subhash inamdar
subhash inamdar
Thursday, June 28, 2012
संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम
नाट्यसंगीताला 'लाइव्ह म्युझिक ट्रॅक'ची जोड देऊन अभिनव प्रयोग करणाऱ्या युवा संगीतकार गंधार संगोरामने आता जागतिक संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम हाती घेतला आहे. या मॅगझिनचा पहिला अंक जुलैमध्ये सादर केला जाणार असून, दर महिन्याला हे मॅगझिन ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. भारतीय संगीताबरोबरच जागतिक स्तरावरील संगीतक्षेत्रामध्ये होणारे प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
सध्याच्या तरुणाईला भारतीय संगीताबद्दल जगभरातील संगीताबद्दलही तितकेच आकर्षण असून, संगीतामध्ये होत असणारे प्रयोग, बदलते तंत्रज्ञान, नवे संगीतकार, त्यांच्या रचना आदींबाबत तरुणाईमध्ये कुतुहल आहे. या सगळ्याबद्दल दजेर्दार माहिती देऊ शकेल असे मॅगझिन आपल्याकडे उपलब्ध नाही, ही उणीव लक्षात घेऊन गंधार संगोरामने ई-मॅगझिनचा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाविषयी-
भारतामध्ये संपूर्णपणे जागतिक संगीताला वाहिलेले एकही मॅगझिन उपलब्ध नाही. बऱ्याच मॅगझिन्समध्ये संगीतकारांविषयी, वादकांविषयीची माहिती असते; मात्र संगीताविषयी गांभीर्याने कोणीच बोलत नाही. एका अर्थाने उत्तम दर्जाच्या संगीत समीक्षेची उणीव आहे. तरुण कलाकारांना जागतिक स्तरावरील संगीताविषयी नक्कीच कुतुहल आहे, त्या स्तरावरील संगीताविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे; मात्र त्याबाबत परिपूर्ण माहिती मिळत नाही. या मॅगझिनमधून संगीतकार, वादक, तंत्रज्ञान, सांगीतिक प्रयोगांबरोबरच त्याच्या दर्जाविषयी विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
Thursday, June 21, 2012
जरा विसावू या वळणावर!
वारसा निर्माण करणारी कलावंत जोडी...
संसाराच्या सारीपटावर दोन सोंगट्या एकाच रुळावर धावताहेत...आजही रेल्वे धडधडतीच आहे..पण त्याचा फोन प्रवास आता थांबलाय! सुमारे ३८ वर्षांचा बीएसएनएल मधला नोकरीतला प्रवास आता अशोक अवचट याने थांबवला आहे.. तो होतोय निवृत्त !
...नाटकातला हा गद्य नट आणि ती संगीत कलेत निपुण आणि नाटकात सुरेल काम करणारी..दोघे पडले प्रेमात...हातात हात आले...एका छत्राखाली पती-पत्नी झाले...आता तो नोकरीतून अलिप्त झाला..आणि तिने त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा चिंतून त्याला `जरा विसावू या वळणावर.` .हे गीत म्हणून त्याने केलेल्या कामाचे दिव्य स्वरुप दाखवून संसाराच्या सारीपटावर..झालेल्या अनेक वाद-संवादाची आठवण करून दिली..आणि पुढच्या वाटचीलीतही मी बरोबर आहे....हे सांगत `प्रेम सेवा शरण..`म्हणूत भारतीय संस्कृती प्रमाणे पुढेही एकत्र चालण्याचे वचन दिले..तेही संगीतामधून....
गेले काही दिवस भरत नाट्यमंदिराच्या बोर्डवर एका कार्यक्रमाची पाटी झळकत होती...२१ जून संध्या, ६ वाजता..सौ. सुचेता अवचट आणि अभिषेक अवचट यांचा संगीतमय कार्यक्रम `या वळणावर..`.
गुरुवारी प्रत्यक्ष तो काय आहे हे पाहल्यावर प्रचिती आली की अशोक अवचट या आमच्या मित्राच्या निवृती निमित्त त्याच्या पत्नीने म्हणजे सुचेताने त्याला ही या वळणावर ही स्वरमयी भेट देण्याचा घाट घातला आहे...किती सुंदर...
कलावंत हे दांपत्य...एक जण लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, एकच प्याला या नाटकात हजारो प्रयोग करत करत नोकरी केली. आता त्याच्या निवृत्तीची घोषणा झाली..त्याला आपल्या संगीतातून तिने हे सुरेल नजराणा बहाल केला....मानापमान, कट्यार, सुवर्णतुला, सौभद्र अशा नाटकातून तिने यापूर्वी संगीत अभिनेत्रीच्या भूमिका केल्या...स्वरराज छोटा गंधर्व आणि. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नाच्यसंगीताची रितसर तालीम घेतली. तिचे नाट्य संगीतातले सादरी करण ऐकणे आणि यांचा मुलगा अभिषेक याने ही कला पुढे नेण्याचे दिलेले गीतांच्य़ामाध्यमातून वचन..हे सारे वेगळे आणि भारावणारे होते.
`घननिळा लडविळा `ने सुरवात करुन सुचेता अवचट...एकेक गीते सादर करत होती...फक्त अशोकने आरंभी हा कार्यक्रम का करित आहे याची माहिती दिली..आणि पुढे सारा सुरेल आविष्कार आपल्या भाऊक आणि लजिवाळ आणि धारदार तेजःपुंज आवाजॉत सादर केला तो सुचेताने..
भक्तिगीतातून सुरवात करुन, सुगम संगीत, भावसंगीत, गझल, ठुमरी, चित्रपट गीते आणि नाट्यगीतातून या वळणावर...आपल्या पतीच्या चरणी समर्पित केला....एका सुंदर कल्पनेचा हा भावाविष्कार शब्दातून सांधला तो रविंद्र खरे यांनी. आणि यासाठी तबला साथ दिली ती प्रसाद जोशी यांनी तर हार्मोनियमवर आपल्या कौशल्यमयी बोटाची किमया दाखवून कार्यक्रमाला बहार आणली ती सचिन जांभेकर यांनी...
अगा वैकुंठीच्या राणा. हो भक्तीगीत..याद पिया की आये..ही ठुमरी...प्रेम सेवा शरण म्हणत अवघा रंग एकची झाला या भैरवीने सुचेता अवचट यांनी खरच रसिकांना फुलविले..स्वरांनी तृप्त केले..
.
कलेची सेवा करीत नोकरी करणे ही काळाची गरज..पण त्यातली कलासेवा फुलवून ती जपत तो वारसा पुढे नेणारे हे अवचट दांपत्य... आपल्या अशा कार्यक्रमातून वेगळे भासविले..एक वेगळा पायंडा पाडत एक आदर्शही घालून दिला...त्यांच्या या शुभघडीला आमचाही मुजरा.....!
अशोकच्या निवृत्तीनंतरच्या कलाप्रवासाला शुभेच्छा !
सुभाष इनामदार,पुणे
संसाराच्या सारीपटावर दोन सोंगट्या एकाच रुळावर धावताहेत...आजही रेल्वे धडधडतीच आहे..पण त्याचा फोन प्रवास आता थांबलाय! सुमारे ३८ वर्षांचा बीएसएनएल मधला नोकरीतला प्रवास आता अशोक अवचट याने थांबवला आहे.. तो होतोय निवृत्त !
...नाटकातला हा गद्य नट आणि ती संगीत कलेत निपुण आणि नाटकात सुरेल काम करणारी..दोघे पडले प्रेमात...हातात हात आले...एका छत्राखाली पती-पत्नी झाले...आता तो नोकरीतून अलिप्त झाला..आणि तिने त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा चिंतून त्याला `जरा विसावू या वळणावर.` .हे गीत म्हणून त्याने केलेल्या कामाचे दिव्य स्वरुप दाखवून संसाराच्या सारीपटावर..झालेल्या अनेक वाद-संवादाची आठवण करून दिली..आणि पुढच्या वाटचीलीतही मी बरोबर आहे....हे सांगत `प्रेम सेवा शरण..`म्हणूत भारतीय संस्कृती प्रमाणे पुढेही एकत्र चालण्याचे वचन दिले..तेही संगीतामधून....
गेले काही दिवस भरत नाट्यमंदिराच्या बोर्डवर एका कार्यक्रमाची पाटी झळकत होती...२१ जून संध्या, ६ वाजता..सौ. सुचेता अवचट आणि अभिषेक अवचट यांचा संगीतमय कार्यक्रम `या वळणावर..`.
गुरुवारी प्रत्यक्ष तो काय आहे हे पाहल्यावर प्रचिती आली की अशोक अवचट या आमच्या मित्राच्या निवृती निमित्त त्याच्या पत्नीने म्हणजे सुचेताने त्याला ही या वळणावर ही स्वरमयी भेट देण्याचा घाट घातला आहे...किती सुंदर...
कलावंत हे दांपत्य...एक जण लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, एकच प्याला या नाटकात हजारो प्रयोग करत करत नोकरी केली. आता त्याच्या निवृत्तीची घोषणा झाली..त्याला आपल्या संगीतातून तिने हे सुरेल नजराणा बहाल केला....मानापमान, कट्यार, सुवर्णतुला, सौभद्र अशा नाटकातून तिने यापूर्वी संगीत अभिनेत्रीच्या भूमिका केल्या...स्वरराज छोटा गंधर्व आणि. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नाच्यसंगीताची रितसर तालीम घेतली. तिचे नाट्य संगीतातले सादरी करण ऐकणे आणि यांचा मुलगा अभिषेक याने ही कला पुढे नेण्याचे दिलेले गीतांच्य़ामाध्यमातून वचन..हे सारे वेगळे आणि भारावणारे होते.
`घननिळा लडविळा `ने सुरवात करुन सुचेता अवचट...एकेक गीते सादर करत होती...फक्त अशोकने आरंभी हा कार्यक्रम का करित आहे याची माहिती दिली..आणि पुढे सारा सुरेल आविष्कार आपल्या भाऊक आणि लजिवाळ आणि धारदार तेजःपुंज आवाजॉत सादर केला तो सुचेताने..
भक्तिगीतातून सुरवात करुन, सुगम संगीत, भावसंगीत, गझल, ठुमरी, चित्रपट गीते आणि नाट्यगीतातून या वळणावर...आपल्या पतीच्या चरणी समर्पित केला....एका सुंदर कल्पनेचा हा भावाविष्कार शब्दातून सांधला तो रविंद्र खरे यांनी. आणि यासाठी तबला साथ दिली ती प्रसाद जोशी यांनी तर हार्मोनियमवर आपल्या कौशल्यमयी बोटाची किमया दाखवून कार्यक्रमाला बहार आणली ती सचिन जांभेकर यांनी...
अगा वैकुंठीच्या राणा. हो भक्तीगीत..याद पिया की आये..ही ठुमरी...प्रेम सेवा शरण म्हणत अवघा रंग एकची झाला या भैरवीने सुचेता अवचट यांनी खरच रसिकांना फुलविले..स्वरांनी तृप्त केले..
.
कलेची सेवा करीत नोकरी करणे ही काळाची गरज..पण त्यातली कलासेवा फुलवून ती जपत तो वारसा पुढे नेणारे हे अवचट दांपत्य... आपल्या अशा कार्यक्रमातून वेगळे भासविले..एक वेगळा पायंडा पाडत एक आदर्शही घालून दिला...त्यांच्या या शुभघडीला आमचाही मुजरा.....!
अशोकच्या निवृत्तीनंतरच्या कलाप्रवासाला शुभेच्छा !
सुभाष इनामदार,पुणे
Sunday, June 17, 2012
व्हायोलीन वादकांनी केली सुरेल उधळण!
उगाच मराठी माणसांबद्दल अफवा पसरवितात...दोन मराठी मंडळी एकत्र येत नाहीत..त्यांच्या संस्थेत फाटाफूट होते...प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघांचे नाट्यक्षेत्रातले उदाहरण देतात...पण पुण्यात असा एक व्हायोलीन वादकांचा ग्रुप आहे...तो दोघांनी सुरु केला ( संजय चांदेकर आणि अभय आगाशे) आता गेली पाच वर्षे त्यात दोन नविन मराठी व्हायोलीन वादकांची (चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर) भर पडून आता ते चौघे कलावंत दरवर्षी जागतिक व्हायोलीन दिन सादरा करतात....रसिकप्रिय व्हिओलिना ! कालच त्यांचा कार्यक्रमही अप्रतिम रंगला..पुणेकरांची साथही तेवढी जोरदार होती...पावसाची साथ मिळाली तरीही..हे हे वेगळे...

बाहेर पावसाच्या सरी कोसळताना पहाताय..कावळे..फिरताहेत..कोकिळा कूजन करताहेत...आणि आतल्या तशा ओपन वाटाव्या अशा निवारा सभागृहात व्हायोलीन वादक आपली मैफल सादर करताहेत..किती वेगळा आणि आनंददायी अनुभव होता तो !
एक व्हायोलीन वाजत असले तर किती सुरेलता प्रकटते..इथे तर चार वादक एकच गाणे सादर करताहेत...फारच सुंदर..अगदी `गगन सदन` पासून सुरवात करुन..वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राची धुन आणि या सुरांनो चंद्र व्हा..ही भेरवी आणि त्यानंतर चार वादकांची जुगलबंदीतली एकाग्रता आणि कसब... जेव्हा हे व्हायलीन वादक सुरावट आळवितात..तेव्हा रसिकांची दाद टाळ्यांच्या निनादात सहजी मिळते..
गेली दहा वर्षे हा उपक्रम संजय चांदेकर आणि अभय आगाशे....व्हिओलिना...या ग्रुपव्दारे सादर करताहेत..गेली पाच वर्षे चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर यात सहभागही झाला आणि हा सुस्वर झेंडा त्यांनी आपल्या जिद्दीने सर करत नेला आहे..आता त्याला कुठे मुळे फुटायला लागली आहे..यंदा त्याला अनाहत या ट्रस्टची साथ मिळाली.
केवळ व्हायोलीन वादन तर आहेच पण यंदा अनय गाडगीळ आणि विनित तिकोनकर या वादकांच्या सहाय्याने केलेली फ्यूजनची कमालही तेवढीच दाद देण्यासारखी होती..
गाणी किती आणि कोणती यापेक्षाही हा सारा दोन तासांचा अनुभव संगीत सुरात न्हाऊन निघालेला होता..हे महत्वाचे..आज मालिकांच्या आणि पावसाच्या नादात घरातून बाहेर येऊन या वादाकांची वादनशैली अनुभवण्य़ाची गरज पुणेकरांन वाटली.. त्यातच निवारा सारख्या तशा मोकळ्या जागेच्या सभागृहात.. ( कारण इथे डास घोंघावत होते..पावसाचे किडे फिरत होते...त्यातही भर म्ङमून तिनदा प्रकाशही गायब झाला.)
रविराज गोसावी आणि मनोज चांदेकर यांच्या तबला साथीतून नाद घुमत होता...स्वरांना लयदार करीत होता. अविनाश तिकोनकर यांची साथ आणि विनित तिकोनकर यांची पखवाजची साथ रंगत अधिक वाढवित होती... निवेदिकेच्या नवख्या शब्दामधून सतत एफ टी आयच्या रेडीओची जाहिरात होत होती..मधूनच श्रोत्यांना दाते संबोधून निधी देण्याची विनंती केली जात होती. दाते उस्फूर्तपणे देणग्या जाहिर करत होत्या..सारे सुरु होते या व्हायोलीन वादनाच्या मैफलीत...
वन्समोअर घेत आणि टाळत ही हिदी-मराठी गितांची आणि त्यातही नाट्यसंगीताची बरसात श्रोते मनसोक्त अनुभवित होते...
एक सातत्याने केला जाणार उपक्रम असाच सुरु रहावा आणि ह्या व्हायोलीन वादकांनी नवीन सुरावटीतून या वाद्याचे वेगळेपण कायम ठेऊन रसिकांचे मनोरंजन आणि महती वाढवित ठेवावी...

सुभाष इनामदार,पुणे

बाहेर पावसाच्या सरी कोसळताना पहाताय..कावळे..फिरताहेत..कोकिळा कूजन करताहेत...आणि आतल्या तशा ओपन वाटाव्या अशा निवारा सभागृहात व्हायोलीन वादक आपली मैफल सादर करताहेत..किती वेगळा आणि आनंददायी अनुभव होता तो !
एक व्हायोलीन वाजत असले तर किती सुरेलता प्रकटते..इथे तर चार वादक एकच गाणे सादर करताहेत...फारच सुंदर..अगदी `गगन सदन` पासून सुरवात करुन..वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राची धुन आणि या सुरांनो चंद्र व्हा..ही भेरवी आणि त्यानंतर चार वादकांची जुगलबंदीतली एकाग्रता आणि कसब... जेव्हा हे व्हायलीन वादक सुरावट आळवितात..तेव्हा रसिकांची दाद टाळ्यांच्या निनादात सहजी मिळते..
गेली दहा वर्षे हा उपक्रम संजय चांदेकर आणि अभय आगाशे....व्हिओलिना...या ग्रुपव्दारे सादर करताहेत..गेली पाच वर्षे चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर यात सहभागही झाला आणि हा सुस्वर झेंडा त्यांनी आपल्या जिद्दीने सर करत नेला आहे..आता त्याला कुठे मुळे फुटायला लागली आहे..यंदा त्याला अनाहत या ट्रस्टची साथ मिळाली.
केवळ व्हायोलीन वादन तर आहेच पण यंदा अनय गाडगीळ आणि विनित तिकोनकर या वादकांच्या सहाय्याने केलेली फ्यूजनची कमालही तेवढीच दाद देण्यासारखी होती..
गाणी किती आणि कोणती यापेक्षाही हा सारा दोन तासांचा अनुभव संगीत सुरात न्हाऊन निघालेला होता..हे महत्वाचे..आज मालिकांच्या आणि पावसाच्या नादात घरातून बाहेर येऊन या वादाकांची वादनशैली अनुभवण्य़ाची गरज पुणेकरांन वाटली.. त्यातच निवारा सारख्या तशा मोकळ्या जागेच्या सभागृहात.. ( कारण इथे डास घोंघावत होते..पावसाचे किडे फिरत होते...त्यातही भर म्ङमून तिनदा प्रकाशही गायब झाला.)
रविराज गोसावी आणि मनोज चांदेकर यांच्या तबला साथीतून नाद घुमत होता...स्वरांना लयदार करीत होता. अविनाश तिकोनकर यांची साथ आणि विनित तिकोनकर यांची पखवाजची साथ रंगत अधिक वाढवित होती... निवेदिकेच्या नवख्या शब्दामधून सतत एफ टी आयच्या रेडीओची जाहिरात होत होती..मधूनच श्रोत्यांना दाते संबोधून निधी देण्याची विनंती केली जात होती. दाते उस्फूर्तपणे देणग्या जाहिर करत होत्या..सारे सुरु होते या व्हायोलीन वादनाच्या मैफलीत...
वन्समोअर घेत आणि टाळत ही हिदी-मराठी गितांची आणि त्यातही नाट्यसंगीताची बरसात श्रोते मनसोक्त अनुभवित होते...
एक सातत्याने केला जाणार उपक्रम असाच सुरु रहावा आणि ह्या व्हायोलीन वादकांनी नवीन सुरावटीतून या वाद्याचे वेगळेपण कायम ठेऊन रसिकांचे मनोरंजन आणि महती वाढवित ठेवावी...

सुभाष इनामदार,पुणे
Tuesday, June 5, 2012
निगर्वी , सात्विक तबलावादक विनायकराव थोरात
तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार
मराठी संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सर्व गायक अभिनेता आणि अभिनेत्रींसाठी, मराठी संगीत नाटकाच्या आणि नाट्यसंगीताच्या रसिक प्रेक्षकांसाठी आज एक अतिशय आनंददायक घटना घडली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्वांच्या जन्मदिनी देण्यात येणाऱ्या "बालगंधर्व पुरस्कार " साठी ज्येष्ठ, श्रेष्ठ
श्रेष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांची एकमताने निवड झाली आहे... येत्या २६ जून २०१२ रोजी, म्हणजेच बालगंधर्वांच्या १२४ व्या जन्मदिनी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे..
सुमारे ५० हून अधिक वर्षे विनायकरावांनी तन-मन-धन विसरून नाट्यसंगीत आणि संगीत नाटकाच्या साथीला वाहून घेतले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरराज छोटा गंधर्व यांना केलेली साथ असो, किंवा कित्येक वर्षे शिलेदारांच्या मराठी रंगभूमीच्या सर्वच संगीत नाटकांना केलेली साथ असो, अनेक थोर गवैय्यांना मैफिलीमध्ये केलेली साथ असो, थोरातांच्या साथीची खरोखर तुलनाच होऊ शकत नाही..
आजच्या पिढीतल्या ज्या तबलजींना संगीत नाटकांची, नाट्यसंगीताची साथ करायची आहे, त्यांनी केवळ आणि केवळ थोरातांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असा हा थोर कलाकार..
सर्वच गायक कलाकारांनी एक गोष्ट सतत ध्यानात ठेवावी की आपलं गाणं रंगणं, खुलणं हे साथीदारांवर अवलंबून असतं.. साथीदारांशिवाय गाण्याला रंगत येत नाही.. म्हणून ५०% गाणं हे साथीदारांच्या संगतीवर अवलंबून असतं.
विनायकरावांची साथ ही कायमच गाण्याला पूरक अशीच राहिली. त्यांनी कधीही गाण्यावर कुरघोडी केली नाही.. गाणं कसं बहरेल याचाच विचार त्यांनी कायम केला. कितीही बुजुर्ग गायक असोत किंवा अगदी माझ्यासारखे छोटे गायक असोत की ज्यांचं संगीत क्षेत्रात आत्ताशी कुठे पाऊल पडतंय, सगळ्यांबरोबर ते तितक्याच तन्मयतेनी साथ करतात..
कधीही मेहनत करायची सोडू नये आणि कधीही कुणा कलाकाराची टिंगल करून उणी दुणी काढू नयेत ही त्यांची आमच्या पिढीला दिलेली शिकवण.
हा माणूस किती मितभाषी आणि मृदुभाषी आहे , हे त्यांच्या सहवासात आलेले सर्व कलाकार जाणतातच. रिकाम्या, फावल्या वेळेत ते केवळ चिंतन आणि चिंतनच करतात.
त्यांच्या ठेक्यातला डौल, आंस ही केवळ शिक्षणामुळे आलेली नाही, तर त्यांनी आपल्या कलेवर जे प्रेम केलं आणि संपूर्ण आयुष्य तबलावादनात झोकून दिलं, त्याचा हा परिणाम आहे. तीनताल, एकताल, रूपक, झपताल हे नेहमीचे प्रचलित ठेके सुद्धा त्यांच्याकडून ऐकणे हा एक विलक्षण आनंद सोहळा असतो. परंतु जे ठेके तितकेसे प्रचलित नाहीत, पण जे नाट्यसंगीतात अनेक ठिकाणी वापरले गेले आहेत ते ठेके ऐकावेत तर केवळ थोरात यांच्याकडूनच. गंधर्व ठेका, पंजाबी, झम्पा, हे ठेके इतक्या सफाईनी वाजवणारे तबलजी आजच्या पिढीमध्ये मिळणे फारच मुश्कील आहे, हे सत्य आहे.. साधा केहरवा, धुमाळी असो, थोरातांकडून तो ऐकताना त्यामध्ये खास "थोरात छाप" ऐकायला मिळते.
असा हा तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार , आजही जमिनीवर घट्ट पाय रोवून निगर्वी , सात्विक पणे उभा आहे. यासारखा आदर्श आमच्या पिढीपुढे दुसरा कुठला असणार?
पुणे महानगरपालिकेनी आज या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना किती आनंद झालाय ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.
या निमित्तानी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहोत अशी दत्त महाराजांच्या चरणाशी विनम्र प्रार्थना करतो..
-अतुल रविंद्र खांडेकर, पुणे
मराठी संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सर्व गायक अभिनेता आणि अभिनेत्रींसाठी, मराठी संगीत नाटकाच्या आणि नाट्यसंगीताच्या रसिक प्रेक्षकांसाठी आज एक अतिशय आनंददायक घटना घडली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्वांच्या जन्मदिनी देण्यात येणाऱ्या "बालगंधर्व पुरस्कार " साठी ज्येष्ठ, श्रेष्ठ

श्रेष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांची एकमताने निवड झाली आहे... येत्या २६ जून २०१२ रोजी, म्हणजेच बालगंधर्वांच्या १२४ व्या जन्मदिनी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे..
सुमारे ५० हून अधिक वर्षे विनायकरावांनी तन-मन-धन विसरून नाट्यसंगीत आणि संगीत नाटकाच्या साथीला वाहून घेतले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरराज छोटा गंधर्व यांना केलेली साथ असो, किंवा कित्येक वर्षे शिलेदारांच्या मराठी रंगभूमीच्या सर्वच संगीत नाटकांना केलेली साथ असो, अनेक थोर गवैय्यांना मैफिलीमध्ये केलेली साथ असो, थोरातांच्या साथीची खरोखर तुलनाच होऊ शकत नाही..
आजच्या पिढीतल्या ज्या तबलजींना संगीत नाटकांची, नाट्यसंगीताची साथ करायची आहे, त्यांनी केवळ आणि केवळ थोरातांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असा हा थोर कलाकार..
सर्वच गायक कलाकारांनी एक गोष्ट सतत ध्यानात ठेवावी की आपलं गाणं रंगणं, खुलणं हे साथीदारांवर अवलंबून असतं.. साथीदारांशिवाय गाण्याला रंगत येत नाही.. म्हणून ५०% गाणं हे साथीदारांच्या संगतीवर अवलंबून असतं.
विनायकरावांची साथ ही कायमच गाण्याला पूरक अशीच राहिली. त्यांनी कधीही गाण्यावर कुरघोडी केली नाही.. गाणं कसं बहरेल याचाच विचार त्यांनी कायम केला. कितीही बुजुर्ग गायक असोत किंवा अगदी माझ्यासारखे छोटे गायक असोत की ज्यांचं संगीत क्षेत्रात आत्ताशी कुठे पाऊल पडतंय, सगळ्यांबरोबर ते तितक्याच तन्मयतेनी साथ करतात..
कधीही मेहनत करायची सोडू नये आणि कधीही कुणा कलाकाराची टिंगल करून उणी दुणी काढू नयेत ही त्यांची आमच्या पिढीला दिलेली शिकवण.
हा माणूस किती मितभाषी आणि मृदुभाषी आहे , हे त्यांच्या सहवासात आलेले सर्व कलाकार जाणतातच. रिकाम्या, फावल्या वेळेत ते केवळ चिंतन आणि चिंतनच करतात.
त्यांच्या ठेक्यातला डौल, आंस ही केवळ शिक्षणामुळे आलेली नाही, तर त्यांनी आपल्या कलेवर जे प्रेम केलं आणि संपूर्ण आयुष्य तबलावादनात झोकून दिलं, त्याचा हा परिणाम आहे. तीनताल, एकताल, रूपक, झपताल हे नेहमीचे प्रचलित ठेके सुद्धा त्यांच्याकडून ऐकणे हा एक विलक्षण आनंद सोहळा असतो. परंतु जे ठेके तितकेसे प्रचलित नाहीत, पण जे नाट्यसंगीतात अनेक ठिकाणी वापरले गेले आहेत ते ठेके ऐकावेत तर केवळ थोरात यांच्याकडूनच. गंधर्व ठेका, पंजाबी, झम्पा, हे ठेके इतक्या सफाईनी वाजवणारे तबलजी आजच्या पिढीमध्ये मिळणे फारच मुश्कील आहे, हे सत्य आहे.. साधा केहरवा, धुमाळी असो, थोरातांकडून तो ऐकताना त्यामध्ये खास "थोरात छाप" ऐकायला मिळते.
असा हा तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार , आजही जमिनीवर घट्ट पाय रोवून निगर्वी , सात्विक पणे उभा आहे. यासारखा आदर्श आमच्या पिढीपुढे दुसरा कुठला असणार?
पुणे महानगरपालिकेनी आज या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना किती आनंद झालाय ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.
या निमित्तानी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहोत अशी दत्त महाराजांच्या चरणाशी विनम्र प्रार्थना करतो..
-अतुल रविंद्र खांडेकर, पुणे
Tuesday, May 15, 2012
`मुक्ताई ` पाहण्यासाठी भरत नाट्य हाऊसफुल्ल
बारा वर्षांपूर्वी परकर पोलक्यात सादर केलेला मुक्ताविष्कार आज नऊवारी साडीत करणा-या प्रचिती प्रशांत सुरु यांचा मुक्ताई चा दोनशेवा प्रयोग पहाण्यासाठी भरत नाट्य मंदिराच्या खूर्च्या कमी पडल्या. कांही महिने बंद असलेल्या भरतनी नव्याने सुरु केलेली वातानुकूलित यंत्रणा कोलमडून पडली. जिथ जागा मिळेल तिथे लोक बसून प्रयोग पहात होते. अनेक विध मंडळी संस्थेकडे आणि आयोजकांकडे त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत होते. एकजण तर आपली पत्नी आत आहे मात्र आपल्याला जागा नाही म्हणून प्रयोग कधी सुटणार याची प्रतिक्षा करीत ऊभे होते... यातून एक झाले...भरत नाट्य संशोधन मंदिराने आपल्या सास्कृंतिक कार्यक्रमांच्या योजनेत ६ जून ला `मुक्ताई`ला लाभलेल्या गर्दीचा प्रतिसाद पाहून २०१ वा प्रयोग घोषीत केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशिके शिवाय प्रवेश नाही हे ही संस्थेने ठरवून टाकले आहे.
योग साधून आळंदी देवस्थानचे प्रमुख ट्रस्टीपद भूषवित असलेले डॉ. प्रशान्त अनंत सुरू यांनी या कौतुक प्रयोगाच्या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि स्वामी माधवानंद यांना रंगमंचावर उपस्थितीत केले होते. आरोग्याची तपासणी करणारी प्रचिती आता डॉक्टर झाली आहे..पण या निमित्ताने ती `मुक्ताई`मधून समाजमनाची डॉक्टर बनू पहाते आहे असे या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रतिसादावरुन दिसून येते..राजदत्त बोलताना `भारुडांनी समाजाला ज्ञान देण्याचा जसा प्रयत्न एकनाथांनी केला, त्याचाच वारसा `मुक्ताई`च्या निमित्ताने प्रचिती चालविते आहे याबद्दल कौतूक आणि समाधान व्यक्त केले.
आमच्यात १०० दोष आहेत याची यादीही तयार केली आहे..पण गुणांच्या बाजूला ५ पांडवही आहेत. हे विसरून चालणार नाही..मंगंश तेंडूलकर मुक्ताईच्या डी,व्ही.डी चे प्रकाश करताना आपल्या शैलीत बोलत होते.`आळंदीतल्या त्या इतर भावंडाबरोबरच मुक्ताईचे स्थानही तेवढेच श्रेष्ठ आहे..ते आज सांगण्याची गरज आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने ते काम प्रचिती सुरु करीत आहेत..याचा अधिक आनंद आज वाटत आहे आजच्या काळात हजार वर्षापूर्वी संतांनी निर्मीण केलेला हा भावनीक ठेवा..त्याला मोल नाही....ती ज्ञानाची..संस्काराची महती आजही ओरडून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे..`
आपल्या बरोबर गेली ४० वर्षे अनेक कलाकार काम करीत आहेत पण प्रचितीसारखी लाघवी आणि मनमिळावू कलाकार आपण दुसरी पाहिली नसल्याचे या प्रयोगाच्या निमित्ताने खास मुंबईहून हजर राहिलेले अभिनेते अविनाश खर्शीकर सांगतात.
साम संगीत सभेच्या वतीने हा मुक्ताई या मुक्तआविष्काराचा २०० प्रयोग सादर झाला..त्यानिमित्ताने साम संगीत सभेच्या मेघना वैद्य यांनी उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करतात. विद्या, कला आणि ज्ञान देणे हा याचा उद्देस असल्याचे त्या सांगतात.

आपल्याला आशीर्वाद देणारे असंख्य रसिक, मान्यवर उपस्थित पाहताना डॉ. प्रचितीच्या चेह-यावर विलक्षण समाधान होते. वयाची १२ वर्षाची मुलगी आज २४ वर्षाची झाली आहे. तेव्हा. नाटक करायला मिळतोय याचा आनंद होता. आता यातून आपण खूप काही शिकलो आहोत..अशीच प्रचिती सतत येवो असा आशीर्वाद तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांकडे मागितला.
पद्मभीम नाट्यसंघाची ही निर्मिती मुक्ताई आता तेवढ्यात तयारीने हा प्रयोग सादर करत होती. आता पुढे वाटचाल सुरु आहे.
वैद्यकीय व्यवसायातून माणसांचे मोहोळ निर्माण करणारे डॉ. प्रशात्न आणि डॉ. प्रफुल्लता सुरु यांची चाहती मंडळी इथे मोठ्या दाटीने एकत्रित होऊन मुक्ताईच्या महतीचा आविष्कार ऐकत होती. याचे लेखन केले ते डॉ,प्रफुल्लता सुरु यांनी आणि दिग्दर्शनाची संकल्पना राबविली ती डॉ. प्रशांत सुरु यांनी.. कौतूक समारंभाचे संचलन करणारे डॉ. प्रशांत सुरु यांनी वेळेत आणि मनापासून पहिला भाग आटोपता घेतल्यावर आजचा २०० वा प्रयोग पाहण्यात प्रेक्षक गर्क झाला होता.
अधुनिकतेकडे झुकणारा आजचा वाचक आणि रसिकवर्ग सारे सोडून या प्रयोगासाठी भरतकडे मुक्ताई पाहण्यासाठी असंख्य संख्येने हजर रहातो..हे काळाने पुढे खेचत आणलेला आजचा वर्ग काही प्रमाणात का होईना मूळ संस्कृती-संकल्पनेकडे आजही आकर्षीत होत आहे हे मंगळवारच्या (१५ मे, २०१२) वातावरणातून जाणवत होते.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
योग साधून आळंदी देवस्थानचे प्रमुख ट्रस्टीपद भूषवित असलेले डॉ. प्रशान्त अनंत सुरू यांनी या कौतुक प्रयोगाच्या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि स्वामी माधवानंद यांना रंगमंचावर उपस्थितीत केले होते. आरोग्याची तपासणी करणारी प्रचिती आता डॉक्टर झाली आहे..पण या निमित्ताने ती `मुक्ताई`मधून समाजमनाची डॉक्टर बनू पहाते आहे असे या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रतिसादावरुन दिसून येते..राजदत्त बोलताना `भारुडांनी समाजाला ज्ञान देण्याचा जसा प्रयत्न एकनाथांनी केला, त्याचाच वारसा `मुक्ताई`च्या निमित्ताने प्रचिती चालविते आहे याबद्दल कौतूक आणि समाधान व्यक्त केले.
आमच्यात १०० दोष आहेत याची यादीही तयार केली आहे..पण गुणांच्या बाजूला ५ पांडवही आहेत. हे विसरून चालणार नाही..मंगंश तेंडूलकर मुक्ताईच्या डी,व्ही.डी चे प्रकाश करताना आपल्या शैलीत बोलत होते.`आळंदीतल्या त्या इतर भावंडाबरोबरच मुक्ताईचे स्थानही तेवढेच श्रेष्ठ आहे..ते आज सांगण्याची गरज आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने ते काम प्रचिती सुरु करीत आहेत..याचा अधिक आनंद आज वाटत आहे आजच्या काळात हजार वर्षापूर्वी संतांनी निर्मीण केलेला हा भावनीक ठेवा..त्याला मोल नाही....ती ज्ञानाची..संस्काराची महती आजही ओरडून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे..`
आपल्या बरोबर गेली ४० वर्षे अनेक कलाकार काम करीत आहेत पण प्रचितीसारखी लाघवी आणि मनमिळावू कलाकार आपण दुसरी पाहिली नसल्याचे या प्रयोगाच्या निमित्ताने खास मुंबईहून हजर राहिलेले अभिनेते अविनाश खर्शीकर सांगतात.
साम संगीत सभेच्या वतीने हा मुक्ताई या मुक्तआविष्काराचा २०० प्रयोग सादर झाला..त्यानिमित्ताने साम संगीत सभेच्या मेघना वैद्य यांनी उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करतात. विद्या, कला आणि ज्ञान देणे हा याचा उद्देस असल्याचे त्या सांगतात.
आपल्याला आशीर्वाद देणारे असंख्य रसिक, मान्यवर उपस्थित पाहताना डॉ. प्रचितीच्या चेह-यावर विलक्षण समाधान होते. वयाची १२ वर्षाची मुलगी आज २४ वर्षाची झाली आहे. तेव्हा. नाटक करायला मिळतोय याचा आनंद होता. आता यातून आपण खूप काही शिकलो आहोत..अशीच प्रचिती सतत येवो असा आशीर्वाद तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांकडे मागितला.
पद्मभीम नाट्यसंघाची ही निर्मिती मुक्ताई आता तेवढ्यात तयारीने हा प्रयोग सादर करत होती. आता पुढे वाटचाल सुरु आहे.
वैद्यकीय व्यवसायातून माणसांचे मोहोळ निर्माण करणारे डॉ. प्रशात्न आणि डॉ. प्रफुल्लता सुरु यांची चाहती मंडळी इथे मोठ्या दाटीने एकत्रित होऊन मुक्ताईच्या महतीचा आविष्कार ऐकत होती. याचे लेखन केले ते डॉ,प्रफुल्लता सुरु यांनी आणि दिग्दर्शनाची संकल्पना राबविली ती डॉ. प्रशांत सुरु यांनी.. कौतूक समारंभाचे संचलन करणारे डॉ. प्रशांत सुरु यांनी वेळेत आणि मनापासून पहिला भाग आटोपता घेतल्यावर आजचा २०० वा प्रयोग पाहण्यात प्रेक्षक गर्क झाला होता.
अधुनिकतेकडे झुकणारा आजचा वाचक आणि रसिकवर्ग सारे सोडून या प्रयोगासाठी भरतकडे मुक्ताई पाहण्यासाठी असंख्य संख्येने हजर रहातो..हे काळाने पुढे खेचत आणलेला आजचा वर्ग काही प्रमाणात का होईना मूळ संस्कृती-संकल्पनेकडे आजही आकर्षीत होत आहे हे मंगळवारच्या (१५ मे, २०१२) वातावरणातून जाणवत होते.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Friday, May 11, 2012
`आरोग्य संगीत` शनिवारी पुण्यात
संगीताचा शरीरावर आणि मनावर होणार परिणाम सांगणारा अनोखा कार्यक्रम
पुणे- भारतीय संगीताद्वारे शरीरावर व मनावर कसे परिणाम होतात. कोणता स्वर आपल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम करतो .भारतीय शास्त्रीय संगीतातील राग व वेगवेगळे मानवी आजार यांचा परस्परांशी कसा संबंध आहे. कोणत्या रागामुळे कोणता रोग बरा होण्यास मदत होते. संगीतामुळे मेदूवर चांगला परिणाम कसा होतो.. संगीताचा मानवी मनावर होणार परिणाम अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेणारा कार्यक्रम म्हणजे `आरोग्य संगीत`.`
सारे काही संगीताच्या ,गाण्याच्या आणि वाद्यवृदांद्वारे सांगणारा हा अनोखा कार्यक्रम. कोणत्या रोगावर कोणत्या रागातील कोणते गाणे ऐकायला पाहिजे हे सारे प्रत्यक्ष दाखवून देणारा हा कर्यक्रम आहे. गाण्यांबरोबरच बासरी व व्हयोलीन या वाद्यांवरील काही गाणी, धून, फ्यूजन आणि जुगलबंदाही यात सादर होणार आहे.
कोल्हापूरच्या `फायटो फार्मा आर्ट सर्कल` आयोजित आणि `संस्कार जीवनगाणे` प्रस्तुत `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. दिनेश गुणे यांची आहे. निवेदनाची बाजू श्री. मंगेश वाघमारे व सौ. केतकी कौजलगी यांनी सांभाळली आहे.. पुण्यात सांस्कृतिक पुणेच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम शनिवार १९ मे २०१२ला संध्याकाळी सहा वाजता पत्रकार संघाच्या सभागृहात सादर होईल.
यात मी मराठी आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा उपविजेता प्रल्हाद जाधव आणि सारेगम फेम वृंदा कुबेर यांचा प्रमुख गायक म्हणून सहभाग असून सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलीन), स्वप्नील साळोखे( ढोलक आणि ढोलकी) तर शिवाजी सुतार (की बोर्ड) सचिन पन्हाळकर( तालवाद्ये) या वादक कलावंताचा सहभाग असणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना खुला आहे.
पुणे- भारतीय संगीताद्वारे शरीरावर व मनावर कसे परिणाम होतात. कोणता स्वर आपल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम करतो .भारतीय शास्त्रीय संगीतातील राग व वेगवेगळे मानवी आजार यांचा परस्परांशी कसा संबंध आहे. कोणत्या रागामुळे कोणता रोग बरा होण्यास मदत होते. संगीतामुळे मेदूवर चांगला परिणाम कसा होतो.. संगीताचा मानवी मनावर होणार परिणाम अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेणारा कार्यक्रम म्हणजे `आरोग्य संगीत`.`
सारे काही संगीताच्या ,गाण्याच्या आणि वाद्यवृदांद्वारे सांगणारा हा अनोखा कार्यक्रम. कोणत्या रोगावर कोणत्या रागातील कोणते गाणे ऐकायला पाहिजे हे सारे प्रत्यक्ष दाखवून देणारा हा कर्यक्रम आहे. गाण्यांबरोबरच बासरी व व्हयोलीन या वाद्यांवरील काही गाणी, धून, फ्यूजन आणि जुगलबंदाही यात सादर होणार आहे.
कोल्हापूरच्या `फायटो फार्मा आर्ट सर्कल` आयोजित आणि `संस्कार जीवनगाणे` प्रस्तुत `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. दिनेश गुणे यांची आहे. निवेदनाची बाजू श्री. मंगेश वाघमारे व सौ. केतकी कौजलगी यांनी सांभाळली आहे.. पुण्यात सांस्कृतिक पुणेच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम शनिवार १९ मे २०१२ला संध्याकाळी सहा वाजता पत्रकार संघाच्या सभागृहात सादर होईल.
यात मी मराठी आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा उपविजेता प्रल्हाद जाधव आणि सारेगम फेम वृंदा कुबेर यांचा प्रमुख गायक म्हणून सहभाग असून सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलीन), स्वप्नील साळोखे( ढोलक आणि ढोलकी) तर शिवाजी सुतार (की बोर्ड) सचिन पन्हाळकर( तालवाद्ये) या वादक कलावंताचा सहभाग असणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना खुला आहे.
Sunday, May 6, 2012
गप्पांची सुरेल सांगता आनंद भाटेच्या भैरवीतून
रविवारची संध्याकाळ डिएसके गप्पांनी रंगत गेली ती एक संगीतकार आणि एक गायक अशा दोन कलाकालाच्या आविष्कारानी. योगायोग म्हणजे आजच बालगंधर्व चित्रपट प्रकाशित होऊन वर्ष झाले आणि दुसरे म्हणडे बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्य़ानंतर आनंद भाटेचा पहिला जाहिर कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले.
गप्पांची आजची सुरवात झाली ती शाकुंतल नाटकातल्या पंचतुंड नर रुंडमालधर या बालगंधर्व चित्रपटातल्या नांदीने अर्थातच ती सादर केली आनंद भाटे आणि गप्पांचा समारोपही झाला तोही बालगंधर्व चित्रपटातल्या भैरवीने. चिन्मया सकल ह्दयानी....
सुरेल कार्यक्रमात नव्या दिशेने रचनांकडे किंवा कवितेकडे पहाणारा एक तरुण संगीतकार कौशल इनामदार यांच्या मनमोकळ्या उत्तरानी. त्यांच्या दृष्टीने मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतोय..आणि मी स्वतःची अशी वाट निवडली आहे.. मला माझ्या गुणदोषांसह स्विकारा.. आज आपण जुन्यातले जे उत्तम ते आज लोक विसरत चाललेत...आणि संगीतात स्वतःची वेगळी वाट निवडली आहे... जुन्या संगीताकडेही नव्याने पाहण्याची माझी सवय आहे..म्हणूनच मी पुलंच्या भिल्लण या सांगितिक कार्यक्रमाला नवा टच दिला. आचार्य़ अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाकडे वेगळ्या नजरेने पाहिले..आणि बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्यांकडेही स्वतःचा पारंपारिक तरीही जुने जपण्याचा प्रयत्न केला आहे..
कौशल इनामदारच्या मते आनंद भाटेला गळा आहे..आणि आपल्याला नरडं आहे. आपण गायक नाही...फक्त कसे पाहिजे ते दाखविणारा संगीतकार मात्र आहे..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचा संगीतकार म्हणून झालेला प्रवासही त्यांनी ऐकवला...रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिलीच आणि त्याने गायलेल्या गाण्यांनाही तेवढीच पसंतीचा पावती दिली.
गप्पांचा हा फड हलता आणि सुरेल संवादातून जिंकला तो आनंद गंधर्व आनंद भाटे यांने. एम टेक होऊन झेन्सर मध्ये चाकरी करुन तेवढ्याच ताकदीने शास्त्रीय. संगीताचा रियाज करणारा हा तरुण गायक नट अधिक लोकप्रिय ठरला तो बालगंधर्व चित्रपटातल्या नाट्यपदांमुळे...भारतरत्न पं., भिमसोन जोशी यांचेकडे २० वर्षे शिकून शास्त्रीय संगीताचा पाय भक्कम केला आणि त्यांचे ऋण आनंदाने मिरव तोही आता तेवढाच संतवाणी गाण्यात तयार असल्याचे त्याने कान्होबा तुझी घोंगडा चांगली यातून सिध्द करुन दिले. रागसंगीताबरोबरच भीमसेन जोशी यांचेकडे मैफलीत कसे गावे ते शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.
संगीताची ही मेजवानी खुलविण्यात ज्या साथीदार कलावंताचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा व आवश्यक आहे. हार्मोनियमची साथ करत होते बालगंधर्व चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार असलेले आणि कौशल इनामदारांचे महाविद्यालयापासूनचे मित्र असलेले आदित्य ओक. तबला संगत केली ती पुण्याचे अनुभवी तबलावादक संजय करंदीकर यांनी ...तर माऊली टाकळकर.ज्यांच्या टाळाशिवाय संतवाणी होणार नाही,असे ज्येष्ठ बुजुर्ग कलावंत.
गप्पाची मैफल गतीमान केली ती राजेश दामले यांच्या सूत्रातून आणि प्रश्नातून..विविध ट्प्पायंवरचा प्रवास दोन कलावंताकडून त्यांनी उलगडून दाखविला.. त्यात रसिकाची उत्सुकता होती आणि संवादची साखळी होती.
डीएसके फाउंडेशनचे ट्रस्टी श्याम भुर्के यांनी गप्पांची आघाडीची बाजू सांभाळत याचा उद्देश स्पष्ट केला. मॅजेजिस्टि गप्पा बंद झाल्या आणि साहित्यिक गप्पांची उणीव जाणवली. चार दिवस का होईंना..कला, साहित्यिक आणि संगीत आणि राजकारणाचा फड डीएस के गप्पात रंगू लागला..त्याला आता १५ वर्षे झाली...
आज त्याची सांगता आनंद भाटेच्या भैरवीनी झाली आणि
पुढच्या वर्षीच्या गप्पांसाठी वाट पहाताना नव्याचे वेध होते..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
गप्पांची आजची सुरवात झाली ती शाकुंतल नाटकातल्या पंचतुंड नर रुंडमालधर या बालगंधर्व चित्रपटातल्या नांदीने अर्थातच ती सादर केली आनंद भाटे आणि गप्पांचा समारोपही झाला तोही बालगंधर्व चित्रपटातल्या भैरवीने. चिन्मया सकल ह्दयानी....
सुरेल कार्यक्रमात नव्या दिशेने रचनांकडे किंवा कवितेकडे पहाणारा एक तरुण संगीतकार कौशल इनामदार यांच्या मनमोकळ्या उत्तरानी. त्यांच्या दृष्टीने मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतोय..आणि मी स्वतःची अशी वाट निवडली आहे.. मला माझ्या गुणदोषांसह स्विकारा.. आज आपण जुन्यातले जे उत्तम ते आज लोक विसरत चाललेत...आणि संगीतात स्वतःची वेगळी वाट निवडली आहे... जुन्या संगीताकडेही नव्याने पाहण्याची माझी सवय आहे..म्हणूनच मी पुलंच्या भिल्लण या सांगितिक कार्यक्रमाला नवा टच दिला. आचार्य़ अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाकडे वेगळ्या नजरेने पाहिले..आणि बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्यांकडेही स्वतःचा पारंपारिक तरीही जुने जपण्याचा प्रयत्न केला आहे..
कौशल इनामदारच्या मते आनंद भाटेला गळा आहे..आणि आपल्याला नरडं आहे. आपण गायक नाही...फक्त कसे पाहिजे ते दाखविणारा संगीतकार मात्र आहे..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचा संगीतकार म्हणून झालेला प्रवासही त्यांनी ऐकवला...रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिलीच आणि त्याने गायलेल्या गाण्यांनाही तेवढीच पसंतीचा पावती दिली.
गप्पांचा हा फड हलता आणि सुरेल संवादातून जिंकला तो आनंद गंधर्व आनंद भाटे यांने. एम टेक होऊन झेन्सर मध्ये चाकरी करुन तेवढ्याच ताकदीने शास्त्रीय. संगीताचा रियाज करणारा हा तरुण गायक नट अधिक लोकप्रिय ठरला तो बालगंधर्व चित्रपटातल्या नाट्यपदांमुळे...भारतरत्न पं., भिमसोन जोशी यांचेकडे २० वर्षे शिकून शास्त्रीय संगीताचा पाय भक्कम केला आणि त्यांचे ऋण आनंदाने मिरव तोही आता तेवढाच संतवाणी गाण्यात तयार असल्याचे त्याने कान्होबा तुझी घोंगडा चांगली यातून सिध्द करुन दिले. रागसंगीताबरोबरच भीमसेन जोशी यांचेकडे मैफलीत कसे गावे ते शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.
संगीताची ही मेजवानी खुलविण्यात ज्या साथीदार कलावंताचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा व आवश्यक आहे. हार्मोनियमची साथ करत होते बालगंधर्व चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार असलेले आणि कौशल इनामदारांचे महाविद्यालयापासूनचे मित्र असलेले आदित्य ओक. तबला संगत केली ती पुण्याचे अनुभवी तबलावादक संजय करंदीकर यांनी ...तर माऊली टाकळकर.ज्यांच्या टाळाशिवाय संतवाणी होणार नाही,असे ज्येष्ठ बुजुर्ग कलावंत.
गप्पाची मैफल गतीमान केली ती राजेश दामले यांच्या सूत्रातून आणि प्रश्नातून..विविध ट्प्पायंवरचा प्रवास दोन कलावंताकडून त्यांनी उलगडून दाखविला.. त्यात रसिकाची उत्सुकता होती आणि संवादची साखळी होती.
डीएसके फाउंडेशनचे ट्रस्टी श्याम भुर्के यांनी गप्पांची आघाडीची बाजू सांभाळत याचा उद्देश स्पष्ट केला. मॅजेजिस्टि गप्पा बंद झाल्या आणि साहित्यिक गप्पांची उणीव जाणवली. चार दिवस का होईंना..कला, साहित्यिक आणि संगीत आणि राजकारणाचा फड डीएस के गप्पात रंगू लागला..त्याला आता १५ वर्षे झाली...
आज त्याची सांगता आनंद भाटेच्या भैरवीनी झाली आणि
पुढच्या वर्षीच्या गप्पांसाठी वाट पहाताना नव्याचे वेध होते..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Subscribe to:
Posts (Atom)




