते.

कुणा एकाचे नाव घेतले तर ते बरोबर नाही..स्वतः पंचभाई, राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो), देवयानी सहस्त्रबुध्दे, माधवी तळणीकर आणि अमिता घुगरी..सारेच गायक कालवंत ..तर निखिल महामुनी( उद्याचा संगीतकार),राजेद्र हसबनीस, दिप्ती कुलकर्णी, चारुशीला गोसावी, अमित काकडे, आदित्य आपटे....या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे दिली पाहिजेत.

गुढीपाडवा ते रामनवमी असा संगीत, गीत आणि नृत्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात विविध कलावंत करत असतात...यातलाच हा एक..
पण स्वत्ः कसलाही आविर्भीव न आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतातययाला दाद ही दिलीच पाहिजे..म्हणूनच हे टिपण लिहले..नव्हे लिहावेसे वाटले..
यांच्यावर लिहले दुस-यांवर नाही..असे होता कामा नये.. सारेच जण आपापली सेवा प्रामाणिकतेने सादर करतात..पण ज्यांच्याविषयी मुद्दाम लिहावे वाटले असा हा कार्यक्रम होता हे नक्की..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 7, 2014

नाट्यपदांची रंगत वाढत गेली..

 विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित कार्य़क्रम



नाट्यसंगीत गाणारे तीस चेहरे जेव्हा एकापाठोपाठ पुण्यातल्या गांधर्व महाविद्यालयातल्या  पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंचावर सलग सोळा पदं सादर करतात तेव्हा नक्कीच मराटी संगीत नाटक अजुनही पुढच्या पिढीपर्यत नाट्यसंगीताच्या माध्यमातून का होईना पोहोचले आहे याचे समाधान होऊन मन पुन्हा एकदा त्या जुन्या धुप आणि नादीनं सुरु होणा-या  संगीत नाटकांकडे धाव घेते.


रविवारी, ६ एप्रिल १४ ला विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या वतीने  पुण्यात नाट्यसंगीत पदविका अभ्यासक्रमाच्या कलाकारांनी आपला नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर केला..शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर आणि मधुवंती दांडेकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते..त्यांच्या नाटयसंगीतातल्या तयारीने पुणेकर रसिक भरावला गेला नाही तरच नवल. 
विद्याधर गोखले यांनी १४ संगीत नाटके लिहून त्यातून मराठी संगीत नाटकांची परंपरा पुढे झेपावत नेली..

आता संगीत नाटके फारशी होत नाहीत. मात्र नाट्यसंगीताला रसिकांच्या मनात अजुनही अढळ आणि अतूट  स्थान आहे...हे जाणून या प्रतिष्टानमार्फत नाट्य संगीताचे दोन वर्षाचे पदविका शिक्षण दादर (मुंबई), ठाणे आणि  पुण्यात दिले जाते..ठाणे वगळता इतर ठिकाणी  येणा-या कलावंतांत पुरुषांचा सहभाग जेमतेम असतो अशी खंत श्रीकांत दादरकर व्यक्त करतात..इथेही महिलांचा अधिक ओढा आणि चिकाटी दिसते.

विद्याधर गोखले यांची कन्या आणि  संगीत नाटकातून भूमिका केलेल्या उतम संगीत कलाकार शुभदा दादरकर, पं. रामदास कामत, आर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर यांनी नाट्यसंगीताचा हा ठेवा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यात मोठीच मजल मारली आहे.





रविवारच्या या नाट्यसंगीताच्या मैफलीची रंगत आणणा-या राधाधर मधु मिलिंद, फुलला मनी वसंत बहार, एकला नयनाला, नयने लाजवीत..किंवा गौरी मनहारी, येतील कधी परतून, सुरसुख खनी किंवा श्रीरंगा कमलाकांता सारख्या पदांना आमच्या मनात पुन्हा एकदा त्या गीतांची मोहिनी गंधीत करण्यासाठी विदुला जोशी, डॉ. जयश्री बहुलीकर, हर्षदा कारेकर, धनश्री लोणकर, संहिता देशपांडे, स्वरुपा करंदीकर, शरयू कुलकर्णी, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे, नम्रता महाबळ, अपर्णा कुलकर्णी, देवेंद्र पटवर्धन, नीला किल्लेदार आणि स्वाती गणपुले या कलावंतांची पदे समोर कानावर पडत गेली..आणि एकूणच नाट्यसंगीताचा प्रवास सुरु राहिला..निवेदनातून माधवी केळकर यांनी ती पदे एकमेकात गुंफली.

दोन वर्ष पुर्ण झालेल्या कलावंतांचे स्वतंत्र पद तर ज्यांना एक वर्षच झाले आहे त्यांनाही नांदी ते भैरवी अशी मोहक पण वातावरण निर्मिती करणा-या पदांत समाविष्ट करुन एकुणात सुमारे तीस कलावंतांची हजेरी या व्यासपीठावर लागली.
आता नवीन कलावंतांची रितसर नोंदणी करण्यासाठी त्यांची तयारी २० एप्रिलला पुण्यात होऊन त्यातल्या कांहीना पुढच्या वर्षी या प्रतिष्टानच्या अभ्याक्रमात सहभागी होता येणार आहे.. यात अगदी तरुण आणि साठीच्या महिला कलावंताचा सहभाग आहे.

एकूणातच पुण्यातल्य़ा कार्य़क्रमात मला भावलेली काही नावे म्हणजे..हर्षदा कारेकर, स्वरुपा करंदीकर, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे आणि नम्रता महाबळ  अशी सांगावी लागतील.
एकूणच या पारंपारिक पदांना झुलवीत प्रसंगी पुढचा सूर देणारा तरुण ऑर्गनवादक हिमाशू जोशी आणि हार्मानियमवर केदार तळणीकर तर तबल्यावर विद्यानंद देशपांडे आणि संतोष अत्रे यांची संगत मेहनत नाट्यपदांना आकार देत होती.
आपल्या गायकीने संगीत नाटकांत भुमिका करणारे ज्येष्ठ  गायक नट नारायण बोडस या कार्यक्रमाला अखेरपर्य़त. हजर होते. तर मुकुंदराज गोडबोले, संगीतकार गिरीश जोशी , गायिका कविता टिकेकर असे कलावंतही  क्रिकेट विश्वातली महत्वाची लढत सोडून खास उपस्थित होते.

विद्याधर गोखले यांच्या `बावनखणी `नाटकातल्या -प्रेमरंगामध्ये रंगलेल्या होळीच्या गीताने वेगळीच धुंदी आणत कार्यक्रमाची समाप्ती झाली.
कमीत कमी वेळात नाट्यसंगीताचा हा नजराणा देण्यासाठी घेण्यात महनतीला खरा रंग इथे आला..तेच नाटकाचे सूर आता रंगमंचावर नाटकातून प्रत्यक्ष  कधी पहायला मिळतील याची ओढ यामुळेच तर निर्माण झाली.  


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276





Tuesday, March 25, 2014

शब्दरुपाने सुधीर मोघे आपल्यातच आहेत...

सुधीर मोघे यांना नेहमीच कवी म्हणून ओळखले गेले..त्यांचे देहाने जाणे झाले ते १५ मार्चला पुण्यात..

सोमवारी निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहताना..ते गेलेत असे समजू नका ते शब्दरुपाने आपल्यातच आहेत..एवढेच काय त्यांच्या ७५ अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजनही तसेच सुरु ठेवा...यातून त्यांच्या विषयीच्या आठवणी भरभरुन अनेक सुहृद सांगतील  आणि सुधीर मोघे यांचे खरेच मनस्वी व्यक्तिमत्व कसे होते.याचा उलगडा अनेकांच्या बोलण्यातून होईल..अनेक आठवणी सांगितल्या जातील .ते पुस्तकरुपाने लोकांसमोर मांडता येईल..नवीन पिढीला त्यांच्या कवीतांचे, साहित्याची आणि रंगरूपाची खरी ओळख पटेल...
`स्वरानंद`ने पुढाकार घेऊन योजलेल्या या सभेत..अनेकांनी सुधीर मोघे यांच्याविषयीचे आपले नाते काय होते..तो कसा इतरांपेक्षा कसा वेगळा होता याविषयीच्या भावना व्यक्त केल्या...यासभेला सुधीर मोघे यांचे मोठे बंधू आणि ज्येष्ठ अभनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते..
त्यांच्या भावना अशा होत्या...
आनंद माडगूळकर..
गदिमांच्या गावी जाताना सुधीर म्हणाला.होता...उद्या आपण गेल्यानंतर पुन्हा लोक आपली आठवण अशी काढतील का रे...तेव्हा मला त्या शब्दांची किंमत कळली नाही..पण आज कळते आहे....त्याचे मोठेपण आज तो नसताना जास्त जाणवतं आहे..गदिमाच्या आशीर्वादाने पहिले चैत्रबन साकार झाले..या चैत्रबनातले प्रतिभावंत त्याच्या जाण्याने संपले..


मानसी मागिकर..
कविता पानोपानी कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सुधीर मोघेंच्या मोठेपणाची अनुभूती जाणवली..कलेबद्दलची आणि कवीतेबद्दलची जाण त्यांच्याकडून कळत गेली...जे आपले आहे ते कधी ना कधी मिळतच. हा त्याचा सिध्दांत होता.
केतकी माटेगावकर..
आरोही चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं गाणं जवळून अनुभवता आलं.रंगूनि रंगात माझ्या...याचे संगीत त्यांचच होते.. त्यांचं प्रोत्साहन..आणि गाण्यामधले स्वर हे काही विलक्षण होतं. ते आपल्यात नाहीत.पण ते गाण्यामधून कवीतेमधून अापल्यातच आहेत.
डॉ.वि.भा.देशपांडे..
पाय नेहमीच जमिनिवर असलेला कलावंत...म्हणूनच मैत्रीही घट्ट होती..आम्ही दोघे एकाच रुग्णालयात..मी ७ व्या तर ते दुस-या मजल्यावर..पण त्यांची भेट म्हणजे अनामीकाची ठरली..हे दुदैर्व..
रमण रणदिवे...
जीवनरसाना भरभरुन माणूस कसा असतो..ते सुधीर मोघे यांच्याकडे पाहता समजते.. संगीताचा कान ..स्मृतीतल्लख..आणि सह्दय माणूस तो होता..ज्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडावं असा माणूस...

अपर्णा संत..
पूर्वजन्मीतचे पूण्य म्हणून असा माणूस आयुष्यात मिळाला..
कळले ना..
जगणे गाणे आहे सारे
कोणीही गावो लागलेत तंबोरे
रे जगणे म्हणजे संथ स्वरांचा श्वास
अन् मरण,
जणू ही दोन स्वरातील आस...
ह्याच त्यांच्या ओळी आठवतात...

शशिकांत कुलकर्णी..
कवीता पानोपानी कार्यक्रमाचे व्यवस्थापनाच्या निमित्ताने त्यांची कर्तबगारी कळत गेली..मोठा कवी, मोठा माणूस..
डॉ. सलील कुलकर्णी..
प्रत्येक छोट्या गोष्टीत रसपूर्ण जगणे कसे असावा हे शिकविणारा कवी..खरा माणूस..मनस्वीपणे जगला..
शैला मुकूंद..
 गिरविणे हे त्यांच्या लेखी कधीच नव्हते..ते सतत नवे नवे लिहित गेले..देत गेले..उलगडत गेले..
श्रीनिवास भणगे..
निर्भिड आणि निष्पाप..माणूस..त्यांच्याकडून नाही म्हणायला शिकलो..
सुधीर गाडगीळ..
गद्य निवेदनाचा मूळपुरुष..भरभरून दाद देणारा कलावंत..
आनंद मोडक..
जुन्या गाण्यांचा चाहता..आचार्य अत्रे, पुल देशपांडे गदिमा या परंपरेला प्रतिभावंत हरपाला..तुकारामा इतकं सोपं..आणि तुकारामा इतक अवघड लिहिणारा कवी..
अरुणा ढेरे..
 संगीताची उत्तम जाण आणि शब्दाचं उत्तम ज्ञान असणारा कवी.. सतत ताजा असणारा आणि मराठी काव्यपरंपरेचे उत्तम ज्ञान असणारा कवी..
विजय कुवळेकर..
चांगल्या गुणांची पूजा करत सतत नवीन करत रहाणे हेच त्याचं उद्दिष्ट होतं. नेहमीच शब्दांशी, सुरांशी तो खेळत राहिला.

याशिवाय मृणाल कुलकर्णी (पत्राद्वारे), प्रदिप दिक्षित, श्रीकांत पारगावकर, वंदना खांडेकर, सिध्दार्थ बेंदें यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या...
अरुण नूलकरांनी प्रसंगोचित अशा आठवणी आणि सुधीर मोघे यांच्याबद्दलच्या गुणांचा उल्लेख आपल्या निवेदनात केला..






Thursday, March 13, 2014

आवाज कुणाचा..भावे काकांचा...पडद्यावरही



`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे इप्टाच्या माहितीपटातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचले...आणि सातारच्या घरातली आपली पारंपारिक कला घेऊन ते आता रंगभाषेच्या माध्यमातून देशाच्या नाट्यपरंपरेतले चेहरे सजविणारे कलावंत म्हणून सुपरिचित झाले ...

 पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांसोबतच "इप्टा‘, "पीडीए‘, थिएटर ऍकॅडमीसारख्या अनेक नाट्य संस्थांच्या प्रयोगांमधून त्यांनी रंगभूषेची किमया केली आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका या नावानेच ओळखले जातात. रुपेरी पडद्यावर जेव्हा हा माहितीपट झळकला तेव्हाही उपस्थित तरुण कलावंतांनी पुन्हा एकदा..आव्वाज कुणाचा..भावे काकांचा..म्हणत एकच गजर करत त्यांच्या प्रेमाचे पुरते दर्शन घडविले..

आपण जे काही आहोत..ते वडिलांच्या कलागुंणांच्या शिकवणुकीने..आणि रंगभूषेतल्या कलेचा ध्यास घेऊन जगलो ..परमेश्वराने आपल्याला यासाठीच जन्माला घातले..ह्या धारणेने...मात्र मी आज प्रेम पाहून काय बोलावे..तेच कळत नाही...माझ्या काकांनी (मुकुंद भावे) तर मला साक्षात दंडवत घालून मला लाजविले...याउपर मी काय बोलावे..हेच कळत नाही....प्रभाकर भावे आज इथे मात्र खरोखरच निशब्द झाले..

गुरुवार संध्याकाळी सारे तरुण रंगकर्मी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या चित्रपटगृहात एकत्र होऊन..भावेमय रंगून गेले होते..इप्टाच्या पुणे शाखेच्या या माहितीपटाचे कोतूक करण्यासाठी मुंबईहून  व इप्टाचे माजी उपाध्यक्ष व अभिनेते अंजन श्रीवास्तव  , अभिनेते मोहन आगाशे,ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्यासह अनेक जण अमृत सामक यांनी बनविलेला पाहण्यासाठी आणि प्रभाकर भावेंच्या कार्याची तोंडभरून स्तुती करण्यासाठी हजर होते...
हरहुन्नरी कलावंत..काय काय करु शिकतो...ते त्यांच्या रंगभूषेच्या प्रदिर्घ कारकीर्दीने समजते...शिवाय त्यांचे मुखवटे आणि रंगभूषेविषयीचे पुस्तकही तेवढेच उत्तम साकारले गेले आहे...कलाकारातला माणूसही तेवढाच जागा आहे...भावे काकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे..ते माणसातल्या कालकाराला बाहेर काढतात..त्यांनी चेहरा रंगविला की तो तो रहात नाही तो नट बनतो..आणि आपली  भूमिका उत्तम रिच्या वठविण्याचा आत्मविश्वास आपल्यात सहजपणे प्राप्त होतो..असा तरुण रंगकर्मिंचा विश्वास आहे.

अनेक कलावंत आणि पुरुषोत्तम गाजविणारे..गाजविलेले कलाकार भावेंविषयी काय सांगतात..ते ऐकणे फार मोलाचे आहे...फ्रभाकतर भावे यांचा सन्मानही इथे केला गेला...मोहन आगाशे यांनी तो केला..एका रंगकर्मिला असा रसिकांचा लोभ मिळणे हे आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे..ती त्यांना त्यांच्या रुजू बोलण्यातून..कामाच्या निष्ठेतून मिळाली..हेच यातून दिसते....त्यांच्या या क्षेत्रातल्या लेखनकार्यालाही नाट्यकर्मिच्या लेखी एक प्रयत्नातून सिध्द झालेला ठेवा प्राप्त होत आहे..तो जपून ठेवावा आणि त्यांच्या लेखनाला महत्व प्राप्त व्हावे अशीच सा-यांची इच्छा आहे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Sunday, March 2, 2014

पुन्हा ज्योत्स्ना भोळेंचे स्वर आळवले गेले..



ज्योत्स्ना भोळे...यांच्या गायकीचा स्पर्श झालेल्या अनेक गीतांना..नाट्यपदांना आज पुण्यात पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली..ती त्यांच्या गाण्यांच्या स्पर्धेच्या दिवशी..पुण्याच्या पत्रकार संघात.`स्वरवंदना प्रतिष्ठान`च्यावतीने रविवारी १८ ते ८० वयोगटातल्या विविध वयातल्या स्पर्धकांनी भाग घेतला..यात मोठ्या गटात लीना राजवाडे आणि कनिष्ठ गटात किमया लोवलेकर यांना पहिले बक्षिस मिळाले...
निर्मला गोगटे, सुमती टिकेकर आणि गायक श्रीकांत पारगावकर यांच्या परिक्षक समितीसमोर स्पर्धकांनी आपापली तयारी सादर केली..लगेचच याबाबतचा निर्णय दिला गेला आणि परिक्षकांच्या हस्तेच विजेत्यांची नावे जाहिर करुन त्यांना पुरस्कार दिले गेले.
`गाणे हे अवघड गोष्ट आणि ती सोपी गोष्ट नाही..तेव्हा तुम्ही प्रयत्न करीत आहात याबद्दल आनंद वाटतो..पण ती एक शब्द-सुरांची अनोखी कला आहे..त्यात मेहनत आहे..ती सहजी येणारी सोपी गोष्ट नाही.`.असे..जाहिर चिंतन निर्मला गोगटे यांनी याप्रसंगी सांगून स्पर्धकांची पाठही थोपटली आणि गाणे ही किती गंभीर गोष्ट आहे..ते पटवून दिले.


अरुण नूलकरांनी संपूर्ण स्पर्धेचे संचालन केले..त्यांनीच यशस्वी स्पर्धकांची नावे जाहिर केली..
यात ३५ ते ८० या वरीष्ट गटात
लीना राजवाडे, संगीता कुलकर्णी, संगीता भिडे या तिघांशिवाय उर्मिला मराठे यांना उत्तेजनार्थ म्हणून जाहिर केले..याशिवाय  १८ ते ३५ या वयोगटात किमया लोवलेकर, ऋतूजा जोशी, भक्ति पिळणकर आणि उत्तेजनार्थ - योगदा देशपांडे याची निवड केली.. 




या निमित्ताने या सभागृहात ज्योस्त्ना भोळे यांची सतत आठवण येत होती..त्यांची कन्या वंदना खांडेकतर यांनी या बाबत पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजली होती..
त्यांच्या गाण्यातले सहजपणही किती अवघड होते..हे प्रत्येक गीताबरोबर कळत होते..त्यांच्या जन्मशताब्दीच्या या खुणा आता वर्षभर विविध कारणाने उमटणार आहेत..त्यांच्या स्मृतीला अभिवादन...



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, February 7, 2014

भक्तिमय भावीकतेत रसिक चिंब



स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यातले त्यांचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी जय जय राम कृष्ण हरी..चा गजर सुरु केला आणि उद्यान कार्यालयातल्या सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एका मागोमाग अशा रचना तिथे स्वर आणि शब्दातून जसजशा गायक सादर करु लागले तसा हा सारा भक्तिमय भावीकतेने रसिक चिंब भिजून गेला...आणि दोन तास सुरु झालेला हा स्वरोत्सव त्या ज्येष्ठ गुरुंना खरी भावांजली ठरली.


संगीतासह सर्व कलांचा प्रसार व्हावा आणि गुरुंच्या स्वरातील चार स्वर रसिकांच्या कानी पडावेत यासाठी साधना करुन त्याचे विविध माध्यमातून सादरीकरण करण्याच्या उद्देशाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे अनेक काळ शिष्य असलेले राजेद्र दिक्षित यांनी आपल्या श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाची स्थापना केली. संस्थेच्या उद्दंशांपैकी असलेल्या पं. भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने म्हणजेच तिथीप्रमाणे रथसप्तमीला स्वरोत्सवाचे आयोजन केले होते.
केवळ पंडीतजींवरची असीम श्रध्दा आणि त्यांच्यासोबतीने मिळालेला ठेवा रसिकांसमोर देताना त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देणे हाच केवळ उद्देश मनी बाळगून त्यांनी हा कार्यक्रम गुरुवारी सहा फेब्रुवारी २०१४ ला संध्याकाळ साजरी केली स्वरांच्या पुजेने.

ही स्वरपूजा बांधताना केवळ आपले गुरु न समोर ठेवता पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. शरद गोखले अशा दोन गुरुंच्या शिष्यांना हा स्रमंच उपलब्ध करुन दिला..ही मोठी गोष्ट असल्याचे स्वतः  डॉ. मोहन दरेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्टही केले. म्हणून या कार्यक्रमाचे मूल्य अमूल्य आहे..
तबला, पखवाज, टाळ, व्हायोलीन आणि हार्मोनियम यांच्या साथीने सारा परिसर दुमदुमून गेला त्यात मिळाली ही सुंदर स्वरांची सुरेल साथ....एकूणच वातावरणात  ते भाव सहजीपणे उतरले होते.
पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य स्वतः राजेंद्र दिक्षित. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. मोहन दरेकर आणि पं. शरद गोखले यांच्या कन्या आणि शिष्या भक्ति पागे-गोखले यांचा सहभाग असलेली ही संध्याकाळ अभंग, भक्तिगीत आणि नाट्यगीतांने रंगली.

राजेंद्र दिक्षीत- 
राजस सुकुमार, इंद्रायणी काठी,
 माझे माहेर पंढरी,
कान्होबा तुझी घोंगडी चांगली,
ध्यान करु जाता मन हरपले आणि
अगा वैकुंठीचा राया..
 



 




डॉ. मोहन दरेकर- 
संत भार पंढरी,
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
सावळे सुंदर..









भक्ति पागे-गोखले-
अवघाची संसार सुखाचा करेन
उगवला चंद्र पुनवेचा,
शंकरा भरणम्,

...शेवटी पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजीतल भजनाने कार्यक्रमाची सांगता.. जो भजे हरि को  सदा, सोही परम पद पावना...

राजेंद्र दिक्षीत यांच्या माझे माहेर पंढरी आणि कान्होबाने दाद तर मिळविवीच पण गाण्यात तो पंडीतजींचा स्पर्शही उतरल्याचे जाणविले.

संतभार पंढरी आणि सावळा सुंदर या दोन रचनातून मोहन दरेकरांचे पांडित्य .त्यांची स्वरावरची हुकूमत आणि आवाजाला साजेशी फिरत ऐकताना मन त्प्त झाल्याचे समाधान मिळाले.

या दोन गायकांच्या तुलनेत भक्ति पागे-गोखले यांची पदे कमजोर पडली. त्यात जीवंतपणा होता पण भारदस्तता आणि आवाजाचा पातळ पोत यामुळे पदांना आणि अभंगाची रंगत थोडी कमी नटली.

ह्या लेखनाचा उद्देश हा टिकात्मक नसला तरी या घटनेचा उद्देश साध्य झाला की नाही हे सांगण्याचा आहे. स्वरभास्कराच्या नावाने श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाने आपले कर्तव्य चोक बजावले..पण त्यातली रंगत आणि उंची गाठायची आवश्यकता आहे. केवळ हे स्वरांचे आणि शब्दांचे बुडबुडे न रहाता संगीत विषयक काम केल्याचे ठोस पुरावे इथे दिसायला हवे होते.मग या व्यासपीठाला एक अभ्यासापूर्णतेचे वलय निर्माण होईल.मात्र राजेंदर् दिक्षीत यांचा प्रामाणिक प्रयत्न होता..हे मान्यच करायला हवे..त्यांची ही तळमळ त्यांच्याकडून अधिक काम करवून घेईल यात शंका नाही.

ही मैफल पांडुरंग मुखडे (तबला), संजय गोगटे आणि प्रवीण कासलीकर (हार्मानियम), चारूशीला गोसावी (व्हायोलीन), पंढरीनाथ दरेकर, गणेश टाके, निखिल ताकभाते ( पखवाज आणि तालवाद्य), ,  यांच्या साथसंगीत रंगली. कार्यक्रमाचे निवेदन अनिल स्वकूळ यांनी केले पण त्यात जोश कमी आमि आवेश अधिक होता..याला अदिक निवेदनाची उत्तम साथ लाभली असती तर कार्यक्रमाची सफाई अधिक वाढली असती.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



Saturday, December 28, 2013

डॉ. अर्चना गोडबोले-पर्यावरणतज्ज्ञ

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले..

तीव्र इच्छेचा परिस हातात असला आणि त्याला अथक, मन:पूर्वक प्रयत्नांची जोड मिळाली तर एखादी अनवट वाटसुद्धा कशी लखलखीत होऊन उजळून निघते याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. अर्चना गोडबोले, ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’च्या (AERF) संस्थापिका... पण अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर कोकणातील देवराया आणि पर्यायाने पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरावे म्हणून अखंड काम करणारी स्त्री...

महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया आणि त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पती असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. आज कोकणातील देवरायांचा हा प्रश्न केवळ ‘लोकल’ नाही, तर ‘ग्लोबल’ पातळीवर होणारी तापमानवाढ, बदलणारे ऋतुचक्र, नैसर्गिक संसाधनांची अमाप वेगाने होणारी हानी अशा सगळ्या प्रश्नांशी त्याचे नाते आहे.

या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अर्चना कधी सावंतवाडी, कुडाळजवळच्या अगदी दुर्गम अशा छोटय़ा गावांमध्ये असतात तर कधी दोन-अडीच महिने अमेरिकेत मात्र दोन्ही ठिकाणचा अजेंडा एकच. समविचारी लोकांच्या भेटीगाठी. पर्यावरणाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काय प्रयत्न करता येईल याची आखणी आणि असेच काही.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाच्या घरात पैशाची श्रीमंती फार नव्हती, पण पुस्तक, वाचन, चर्चा अशी वैचारिक समृद्धी भरपूर होती. मोठी स्वप्नं बघण्यासाठी लागणारी हिंमत तिला तिच्या वडिलांनी दिली, अर्चना यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागलेली बघायची होती तेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता अर्चना यांनी वनस्पती नामकरणशास्त्रात एम. एस्सी. केली मग मानव वनस्पतीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी जणू झपाटलेला कालखंड होता. मनापासून आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्याचा आनंद तर होताच, पण पश्चिम घाट बचाव चळवळीच्या संपर्कात आल्याने आवडत्या विषयात प्रत्यक्ष काम करण्याचे धडेही त्याच वेळी मिळत होते. चळवळीतील सहकारी असलेले आणि पर्यावरणासंबंधात मराठी पत्रकारिता करणारे जगदीश गोडबोलेने शंभर दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालण्याचे ठरवले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कामाची दिशा अर्चना यांना या मोहिमेतून मिळाली आणि स्वत:मधील सामथ्र्य, कौशल्य याची ओळखही स्पष्टपणे झाली. या मोहिमेनंतर त्यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण खात्यात नोकरीत केली, पण त्या कामाचे समाधान फारसे मिळाले नाही, पण जंगल संरक्षण आणि संवर्धन या कामासाठी आवश्यक असलेली अभ्यास व संशोधनाची पाश्र्वभूमी मात्र तयार झाली.

देवरायांचे संरक्षण-संवर्धन करणारी संस्था स्थापण्याच्या खटाटोपाऐवजी पर्यावरण विषयातील एखादे झुळझुळीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील पद, नोकरी मिळवणे हे त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली, खडतर पण शाश्वत विकासाचे आश्वासन देणारी. जैविक विविधतेच्या संदर्भात संशोधन, या विविधतेचे रक्षण आणि संवर्धन आणि त्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन हे सूत्र घेऊन(AERF) या त्यांच्या संस्थेने काम सुरू केले. पुढे पर्यावरणासाठी इतके मूलभूत काम करणाऱ्या संस्थेला आणि माणसांना कोकणच्या जंगलाने आमंत्रण दिले...!

कोकणात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या देवराया म्हणजे निव्वळ वृक्षसमूह आणि त्यावरील प्राणी-पक्षी जीवन नाही. ती एक संपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. परस्परांना जगवणारी आणि त्यामुळे परस्परांवर अवलंबून असणारी. त्याच्या आसपास जगणाऱ्या माणसांच्या जीवनाला सर्वार्थाने आधार देणारी ही व्यवस्था... या व्यवस्थेला मूठभर लोभी माणसांपासून वाचवायची गरज आहे तर त्यासाठी लोकांचा पाठिंबा हवा, मदत हवी, लोकजागृती आणि त्यातून स्वयंस्फूर्तीने लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे त्यांचे सगळे कामच लोकसहभागाभोवती गुंफले आहे.

सध्या देवराई संरक्षणाबरोबर, खाणकाम उद्योग हे ही एक कडवं आव्हान बनतं आहे. पण त्याच्याशी लढण्यासाठीही मोर्चे काढण्यापेक्षा, नारेबाजी करण्यापेक्षा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे धोरण अर्चनाने अनुसरले आहे कारण मोर्चे काढून, आंदोलन करून, सरकारवर जबाबदारी टाकून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पूर्ण पणे थांबणार नाहीत. फार तर सरकारी आदेश निघतील हे त्यांना देवरई संरक्षणाच्या अनुभवातून कळून चुकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील असनिये गावातील खाणकाम थांबवण्यासाठी या परिसरातील जैवविविधतेचा एक वर्ष सखोल अभ्यास करून तपशीलवार अहवाल तयार केला गेला आणि गावातील लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनवाईमध्ये या अहवालाच्या आधारे प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यात आला. समाजातील सत्ताधीश, पैशाची अमाप सत्ता बाळगत निर्णय आपल्या बाजूने वळवणाऱ्यांचा विरोध पत्कारत ज्या भूमीच्या पोटात तुम्ही खणत खोल उतरता तिचे आणि तिच्या आधारे जगणाऱ्या माणसांची काही बाजू आहे व ती त्या हिरिरीने मांडते आहेत.

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं निव्वळ वाचवणं हे अर्चना यांच्या पुढील आव्हान नाही तर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं हे त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे काम आहे आणि त्यासाठी My Forest नावाचा उपक्रम त्यांनी वं त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतला आहे. जैवविविधतेच्या प्रश्नी ज्यांना आस्था आहे त्यांनी एक एकर जमीन पाच वर्षांसाठी, पाच हजार रुपये देऊन दत्तक घ्यायची. हे पैसे जंगले तोडून पैसे कमवू इच्छिणाऱ्या जमीन मालकाला दिले जातात आणि जंगल वाचवले जाते. एक जंगल वाचते तेव्हा त्याच्या अंगा-खांद्यावर जगणारे प्राणी, पक्षी, कीटक तर वाचतातच, पण हवेचे प्रदूषण काही अंशाने कमी होते आणि पावसाचे चार काळे ढग त्या जंगलाच्या माथ्यावर येण्याच्या शक्यता वाढतात.

अर्चना यांच्या आयुष्याचा साथीदार जगदीश त्यांचा हात सोडून गेल्यावर आता निसर्ग हाच त्यांचा आप्त, मित्र सर्व काही आहे. भटकंती करीत निसर्गाची तऱ्हेतऱ्हेची रूपे बघायला आवडणाऱ्या अर्चना यांना या भटकंतीतच विविधरंगी, अद्भुत निसर्ग, त्याची अनंत रूपे बघायला मिळाली.

आत्तापर्यंत जागतिकीकरणाचे वारे येण्यापूर्वीपर्यंत सामान्य माणसांचे निसर्गाशी काहीतरी नाते होते. घरातील प्रत्येकाला किमान चार झाडांची नावे ठाऊक होती. अंगणा-परसातील झाडे ओळखता येत होती. निसर्गातील शांतता त्याला हवीशी वाटत होती. या ना त्या निमित्ताने तो निसर्गाशी जोडलेला होता. त्यामुळे ‘निसर्गाला सांभाळा’ हे सामान्य माणसाला सांगणे-पटवून देणे सोपे होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या रेटय़ाने माहिती, उपभोगाची साधने याचा जो एक महापूर आपल्याकडे आला आहे, त्यात हे नाते, मूल्यविवेक फार वाहून गेला आहे. आता निसर्गाचा आदर करणे माणसं विसरलीच आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये निसर्गाबद्दलची, त्यातील संसाधनांबद्दलची कमालीची वाढलेली बेफिकिरी आणि अलिप्तपणा त्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते आहे ते फक्त ओरबाडून घेण्यापुरतेच. अशा या आव्हानांशी आता पर्यावरणासाठी लढणाऱ्या अर्चनासारख्या कार्यकर्त्यांना लढावे लागते आहे. २०११ ला डॉ. अर्चना गोडबोले आणि कोल्हापूरच्या ‘निसर्ग मित्र'चे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटाचा भाग असणाऱ्या राज्यांच्या संस्थां, पर्यावरणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरविले आहे.

हिरवाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन, हिरव्या वाटेवरचा ह्या वेगळ्या प्रवासावर असणाऱ्या अर्चना सारख्या अनेकांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांकारिता आणि पर्यावरण संवार्धानाकरिता अनेक अनेक शुभेच्छा...!!!


साभार- लोकसत्ता...