उद्याच्या पीढीचा कणखर पाया
पुण्याच्या रसिकांसमोर कार्यक्रम करण्याचा योग हा नक्कीच सुयोग असतो..पुणेकर कलावंतावर, कलेवर प्रेम करतात. तितक्याच तन्मयतेने ऐकतात. म्हणूनच नेहमीच त्यांना वादन ऐकविताना आपल्या बेहद खुशी मिलती हे.... एन. राजम
मित्र फाउंडेशनच्या वतीन २१ ऑगस्टची सकाळ
संगीत प्रेमी एन. राजम यांचे व्हायोलिन एकायला उत्सुक
आपली नात रागिणी शंकर हिच्यासह त्या रंगमंचावर येतात तेव्हा रसिकांना हा मानाचा मुजरा करतात..अगदी सहजपणे त्या पुणेकर श्रोत्यांसमोर बोलत्या होत्या..
ते त्यांच्या रसिकतेची दाद घेतच.
आज मेरे साथ मेरी नतनीया( नात) रागिणी शंकर मुद्दाम आली आहे. हे सांगताना आपल्या घराण्याची परंपरा उलगडून बोलतात.. आमच्या घराण्यात मुले ३ वर्षाची झाली की हातात व्हायोलिन देतात. हळू हळू ती शिकत जातात.. खेळ खेळ म्हणून ते वाद्य वाजवायला शिकतात.. रोज किमान अर्धा-पाऊण तास ते वाद्याशी रियाज करतात.. स्वर.राग ताल यांचे नातू हळू हळू वयाबरोबर समृध्द होत जाते. रागिणीपण तशीत वयाच्या सातव्या वर्षापासून कार्यक्रम करायला लागली आहे...
रागिणीच्या तयारीच्या वाजविण्यात ती आजीच्या बरोबरीने साथ करत गेली हेच शिक्षण समृध्दतेकडे जात आहे...याची जाणिव पुणेकर संगीतप्रेमींना झाली..
मित्र फाउंडेशनच्या या मैफलीत तिच्या वादनाला जागोजागी टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. आजी एन राजम यांच्या चेह-यावरचे कौतूकही स्वरमंचावर जाणवते होते..
मित्र फाउंडेशनच्या वतीने दरमैफलीत एका ज्येष्ठ कलावंताचा सन्मान केला जातो. आज केला तो ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक थोरात यांचा. त्यांना १०,००१ रूपये आणि सन्मानभेट देउन एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रत्येक कलाकार ही परमेश्वरी देणगी आहे. ते घडतात परमेश्वराच्या कृपेने हा ठाम विश्वास बाळगणा-या या बुजुर्ग कलावंताला रियाजातून आपण तयार झाल्याचे सांगावेसे वाटते. संगीत हे व्हिटॅमीन आहे. ते शेवटपर्यत मिळो हिच त्यांची इच्छा सत्कार स्विकारताना त्यांनी बोलून दाखविली.
याच वेळी ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनीस्ट प्रभाकर जोग यांना ८० व्या वर्षात पदापर्णाच्या निमित्ताने एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मैफलीची सुरवात अहिरभैरव रागाच्या सुंदर मांडणीतून एन राजम यांनी केली. मग भजन आणि घेई छंद हे नाट्यगीत सादर करून आपल्या सुरेल, सुस्वर आणि लालित्यपूर्ण वादनाचा साक्षात्कार घडविला.
उद्याच्या पीढीचा कणखर पायाही किती भक्कम तयार झाला आहे याचे दर्शनही रागिणीच्या रुपाने त्यांनी रसिकांसमोर पेश केले.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
subhash inamdar
subhash inamdar
Sunday, August 21, 2011
Thursday, August 18, 2011
इचलकरंजी ते कॅलिफोर्निया-अभिजित कुंभार
सकाळी सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात बसते. मग तेच गाणे गुणगुणत बसणे हे तर अगदीच रुटीन. परंतु केवळ अशी गाणी गुणगुणत बसण्यापेक्षा स्वतः रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गुणगुणायला किती आनंद मिळतो, या कल्पनेतूनच सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करताना इचलकरंजी ते कॅलिफोर्निया असा पल्ला गाठणाऱ्या अभिजित कुंभारने चक्क स्वरचित गीतांचा एक म्युझिक अल्बमच तयार केला आणि तोही त्याच्या आयटी क्षेत्रातली टिपिकल ऑफशोअर ऑपरेशन्सची कल्पना वापरून! अभिजितने आपल्यासारख्या अनेकांना, ज्यांना इच्छा असून वेळ काढता येत नाही किंवा पायरसीच्या भीतीमुळे त्यांची कल्पना कल्पनेतच विरते अशांना एक वाट खुली करून दिली आहे.
"मी प्रेमिका' या अभिजितच्या म्युझिक अल्बमने समस्त तरुण वर्गाचा विकपॉइंट असलेले "प्रेम' आणखी एकदा गाण्यातून सादर केलेय. "जी मिळे ती नजर..', "चहू ओर पाहता...', "नवा नवा श्वास हा...' अशा एकूण आठ गाण्यांच्या या अल्बमचे गीत आणि संगीतकार अभिजित, संगीत संयोजक मिलिंद गुणे आणि गायिका कस्तुरी पायगुडे-राणे हे तीन मुख्य आधारस्तंभ. अभिजितने गीते रचली, त्यांना चाली लावल्या आणि ती कस्तुरी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर मिलिंद गुणेंनी त्यावर काम केले. गीत-संगीतकार कॅलिफोर्नियात आणि संगीत संयोजक व गायिका पुण्यात असे ऑफशोअर ऑपरेशन सुरू असताना फोनवर खूप चर्चा झाल्या, टिप्स दिल्या-घेतल्या गेल्या.
संगीताचे शिक्षण घेता आले नसले तरी चाली रचण्याचा छंद पूर्वीपासून होता. अभिजितवर प्रभाव आहे तो हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, आर. डी. बर्मन आणि एस. डी. बर्मन यांचा! रोजच्या रहाटगाडग्यातून समाधान मिळेल अशी रचना करण्याच्या तीव्र इच्छेने "प्रेमिका'ची संकल्पना सत्यात आल्याचे अभिजित सांगतो. नव्या संगीतकारांसाठी या क्षेत्रात पाय रोवणे किती कठीण आहे हे आपल्याला या अल्बमच्या निमित्ताने कळले, असे सांगतानाच अभिजितने जगभरातल्या मराठी कलावंतांना विश्वासाने एकत्र येण्यासाठी एखादे व्यासपीठ नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अल्बम पूर्ण करण्याच्या ऊर्मीतून अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती मिळत गेली आणि पुढे जात राहिलो, असे सांगतानाच पत्नी मानसीची साथदेखील यात महत्त्वाची असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
परदेशात स्थायिक असल्यामुळे तिकडच्या मराठी रसिकांपर्यंत हा अल्बम बऱ्याच प्रमाणात पोचला आहे. भारतातून विदेशात गेल्यानंतर मातृभूमी, मातृभाषेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. करिअरच्या मागे धावताना आपले छंद, आवडी जोपासणे सोपे नाही; पण परदेशात राहूनही आपली सांस्कृतिक मूल्ये जपत असताना कलेची आवड जोपासणाऱ्या गुणवंतांची संख्याही कमी नाही. या आवडीपोटी असे धाडस हे कलावंत करू धजतात, असे अभिजितला वाटते.
http://www.esakal.com/esakal/20110818/5341174800411566553.htm
Wednesday, August 17, 2011
युसुफभाई मिरजकरांचे अपघाती निधन
संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्क बोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.
सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms
पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.
सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms
Monday, August 15, 2011
तो राजहंस एक...च्या निमित्ताने
नटसम्राट बालगंधर्व...आपल्या स्वर्गीय गायनाने अबालवृध्दांना भारून टाकणारा जादूगार.
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे. बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे. ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे. श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे. गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे.. गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे. बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे. ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे. श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे. गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे.. गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे
Thursday, August 4, 2011
महाराष्ट्रीय कलोपासकाच्या नाटकाची नांदी
कलोपासना करणारे निष्ठावान कार्यकर्ते हे जांच्या जवळ आजही आहेत तेच हे महाराष्ट्रीय कलोपासकाचे उपासक...
ऑगस्टच्या ३ तारखेला संस्थेने आयोजित केलेला मेळावा...हे त्याचे प्रतिक होते...
१९३६ साली संस्थेचे आपला अधिकृत नामफलक लावला. आणि आज बरोबर ३ ऑगस्ट २०११ ला संस्थेने ७४ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले. ..
मोजक्याच पण नाटकवेड्या मंडळींसमवेत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यंदा संस्था नवीन नाटक करणार असण्याची घोषणा संस्थेचे सचिव धनंजय गोळे ( जे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे नातू होत) यांनी केली. त्याचे दिग्दर्शनही आपण करणार असल्याचेही जाहिर करून कलोपासकांच्या पुढील वाटचालीचा अंदाज येत गेला. केवळ पुरूषोत्तम करंडक स्पर्धा भरविणे हा संस्थेचा हेतू असल्याचे सध्या बोलले जाते. या पार्श्वभूमिवर संस्था एक हौशी नाटकवेड्या कार्य़कर्त्यांची आहे हे मंडळी विसरून चालली होती.
आता पुन्हा नाटक करणे. राजाभाऊ नातूंनी केलेल्या विविध ध्वनिमुद्रणातील निवडक भागांचे दरमहा कार्यक्रम करणे. आणि पुरूषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धोंची पुण्याबाहेर नेण्याची योजना कार्यान्वयीत करणे. अशा काही मह्त्वाच्या निर्णयांचे या स्नेहमेळाव्यात जाहिर कौतूक झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नवी चेतना निर्माण झाली.
ज्या ठिकाणी संस्थेने आपली पहिली मूहूर्तमेढ रोवली , त्या नूमवि शाळेच्या जवळच्याच वास्तूत कलोपासकाने योजलेल्या अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडला. या समारंभात डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. प्र.ल गावडे, आणि गेली ५५ वर्षे व्यावसायिक रंघभूमिवर आणि चित्रपटाच्या ऑफर नाकारून महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांच्या पीडीएत काम करणा-या सेवा चौहान यांनी तो भूतकाळ जागा करून इतिहासातल्या संस्थेच्या मोलाच्या कार्याचे कथन केले.
ज्येष्ठ्य अभिनेते श्रीकांत मोघे यांनी अपूर्व बंगाल या कलोपासकाने केलेल्या नाटकात पहिली भूमिका करून रंगभूमिवरचे पहिले पदार्पण कसे केले आणि तिथे आपणाला रंगभूमिवर काम करण्याचा सूर सापडल्याची प्रांजल कबूली दिली.
भगवान पंडित, प्रमिलाताई बेडेकर आणि राजाभाऊ नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेला पुढे नेण्याचे काम अनेक नाट्यप्रेमी कार्य़कर्त्यांनी केल्यामुळेच संस्था आजही ओळखली जात असून यापुढेही आपल्या नवीन योजनातून संस्थेची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निनाद बेडेकर यांनी दिला.
एके काळी पुण्यातून स्पर्धेला कुठले नाटक येतेय याची वाट मुंबईचे व्यावसायिक लोक पहात असत. यापुढेही अशी नाटके काढा की व्यवसायीक पुण्याकडे अशा दृष्टीकोनातून बघतील ...
श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यातून चांगल्य़ा गुणवत्तेची नाटके आली तर मराठी प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे खेचला जाईल, असा आशावादी सूर आला.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
ऑगस्टच्या ३ तारखेला संस्थेने आयोजित केलेला मेळावा...हे त्याचे प्रतिक होते...
१९३६ साली संस्थेचे आपला अधिकृत नामफलक लावला. आणि आज बरोबर ३ ऑगस्ट २०११ ला संस्थेने ७४ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले. ..
मोजक्याच पण नाटकवेड्या मंडळींसमवेत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यंदा संस्था नवीन नाटक करणार असण्याची घोषणा संस्थेचे सचिव धनंजय गोळे ( जे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे नातू होत) यांनी केली. त्याचे दिग्दर्शनही आपण करणार असल्याचेही जाहिर करून कलोपासकांच्या पुढील वाटचालीचा अंदाज येत गेला. केवळ पुरूषोत्तम करंडक स्पर्धा भरविणे हा संस्थेचा हेतू असल्याचे सध्या बोलले जाते. या पार्श्वभूमिवर संस्था एक हौशी नाटकवेड्या कार्य़कर्त्यांची आहे हे मंडळी विसरून चालली होती.
आता पुन्हा नाटक करणे. राजाभाऊ नातूंनी केलेल्या विविध ध्वनिमुद्रणातील निवडक भागांचे दरमहा कार्यक्रम करणे. आणि पुरूषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धोंची पुण्याबाहेर नेण्याची योजना कार्यान्वयीत करणे. अशा काही मह्त्वाच्या निर्णयांचे या स्नेहमेळाव्यात जाहिर कौतूक झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नवी चेतना निर्माण झाली.
ज्या ठिकाणी संस्थेने आपली पहिली मूहूर्तमेढ रोवली , त्या नूमवि शाळेच्या जवळच्याच वास्तूत कलोपासकाने योजलेल्या अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडला. या समारंभात डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. प्र.ल गावडे, आणि गेली ५५ वर्षे व्यावसायिक रंघभूमिवर आणि चित्रपटाच्या ऑफर नाकारून महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांच्या पीडीएत काम करणा-या सेवा चौहान यांनी तो भूतकाळ जागा करून इतिहासातल्या संस्थेच्या मोलाच्या कार्याचे कथन केले.
ज्येष्ठ्य अभिनेते श्रीकांत मोघे यांनी अपूर्व बंगाल या कलोपासकाने केलेल्या नाटकात पहिली भूमिका करून रंगभूमिवरचे पहिले पदार्पण कसे केले आणि तिथे आपणाला रंगभूमिवर काम करण्याचा सूर सापडल्याची प्रांजल कबूली दिली.
भगवान पंडित, प्रमिलाताई बेडेकर आणि राजाभाऊ नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेला पुढे नेण्याचे काम अनेक नाट्यप्रेमी कार्य़कर्त्यांनी केल्यामुळेच संस्था आजही ओळखली जात असून यापुढेही आपल्या नवीन योजनातून संस्थेची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निनाद बेडेकर यांनी दिला.
एके काळी पुण्यातून स्पर्धेला कुठले नाटक येतेय याची वाट मुंबईचे व्यावसायिक लोक पहात असत. यापुढेही अशी नाटके काढा की व्यवसायीक पुण्याकडे अशा दृष्टीकोनातून बघतील ...
श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यातून चांगल्य़ा गुणवत्तेची नाटके आली तर मराठी प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे खेचला जाईल, असा आशावादी सूर आला.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
Monday, August 1, 2011
नाट्यसंगीताचा जुना खजाना
संगीत नाटकातले संगीत आजही ऐकले जाते
-डॉ. सुहासिनी कोरटकर
बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.
संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.
सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.
संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.
-डॉ. सुहासिनी कोरटकर
बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.
संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.
सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.
संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.
Wednesday, July 27, 2011
कलावंत विवेकाला स्पर्श करतो
-कवी ग्रेस
कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.
अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.
कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.
अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)














