subhash inamdar

subhash inamdar

Friday, June 30, 2017

वारसा संगीत नाटकांचा..













संगीत नाटकांची परंपरा सांगणारा सुरेख पट...

मराठी संगीत नाटकाची एकशे सत्तर वर्षांची परंपरा सांगणारा एक रंगमंचिय आविष्कार ललितकलादर्शची तिसरी पिढी म्हणजे बापुराव पेंढारकरांच्या नातवाने..ज्ञानेश पेंढारकर यांने नकताच भरत नाट्य मंदिरात खास पुणेकरांसाठी सादर केला.. जो वारसा त्याचे वडील भालचंद्र पेंढारकरांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या साथीने पुढे नेला तो... वारसा संगीत नाटकाचा...हेच त्याचे शिर्षक होते..

भरत वाक्यापासून भैरवीपर्य़तचा हा संगीत वारसा चार तासाचा कालावधी घेऊन खास इथे केला गेल्या त्याचे कारण त्यांच्या निवेदनातूनच स्पष्ट होते..बालगंधर्व, भास्करबुवा बखले, वझे बुवा, खाडीलकर, गडकरी  ...हे सारे दिग्गज या पुण्यातले..त्यांनी हे संगीत नाटक जागतिक क्षितिजावर  फडकविले...त्यांना हा प्रयोग करून मानवंदना देण्याचा हा उद्देश होता..

नांदी, दिंडी, साकी..पासून नाट्यपदांच्या विविध छटा या बैठकीच्या पदातून इथे ऐकवित असताना..मागे पडद्यावर त्या काळचे चेहरे..पेहराव..ते नट यांचाही इतिहास दिसत होता..कांही ठिकाणी ते सारे पडद्यावर ऐकविले देखिल..

 ज्ञानेश पेंढारकरने  निलाक्षी पेंढारकर या आपल्य़ा सुविद्य पत्नीच्या सुरेल
आवाजातून  ही संगीत नाटकांची परंपरा उलगडून दाखविली..

आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जसा रसिकांचा स्पर्श झाला तसा तो पुण्यातल्या आणि मुंबईतल्या कलावंतांनीही हा प्रयोग पाहिला..अगदी अखेरपर्यत..त्यात कीर्ती, लता शिलेदार, मधुवंती दांडेकर, भास्करबुवा बखले यांंची नातसून लिखिका आणि गायिका शैला दातार, विद्याधर गोखले यांची कन्या शुभदा आणि जावई श्रीकांत दादरकर, गिरीजा काटदरे..असे कितीतरी..
रंगमंचावरही गायकात पं. राम मराठे यांची पणती आदिती मराठे यांनाही त्यात सामिल करून घेतले होते..

ज्ञानेश पेंढारकरांनी अनेक नाट्यपदे उत्तम गायलिही..पण दुरितांचे तिमिर जावो मधले..आई तुझी आठवण येते..या पदांनी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ करून टाकले..

निलाक्षी पेंढारकरांनी स्वयंवर, मानापमान ते अखेरचा जोहार मायबाप..हा अभंग गाउन रसिकांना मोहात पाडले.
.
धनंजय म्हसकर यांनी कट्यार..ते मत्स्यगंधा मधील पदांना रसिकांसमोर मांडले. तर खास उल्लेख करावा लागेल  तो निमिष कैकाडी यांचा. त्यांने गायलेली सगळी पदे रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद देत ऐकली.. काहींना तर वन्समोअर घ्यावाच लागला.
तयारीचा दमदार आवाज यामुळे पुणकरांना ऐकता आला.

संकेत म्हात्रे आणि ऋग्वेदी प्रधान यांनी संवादातातून रसिकांना संगीत नाटकाचा इतिहास सांगितला..

आणि अखेरीस. या कार्यक्रमाची रंगत वाढविली किंवा ता ऐकावीसी वाटली ती उतम साथिदारांच्या संगतीमुळे. यात तबल्या धनंजय पुराणीक, हार्मोनियम लिलाधर चक्रदेव आणि ऑर्गनवर साथ करणारे पं. गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य मकरंद कुंडले..त्यांनी ऑर्गवर आपला सुरेल स्पर्श एका उत्तम नाट्यसंगीताच्या पदातून करवून दिला..

आपली संगीत नाटकांची परंपरा आता अशा बैठकीच्या कार्यक्रमातून का होईना..काळानुरुप टिकविण्याचे आणि तो वारसा पुढच्या पिढीपर्य़त नेण्याचे कसब ज्ञानेश पेंढारकर आणि निलाक्षी पेंढारकर करताहेत... यासाठी त्यांनी खास शाबासकी.
आणि ही शाब्दिक दादही...

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276h

Monday, March 6, 2017

पाच व्हायोलीन वादकांचा सुरेल आविष्कार





ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं.गजाजननबुवा जोशी यांची स्मृती पुण्यातील पाच व्हायोलीन वादकांनी आपल्या वादनातून जागी ठेवली. स्वरांवरची कमाल तयारी आणि तालाच्या संगतीने वादनातले बारकावे पुणेकर रसिकांनी रविवारी अनुभवले


`स्वरबहार` प्रस्तुत पं. भालचंद्र देव यांच्या पुढाकाराने गेली चौवीस वर्ष गजाननबुवांच्या शेलीचे स्मरण पुणेकरांच्या साक्षिने केले जाते.  

काल म्हणजे रविवारी..देवेन्द्र जोशी, अभय आगाशे्, सौ. चारूशीला गोसावी डॉ. सौ. निलिमा राडकर आणि पं.भालचंद्र देव या पाच व्हायौलिन वादकांची मैफल स्मरणात रहावी अशीच आनंद देऊन गेली..
 पं. भालचंद्र देव हे गजाननबुवांचे शिष्य..आपल्या गुरुच्या स्मरणार्थ दरवर्षी सादर होणा_या या मैफलीस पुढच्या वर्षी पंचवीस वर्षे होतील.


 नवोदित पण व्हायेलीन वादनात तरबेज असणारे वादक शोधून त्यांना ह्या व्यासपीठावर संधी देण्याची पं. देव यांची पध्दत आहे. यंदा देवैन्द जोशी हे त्यातलेच एक नाव.

 एस एम जोशी संभागृहातल्या छोटेखानी रंगमंचावर पं. गजाननबुवा जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या वादनाची ध्वनीफित ऐकवून कार्यक्रमाची सुरवात झाली..पुढे दौन अडिच तास हा व्हायोलीन वादनाचा स्वरयज्ञ सुरू झाला तोच मुळी देवेन्द्र जोशी यां व्हायोलीन वादकाच्या बागेश्री रागातल्या वादनाने.. गेली काही वर्षे वादवापासून दूर गेलेले जोशी इथे मात्र आपली नजाकत दाखवून रसिकांच्या पसंतीस उतरले.


`व्हिओलीना` या व्हायोलीन दिनाच्या निमित्ताने लक्षात राहिलेले नाव म्हणजे अभय आगाशे..त्यांनी इथे हंसध्वनीचै सूर आळवून आपली वाद्यावरची हूकमत स्पष्ट सुरांतून मनात आपली प्रतिमा नि्र्माण केली.

  











 सौ. चारूशीला गोसावी आणि डॉ. निलिमा राडकर या दोन तयार व्हायोलीन वादकांनी जुगलबंदीत सादर केलेला राग मधुकंस त्यांच्या साधनेची महती आपल्या वादनातून सिध्द केली. दोनही कलावंतांची स्वरतालावरची पकड ऐकताना भान हरपून जात होते.. सिध्दहस्त कलावंतांची सारी लक्षणे त्यांच्या वादनातून पुणेकर रसिकांना स्पष्ट जाणवत होती.. सौ. गौसावी यांनी बालगर्धवांच्या गोड गळ्यातून टिपलेले स्वयंवर नाटकातले नरवर कृष्णा समान..हे पद व्हायोलिनच्या सुरातून ऐकताना श्रोते  डुलत
होते. तर डॉ. राडकर यांनी काफी रागातली धूनही तेवढ्याच मनस्वीपणे सादर केली. या दोन स्त्री कलावंतांचा आविष्कार या मैफलीतला सर्वात उत्तम सादरीकरणाचा नमुनाच होता.


 
 पं. गजाननबुवांचे शिष्य अवघे ब्याऐंशी वर्षाचे वयोमान असणारे पं. भालचंद्र देव यांची आपल्या छोट्या सादरीकरणाची सुरवात राग जनसंमोहिनीने केली. तुमची बैठक पक्की असली की कलेवरची निष्ठा वादनातून जाणवते..गुंतता ह्दय हे..हे नाट्यपद आणि शेवटी सादर झालेली भैरवी.. 

पं. देव यांच्या वादनातले बारकावे दाखवत रसिकांच्या चरणी लीन होत वादन संपवतात तेव्हा टाळ्यांचा नाद होतो...पण खरा कलावंत त्यात बुडून जात नाही..तर ती रसिकतेची थाप गुरूप्रसाद म्हणून स्विकारत आपली पुढील वाटचाल करत रहातो..

सगळ्या मैफलीची तबला साथ त्या त्या कलावंतांच्या वैशीष्ठ्यानुसार रविराज गोसावी यांनी समर्पक केली.. स्वरबहारचे पडद्यामागचे सूत्रधार राजय गोसावी यांनी थोडक्या शब्दातून निवेदन करून कार्यक्रम सुविहित सादर केला..













-सुभाष इनामदार,
सांस्कृतिक पुणे
9552596276

Saturday, December 24, 2016

पं.प्रभाकर जोग यांचा ८५वा वाढदिवस



संगीतसाधक प्रभाकर जोग यांचे८५ वर्षांत पदार्पण
ज्येष्ठ संगीतकार, श्रेष्ठ व्हायोलीनवादक आणि उत्तम संगीतसंयोजक पं. प्रभाकर जोग यांचा आज ८५ वा वाढदिवस..त्यांच्यासारख्या उत्तम कलाकाराची ओळख ही त्यांच्या त्या काळातल्या आठवणीतून झाली पाहिजे..त्यांनी उत्तम आरोग्यपूर्ण अशी शतायुषी पुरी करावी अशीच सा-या संगीत चाहत्यांची सदिच्छा आहे..
सांस्कृतिक पुणेकडून त्यांना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या आयुष्यातल्या कारकीर्दीचा त्यांनीच घेतलेला आढावा पुन्हा इथे देताना, त्यांचे काम . त्यांची कुशलता आणि त्यांनी संगीतकलेची केलेली सेवा रसिक वाचकांसमोर देता आली तर पहावे हा उद्देश..त्यांच्याच शब्दात…..




सुधीर फडके यांनीप्रतापगडचित्रपटाचे काम पुण्यामध्ये सुरू केले होते. व्हायोलिनसाठी प्रभाकर जोग यांना बोलवा, असे ललिताबाईंनी बाबूजींना सांगितले होते त्यानुसार १९५० मध्ये मी वादक म्हणून त्यांच्यासमवेत काम करण्यास सुरुवात केली. ‘सुवासिनीचित्रपटाच्यावेळी मी त्यांचा संगीत साहाय्यक झालो. त्यामुळे साहजिकच पुढे गीतरामायणाचे संगीत संयोजन करण्याची संधी मिळाली. माझ्या घरामध्ये गीतरामायणाच्या तालमी होत असत. वादकांना सूचना देण्यापासून तेऑर्केस्ट्रा कंडक्टकरण्यापर्यंतची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्याचे प्रतििबब गीतरामायणातील गीतांच्या लोकप्रियतेमध्ये दिसून येते.


बाबूजींचा मी इतका विश्वास संपादन केला होता की, गीतरामायणातीलचला राघवा चला पहाया जनकाची मिथिलाहे गीत स्वरबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. या गीतासाठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा आवाज वापरला होता. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथाया बाबूजींच्या स्वरातील गीताची अस्ताई मी संगीतबद्ध केली होती

गीतरामायणामध्ये वादकांना शंभर रुपये मिळायचे, तर साहाय्यक असल्यामुळे मला सव्वाशे रुपये मानधन मिळायचे. वादकांचे चहापान करण्यासाठी पैसे खर्च व्हायचे. पण कामामध्ये मिळणाऱ्या आनंदापुढे या पैशांचे मोल वाटायचे नाही. आकाशवाणीवरून आठवडय़ाला एक याप्रमाणे प्रसारित होत असलेल्या गीतरामायणातील निम्मी गाणी होईपर्यंत माझ्याकडे घरामध्ये रेडिओदेखील नव्हता. नंतर मी रेडिओ विकत घेतला. एका अर्थानेगीतरामायणहा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हणता येईल.

माझ्या आयुष्यातली आणखी एक गोष्ट त्याच दरम्यान घडली. रोहिणी भाटे यांच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी कुसुम वाड ही गायिका येत असे. मी त्यांचा व्हायोलिनवादक होतो. आमचा परिचय झाला आणि त्याचे रूपांतर विवाहामध्ये झाले. कुसुम वाड नीला जोग झाली

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल काहे संगीतकार म्हणून मी स्वतंत्ररीत्या स्वरबद्ध केलेले पहिले गीत. पूर्वी आकाशवाणी नवीन गायक, कवी आणि संगीतकारांना संधी देत असे. त्यासाठी ऑडिशन घेतली जात असे. यामध्ये नीलाने सहभाग घेतला होता आणि मला तुमचेच गाणे पाहिजे, असा प्रेमळ स्त्रीहट्ट धरला. त्या वेळी माझ्याकडे स्वत:चे असे कोणतेच गाणे नव्हते. ‘लपविलास तू हिरवा चाफाहे गाणे मी स्वरबद्ध केले आणि तिने ते गायले. हे गाणे एवढे लोकप्रिय झाले की तिची गायिका म्हणून ओळख झाली. मात्र एचएमव्ही कंपनीने या गीताची ध्वनिफीत (कॅसेट) करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठीश्रेणीचा कलाकार हवा ही त्यांची अट होती. नीलाबीश्रेणीची गायिका होती. त्यामुळे ते गाणे मालती पांडे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केले गेले. ध्वनिफीत करण्यासाठी त्याच्या जोडीलाकशी मी सांगू वडिलांपुढे, श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडेहे गदिमांचेच गीत घेण्यात आले होते. तर मंदाकिनी पांडे यांच्या स्वरांतसत्यात नाही आले स्वप्नात येऊ काआणिसोनियाचा पाळणा रेशमाचा डोरही संजीवनी मराठे यांची गीते स्वरबद्ध केली होती.


लपविलास तू हिरवा चाफाया गीताची एक वेगळीच गोष्ट आहे. मुळात हे गाणे माडगूळकरांनीलाखाची गोष्टचित्रपटासाठी लिहिले होते. ते स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजी यांच्यासमवेत मी बसलो असताना राजाभाऊ परांजपे तेथे आले आणि त्यांनी गदिमांना म्हटलं, ‘अण्णा हे गाणं नाही चालणार. गाणं छान आहे, पण मी चित्रपटातीलसिच्युएशनबदलतो आहे. त्यामध्ये हे गाणं बसत नाही.’’ राजाभाऊंनी नाकारलेलालपविलेला चाफामला उपयोगी पडला. ‘लाखाची गोष्टचित्रपटामध्ये राहून गेलेले हे गाणे जयसिंग सावंत या माझ्या मित्राकडे होते. नीलाने हट्ट केल्यानंतर मला त्याची आठवण झाली. जयसिंग याच्याकडून मी ते गाणं आणलं आणि त्याला चाल लावली. नीलाने ते आकाशवाणीसाठी गायले. आणि या गाण्याने संगीतकार म्हणून माझी ओळख झाली.


जावई माझा भलाहा माझा संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटासाठीकाय मागू मी देवापाशी अंगणी गंगा घरात काशीहे गीत आशा भोसले यांनी गायिले होते. मात्र त्या वेळी लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी आणि किशोरकुमार या पाश्र्वगायकांचाएचएमव्हीकंपनीशी रॉयल्टीच्या मुद्दय़ावरून वाद झाला होता. आम्ही गायलेल्या गीताची ध्वनिफीत निघणार नाही, असा निर्मात्याबरोबर करार करून मगच ते चित्रपटासाठी पाश्र्वगायन करीत असत. या वादाचा फटकाजावई माझा भलाचित्रपटाला बसला. चित्रपटातील गीते चांगली असूनही ध्वनिमुद्रिका नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.

पणस्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणीआणिप्रिया आज माझी नसे साथ द्यायाअशा गीतांनी मला सुगम संगीतामध्ये मुशाफिरी करता आली याचा आनंद वाटतो. सुधीर फडके यांचा अमृतस्वर लाभलेली ही गीते लोकप्रिय झाली हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सांगीतिक कारकीर्द सुरू झाली त्या बाबूजींनी माझ्या संगीत दिग्दर्शनामध्ये ही गाणी आनंदाने गायिली. जे स्वत: परिपूर्ण संगीतकार-गायक अशा बाबूजींना मी गाण्याची चाल सांगायची म्हणजे माझ्यावर दडपण असायचे. पण बाबूजी हे स्वत: ते दडपण दूर करायचे. ते अगदी एखाद्या विद्यार्थ्यांसारखं गाणं शिकायला बसायचे. एखादी वेगळी जागा घेतली तर चालेल का, असे ते मला विचारत. ‘तुम्ही सांगता तसे माझ्या गळ्यातून आलेच पाहिजे,’ असे सांगून ते सराव करायचे. यशाच्या शिखरावर असताना मेहनत आणि अचूकतेवर भर देणारा असा दुसरा संगीतकार-गायक मी पाहिलाच नाही.

स्वर आले दुरूनीया गीताची जन्मकथा रोमांचकारी आहे. एकदा ध्वनिमुद्रण संपवून मी बसने घरी येत होतो. प्रवास सुरू असताना मनात काही वेगळेच चालले होते. एक सुरावट जन्म घेत होती. मग खिशातील पेन काढून बसच्या तिकिटाच्या मागे मी नोटेशन लिहिले. घरी आल्यानंतर संवादिनी घेऊन मी ते गायलो. चाल पक्की झाली. आता त्याला शब्द हवे होते. हे गाणे कोण लिहू शकेल असा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर संगीतकार यशवंत देव यांचे नाव आले. या चालीला समर्पक शब्द संगीताची जाण असलेले देवसाहेबच देऊ शकतील अशी माझी पक्की खात्री झाली. देव हे त्या वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर काम करीत होते. मी देवसाहेबांना दूरध्वनी केला आणि त्यावरच मी त्यांना नोटेशन ऐकविले. त्यांनी मला पत्राद्वारे नोटेशन पाठविण्यास सांगितले. त्यांचे उलट टपाली पत्र आले आणि शब्द होतेस्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’. गाण्याचे शब्द खरोखरच दुरून आले होते. हे गीत गाण्याची मी बाबूजींना विनंती केली. त्यांनी या गीताचे सोने केले हे मी वेगळे सांगायला नको. त्याच्या जोडीला दुसरे गीत हवे म्हणून पुन्हा देवांनाच गळ घातली आणि त्यांनीप्रिया आज माझी नसे साथ द्यायाहे गीत मला दिले. तेही बाबूजींनी अप्रतिम गायले आहे.

प्रपंच चालविताना पैसे लागतात. सुधीर फडके यांच्यासमवेत काम करताना पैसे मिळायचे. पण वाढत्या घरखर्चाची आवश्यकता ध्यानात घेता गरजा भागविण्यासाठी मिळणारे पैसे पुरायचे नाहीत. मग बाबूजी यांच्याशी चर्चा करूनच मी हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये वादक म्हणून दाखल झालो

आघाडीच्या सर्वच संगीतकारांच्या स्वररचनांमध्ये व्हायोलिनवादनासाठी मला निमंत्रण असायचे. मदन मोहन यांना माझे वादन आवडत असे. तरमी केव्हा उपलब्ध आहे हे जाणून घेऊनच मग ध्वनिमुद्रण निश्चित करावे,’ असे भूपेन हजारिका आपले साहाय्यक अनिल मोहिले यांना सांगायचे. मी मुंबईमध्ये गेलो तो काळ ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांचा होता. अशा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आणि संगीतकार एस. एन. त्रिपाठी खूपच लोकप्रिय होते. त्यांच्याकडेही काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्याशी छान गप्पा मारत असत. ‘इतना फास्ट नोटेशन लिखनेवाला म्युझिशियन हमने देखा नहीं,’ अशा शब्दांत माझे कौतुक झाले. त्यामुळे मदन मोहन, सज्जाद, एस. डी. बर्मन, रोशन, . पी. नय्यर यांच्यापासून आर. डी. बर्मन, जयदेव, राजेश रोशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन ते अगदी नव्या पिढीेचे म्हणता येतील असे अन्नू मलिक, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद अशा सर्व संगीतकारांबरोबर मी काम केले आहे.