सोमवार सकाळी १० ची वेळ... अनंतचतुर्थी निमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरूच होती. मी टिळक रोडवरच्या स्पीकरच्या भिंतींनी हादरून गेलो. लांब उभे राहून नुसती नजर टाकली तर मिरवणुतील सजावटीच्या मखरात बसलेला श्री मंगलमूर्ती शांतपणे मांडी घालून ठामपण बसलाय.. माझ्या हाती काही नाही .कार्यकर्ते नेतील तसा मी पुढे सरकतो आहे,...असे सांगत.
अनेकांना ऑफिस गाठायची घाई. कुणाला दुकान सुरू करायची..तर कुणाला काही...पण या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचे काय....
प्रत्येक गणपती मंडळाच्या ट्रॅक्टरमागे विजपुरठा करणारे जनरेटर लावलेले होते. एका गाडीत डीजे गाण्य़ांची निवड करून ठोका असणारी गाणी निवडत होते. लय आणि तालात धुंद होऊन मंडळी नाचत होती. अंगविक्षेप करीत होती. अंगात बळ आल्यासारखे त्यांचे अंग तालावर जणू थिरकत होते..
सा-या वातावरणाचा ताबाच जणू या मंडळाच्या कर्णकर्कश ( योपेक्षा दुसरा शब्द सापजत नाही) आवाजाने घेतला होता. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते.... नंतर सुरु होतो पितृपंधवडा... तो अशुभ मानतात...पण त्याचे कोणाला काय....
आपल्याच मस्तीत नाचणारे इतके मश्गुल असतात की ठेका हेच त्यांचे लक्ष... आणि अंगाला हिसके देउन नाचणे हा त्यांचा धर्म.
गणपती बाप्पा मोरया... या निनादात बुध्दीचे हे आराध्य दैवत .. स्पिकरच्या भिंतीत अडकून गेले आहे. इथे नशा दिसते ती भक्तिची नाही तर आवाजाच्या नशेची.
खरं सांगतो..मी तर टिळक रोडवर चाललेल्या एका ट्र्रक्टरच्या मागे काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघीतली. ते सर्वजण अगदी त्यांचा डीजेही आस्वादात मग्न होता... ते काही मंडळी इतर कार्यकर्त्यांना आत बोलावित होता. आता ही खरी नशा चालू होती..
तसे पाहिले तर नाचणा-या तरूणांच्या डोळ्य़ात ती धुंदी कशाची आहे ते दिसत होते. त्यांचे पाय थिरकतच होते... अंग वळतच होते... हे सारे कुणासाठी... का ही संधी साधून हे सारे भक्त आपल्या दैवतासमोर हा आगळा खेळ करण्यातच धन्यता मानतात... (देवा गजानना पाहतो आहेस ना... हे काय चाललयं ते...)
पोलिसांचे एक पथक या मंडळींना पुढे येण्यासाठी सतत सांगत होते.. पण ते तात्पुरते ऐकत...पालिस पुढे गेले की लयीत..संथता आलीच.. एक पोलिस चौकात डीजेला स्पीकरचा आवाज कमी करायला सांगत होता. काही काळ लोटला की डीजे पुन्हा आवाजाची बटने वाढविताना दिसत होते...
हे सारे पाहिलेले तुम्हापर्यत पोचवावे वाटले. तुम्ही ते अनुभवलेलेही असेल..पण मला ते सांगावेसे वाटते... या माध्यमातून...
खरच...आपण सारे यातून काय मिळवितो.. समाधान..शांती..आराधना...
भक्ति की नुसतीच नशा..भक्तिची.....
सुभाष इनामदार, पुणे
( गणपती मिरवणुकीतील हे दृष्य...लक्ष्मी पथावरचे व संग्रहातले आहे.याचा या लेखाशी संबंध नाही)
subhash inamdar
subhash inamdar
Monday, September 12, 2011
Saturday, September 3, 2011
यांना शांततेचे महत्व कधी कळणार..
गायक आपले गाणे खुलवित होता. उपस्थित वर्ग त्याच्या त्या शास्त्रीय गाण्यात तल्लीन होऊन माना डोलावित होता. अस्वादकाचे विविध अनुभव घेत मीही मधुनच त्यांच्या चिजेच्या समेवर तालात सम पकडण्याचा प्रयत्न माझ्या देहबोलीतून करीत होतो. एकूणच एक गायक स्वरांची विविध आंदोलने विविध अंगाने नटवित होता. स्वरांचे आविष्कार किती पध्दतीने होऊ शकतात.. दाद देणारा जाणकार तारीफ करून वाहवाची पसंती अगदी खुल्या मनाने देत तल्लीन होऊन स्वरांचा आस्वाद घेत होता.
किती विलोभनिय गोष्ट. इथे शांतता भंग करणारा एक आणि त्याला तालाची आणि स्वरांची संगत करणारा पेटीवादक बस्स..एवढेच..बाकी सारा वर्ग ते सारे निशःब्दपणे साठवून ठेवीत....
भारतीय परंपरेचा हा थाट..भारतीय संस्कृतीतही आहे. मग गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक ठिकाणी....केवळ प्रकाशात शांतपणे विराजमान झालेली गणेशमूर्ती तुम्हालाही आकर्षित करते ना...
गोंगाटाच्या आणि स्पीकरच्या भिंतीतून ह्दय भेदून टाकणारा आवाज तुमच्या कानी ठसत जातो.. तेव्हा कुठेतरी असा मनोहारी आणि नयनमनोहर मंडळाच्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे तुम्ही कौतूक कराल ना...मला खात्री आहे..तुम्हालाही ते आवडते....
पण.... हा पण भारी खट्याळ...कधी मध्ये येईल काही सांगता येत नाही...
आज आपण सारेजण या गोंगाटाच्या अधिन झाले आहोत. नव्हे...तो सहन केल्याशिवाय पर्याय नाही... तोंड बाधून बुक्क्यांचा मारच जणू.
म्हणून अशा शांत..निवांत आणि तरीही प्रसन्न अशा गणपती मंडळांची माहिती करून द्यायला मला आवडेल.
आजच पुण्याच्या टिळक रस्त्य़ावरच्या सदाशिवपेठेचा भाग असलेल्या चिमणबाग गणेशोत्सव मंडळात डोकावले. इथली मूर्ती..शोभिवंत. प्रकाश..मूर्तीला उठाव आणेल एवढा.. मंडपात मूर्ती..एक कार्यकर्ता आणि तिचे सुंदर रूप..
कुठे स्पीकरवर गाणी नाहीत की, कुठलाही संदेश देणारी सजावट नाही. इथे आवाज येतो..आणि स्पीकर तोंड उघडतो तो फक्त आरतीच्यावेळी..
बाकी सारी प्रसन्न तरीही भारून राहिलेली शांतता. वर्गणी मागतानाही कुणी कितीही देवो..ती स्विकारली जाते. हुज्जत घातली जात नाही. सारा खर्च तेवढ्याच वर्गणीतून होतो...
तुम्हालाही असे मंडळ दिसले..तर मला मेल करा.. जमेल तर माहिती कळवा..शांततेतही सुख आणि मन रमते..फुलते आणि क्वचित नादावतेही...
सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
Wednesday, August 31, 2011
सीडीमुळे पारंपारिक गान प्रकारांना उजाळा
-पतंजली मादुस्कर
राग गायनाचे विविध प्रकारांची ओळख आज शास्त्रीय संगीताच्या परिक्षांपुरर्ती राहिली आहे. या सीडीच्या निमित्ताने राग गायनाच्या विविध शैलीदार परंपराचे दर्शन घडले आहे. हे लोप पावत चाललेले रागप्रकार कलाकार प्रत्यक्षपणे आपल्या गायनातून सादर करतील आशी अपेक्षा आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक पतंजली मादुस्कर यांनी केली.
यशकमल प्रस्तुत, स्वरगंगा निर्मित-डॉ. नीता भाभे यांच्या देती साद-स्वर नाद या सीडीचे प्रकाशन मादुस्कर यांच्या हस्ते शनिवारी ( २७ ऑगस्ट), गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विविध रागांची निर्मिती झाली. ते सादर करण्यासाठी विविध फॉर्म तयार झाले. त्यातलीच राग गायनाची ही पारंपारिक परंपरा आज काळाबरोबर नष्ट होत चालाली आहे. निता भाभे यांच्या या सीडीद्वारे पुन्हा एकदा त्याला नव्याने उजाळा मिळाला असल्याचा उल्लेख मादुस्करांनी आवर्जून केला.
याचवेळी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रेवा नातू यांना कै. नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ञ सुनिताबाई खाडिलकर यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी रेवा नातू यांच्या संगीत कारकीर्दीला भरघोस यश लाभावे अशी इच्छा प्रकट करताना खाडिलकरांनी अखंड संगीतात वाहून घेतलेल्या निता भाभे यांचे संगीतविषयक विचार आणि राग गानप्रकारांची माहिती असणारी सीडी निर्माण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि संगीत शिकणा-यांसाठी ती अत्यंत उपयुक्त असून यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात याचा उपयोग नक्कीच करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी नुकतेच ९७ वर्षात पदार्पण करणारे दाजीकाका गाडगीळ समारंभाला कलावंताना शाबासकी देण्यासाठी उपस्थित होते.
डॉ, नीता भाभेयांच्यासह त्यांच्या शिष्या संगीता कुलकर्णी, विनिता सुमंत, स्नेहल खानवेलकर यांनी अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग आणि चतरंगमधील भैरवीतून रागांच्या विविध अंगाचे ,त्यांच्या मधुरतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण रागप्रकारांच्या सादरीकरणात विनित तिकोनकर, अभिजित जायदे (तबला), अविनाश तिकोनकर( पखवाज) आणि संवादिनीची साथ जयंत साने यांनी केली.
सुभाष इनामदार, पुणे
मोबा. – ९५५२५९६२७६
E_mail- subhashinamdar@gmail.com
राग गायनाचे विविध प्रकारांची ओळख आज शास्त्रीय संगीताच्या परिक्षांपुरर्ती राहिली आहे. या सीडीच्या निमित्ताने राग गायनाच्या विविध शैलीदार परंपराचे दर्शन घडले आहे. हे लोप पावत चाललेले रागप्रकार कलाकार प्रत्यक्षपणे आपल्या गायनातून सादर करतील आशी अपेक्षा आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक पतंजली मादुस्कर यांनी केली.
यशकमल प्रस्तुत, स्वरगंगा निर्मित-डॉ. नीता भाभे यांच्या देती साद-स्वर नाद या सीडीचे प्रकाशन मादुस्कर यांच्या हस्ते शनिवारी ( २७ ऑगस्ट), गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विविध रागांची निर्मिती झाली. ते सादर करण्यासाठी विविध फॉर्म तयार झाले. त्यातलीच राग गायनाची ही पारंपारिक परंपरा आज काळाबरोबर नष्ट होत चालाली आहे. निता भाभे यांच्या या सीडीद्वारे पुन्हा एकदा त्याला नव्याने उजाळा मिळाला असल्याचा उल्लेख मादुस्करांनी आवर्जून केला.
याचवेळी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रेवा नातू यांना कै. नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ञ सुनिताबाई खाडिलकर यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी रेवा नातू यांच्या संगीत कारकीर्दीला भरघोस यश लाभावे अशी इच्छा प्रकट करताना खाडिलकरांनी अखंड संगीतात वाहून घेतलेल्या निता भाभे यांचे संगीतविषयक विचार आणि राग गानप्रकारांची माहिती असणारी सीडी निर्माण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि संगीत शिकणा-यांसाठी ती अत्यंत उपयुक्त असून यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात याचा उपयोग नक्कीच करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी नुकतेच ९७ वर्षात पदार्पण करणारे दाजीकाका गाडगीळ समारंभाला कलावंताना शाबासकी देण्यासाठी उपस्थित होते.
डॉ, नीता भाभेयांच्यासह त्यांच्या शिष्या संगीता कुलकर्णी, विनिता सुमंत, स्नेहल खानवेलकर यांनी अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग आणि चतरंगमधील भैरवीतून रागांच्या विविध अंगाचे ,त्यांच्या मधुरतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण रागप्रकारांच्या सादरीकरणात विनित तिकोनकर, अभिजित जायदे (तबला), अविनाश तिकोनकर( पखवाज) आणि संवादिनीची साथ जयंत साने यांनी केली.
सुभाष इनामदार, पुणे
मोबा. – ९५५२५९६२७६
E_mail- subhashinamdar@gmail.com
Monday, August 22, 2011
शब्द झाले मायबाप!
कवी वैभव जोशी यांच्या कविता-गीत-गझलांची "संपूच नये असं वाटणारी" मैफल आज टिळक स्मारक मंदिरात सादर झाली ती मायबोलीकर किरण सामंत, आनंद आणि कौतुक शिरोडकर यांच्या 'सृजन थिएटर्स' निर्मित "शब्द झाले मायबाप" या कार्यक्रमाच्या औचित्याने. मायबोली हे संकेतस्थळ(www.maayboli.com) मराठी साहित्याला वाहिलेल्या अनेक संकेतस्थळांपैकी सर्वात अग्रेसर. स्वत: वैभवने लिहायला सुरूवात केली ती याच संकेतस्थळावर. आपण काहीतरी दर्जेदार लिहू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्यानंतर वैभवचा कविता क्षेत्रातला प्रवास तिथून जो सुरू झाला तो आज "११ मराठी आल्बम्स, ३ आणि नवीन येणा-या ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिकां या सा-यांमधून गेल्या ३ वर्षांत जवळजवळ १५०हून अधिक गाणी" ही जणु काही एक अजून एका मोठ्या पल्ल्याची सुरूवातच आहे इथपर्यंत!
पडदा उघडल्यानंतर स्टेजवर फक्त वैभव आणि सुरूवात ह्या कवितेने "सूर झाला ईश्वर, शब्द झाले मायबाप" हे म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच असावी आणि सचिनने ओपनिंगलाच फटकेबाजी सुरू करावी! आजपर्यंत तरी अशा मैफली पाहिल्या आहेत की ज्या रंगात यायला किमान काही वेळ जावा लागतो. परंतु आज मात्र पहिल्या क्षणापासून ते औपचारिक शेवटापर्यंत ही मैफल रसिकांच्या हृदयात आरपार घुसली होती हे तिथे उपस्थित असलेला कुणीही नाकारू शकणार नाही. मिलींद कुलकर्णी यांच्या संयत आणि चपखल निवेदनालाही दाद दिलीच पाहिजे. कमलेश भडकमकर यांच्या संगीतयोजनेसोबत वैशाली सामंत, राहूल देशपांडे, अमृता नातू, रघुनंदन पणशीकर, मधुरा दातार, दत्तप्रसाद रानडे, जयदीप बागवडकर, जान्हवी अरोरा अशा ख्यातनाम गायकांनी मराठी आल्बम आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेल्या व होत असलेल्या वैभवच्या गाण्यांचे जोरदार सादरीकरण केले.मैफल अजून रंगात आली ती कवी सौमित्र आणि वैभव यांनी सादर केलेल्या वैभवच्या कविता आणि गझलांनी! सौमित्र वैभवची एक गझल सादर करताना थांबून 'व्वा' म्हणाला तेव्हा हे अधोरेखित झालं की आज तिथे जमलेले श्रोतेच नव्हे तर वैभवसकट इतर सारे कलाकार स्वत: एक "श्रोता" झाले होते! सादर करणारा जेव्हा श्रोता होतो, तेव्हा ती मैफल तिच्या अत्त्युच्य बिंदूवर असते. मी जितके काही कार्यक्रम पाहिले आहेत त्यात गायक येतात आणि गाऊन जातात. पण आज प्रत्येक गायकाला वैभवबद्दल काहीतरी जिव्हाळ्याचं बोलायचं होतं. त्याची गझल, गीत सादर करताना प्रत्येकाने प्राण ओतला होता हे सांगण्यात जर्राही अभिनिवेशीपणा नाही. एखाद्या चांगल्या गझलेत जसा प्रत्येक शेर ही एक अर्थपूर्ण कविता असते त्याप्रमाणेच आजच्या कार्यक्रमातला प्रत्येक परफॉर्मन्स ही एक स्वतंत्र आणि विलोभनीय अशी एक मैफिल होती आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे वैभव जोशी!
इतका नितांतसुंदर आणि दर्जेदार मराठी कार्यक्रम रसिकांना दिल्याबद्दल प्रायोजक श्री. रामचंद्र चिंचलीकर आणि एलिगंट केअरटेकर संस्था यांचे जितके कौतुक करावे, आभार मानावे तितके कमीच आहे.
टीप: सदर कार्यक्रमात सहभागी असलेले पण या लेखात नाव न येऊ शकलेले अजूनही काही दिग्गज कलाकार असतील तर ते केवळ लेखकाचे अज्ञान समजावे.
vinayak khambayat
पडदा उघडल्यानंतर स्टेजवर फक्त वैभव आणि सुरूवात ह्या कवितेने "सूर झाला ईश्वर, शब्द झाले मायबाप" हे म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच असावी आणि सचिनने ओपनिंगलाच फटकेबाजी सुरू करावी! आजपर्यंत तरी अशा मैफली पाहिल्या आहेत की ज्या रंगात यायला किमान काही वेळ जावा लागतो. परंतु आज मात्र पहिल्या क्षणापासून ते औपचारिक शेवटापर्यंत ही मैफल रसिकांच्या हृदयात आरपार घुसली होती हे तिथे उपस्थित असलेला कुणीही नाकारू शकणार नाही. मिलींद कुलकर्णी यांच्या संयत आणि चपखल निवेदनालाही दाद दिलीच पाहिजे. कमलेश भडकमकर यांच्या संगीतयोजनेसोबत वैशाली सामंत, राहूल देशपांडे, अमृता नातू, रघुनंदन पणशीकर, मधुरा दातार, दत्तप्रसाद रानडे, जयदीप बागवडकर, जान्हवी अरोरा अशा ख्यातनाम गायकांनी मराठी आल्बम आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेल्या व होत असलेल्या वैभवच्या गाण्यांचे जोरदार सादरीकरण केले.मैफल अजून रंगात आली ती कवी सौमित्र आणि वैभव यांनी सादर केलेल्या वैभवच्या कविता आणि गझलांनी! सौमित्र वैभवची एक गझल सादर करताना थांबून 'व्वा' म्हणाला तेव्हा हे अधोरेखित झालं की आज तिथे जमलेले श्रोतेच नव्हे तर वैभवसकट इतर सारे कलाकार स्वत: एक "श्रोता" झाले होते! सादर करणारा जेव्हा श्रोता होतो, तेव्हा ती मैफल तिच्या अत्त्युच्य बिंदूवर असते. मी जितके काही कार्यक्रम पाहिले आहेत त्यात गायक येतात आणि गाऊन जातात. पण आज प्रत्येक गायकाला वैभवबद्दल काहीतरी जिव्हाळ्याचं बोलायचं होतं. त्याची गझल, गीत सादर करताना प्रत्येकाने प्राण ओतला होता हे सांगण्यात जर्राही अभिनिवेशीपणा नाही. एखाद्या चांगल्या गझलेत जसा प्रत्येक शेर ही एक अर्थपूर्ण कविता असते त्याप्रमाणेच आजच्या कार्यक्रमातला प्रत्येक परफॉर्मन्स ही एक स्वतंत्र आणि विलोभनीय अशी एक मैफिल होती आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे वैभव जोशी!
इतका नितांतसुंदर आणि दर्जेदार मराठी कार्यक्रम रसिकांना दिल्याबद्दल प्रायोजक श्री. रामचंद्र चिंचलीकर आणि एलिगंट केअरटेकर संस्था यांचे जितके कौतुक करावे, आभार मानावे तितके कमीच आहे.
टीप: सदर कार्यक्रमात सहभागी असलेले पण या लेखात नाव न येऊ शकलेले अजूनही काही दिग्गज कलाकार असतील तर ते केवळ लेखकाचे अज्ञान समजावे.
vinayak khambayat
Sunday, August 21, 2011
गंधर्व गायकीचा स्पर्श झालेला..
तो राजहंस एक
ऑगस्ट २१ वर्ष २०११ चा मुहूर्त घेऊन पुण्याच्या तरूण आणि दमदार गायकाने बालगंर्धवांच्या सांगेतिक प्रवासाची वाटचाल पुणेकर रसिक मायबापांसमोर सादर केली आणि साक्षात गंर्धवयुगाचा आभास तयार केला. अतुल खांडेकर या एकलव्यासारख्या शिष्याने हे शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न केला. पण नू.म.वि. शाळेतल्या संपत इंगळे याच्या स्मृतीला वंदन करून.
सुमारे तीन तासांचा `तो राजहंस एक`.. कार्यक्रम
म्हणजे बालगंधर्व युगाची पुरती ओळख. त्यांनी लोकप्रिय केलेली पदे. त्यांचा जीवनपट उलगडत त्यांच्या काळातल्या आठवणी आणि त्यांच्या नाटकांची, त्यांच्या वैशिष्ठ्याची , पदांच्यावेळची कथा कीर्ती शिलेदार आणि शेला दातार यांच्या पडद्यावर दाखविलेल्या चित्रफितीमधून थेट सांगत ह्या राजहंसी नटाच्या नाट्याची मेहिनी प्रेक्षकांवर पडत होती. भावनिक, भाऊक आणि स्वरांनी, तानांनी लगडलेला हा प्रवास ऐकताना कांही काळ त्यांच्या काळात नेण्याचा हा प्रयत्न होता.
शांकुतलच्या नांदीपासून सरू झालेला हा प्रवास जोहार मायबाप पर्यंत माना डोलवत, टाळ्यांची दाद घेत अतुल खांडेकरांनी आपल्या गाण्यातून सादर केला. भास्करबुवांच्या शिकवणीतून रागांचे मर्म बालगंधर्वांनी समजून घेतले. तेच मर्म अतुलने जयमालाबाई शिलेदार आणि नंतर कीर्ती शिलेदाराकडून कळवून घेतले. त्याचा रियाज आळविला आणि ते तेवढ्याच श्रध्देने रसिकांपर्यंत पोचविले. त्यात भक्ति, भाव आणि सुंदर नादमयता होती. तानांची बरसात होती. शब्दातली स्पष्टता होती. लयीचा झंकार होता.
मग मना तळमळसी असो. की शारदातले मूर्तीमंत भीती असो. मानापमानातले खरा तो प्रेमा काय किंवा स्वयंवर मधले यदुमनी सदना असो. सावित्री नाटकातले सनातन नाद हा भगवाना सारखे सहसा न ऐकू येणारे पद असो..कान्होपात्रातला पतित तू पावना हा अभंग असो.... सारेच संगीताच्या साथीतून रसिकांनी अनुभवले. खरे तर हे त्याला जोडीला गायिका असती तर त्यांच्यावरचा भार हलका झाला असता. पण जे कांही व्रत म्हणून घेतले ते अखेरपर्यंत सुसंगत माडण्यांत अतुल नक्कीच यशस्वी झालेला दिसतो.
मात्र एक खरे मास्टर कृष्णरावांच्या भजनात आणि अभंगात त्याची मास्टरी आहे. पखवाज आणि टाळांच्या नादात सादर केलेली भजने वन्समोअरची पावती देऊन गेली.. वन्समोअर मिळाला की बालगंधर्व जसे नव्याने गायल्यासारखे पद सादर करायचे तसेच अतुलने पतित तो पावना चा वन्समोअर घेताना दाखवून दिले.
वर्षा जोगळेकरांनी आपल्या नेमक्या शब्दातून गंधर्व गीयकीची वैशिष्ठ्ये ठसवून दिली. त्यात त्यांची गुरूभक्ती. आवाजातला आर्जव. भावनेने शब्द नटविण्याची पध्दती. आणि त्यातही वाक्य संपून पद सुरू करण्याचा तो क्षण ते कसे घ्यायचे ते ..मजवरी तयांचे पदाच्या उदाहरणाने पटवून दिले.
बालगंधर्व गायकीच्या पदांना न्याय देताना अतुल खांडेकर यांनी घेतलेली मेहनत पदो-पदी जाणवत गेली. त्यात विविधता होती. वेगळ्या स्वरांचा समुच्चय होती. नितांत सुंदर निर्मळ स्वर होता. भक्तिची सिध्दता होती. जे शब्दात सांगता येत नाही त्यासाठी तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.
आज हा अनुभव घेताना त्याच्या या प्रयोगाला दाद देण्यासाठी आलेल्यात जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार, शैला दातार, वंदना खांडेकर, आनंद भाटे, डॉ. बाबा आढाव, उल्हासदादा पवार आणि उल्लेख करण्यासारखे असंख्य जण..
`कलाद्वयी`च्या संजय गोगटे यांची ऑर्गन साथ, विद्यानंद देशपांडे यांची तबला साथ आणि वर्षी जोगळेकरांची निवेदन यातून तो साध्य झाले. डॉ. मंदार परांजपे, रवि सिधये ( व्हायोलिन), पखवाजवरील आभय माटे आणि टाळांसाठी सौ. मानसी खांडेकर यांची साथ तेवढीच मोलाची.
जीनवनिष्ठा बाळगणारे बालगंधर्व आजही विज्ञानयुगात राजहंसाच्या दिमाखदार रूपात आपल्या स्वर्गीय गाण्यातून भेटत आहेत.
ही तरूण पिढी जी विज्ञानवादी दृष्टीकोन स्विकारून जगते आहे.. त्याही पिढीत अशी भक्ति ओतप्रात भरल्याचे अशा प्रयोगातून सिध्द होते..
असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दिसणे महत्वाचे आहे. ती जबाबदरी मायबाप रसिकांची आहे.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
ऑगस्ट २१ वर्ष २०११ चा मुहूर्त घेऊन पुण्याच्या तरूण आणि दमदार गायकाने बालगंर्धवांच्या सांगेतिक प्रवासाची वाटचाल पुणेकर रसिक मायबापांसमोर सादर केली आणि साक्षात गंर्धवयुगाचा आभास तयार केला. अतुल खांडेकर या एकलव्यासारख्या शिष्याने हे शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न केला. पण नू.म.वि. शाळेतल्या संपत इंगळे याच्या स्मृतीला वंदन करून.
सुमारे तीन तासांचा `तो राजहंस एक`.. कार्यक्रम
म्हणजे बालगंधर्व युगाची पुरती ओळख. त्यांनी लोकप्रिय केलेली पदे. त्यांचा जीवनपट उलगडत त्यांच्या काळातल्या आठवणी आणि त्यांच्या नाटकांची, त्यांच्या वैशिष्ठ्याची , पदांच्यावेळची कथा कीर्ती शिलेदार आणि शेला दातार यांच्या पडद्यावर दाखविलेल्या चित्रफितीमधून थेट सांगत ह्या राजहंसी नटाच्या नाट्याची मेहिनी प्रेक्षकांवर पडत होती. भावनिक, भाऊक आणि स्वरांनी, तानांनी लगडलेला हा प्रवास ऐकताना कांही काळ त्यांच्या काळात नेण्याचा हा प्रयत्न होता.
शांकुतलच्या नांदीपासून सरू झालेला हा प्रवास जोहार मायबाप पर्यंत माना डोलवत, टाळ्यांची दाद घेत अतुल खांडेकरांनी आपल्या गाण्यातून सादर केला. भास्करबुवांच्या शिकवणीतून रागांचे मर्म बालगंधर्वांनी समजून घेतले. तेच मर्म अतुलने जयमालाबाई शिलेदार आणि नंतर कीर्ती शिलेदाराकडून कळवून घेतले. त्याचा रियाज आळविला आणि ते तेवढ्याच श्रध्देने रसिकांपर्यंत पोचविले. त्यात भक्ति, भाव आणि सुंदर नादमयता होती. तानांची बरसात होती. शब्दातली स्पष्टता होती. लयीचा झंकार होता.
मग मना तळमळसी असो. की शारदातले मूर्तीमंत भीती असो. मानापमानातले खरा तो प्रेमा काय किंवा स्वयंवर मधले यदुमनी सदना असो. सावित्री नाटकातले सनातन नाद हा भगवाना सारखे सहसा न ऐकू येणारे पद असो..कान्होपात्रातला पतित तू पावना हा अभंग असो.... सारेच संगीताच्या साथीतून रसिकांनी अनुभवले. खरे तर हे त्याला जोडीला गायिका असती तर त्यांच्यावरचा भार हलका झाला असता. पण जे कांही व्रत म्हणून घेतले ते अखेरपर्यंत सुसंगत माडण्यांत अतुल नक्कीच यशस्वी झालेला दिसतो.
मात्र एक खरे मास्टर कृष्णरावांच्या भजनात आणि अभंगात त्याची मास्टरी आहे. पखवाज आणि टाळांच्या नादात सादर केलेली भजने वन्समोअरची पावती देऊन गेली.. वन्समोअर मिळाला की बालगंधर्व जसे नव्याने गायल्यासारखे पद सादर करायचे तसेच अतुलने पतित तो पावना चा वन्समोअर घेताना दाखवून दिले.
वर्षा जोगळेकरांनी आपल्या नेमक्या शब्दातून गंधर्व गीयकीची वैशिष्ठ्ये ठसवून दिली. त्यात त्यांची गुरूभक्ती. आवाजातला आर्जव. भावनेने शब्द नटविण्याची पध्दती. आणि त्यातही वाक्य संपून पद सुरू करण्याचा तो क्षण ते कसे घ्यायचे ते ..मजवरी तयांचे पदाच्या उदाहरणाने पटवून दिले.
बालगंधर्व गायकीच्या पदांना न्याय देताना अतुल खांडेकर यांनी घेतलेली मेहनत पदो-पदी जाणवत गेली. त्यात विविधता होती. वेगळ्या स्वरांचा समुच्चय होती. नितांत सुंदर निर्मळ स्वर होता. भक्तिची सिध्दता होती. जे शब्दात सांगता येत नाही त्यासाठी तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.
आज हा अनुभव घेताना त्याच्या या प्रयोगाला दाद देण्यासाठी आलेल्यात जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार, शैला दातार, वंदना खांडेकर, आनंद भाटे, डॉ. बाबा आढाव, उल्हासदादा पवार आणि उल्लेख करण्यासारखे असंख्य जण..
`कलाद्वयी`च्या संजय गोगटे यांची ऑर्गन साथ, विद्यानंद देशपांडे यांची तबला साथ आणि वर्षी जोगळेकरांची निवेदन यातून तो साध्य झाले. डॉ. मंदार परांजपे, रवि सिधये ( व्हायोलिन), पखवाजवरील आभय माटे आणि टाळांसाठी सौ. मानसी खांडेकर यांची साथ तेवढीच मोलाची.
जीनवनिष्ठा बाळगणारे बालगंधर्व आजही विज्ञानयुगात राजहंसाच्या दिमाखदार रूपात आपल्या स्वर्गीय गाण्यातून भेटत आहेत.
ही तरूण पिढी जी विज्ञानवादी दृष्टीकोन स्विकारून जगते आहे.. त्याही पिढीत अशी भक्ति ओतप्रात भरल्याचे अशा प्रयोगातून सिध्द होते..
असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दिसणे महत्वाचे आहे. ती जबाबदरी मायबाप रसिकांची आहे.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
एन.राजम आणि रागिणी शंकर
उद्याच्या पीढीचा कणखर पाया
पुण्याच्या रसिकांसमोर कार्यक्रम करण्याचा योग हा नक्कीच सुयोग असतो..पुणेकर कलावंतावर, कलेवर प्रेम करतात. तितक्याच तन्मयतेने ऐकतात. म्हणूनच नेहमीच त्यांना वादन ऐकविताना आपल्या बेहद खुशी मिलती हे.... एन. राजम
मित्र फाउंडेशनच्या वतीन २१ ऑगस्टची सकाळ
संगीत प्रेमी एन. राजम यांचे व्हायोलिन एकायला उत्सुक
आपली नात रागिणी शंकर हिच्यासह त्या रंगमंचावर येतात तेव्हा रसिकांना हा मानाचा मुजरा करतात..अगदी सहजपणे त्या पुणेकर श्रोत्यांसमोर बोलत्या होत्या..
ते त्यांच्या रसिकतेची दाद घेतच.
आज मेरे साथ मेरी नतनीया( नात) रागिणी शंकर मुद्दाम आली आहे. हे सांगताना आपल्या घराण्याची परंपरा उलगडून बोलतात.. आमच्या घराण्यात मुले ३ वर्षाची झाली की हातात व्हायोलिन देतात. हळू हळू ती शिकत जातात.. खेळ खेळ म्हणून ते वाद्य वाजवायला शिकतात.. रोज किमान अर्धा-पाऊण तास ते वाद्याशी रियाज करतात.. स्वर.राग ताल यांचे नातू हळू हळू वयाबरोबर समृध्द होत जाते. रागिणीपण तशीत वयाच्या सातव्या वर्षापासून कार्यक्रम करायला लागली आहे...
रागिणीच्या तयारीच्या वाजविण्यात ती आजीच्या बरोबरीने साथ करत गेली हेच शिक्षण समृध्दतेकडे जात आहे...याची जाणिव पुणेकर संगीतप्रेमींना झाली..
मित्र फाउंडेशनच्या या मैफलीत तिच्या वादनाला जागोजागी टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. आजी एन राजम यांच्या चेह-यावरचे कौतूकही स्वरमंचावर जाणवते होते..
मित्र फाउंडेशनच्या वतीने दरमैफलीत एका ज्येष्ठ कलावंताचा सन्मान केला जातो. आज केला तो ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक थोरात यांचा. त्यांना १०,००१ रूपये आणि सन्मानभेट देउन एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रत्येक कलाकार ही परमेश्वरी देणगी आहे. ते घडतात परमेश्वराच्या कृपेने हा ठाम विश्वास बाळगणा-या या बुजुर्ग कलावंताला रियाजातून आपण तयार झाल्याचे सांगावेसे वाटते. संगीत हे व्हिटॅमीन आहे. ते शेवटपर्यत मिळो हिच त्यांची इच्छा सत्कार स्विकारताना त्यांनी बोलून दाखविली.
याच वेळी ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनीस्ट प्रभाकर जोग यांना ८० व्या वर्षात पदापर्णाच्या निमित्ताने एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मैफलीची सुरवात अहिरभैरव रागाच्या सुंदर मांडणीतून एन राजम यांनी केली. मग भजन आणि घेई छंद हे नाट्यगीत सादर करून आपल्या सुरेल, सुस्वर आणि लालित्यपूर्ण वादनाचा साक्षात्कार घडविला.
उद्याच्या पीढीचा कणखर पायाही किती भक्कम तयार झाला आहे याचे दर्शनही रागिणीच्या रुपाने त्यांनी रसिकांसमोर पेश केले.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
पुण्याच्या रसिकांसमोर कार्यक्रम करण्याचा योग हा नक्कीच सुयोग असतो..पुणेकर कलावंतावर, कलेवर प्रेम करतात. तितक्याच तन्मयतेने ऐकतात. म्हणूनच नेहमीच त्यांना वादन ऐकविताना आपल्या बेहद खुशी मिलती हे.... एन. राजम
मित्र फाउंडेशनच्या वतीन २१ ऑगस्टची सकाळ
संगीत प्रेमी एन. राजम यांचे व्हायोलिन एकायला उत्सुक
आपली नात रागिणी शंकर हिच्यासह त्या रंगमंचावर येतात तेव्हा रसिकांना हा मानाचा मुजरा करतात..अगदी सहजपणे त्या पुणेकर श्रोत्यांसमोर बोलत्या होत्या..
ते त्यांच्या रसिकतेची दाद घेतच.
आज मेरे साथ मेरी नतनीया( नात) रागिणी शंकर मुद्दाम आली आहे. हे सांगताना आपल्या घराण्याची परंपरा उलगडून बोलतात.. आमच्या घराण्यात मुले ३ वर्षाची झाली की हातात व्हायोलिन देतात. हळू हळू ती शिकत जातात.. खेळ खेळ म्हणून ते वाद्य वाजवायला शिकतात.. रोज किमान अर्धा-पाऊण तास ते वाद्याशी रियाज करतात.. स्वर.राग ताल यांचे नातू हळू हळू वयाबरोबर समृध्द होत जाते. रागिणीपण तशीत वयाच्या सातव्या वर्षापासून कार्यक्रम करायला लागली आहे...
रागिणीच्या तयारीच्या वाजविण्यात ती आजीच्या बरोबरीने साथ करत गेली हेच शिक्षण समृध्दतेकडे जात आहे...याची जाणिव पुणेकर संगीतप्रेमींना झाली..
मित्र फाउंडेशनच्या या मैफलीत तिच्या वादनाला जागोजागी टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. आजी एन राजम यांच्या चेह-यावरचे कौतूकही स्वरमंचावर जाणवते होते..
मित्र फाउंडेशनच्या वतीने दरमैफलीत एका ज्येष्ठ कलावंताचा सन्मान केला जातो. आज केला तो ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक थोरात यांचा. त्यांना १०,००१ रूपये आणि सन्मानभेट देउन एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रत्येक कलाकार ही परमेश्वरी देणगी आहे. ते घडतात परमेश्वराच्या कृपेने हा ठाम विश्वास बाळगणा-या या बुजुर्ग कलावंताला रियाजातून आपण तयार झाल्याचे सांगावेसे वाटते. संगीत हे व्हिटॅमीन आहे. ते शेवटपर्यत मिळो हिच त्यांची इच्छा सत्कार स्विकारताना त्यांनी बोलून दाखविली.
याच वेळी ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनीस्ट प्रभाकर जोग यांना ८० व्या वर्षात पदापर्णाच्या निमित्ताने एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मैफलीची सुरवात अहिरभैरव रागाच्या सुंदर मांडणीतून एन राजम यांनी केली. मग भजन आणि घेई छंद हे नाट्यगीत सादर करून आपल्या सुरेल, सुस्वर आणि लालित्यपूर्ण वादनाचा साक्षात्कार घडविला.
उद्याच्या पीढीचा कणखर पायाही किती भक्कम तयार झाला आहे याचे दर्शनही रागिणीच्या रुपाने त्यांनी रसिकांसमोर पेश केले.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
Thursday, August 18, 2011
इचलकरंजी ते कॅलिफोर्निया-अभिजित कुंभार
सकाळी सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात बसते. मग तेच गाणे गुणगुणत बसणे हे तर अगदीच रुटीन. परंतु केवळ अशी गाणी गुणगुणत बसण्यापेक्षा स्वतः रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गुणगुणायला किती आनंद मिळतो, या कल्पनेतूनच सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करताना इचलकरंजी ते कॅलिफोर्निया असा पल्ला गाठणाऱ्या अभिजित कुंभारने चक्क स्वरचित गीतांचा एक म्युझिक अल्बमच तयार केला आणि तोही त्याच्या आयटी क्षेत्रातली टिपिकल ऑफशोअर ऑपरेशन्सची कल्पना वापरून! अभिजितने आपल्यासारख्या अनेकांना, ज्यांना इच्छा असून वेळ काढता येत नाही किंवा पायरसीच्या भीतीमुळे त्यांची कल्पना कल्पनेतच विरते अशांना एक वाट खुली करून दिली आहे.
"मी प्रेमिका' या अभिजितच्या म्युझिक अल्बमने समस्त तरुण वर्गाचा विकपॉइंट असलेले "प्रेम' आणखी एकदा गाण्यातून सादर केलेय. "जी मिळे ती नजर..', "चहू ओर पाहता...', "नवा नवा श्वास हा...' अशा एकूण आठ गाण्यांच्या या अल्बमचे गीत आणि संगीतकार अभिजित, संगीत संयोजक मिलिंद गुणे आणि गायिका कस्तुरी पायगुडे-राणे हे तीन मुख्य आधारस्तंभ. अभिजितने गीते रचली, त्यांना चाली लावल्या आणि ती कस्तुरी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर मिलिंद गुणेंनी त्यावर काम केले. गीत-संगीतकार कॅलिफोर्नियात आणि संगीत संयोजक व गायिका पुण्यात असे ऑफशोअर ऑपरेशन सुरू असताना फोनवर खूप चर्चा झाल्या, टिप्स दिल्या-घेतल्या गेल्या.
संगीताचे शिक्षण घेता आले नसले तरी चाली रचण्याचा छंद पूर्वीपासून होता. अभिजितवर प्रभाव आहे तो हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, आर. डी. बर्मन आणि एस. डी. बर्मन यांचा! रोजच्या रहाटगाडग्यातून समाधान मिळेल अशी रचना करण्याच्या तीव्र इच्छेने "प्रेमिका'ची संकल्पना सत्यात आल्याचे अभिजित सांगतो. नव्या संगीतकारांसाठी या क्षेत्रात पाय रोवणे किती कठीण आहे हे आपल्याला या अल्बमच्या निमित्ताने कळले, असे सांगतानाच अभिजितने जगभरातल्या मराठी कलावंतांना विश्वासाने एकत्र येण्यासाठी एखादे व्यासपीठ नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अल्बम पूर्ण करण्याच्या ऊर्मीतून अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती मिळत गेली आणि पुढे जात राहिलो, असे सांगतानाच पत्नी मानसीची साथदेखील यात महत्त्वाची असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
परदेशात स्थायिक असल्यामुळे तिकडच्या मराठी रसिकांपर्यंत हा अल्बम बऱ्याच प्रमाणात पोचला आहे. भारतातून विदेशात गेल्यानंतर मातृभूमी, मातृभाषेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. करिअरच्या मागे धावताना आपले छंद, आवडी जोपासणे सोपे नाही; पण परदेशात राहूनही आपली सांस्कृतिक मूल्ये जपत असताना कलेची आवड जोपासणाऱ्या गुणवंतांची संख्याही कमी नाही. या आवडीपोटी असे धाडस हे कलावंत करू धजतात, असे अभिजितला वाटते.
http://www.esakal.com/esakal/20110818/5341174800411566553.htm
Subscribe to:
Posts (Atom)






