subhash inamdar

subhash inamdar

Friday, April 8, 2011

कला रामनाथ- रसिकांची पसंती

कला रामनाथ आणि राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ़ गांधीभवननी आयोजित केला आहे. संगीत रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे १३ एप्रिल रोजी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ९.३० वाजता होणार आहे...

त्या निमित्ताने कला रामनाथ यांची ही ओळख


संगीतरचनाकार मोझार्ट बरोबर ज्यांची तुलना केली जाते अशा कला रामनाथ या त्यांच्या तरल आणि संवेदनशील वादनाबद्दल प्रसिध्द आहेत.  कला रामनाथ यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांच्या सात पिढ्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

 कलाजींचे पूर्वज केरळमधल्या त्रावणकोर दरबारात गायक होते. कलाजींच्या आधीच्या दोन पिढ्या गायनाबरोबर व्हायोलिन वादन ही करत. त्यामुळे लहानपणीच कलाजींना व्हायोलिन दिले गेले. वयाच्या अडीच वर्षापासून त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. सुरुवातीचे धडे आजोबा विद्वान नारायण अय्यर यांनी दिले. त्यानंतर आत्या एन.राजम यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. आजोबा आणि आत्या यांनी व्हायोलिन वादनाचे तंत्र उत्तम तयार करुन घेतले.

 त्यानंतर संगीतमार्तंड पं. जसराज यांच्याकडे त्यांनी पंधरा वर्षे मार्गदर्शन घेतले आणि त्यांच्यातला कलाकार खऱ्या अर्थाने फ़ुलू लागला. गायकी अंगाची संवेदनशीलता त्यांच्या वादनात आली. गायकी अंगाने वादन करण्यासाठी त्यांनी वादनाच्या तंत्रात योग्य ते बदल केले आणि ते गायकीच्या इतके जवळ नेऊन ठेवले की त्यांचे व्हायोलिन गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाऊ लागले. कलाजींच्या मते आजोबांनी अतिशय कडक शिस्तीत वादनाचे तंत्र आत्मसात करवून घेतले होते त्यामुळेच त्यांना वादनात प्रयोग करता आले.
पूर्वी रावणहट्टा नावाचे वाद्य भारतात प्रचलित होते. त्या वाद्याचा फ़िंगरबोर्ड २२ इंच लांब होता आणि हे बो च्या सहाय्याने वाजविले जायचे. त्यावर तीन ऑक्टेव्हज वाजवता येत. हे वाद्य व्हायोलिन चे जनक मानले जाते. सहाव्या शतकात अरब व्यापारासाठी भारतात आले.त्यांच्याबरोबर हे वाद्य पर्शिया मध्ये गेले. तिथे त्याचे रबाब मध्ये रुपांतर झाले. पुढे दहाव्या शतकात रबाब स्पेन मध्ये गेले आणि व्हायोल झाले. हे व्हायोल युरोपात व्हायोलिन झाले आणि सतराव्या शतकात भारतात परत आले.
हे परदेशी वाद्य असूनही भारतीय संगीतात उत्तम रुळले आहे. परदेशातल्या रसिकांना देखील व्हायोलिनवर भारतीय संगीत ऎकायला खूप आवडते. त्यांना भारतीय संगीतात व्हायोलिन इतके सुंदर कसे वाजते याचे नवल वाटते.त्याचप्रमाणे त्यांना व्हायोलिनची भारतीय बैठकही आवडते कारण यामध्ये मानेला त्रास होत नाही.
जगभरातल्या रसिकांना सांगितीक अनुभूती देता येणं ही एक दैवी देणगी आहे असे कलाजी मानतात.अतिशय सफ़ाईदार आणि तंत्रशुध्द पध्दतीने फ़िरणारा बो आणि बोटे, लयीच्या विविध प्रकारांवर असलेले प्रभुत्व, शुध्द आणि प्रभावी सूर यामुळे कलाजींचे वादन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. वैचारीक आणि तंत्रशुध्द वादनाला असलेली संवेदनशीलतेची बैठक हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ठ मानावे लागेल. इतर घराण्यांकडे आणि विविध संगीतप्रकारांकडे बघण्याचा मोकळा दृष्टिकोन हा त्यांच्यातील अभिव्यक्तीला पूरक ठरला असे त्यांना वाटते.
भारतातल्या सगळ्या महत्वाच्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. शंकरलाल महोत्सव (दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सप्तक (अहमदाबाद), पं. मोतीराम आणि पं. मणिराम कॉन्फ़रन्स (हैदराबाद), स्पिरीट ऑफ़ युनिटी कॉन्सर्ट (दिल्ली), स्वामी हरीदास संगीत समारोह(मथुरा), बाबा हरवल्लभ संगीत समारोह (जालंधर), उस्ताद अमीरखान संगीत समारोह (भोपाळ), सवाई गंधर्व संगीत समारोह (पुणे), संकटमोचन संगीत समारोह (वाराणसी), गुणीदास संगीत संम्मेलन (मुंबई, दिल्ली, बंगलोर)
अनेक देशात त्यांनी आपली कला सादर केली आहे.
अमेरीका,कॅनडा, युके, जर्मनी, स्विट्झर्लंड, नेदरलॅंड्स, इटली, फ़्रान्स, बेल्जियम, ग्रीस, रशिया, साऊथ आफ़्रिका, सेशैल्स, मिडल ईस्ट, त्रिनिदाद, केनिया, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, बांगलादेश, मॉरिशस आदि देशांचे दौरे केले आहेत.
कला रामनाथ यांची शैक्षणिक कारकीर्द ही उत्तम आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या त्या उत्तम श्रेणीच्या कलाकार आहेत. २००८ मध्ये त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पं. जसराज पुरस्कार, सूररत्न आणि सूर मणी हे विशेष उल्लेखनीय.
कला रामनाथ यांना जगभरातल्या रसिकांची तसेच समीक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. त्यांनी परदेशातल्या अनेक महोत्सवांमध्ये तसेच जगभरातल्या अनेक संगीतज्ञांबरोबर मैफ़िली गाजविल्या आहेत. हॉलिवूड्च्या संगीतकारांबरोबर ही त्यांनी काम केले आहे..

पं.संजीव अभ्यंकर तसेच पूरबन चॅटर्जी यांच्याबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक सीडीज आणि कॅसेट्स रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

गौरी शिकारपुर ,पुणे

 geetgauri@gmail.com

Thursday, March 31, 2011

तीन दशकांची समाधानपूर्ती ..झलक,पुणे


महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.

रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.


इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.

मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.


पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....

झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.


तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.

कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

( लेखातील सर्व छायाचित्रे शेखर डेरे यांनी काढली आहेत )

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276

http://subhashinamdar.blogspot.com/2011/03/blog-post_29.html?spref=fb

Wednesday, March 23, 2011

संजीव अभ्यंकर-रसभरीत गाणं

पुण्यात आयोजित करण्यात आलेली रविवार दि. १३ मार्चची `सुरेल सभा` खर्‍या अर्थाने रसिकांसाठी आनंदाचा ठेवा ठरली. पं. संजीव अभ्यंकर यांनी रात्रीच्या रागांचे स्वरूप त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीत उलगडून दाखवित केलेल्या सुरांच्या वर्षावात श्रोते चिंब झाले. 


मैफिलीची सुरूवात 'पुराना चंद्रकंस' या रागातील "ए पिया बिन" या बडा ख्यालाने झाली व त्यानंतर मैफिलीत उत्तरोत्तर रंग भरत गेला. पुढे 'बिहागडा' रागातील मध्य लयीतील "आली री अलबेली" ही बंदिश त्यांनी सादर केली. या बंदिशीतील स्थायी व अंतरा हे दोन्ही वेगळ्या तालात बांधलेले होते. स्थायी त्रितालात तर अंतरा एकतालात बद्ध होता. हा वैविध्यपूर्ण अविष्कार श्रोत्यांची मने जिंकून गेला. मध्यंतराआधी नगध्वनी कानडा आणि नायकी कानडा यांच्या सुरेल मिलाफातून त्यांनी या दोन्ही रागांचे अंतरंग स्पष्ट केले.

मध्यंतरानंतर प्रचलित 'चंद्रकंस' रागातील स्वरचित तराणा पंडीतजींनी रसिकांपुढे मांडला व त्यास रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. 'कलावती' रागातील "जा री जा री छिप जा सखी री" या द्रुत बंदिशीनंतर त्यांनी एकनाथ महाराजांची गवळण सादर केली आणि सिंध भैरवीतील अभंगाने सांगता करीत त्यांनी या मैफिलीस कळस चढविला.

रागसादरीकरणासोबतच पंडीतजींनी श्रोत्यांशी केलेला संवाद या मैफिलीत विशेष ठरला. पंडीतजींची रसिकांपर्यंत सदैव काहीतरी नाविन्यपूर्ण पोचवण्याची आस आणि तळमळ त्यांच्या शब्दांतून जाणवत होती. बोलतांना ते म्हणाले, कुठल्याही वैमानिकाला विमान स्वत:च्या बळावर इष्ट स्थळी नेण्याची इच्छा असते. विमानाने वैमानिकास नव्हे तर वैमानिकाने विमानास वश केले पाहिजे. तसेच कधीतरी, गात असता, गळा बुद्धीवर मात करून जातो. पण बुद्धीला जे हवं ते गळ्यातून बाहेर निघणं हे खरं अवघड काम! गाणं अनवट आणि बुद्धीप्रधान असूनही ते लोकांपर्यंत सहजतेने पोचले पाहिजे. त्यातील रस, रंग अबाधित राहीला पाहीजे यातच खरे कसब!

पंडीतजींच्या आवाजातील गोडवा, स्वरांचा लगाव आणि सुरांतील सच्चेपणा, अत्यंत गुंतागुंतीची तानप्रक्रिया पण संगीत अभ्यासकापासून ते सामान्य श्रोत्यापर्यंत ते तितक्याच सुरसतेने कळेल असं रसभरीत गाणं यामुळे ही मैफल श्रोत्यांच्या चिरस्मरणात राहील याबाबत शंका नाही.

केदार केसकर

Monday, March 21, 2011

हास्यगंगेची 'मिरासदारी'


आदिमानवापासून ते ' आयटी ' च्या लाटेवर ऐटीत जगणाऱ्या आधुनिक मानवापर्यंत स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोषांवर बोट ठेवत केलेले व्यंग कायमच मामिर्क विनोदाचे उगमस्थान ठरते . आणि अशा विनोदामधून निर्माण झालेली हास्यगंगा कधीही आटत नाही ...

... कधी गावाकडच्या चावडीवर , देवळातल्या पारावरच्या गप्पांमधून , तर कधी विडंबन , उपहास , अतिशयोक्ती या अस्त्रांचा वापर करीत पोट धरून हसण्यास लावणारे . मा . मिरासदार ' मटा ' शी संवाद साधत होते .

निमित्त आहे त्यांच्या अठरा पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचे . ' दमां ' च्या गाजलेल्या अठरा पुस्तकांचा संच मेहता प्रकाशनतफेर् आज ( सोमवारी ) रसिकांसमोर आणला जात आहे . वगनाट्यापासून ते विनोदी कथासंग्रहांपर्यंत विविध प्रकारातील पुस्तकांचा इरसाल पात्रांचा ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाऱ्या ' दमां ' च्या गंमतगोष्टी , गुदगुल्या , चकाट्या , चुटक्याच्या गोष्टी , माझ्या बापाची पेंड , गावरान मेवा , विरंगुळा , नावेतील तीन प्रवासी , माकडमेवा , भोकरवाडीत अशा लोकप्रिय पुस्तकांचा यात समावेश आहे . सर्वच पुस्तके नव्या पद्धतीने प्रकाशित करण्यात आली असून यातील काहींसाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि . . फडणीस यांनी मुखपृष्ठेही काढली आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनातफेर् हा संच प्रकाशित करण्यात येणार आहे .

अजूनही तुमचा विनोद हसवणार का , असे विचारता ' दमा ' उत्तरादाखल खळाळून हसतात आणि सांगतात , ' चांगले साहित्य , विनोदनिमिर्तीला काळाची बंधने नसतात . त्यामधील मामिर्कता जोपर्यंत कायम आहे , तोपर्यंत तो खुलविणारा ठरतो . कॉलेजमध्ये प्राध्यापकी करताना हाच अनुभव घ्यायचो . पिढ्या , त्यांची भाषा बदलली , विनोद व्यक्त करण्याच्या तऱ्हा बदलल्या , तरी मामिर्कता कायम असेल , तर विनोदातील हास्याला पिढ्यांची कुंपणे राहात नाहीत .'

' शब्दनिष्ठतेसह इतर कोणत्याही विनोदाला काही मर्यादा पडते . अत्र्यांसारख्या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा झेंडूची फुलेमधील विनोद सध्याच्या पिढीला उमगत नाही . कारण , ते कशाचे विडंबन आहे , हेच त्यांना कळत नाही . याउलट मानवी स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित विनोद काळाच्या कसोटीपलिकडे जातो . कारण , अगदी आदिमानवापासून अतिप्रगत यंत्रमानवापर्यंत स्वभावविशेष हे कायमच राहतात . माझ्या पुस्तकांमधून हीच स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोष टिपण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे सध्याची पिढीसुद्धा माझ्या विनोदाला तुफान दाद देते ,' असेही ' दमा ' स्पष्ट करतात .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7750256.cms

Friday, March 18, 2011

पंच्याहत्तरीची सुरेल वाटचाल !

पं. भालचंद्र दामोदर देव
`व्हायोलिन` या वाद्याला `आंधळं वाद्य` असे म्हणतात, कारण त्यावर स्वरांची बोटे बरोबर पडण्यासाठी पडदे किंवा पट्ट्या काहीच नसते. केवळ वादनातल्या कौशल्यामुळेच अचूक स्वर साधता येतात. अशा या अवघड वाद्याबरोबरचा  सुरेल प्रवास करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक ,माझे वडील आणि गुरूही.
 श्री. भालचंद्र देव. परिचितांचे `नाना` २ एप्रिल २०११ रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांच्या आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला धावता आढावा.....


नानांचा जन्म मुंबईचा. माझे आजोबा दामोदर चिंतामण देव, हे नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ते म्युनसिपाल्टीच्या शाळेत संगीत शिकवित असत. ते गाण्याबरोबरच हार्मोनियमही वाजवित असत. प्रसिध्द व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी यांचे ते शिष्य. आजोबांना थोडे व्हायोलिनही वाजवता येत होते. त्यामुळे घरातील संगीताच्या वातावरणामुळे नानांनाही संगीताची गोडी लागली. यामुळेच वयाच्या ११ व्या वर्षी तेही आजोबांकडे व्हायोलिन शिकू लागले.
आजोबांची नोकरी संपल्यावर नाना पुन्हा चिंचवडला  आले. (तसे हे देव कुटुंब चिंचवडच्या मोरया गोसावीच्या कुळातले. कामानामित्त मुंबईला जरी गेले तरी पुन्हा परतोनी माघारी म्हणजे चिंचवडला स्थिरावले) शालेय शिक्षण पूर्ण झाल्य़ावर आजोंबांकडे व्हायोलिनचे धडे घेणे सुरूच होते. वाणिज्य शाखेचे पदवी घेतल्यावर आजोबांनी नानांना पं. गजाननबुवांकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठविले.
रोज दहा तास, असे जवळजवळ तीन वर्षे डोंबिवलीत बुवांकडे व्हायोलिनचे धडे गिरविले. बुवांची शिस्त अतिशय कडक. कोणत्याही बंदिशी किंवा स्वररचना लिहून घ्यायच्या नाहीत. हा दंडक. घरी गेल्यावर त्या आठवून त्याचा रियाज करायचा... हे विद्येचे तंत्र. बुवांच्या या धाकामुळे व्हायोलिनशी जवळीक अधिक झाली.. बुवांच्या सहवासामुळे त्यांचे खास गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची कला अवगत झाली. त्यात ते माहिर . तबल्याच्या बोलाचेही तिथे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले... एकूणच गायकी अंगाने वादन आणि तेही तबल्याच्या लयीत वाजविण्याची कारागिरी सहजी प्राप्त झाली.
पुण्यात टेलिफोन खात्यात नोकरीचा कॉल आला..आणि नाना खुद्द पुण्यात दाखल झाले. पुण्यात नोकरी आणि व्हायोलिन दोन्ही गाष्टी एकत्रच सुरू झाल्या. पुण्यात पं. नागेश खळीकर, बबनराव कुलकर्णी, धुंडिराज मराठे यांचेकडेही नानांनी संगीताचे शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांनी शिकविलेल्या व्हायोलिनच्या विद्येत पुरते प्राविण्य आल्यावर मग नानांनी रेडीओची परिक्षाही यशस्वीपणे पास केली. पुण्यात आलेल्या ६२च्या पुराने राहते घर कोलमडून गेले. गोखलेनगरला संसाराचा पुन्हा मांड मांडला. लग्नानंतर आईलाही गाण्याची आवड लक्षात आली. आईने नानांच्या कार्यक्रमांना तंबो-याची साथ केली. आई (सौ. निला भालचंद्र देव) भक्तिगीत आणि अभंग छान म्हणत असे.
नानांचा पहिला कार्यक्रम १९६३साली रेडिओवर प्रथम झाला . त्यानंतर घरी रेडिओ विकत आणला गेला. आईने घरातली सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सर्व जबाबदा-या तिने आनंदाने, समाधानाने पार पाडल्य़ा. नाना घरात व्हायोलिनच्या शिकवण्या घेत असत. कार्यक्रमांना साथ करण्यासाठी बाहेर जात असत. घराची सारी मदार आईवर असायची.. तीही तेवढीच ..कलाप्रेमी आणि मोठ्या मनाची.
घरातल्या संगीताच्या या वातावरणामुळे वयाच्या नवव्या वर्षी मी व्हायोलिन शिकू लागले. तेही नानांच्या कडक शिस्तीत.. मला आठवते.. माझ्या शेजारी रहाणारी मैत्रीण संगीता आणि मी दोघीही क्लासला बसायचो.. आधी शिकविलेल्या रागांच्या आलाप, ताना जर पाठ नसल्या तर नाना मला क्लासला बसू देत नसत..इतकेच नाही तर वाजविताना काही चूक झाली तर हातातल्या बो ने एक जोराचा फटका मारीत....मात्र या मुळेच माझे व्हायोलिन वादन तयार झाले..आज ते सारे मागे वळून पाहताना डोळे पाणावतात.
आज वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांचा वक्तशिरपणा आणि शिस्त तशीच कायम आहे. पण जेवढे ते कठोर शिक्षक तेवढेच समोरच्याचे कौतुकही ते मनापासून करतात.. मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे.
आपल्या इतक्या वर्षांच्या सुरेल प्रवासात त्यांनी कधीही प्रसिध्दीची किंवा कुठल्य़ाही पुरस्काराची अपेक्षा कधीच धरली नाही. आठ ते सत्तर वयोगटातल्या कितीतरी जणांनी नानांकडे शिक्षण घेतले आहे. आजही घेत आहेत.
पण व्हायोलिन हे फार अवघड वाद्य असल्यामुळे शिकायला येणारे फार चिकाटीने ते शिकत नाहीत..अर्धवट सोडून जातात ही त्यांची खंत आहे.
मितभाषी आणि तेवढेच मिश्किल ही त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये सांगता येतील. ते तसे मितहारीपण असल्यामुळे मोजकाच आहार घेऊन सतत उत्साही असणारे आमचे नाना अजुनही बसने प्रवास करून घरोघऱी शिकवण्या घेण्यासाठी तर जातातच पण गेली ४० वर्षे शनिपारच्या भारत गायन समाजात संगीत शिक्षक म्हणून आजही कार्यरत आहेत. अजूनही कोणत्याही कार्यक्रमालाच काय पण तालमिंनाही वेळेवर हजर असतात. त्यांनी हिच शिस्त आम्हा बहीण-भावांना लावली. त्याचा उपयोग आम्हाला आमच्या आयुष्य़ात खूप झाला.
त्यांचा हा संगीताचा वसा मी (व्हायोलिन) आणि माझा मुलगा रविराज( तबला) आणि मुलगी मधुरा(हार्मांनियम) यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे.
निर्मळ मनाचे.. कोणत्याही कलेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले.. व्हायोलिनवरची निष्ठा कायम ठेवणारे... ते वादनाचे धडे पुढच्या पिढीला शिकविणारे...पं. भालचंद्र देव...
तुम्हाला आयुष्याची स्वर-संगत अशीच अखंड लाभत राहो.. कला आणि कलावंत दोघांनाही याचा लाभ होवो...हिच अपेक्षा...
दिर्घायुष्याचे वरदान लाभो
तुमच्या आयुष्या
हिच विनंती करतो आम्ही
परमेशाच्या देशा...
आपलीच,
सौ. चारूशीला गोसावी ( देव )
मयुरेश, बी-५५, राजर्षी शाहू सोसायटी,
सातारा-पुणे रस्ता, पुणे- ३७
फोन. ०२०- २४२३ ००६० मोबा.९४२१०१९४९९



Friday, March 11, 2011

कणखर आणि कोमलता म्हणजे कुसुमाग्रज

अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावरचा कार्यक्रम त्यांच्याच स्मृतींना उजाळा देउन केला गेला. ज्ञानपीठ विजेते वि. वा शिरवाडकर साहित्यिकांच्या अभ्यासक डॉ. माधवी वैद्य यांनी स्वतःच्या कुसुमाग्रजांच्या आठवणींनी पुन्हा एकदा जागृत केले. त्यांच्या मते कुसुमाग्रजांच्या आठवणी बकुळीच्या फुलासारख्या आहेत. आपण सहजच त्या सुगंधांचा दरवळ मनात घेत रहातो.
यातून उमजलेले कणखर आणि तेवढेच कोमल कुसुमाग्रजांमधील काही कट्ट्यावरून घरी आलेले काही मुद्दे-
-          कवीचे शब्द बदलण्याचा हक्क बदलण्याचा कुणालाच नाही, ह्या ठाम मताचे कपसुमाग्रज.
-          अत्यंत स्वागतशिर व्यक्तिमत्व.
-          तात्यासाहेबांच्या घरी दरबार रोज भरत असे. यात कवी, कलावंत, साहित्यिक, विद्यार्थी यांचेबरोबर माळी, रिक्षावालेही असत.
-          नाशिकला त्यांनी सांस्कृतिक, साहित्यिक रूप दिला. नाशिकनेही त्यांना आपले मानले.
-          त्यांचे आयुष्य म्हणजे आळवावरचे पाण्यासारखे थेंब..सगळ्यात असूनही कशातच नसल्यासारखे.
-          त्यांचा सहवास..त्यांचे घर म्हणजे देवघरासारखे...जिथे तुम्ही सहजच नम्र होता.
-          त्यांना पाहिल्यानंतर आपलं दुःख, वेदना सहजपणे हरपून जायचे.
-          ओळखलतना सर मला..या कवीतेचा खास उल्लेख... त्यांच्याकडून अनेकांनी आशिर्वाद घेतले.
-          पाठीवरती हात ठेऊन..तुम्ही फक्त लढ म्हणा..हा मेत्र मनसेचे राज ठाकरे यांनाही भावला.. त्यांचे आशिर्वाद...
-          माती आणि आकाशाशी संवाद साधणारे शब्द-भावनांचे नाते ते आपल्या लेखनात फार वेगळे व्यक्त करीत असत.
-          त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास होता.
-          कणखर आणि तेवढेच कोमल असे त्यांचे लेखन आणि व्यक्तित्वही होते.


आज कुसुमाग्रज वेगवेगळ्य़ा घटनांमधून व्यक्त झाले. पुण्यातल्या बाजीराव रोडवरच्या बुक गॅलरीच्या सुंदर पुस्तक दालनासमोर..अक्षरधाराच्या कट्ट्यावर... वाचकांची गर्दी फार नव्हती..पण होते माजकेच साहित्यप्रेमी.
आजुबाजूच्या परिसरातही त्यामुळे आपोआपचा साहित्याचा दरवळ पसरला गेला. आत येण्याचे न लक्षात येणारा श्रोता बाहेर उभा राहून कोण काय बोलतोय हे टिपत होता. तसा बाहेर  उभा राहूनही तो हा अनुभव घेत होता.
पिंपळाच्या पारावर..पायरीवर अंथरलेल्या बैठकीवर बसून आज तो कुसुमाग्रज अनुभवीत होता..
उद्या दुसरा कोणी... नक्कीच या उपक्रमाला वाचक प्रतिसाद मिळेल..तो साहित्यिकांना आणि वाचकांनीही खेचून आणेल...राठिवडेकर बंधूंना शुभेच्छा....


करीन म्हणतो सेवा...वाचकांची
त्याला देईन म्हणतो..शब्द..जगण्यासाठी
जिवन अधिक सुंदर करण्यासाठी
वाचायला लावेन... वाचकांना
बोलते करेन लेखकाला...त्याच्या भावनेला
करीन की संसार..
हाच..
पुस्तकांचा....प्रदर्शनाचा
आहे की नाही हा छान उपद्व्य़ाप !

सुभाष इनामदार, पुणे.
Mob- 9552596276


Monday, March 7, 2011

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ साकार

`कोकण विविध दिशा आणि दर्शन` पुस्तकरूपी

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!

अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?
ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.
हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे.  माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..
असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.


आता कार्यक्रमाकडे वळताना...
`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.
सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते. यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
 and