`एकांतील ओळी` केपटाऊनला संशेधनसाछी वास्तव्य असलेल्या मयुरेश कुलकर्णी यांच्या चारोळीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा घाट पुण्यात काल्हापूरच्या मुक्ता पब्लिकेशनच्या वतीने शक्रवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात घातला होता.
लग्नाच्या धामधुमीचे दिवस असल्यामुळे वाचक, रसिक मोजकेच होते. पण जे होते ते मयुरेशच्या शब्दांच्या प्रेमतच पडले....
साधी भाषा. थेट भिडणारी साधी बोली. जे सांगायचे ते मोजक्याच पण तकेवढ्याच तिडकीने सांगणा-या ओळी...अशा मस्त मजेशीर शब्दांची ओंजळ घेऊन तो सभागृहाच्या व्यासपीठावर एकटा लढत होता. प्रेक्षकही तेवढेच मश्गुल होऊन..प्रेम, वेदना, राग, हुरहुर, दुखः, एकाकीपण आणि आई-वडीलांविषयीच्या आदराच्या भावना ऐकत होते..आणि दादही देत होते.
आपण कविता करतो कारण सांगता तोच म्हणतो....
कविता माझी अवस्था
जे बोलता येत नाही
ते लिहितो मी
अशीच आहे व्यवस्था
असाच मैफलीतून एकोक चारोळी आणि कवितांची पामे उलगडत मयुरेश शब्दांवहोवर रसिकांच्या मनॉतले भावही टिपत होता जणू. पीएचडी करण्यासाठी वास्तव्य करणारा हा मयुरेश केपटावूनमध्ये बसून मराठी भाषेतल्या संवेदना तेवढ्याच उत्कटपणे चारोळींतून सागत होता...
ग्रंथासाठी लिहितो न मी
पुस्ककासाठी मी ना लिहितो
माझ्या मनातले मी
माझ्यासाठी लिहितो
कवितांचा खेळ पुस्तकरुपाने मुक्ता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलाय. यापूर्चाही `शोध मनाचा` हे पुस्तकही त्यांनीच त्याच्या रचनांवर भारावून जावून काढले होते. मुक्ताच्या वतीने संचालिका विजया पाटील .यांनी त्यांचे कौतूक करताना `मराठी भाषेवर तिथे राहून प्रेम करणारा मुलगा `म्हणून खास शब्दात ओळख करुन दिली. आम्ही काही पुस्तके व्यवसायाचा विचार न करता वेगळी पण तरुण, नवोदितांना संधी देण्यासाटी काढतो असेही त्या म्हणाल्या.
एकांतातल्या ओळीचे प्रकाशन मयुरेशच्या आजी श्रीमती विजया कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
एक भावपूर्ण पण मराठी भाषेवर प्रेम करणा-या उद्याच्या पिढीसाठी आणि पिढीच्या भावनांसाठी झाले ,
याचे वेगळेपण हेच सांगावे लागेल.
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
मयुरेश कपलकर्णीचा हा ब्लॊग पहा...
(http://mayureshkulkarni.wordpress.com)
subhash inamdar
subhash inamdar
Saturday, December 17, 2011
Friday, December 16, 2011
नानामय पुलोत्सव
पु. ल. देशपांडे, विजयाबाई मेहता, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या नावाने घटकेत हळवा होणारा... त्यांनी दिलेले भरभरून वेचणारा तरीही, आपण कितीसे घेऊ शकलो हा प्रश्न पडलेला... समाजाला आपण दिलेच पाहिजे, देतो म्हणजे उपकार करत नाही, हे ठामपणे ऐकवणारा आणि नाटक-चित्रपट करताना घडलेले किस्से सांगताना प्रेक्षकांना खळाळून हसविणारा... नानाची नाना रूपे... त्यातीलच काही रूपांना श्रोत्यांनी आज पुन्हा पाहिले आणि पुन्हा नानामय होण्यात धन्य मानले. निमित्त होते पु. ल. स्मृती सन्मानचे...
"
तरुणाई'चे उद्घाटन व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांना पु. ल. स्मृती सन्मान व आर. के. लक्ष्मण यांना विशेष पुरस्कार रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत गद्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानाचा एकपात्रीचा अनुभवच रसिकांनी घेतला. काव्यवाचनात आपल्या तरल मनाचे प्रतिबिंब उमटविणारा, पूर्वाश्रमीच्या देण्याने कृतार्थ असल्याची भावना व्यक्त करणारा आणि दुसऱ्याची टोपी उडविणारा खट्याळ अशा नाना रंगात रसिक रंगून गेले. आपल्या शिष्याला पुरस्कार देताना मेहता यांनीही गुरूच्या अधिकाराने पहिल्यांदा कान पिळले आणि नंतर प्रेमाने जवळही घेतले. पाटेकरही मग लहान झाले. पाया पडलेच होते; पण बाईंच्या उंचीपेक्षा लहान दिसावे म्हणून गुडघ्यात वाकून "बाल' झाले.
वडलांच्या नावाने पुरस्कार मिळाला, असे कृतार्थतेने सांगत पाटेकर म्हणाले, ""पितृसमान असलेल्या पुलंच्या लेखनावर आमचा पिंड पोसला गेला. त्यांनी पुस्तकात जी माणसे लपविली, ती मला कधी एकटे पडू देत नाहीत. पुलंच लेखन कधीच एकपदरी वाटले नाही. विजयाबाई या चालतीबोलती शाळा आहेत. आम्ही नेमके कोण आहोत, हे माहीत नसताना आमच्याकडून त्यांनी काढून घेतले.''
नाटकाच्या तालमी, दौऱ्याचे किस्से केवळ ऐकवत नव्हे; तर उभे राहून रंगमंचावर साकारत त्यांनी रसिकांना जणू आपल्याबरोबर त्या काळात नेले. पुरुष नाटकावेळी बायका माझ्यावर खूप चिडायच्या असे सांगत, 5-6 वेळा रंगमंचावर आलेल्या चप्पल "पुरस्कार' म्हणून जपल्याचे मनमोकळेपणे सांगितले.
परकाया प्रवेश करतो तो चांगला अभिनेता, असे सांगत, नानाला हे जमले अशी शाबासकीही मेहता यांनी दिली.
http://www.esakal.com/eSakal/20111217/5158034451279370942.htm
"
तरुणाई'चे उद्घाटन व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांना पु. ल. स्मृती सन्मान व आर. के. लक्ष्मण यांना विशेष पुरस्कार रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत गद्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानाचा एकपात्रीचा अनुभवच रसिकांनी घेतला. काव्यवाचनात आपल्या तरल मनाचे प्रतिबिंब उमटविणारा, पूर्वाश्रमीच्या देण्याने कृतार्थ असल्याची भावना व्यक्त करणारा आणि दुसऱ्याची टोपी उडविणारा खट्याळ अशा नाना रंगात रसिक रंगून गेले. आपल्या शिष्याला पुरस्कार देताना मेहता यांनीही गुरूच्या अधिकाराने पहिल्यांदा कान पिळले आणि नंतर प्रेमाने जवळही घेतले. पाटेकरही मग लहान झाले. पाया पडलेच होते; पण बाईंच्या उंचीपेक्षा लहान दिसावे म्हणून गुडघ्यात वाकून "बाल' झाले.
वडलांच्या नावाने पुरस्कार मिळाला, असे कृतार्थतेने सांगत पाटेकर म्हणाले, ""पितृसमान असलेल्या पुलंच्या लेखनावर आमचा पिंड पोसला गेला. त्यांनी पुस्तकात जी माणसे लपविली, ती मला कधी एकटे पडू देत नाहीत. पुलंच लेखन कधीच एकपदरी वाटले नाही. विजयाबाई या चालतीबोलती शाळा आहेत. आम्ही नेमके कोण आहोत, हे माहीत नसताना आमच्याकडून त्यांनी काढून घेतले.''
नाटकाच्या तालमी, दौऱ्याचे किस्से केवळ ऐकवत नव्हे; तर उभे राहून रंगमंचावर साकारत त्यांनी रसिकांना जणू आपल्याबरोबर त्या काळात नेले. पुरुष नाटकावेळी बायका माझ्यावर खूप चिडायच्या असे सांगत, 5-6 वेळा रंगमंचावर आलेल्या चप्पल "पुरस्कार' म्हणून जपल्याचे मनमोकळेपणे सांगितले.
परकाया प्रवेश करतो तो चांगला अभिनेता, असे सांगत, नानाला हे जमले अशी शाबासकीही मेहता यांनी दिली.
http://www.esakal.com/eSakal/20111217/5158034451279370942.htm
Wednesday, December 14, 2011
माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला. कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.
ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
---------------------------------------------------------------------------------
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................
गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर,
मुंबई
ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
---------------------------------------------------------------------------------
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................
गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर,
मुंबई
माणूस आत्मकेंद्री होत चाललाय-मोनिका गजेंद्रगडकर
गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात नाही
गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..
आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले.
ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला.
कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.
यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.
डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`
आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
---------------------------------------------------------------------------------
माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................
गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई
गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..
आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले.
ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला.
कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.
यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.
डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`
आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
---------------------------------------------------------------------------------
माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................
गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई
Saturday, December 10, 2011
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव -२०११
सवाई गंधर्व संगीत महोत्सवातल्या २०११ कांही यूट्यूबवरच्या लिंक्स...यात शंकर महादेवन यांचे भजन
सवाई गंधर्व २०११ महोत्सवात सगळ्या त टॊपला होता तो शंकर महादेवन...त्याच्याच काही यूट्युब लिंक्स
यात पुण्याचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन...
अमजदअली खान यांना वेळ कमी मिळाला..पण त्यांनी कमाल केली...
भारतीय संगीताबद्दल विशेष आस्था असणाऱ्या पाश्चिमात्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचीही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महोत्सवात परदेशी पाहुण्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. संगीताच्या अभ्यासकापासून कानसेनांपर्यंत अनेक पाहुणे भारतीय संगीताने तृप्त होत आहेत.
फ्रान्सहून आलेल्या कॅपियन संगीतातील प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या, 'मी थोडेफार गाणे, पियानो शिकले आहे. पण व्यवसायाने किंवा रूढ अर्थाने मी कलाकार नाही. पण मला संगीत ऐकण्यास खूप आवडते. पुण्यात एका मित्राच्या लग्नासाठी आले होते. तेव्हा मला या महोत्सवाबद्दल कळले. महोत्सवाची महती ऐकून येथे येण्याचे ठरवले आणि या संगीताच्या प्रेमातच पडले. गायक सुरवातीला जी आलापी करतात, ती खूप शांत, सुखद असते. त्यामुळे ऐकणारा स्वत:च्या मनात डोकावू शकतो. किंबहुना मला भारतीय संगीताचे हेच वैशिष्ट्य वाटले. ते मनाच्या खोलवर पोचले. मला जमिनीवर बसायची सवय नाही; पण महोत्सवात संगीत ऐकताना माझे पाय दुखत आहेत किंवा अशाप्रकारे बसणे मला अवघड जात आहे, हे जाणवतही नाही आणि हीच मला भारतीय संगीताची ताकद वाटते. तुमचे दु:खही तुम्हाला विसरायला लावते.''
पुण्यात आल्यापासून इथले लोक खूप घाईत, धावपळीत असल्यासारखे वाटतात; पण महोत्सवात त्यांना इतक्या शांत चित्ताने बसलेले पाहून खूप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर इथे सर्व स्तरांतील रसिक एकत्र बसून गाणे ऐकतात. श्रीमंतासाठी वेगळी सोय, गरिबांसाठी वेगळी, असा प्रकार नाही हे पाहूनही खूप आनंद झाला, असेही कॅपियन यांनी नमूद केले.
मूळचे कॅनडाचे, पण आता सिंगापूर येथे राहणारे व पुणेकर तबलावादक नवाझ मिरजकर यांच्याकडून शिक्षण घेणारे ब्लेअर मिलर या कार्यक्रमांकडे अभ्यासक दृष्टीने पाहतात.
तबल्याचे शिक्षण नऊ वर्षे घेतल्यामुळे, तसेच दिल्लीत काही वर्षे राहिल्याने त्यांचे कान भारतीय संगीतासाठी तयार झाले आहेत. ते म्हणाले, ""इथला रसिक मला जास्त आवडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन भारतीय संगीत ऐकणे, हा अनुभव खूपच छान आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या अनेक ध्वनिफिती मी ऐकल्या आहेत. त्यांच्या आवाजात जबरदस्त ताकद होती. महोत्सवातील वाद्यसंगीत मला अधिक भावले.''
पुण्यात मिरजकर यांच्या घरी जाऊन आपले गुरू नवाझ मिरजकर यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅनडात भारतीय संगीत शिकणाऱ्या रॉबिन कॅरिगन या खास महोत्सवासाठी पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नीरजा आपटेकर या त्यांच्या कॅनडातील गुरू आहेत. कॅरिगन म्हणाल्या, ""मी गाण्याबरोबर पियानो, ऑर्किडियनही शिकते. या महोत्सवात मला अश्विनी भिडे देशपांडे, शैला दातार यांचे गाणे अधिक भावले. सॅक्सोफोनवर भारतीय संगीत ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. मी जॅझही शिकते. त्यामुळे हा प्रयोग मला अधिक भावला. कॅनडात विविध देशांतील संगीत क्षेत्रातील लोक राहतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते.''
http://www.esakal.com/esakal/20111211/5733657263938939740.htm
सवाई गंधर्व २०११ महोत्सवात सगळ्या त टॊपला होता तो शंकर महादेवन...त्याच्याच काही यूट्युब लिंक्स
यात पुण्याचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन...
अमजदअली खान यांना वेळ कमी मिळाला..पण त्यांनी कमाल केली...
भारतीय संगीताबद्दल विशेष आस्था असणाऱ्या पाश्चिमात्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचीही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महोत्सवात परदेशी पाहुण्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. संगीताच्या अभ्यासकापासून कानसेनांपर्यंत अनेक पाहुणे भारतीय संगीताने तृप्त होत आहेत.
फ्रान्सहून आलेल्या कॅपियन संगीतातील प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या, 'मी थोडेफार गाणे, पियानो शिकले आहे. पण व्यवसायाने किंवा रूढ अर्थाने मी कलाकार नाही. पण मला संगीत ऐकण्यास खूप आवडते. पुण्यात एका मित्राच्या लग्नासाठी आले होते. तेव्हा मला या महोत्सवाबद्दल कळले. महोत्सवाची महती ऐकून येथे येण्याचे ठरवले आणि या संगीताच्या प्रेमातच पडले. गायक सुरवातीला जी आलापी करतात, ती खूप शांत, सुखद असते. त्यामुळे ऐकणारा स्वत:च्या मनात डोकावू शकतो. किंबहुना मला भारतीय संगीताचे हेच वैशिष्ट्य वाटले. ते मनाच्या खोलवर पोचले. मला जमिनीवर बसायची सवय नाही; पण महोत्सवात संगीत ऐकताना माझे पाय दुखत आहेत किंवा अशाप्रकारे बसणे मला अवघड जात आहे, हे जाणवतही नाही आणि हीच मला भारतीय संगीताची ताकद वाटते. तुमचे दु:खही तुम्हाला विसरायला लावते.''
पुण्यात आल्यापासून इथले लोक खूप घाईत, धावपळीत असल्यासारखे वाटतात; पण महोत्सवात त्यांना इतक्या शांत चित्ताने बसलेले पाहून खूप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर इथे सर्व स्तरांतील रसिक एकत्र बसून गाणे ऐकतात. श्रीमंतासाठी वेगळी सोय, गरिबांसाठी वेगळी, असा प्रकार नाही हे पाहूनही खूप आनंद झाला, असेही कॅपियन यांनी नमूद केले.
मूळचे कॅनडाचे, पण आता सिंगापूर येथे राहणारे व पुणेकर तबलावादक नवाझ मिरजकर यांच्याकडून शिक्षण घेणारे ब्लेअर मिलर या कार्यक्रमांकडे अभ्यासक दृष्टीने पाहतात.
तबल्याचे शिक्षण नऊ वर्षे घेतल्यामुळे, तसेच दिल्लीत काही वर्षे राहिल्याने त्यांचे कान भारतीय संगीतासाठी तयार झाले आहेत. ते म्हणाले, ""इथला रसिक मला जास्त आवडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन भारतीय संगीत ऐकणे, हा अनुभव खूपच छान आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या अनेक ध्वनिफिती मी ऐकल्या आहेत. त्यांच्या आवाजात जबरदस्त ताकद होती. महोत्सवातील वाद्यसंगीत मला अधिक भावले.''
पुण्यात मिरजकर यांच्या घरी जाऊन आपले गुरू नवाझ मिरजकर यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅनडात भारतीय संगीत शिकणाऱ्या रॉबिन कॅरिगन या खास महोत्सवासाठी पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नीरजा आपटेकर या त्यांच्या कॅनडातील गुरू आहेत. कॅरिगन म्हणाल्या, ""मी गाण्याबरोबर पियानो, ऑर्किडियनही शिकते. या महोत्सवात मला अश्विनी भिडे देशपांडे, शैला दातार यांचे गाणे अधिक भावले. सॅक्सोफोनवर भारतीय संगीत ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. मी जॅझही शिकते. त्यामुळे हा प्रयोग मला अधिक भावला. कॅनडात विविध देशांतील संगीत क्षेत्रातील लोक राहतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते.''
http://www.esakal.com/esakal/20111211/5733657263938939740.htm
आनंदपंढरीचा विठ्ठल
भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.
आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.
आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.
`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.
गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच श्रीचरणी प्रार्थना...
साश्रुनयनांनी....
आपले पुणेकर रसिक.
शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464
Tuesday, November 22, 2011
सचिन करंबेळकर... काही आठवणी
सचिन करंबेळकर यांचे दुखःद निधन २, डिसेंबर २०१० ला झाले याला यंदा वर्ष पूर्ण होईल. त्यांची स्मृती जपली जावी यासाठी "अक्षय लावणी " चा विशेष कार्येक्रम २, डिसेंबर २०११ ला संध्या. ५.३० वाजता कलावंतांच्या वतीने पुण्यात भरत नाट्य मंदिरात आयोजित केलाआहे.
एक कलावंत आणि एक माणूस म्हणून त्यांच्या विषयीच्या माझ्या मनात येतात.
तो केवळ एक गायकच नव्ह्ता तर अनेक कला त्याच्या ठाई होत्या. एक उमदा परंतु
तेवढाच हळव्या मनाचा कलाकार होता. एखाद्या कलाकाराची कला फुलण्याचे खर तर त्याचे वय होते.
सचिनला जेंव्हा मी प्रथम बघितले ते मराठी रंगभूमीच्या "शाकुंतल" या नाटकाच्या तालमीच्या वेळेस तेंव्हा तो अगदी लहान म्हणजे फार तर ६-७ वर्षाचा असेल. "भरत" म्हणजे सर्वदमन ही भूमिका तो करायचा.आणि ती ही शेवटच्या अंकात.होती. संगीत नाटक असल्याने कितीही उशीर झाला तरी तो कंटाळायचा नाही.उलट न अडखळता, न भिता, खणखणीत पणे आपले संवाद चोख बोलायचा. गाणी मात्र आवडीने ऐकत बसायचा.
" संगीत शारदा" मधे शारदेच्या छोट्या भावाची जयंताची भूमिका तो अतिशय विनोदी पद्धतीने करायचा आणि भरपूर टाळ्या आणि हंशे मिळवायचा. टाळ्या मिळाल्या की खुशीने ओठातल्या ओठात हसणारा सचिन आजही डोळ्यासमोर येतो. तो एक उत्तम अभिनेता होता. बालकलाकार होता.
त्या नंतर ४-५ वर्षापूर्वी सचिन मला भेटला तो माझ्या "अक्षय लावणी" या लावणी गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तीस वर्षानंतर आणि आश्चर्य म्हणजे जुन्या आठवणी काढताना नाटकातल्या त्याच्या संवादा बरोबरच बरोबर त्या वेळचे आमचे संवादही त्यांनी इतक्या वर्षांनी चोख म्हणून दाखवले. त्यावेळेच्या तालमीच्या आणि बाहेरगावच्या कार्येक्रमाच्या अनेक गमतीजमती त्याला आजही आठवत होत्या.त्याच्या स्वभावामुळे ४-५ वर्षात तो माझा धाकटा भाऊ कधी झाला ते मला कळलेही नाही. त्याला स्टेज ची भीती कधीच नव्हती.त्याच्याकडे जबर आत्मविश्वास आणि दांडगी स्मरणशक्ती होती.
गातानाही स्टेजवर त्याला कधीही वही समोर ठेवण्याची गरज भासली नाही
बघता बघता कार्यक्रमाचे निवेदनही आयत्या वेळेस तो सहजपणे करे. पुण्यातील अनेक गुणी गायक-वादक कलाकारांना त्याने त्याच्या कार्येक्रमातून स्टेज मिळवून दिल्यामुळे त्यांची नावेही आज मोठी झाली आहेत. आणि ते कलाकारही हे मान्य करतात.
अनेकांना सदैव कुठल्याही मदतीला तत्पर असलेला सचिन सर्वांनाच आपलेसे करायचा.
प्रेमळ स्वभाव आणि मनाचा हळवेपणा असल्यामुळे कोणी तोडून बोलले किंवा विश्स्वासघात केला की मात्र सहन करणे त्याला अवघड जायचे अभिनया बरोबरच एक उत्तम गायक म्हणून तर दूरदर्शन आणि अनेक स्टेज शो केले. सूर-ताल, नक्षत्रांचे देणे, ग.दिमा गीते या मधून त्यांनी महाराष्ट्र भर नावलौकिक मिळवला.
सुधीर फडके यांच्या सारख्या जेष्ठ कलाकारांनीही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.अनेक जुनी जुनी अनवट गाणी शोधून काढून ती कार्येक्रमात घेऊन रसिकांची दाद मिळवायचा.
वाचनाच्या आवडीपोटी अनेक पुस्तके तो वाचत असे आणि त्यावर चर्चाही करत असे..शिवाय त्याने अनेक उच्च दर्जाच्या कविता लिहिल्या असे त्यांची बहिण वैशाली सांगते.
त्याच्या हातात तर विलक्षण जादू होती. अनेक प्रकारच्या पगड्या, टोप्या, जिरेटोप , फेटे तो बनवत असे. अनेक ऐतिहासिक नाटकांना, मालिकांना , चित्रपटांना त्या भूमिकेचा अभ्यास करून तो टोप, जिरेटोप बनवून देत असे.
खरोखरीच ! सचिन म्हणजे जमिनीवर पाय असलेला आणि अंगी अनेक गुण आणि कला असलेला एक हरहुन्नरी कलाकार होता.
सौ. धनश्री तुळपुळे (भोगले )
११०३ अ/४ शिवाजीनगर
पुणे -४११०१६
9881128386
एक कलावंत आणि एक माणूस म्हणून त्यांच्या विषयीच्या माझ्या मनात येतात.
तो केवळ एक गायकच नव्ह्ता तर अनेक कला त्याच्या ठाई होत्या. एक उमदा परंतु
तेवढाच हळव्या मनाचा कलाकार होता. एखाद्या कलाकाराची कला फुलण्याचे खर तर त्याचे वय होते.
सचिनला जेंव्हा मी प्रथम बघितले ते मराठी रंगभूमीच्या "शाकुंतल" या नाटकाच्या तालमीच्या वेळेस तेंव्हा तो अगदी लहान म्हणजे फार तर ६-७ वर्षाचा असेल. "भरत" म्हणजे सर्वदमन ही भूमिका तो करायचा.आणि ती ही शेवटच्या अंकात.होती. संगीत नाटक असल्याने कितीही उशीर झाला तरी तो कंटाळायचा नाही.उलट न अडखळता, न भिता, खणखणीत पणे आपले संवाद चोख बोलायचा. गाणी मात्र आवडीने ऐकत बसायचा.
" संगीत शारदा" मधे शारदेच्या छोट्या भावाची जयंताची भूमिका तो अतिशय विनोदी पद्धतीने करायचा आणि भरपूर टाळ्या आणि हंशे मिळवायचा. टाळ्या मिळाल्या की खुशीने ओठातल्या ओठात हसणारा सचिन आजही डोळ्यासमोर येतो. तो एक उत्तम अभिनेता होता. बालकलाकार होता.
त्या नंतर ४-५ वर्षापूर्वी सचिन मला भेटला तो माझ्या "अक्षय लावणी" या लावणी गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तीस वर्षानंतर आणि आश्चर्य म्हणजे जुन्या आठवणी काढताना नाटकातल्या त्याच्या संवादा बरोबरच बरोबर त्या वेळचे आमचे संवादही त्यांनी इतक्या वर्षांनी चोख म्हणून दाखवले. त्यावेळेच्या तालमीच्या आणि बाहेरगावच्या कार्येक्रमाच्या अनेक गमतीजमती त्याला आजही आठवत होत्या.त्याच्या स्वभावामुळे ४-५ वर्षात तो माझा धाकटा भाऊ कधी झाला ते मला कळलेही नाही. त्याला स्टेज ची भीती कधीच नव्हती.त्याच्याकडे जबर आत्मविश्वास आणि दांडगी स्मरणशक्ती होती.
गातानाही स्टेजवर त्याला कधीही वही समोर ठेवण्याची गरज भासली नाही
बघता बघता कार्यक्रमाचे निवेदनही आयत्या वेळेस तो सहजपणे करे. पुण्यातील अनेक गुणी गायक-वादक कलाकारांना त्याने त्याच्या कार्येक्रमातून स्टेज मिळवून दिल्यामुळे त्यांची नावेही आज मोठी झाली आहेत. आणि ते कलाकारही हे मान्य करतात.
अनेकांना सदैव कुठल्याही मदतीला तत्पर असलेला सचिन सर्वांनाच आपलेसे करायचा.
प्रेमळ स्वभाव आणि मनाचा हळवेपणा असल्यामुळे कोणी तोडून बोलले किंवा विश्स्वासघात केला की मात्र सहन करणे त्याला अवघड जायचे अभिनया बरोबरच एक उत्तम गायक म्हणून तर दूरदर्शन आणि अनेक स्टेज शो केले. सूर-ताल, नक्षत्रांचे देणे, ग.दिमा गीते या मधून त्यांनी महाराष्ट्र भर नावलौकिक मिळवला.
सुधीर फडके यांच्या सारख्या जेष्ठ कलाकारांनीही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.अनेक जुनी जुनी अनवट गाणी शोधून काढून ती कार्येक्रमात घेऊन रसिकांची दाद मिळवायचा.
वाचनाच्या आवडीपोटी अनेक पुस्तके तो वाचत असे आणि त्यावर चर्चाही करत असे..शिवाय त्याने अनेक उच्च दर्जाच्या कविता लिहिल्या असे त्यांची बहिण वैशाली सांगते.
त्याच्या हातात तर विलक्षण जादू होती. अनेक प्रकारच्या पगड्या, टोप्या, जिरेटोप , फेटे तो बनवत असे. अनेक ऐतिहासिक नाटकांना, मालिकांना , चित्रपटांना त्या भूमिकेचा अभ्यास करून तो टोप, जिरेटोप बनवून देत असे.
खरोखरीच ! सचिन म्हणजे जमिनीवर पाय असलेला आणि अंगी अनेक गुण आणि कला असलेला एक हरहुन्नरी कलाकार होता.
सौ. धनश्री तुळपुळे (भोगले )
११०३ अ/४ शिवाजीनगर
पुणे -४११०१६
9881128386
Subscribe to:
Posts (Atom)











