संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्क बोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.
सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms
subhash inamdar
subhash inamdar
Wednesday, August 17, 2011
Monday, August 15, 2011
तो राजहंस एक...च्या निमित्ताने
नटसम्राट बालगंधर्व...आपल्या स्वर्गीय गायनाने अबालवृध्दांना भारून टाकणारा जादूगार.
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे. बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे. ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे. श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे. गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे.. गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे. बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे. ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे. श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे. गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे.. गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे
Thursday, August 4, 2011
महाराष्ट्रीय कलोपासकाच्या नाटकाची नांदी
कलोपासना करणारे निष्ठावान कार्यकर्ते हे जांच्या जवळ आजही आहेत तेच हे महाराष्ट्रीय कलोपासकाचे उपासक...
ऑगस्टच्या ३ तारखेला संस्थेने आयोजित केलेला मेळावा...हे त्याचे प्रतिक होते...
१९३६ साली संस्थेचे आपला अधिकृत नामफलक लावला. आणि आज बरोबर ३ ऑगस्ट २०११ ला संस्थेने ७४ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले. ..
मोजक्याच पण नाटकवेड्या मंडळींसमवेत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यंदा संस्था नवीन नाटक करणार असण्याची घोषणा संस्थेचे सचिव धनंजय गोळे ( जे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे नातू होत) यांनी केली. त्याचे दिग्दर्शनही आपण करणार असल्याचेही जाहिर करून कलोपासकांच्या पुढील वाटचालीचा अंदाज येत गेला. केवळ पुरूषोत्तम करंडक स्पर्धा भरविणे हा संस्थेचा हेतू असल्याचे सध्या बोलले जाते. या पार्श्वभूमिवर संस्था एक हौशी नाटकवेड्या कार्य़कर्त्यांची आहे हे मंडळी विसरून चालली होती.
आता पुन्हा नाटक करणे. राजाभाऊ नातूंनी केलेल्या विविध ध्वनिमुद्रणातील निवडक भागांचे दरमहा कार्यक्रम करणे. आणि पुरूषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धोंची पुण्याबाहेर नेण्याची योजना कार्यान्वयीत करणे. अशा काही मह्त्वाच्या निर्णयांचे या स्नेहमेळाव्यात जाहिर कौतूक झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नवी चेतना निर्माण झाली.
ज्या ठिकाणी संस्थेने आपली पहिली मूहूर्तमेढ रोवली , त्या नूमवि शाळेच्या जवळच्याच वास्तूत कलोपासकाने योजलेल्या अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडला. या समारंभात डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. प्र.ल गावडे, आणि गेली ५५ वर्षे व्यावसायिक रंघभूमिवर आणि चित्रपटाच्या ऑफर नाकारून महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांच्या पीडीएत काम करणा-या सेवा चौहान यांनी तो भूतकाळ जागा करून इतिहासातल्या संस्थेच्या मोलाच्या कार्याचे कथन केले.
ज्येष्ठ्य अभिनेते श्रीकांत मोघे यांनी अपूर्व बंगाल या कलोपासकाने केलेल्या नाटकात पहिली भूमिका करून रंगभूमिवरचे पहिले पदार्पण कसे केले आणि तिथे आपणाला रंगभूमिवर काम करण्याचा सूर सापडल्याची प्रांजल कबूली दिली.
भगवान पंडित, प्रमिलाताई बेडेकर आणि राजाभाऊ नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेला पुढे नेण्याचे काम अनेक नाट्यप्रेमी कार्य़कर्त्यांनी केल्यामुळेच संस्था आजही ओळखली जात असून यापुढेही आपल्या नवीन योजनातून संस्थेची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निनाद बेडेकर यांनी दिला.
एके काळी पुण्यातून स्पर्धेला कुठले नाटक येतेय याची वाट मुंबईचे व्यावसायिक लोक पहात असत. यापुढेही अशी नाटके काढा की व्यवसायीक पुण्याकडे अशा दृष्टीकोनातून बघतील ...
श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यातून चांगल्य़ा गुणवत्तेची नाटके आली तर मराठी प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे खेचला जाईल, असा आशावादी सूर आला.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
ऑगस्टच्या ३ तारखेला संस्थेने आयोजित केलेला मेळावा...हे त्याचे प्रतिक होते...
१९३६ साली संस्थेचे आपला अधिकृत नामफलक लावला. आणि आज बरोबर ३ ऑगस्ट २०११ ला संस्थेने ७४ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले. ..
मोजक्याच पण नाटकवेड्या मंडळींसमवेत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यंदा संस्था नवीन नाटक करणार असण्याची घोषणा संस्थेचे सचिव धनंजय गोळे ( जे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे नातू होत) यांनी केली. त्याचे दिग्दर्शनही आपण करणार असल्याचेही जाहिर करून कलोपासकांच्या पुढील वाटचालीचा अंदाज येत गेला. केवळ पुरूषोत्तम करंडक स्पर्धा भरविणे हा संस्थेचा हेतू असल्याचे सध्या बोलले जाते. या पार्श्वभूमिवर संस्था एक हौशी नाटकवेड्या कार्य़कर्त्यांची आहे हे मंडळी विसरून चालली होती.
आता पुन्हा नाटक करणे. राजाभाऊ नातूंनी केलेल्या विविध ध्वनिमुद्रणातील निवडक भागांचे दरमहा कार्यक्रम करणे. आणि पुरूषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धोंची पुण्याबाहेर नेण्याची योजना कार्यान्वयीत करणे. अशा काही मह्त्वाच्या निर्णयांचे या स्नेहमेळाव्यात जाहिर कौतूक झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नवी चेतना निर्माण झाली.
ज्या ठिकाणी संस्थेने आपली पहिली मूहूर्तमेढ रोवली , त्या नूमवि शाळेच्या जवळच्याच वास्तूत कलोपासकाने योजलेल्या अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडला. या समारंभात डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. प्र.ल गावडे, आणि गेली ५५ वर्षे व्यावसायिक रंघभूमिवर आणि चित्रपटाच्या ऑफर नाकारून महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांच्या पीडीएत काम करणा-या सेवा चौहान यांनी तो भूतकाळ जागा करून इतिहासातल्या संस्थेच्या मोलाच्या कार्याचे कथन केले.
ज्येष्ठ्य अभिनेते श्रीकांत मोघे यांनी अपूर्व बंगाल या कलोपासकाने केलेल्या नाटकात पहिली भूमिका करून रंगभूमिवरचे पहिले पदार्पण कसे केले आणि तिथे आपणाला रंगभूमिवर काम करण्याचा सूर सापडल्याची प्रांजल कबूली दिली.
भगवान पंडित, प्रमिलाताई बेडेकर आणि राजाभाऊ नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेला पुढे नेण्याचे काम अनेक नाट्यप्रेमी कार्य़कर्त्यांनी केल्यामुळेच संस्था आजही ओळखली जात असून यापुढेही आपल्या नवीन योजनातून संस्थेची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निनाद बेडेकर यांनी दिला.
एके काळी पुण्यातून स्पर्धेला कुठले नाटक येतेय याची वाट मुंबईचे व्यावसायिक लोक पहात असत. यापुढेही अशी नाटके काढा की व्यवसायीक पुण्याकडे अशा दृष्टीकोनातून बघतील ...
श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यातून चांगल्य़ा गुणवत्तेची नाटके आली तर मराठी प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे खेचला जाईल, असा आशावादी सूर आला.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
Monday, August 1, 2011
नाट्यसंगीताचा जुना खजाना
संगीत नाटकातले संगीत आजही ऐकले जाते
-डॉ. सुहासिनी कोरटकर
बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.
संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.
सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.
संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.
-डॉ. सुहासिनी कोरटकर
बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.
संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.
सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.
संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.
Wednesday, July 27, 2011
कलावंत विवेकाला स्पर्श करतो
-कवी ग्रेस
कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.
अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.
कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.
अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.
Tuesday, July 26, 2011
आजी मी नवल पाहिले....
संगणक क्षेत्रात मोलाचे काम करणारे दिपक शिकारपूर यांना मसाप तर्फे गो.रा. परांजपे पुरस्कार ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर यांचे हस्ते देण्यात मंगळवारी देताना गुरू-शिष्याचे एक वेगळे नाते मनाला अधिक भावले.
सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेतले शिक्षक तपस्वी सर. या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित होते.
त्यांनी दिपक माझा विद्यार्थी होता. पण मी आज त्याचा विद्यार्थी बनलोय. तो जेव्हा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणच्या व्याख्यानात संगणकावर भाषण देतो. त्यांना संगणकाचे ज्ञान देतो. आणि मराठीत संगणक साक्षर व्हावेत यासाठी प्रयत्न करताना पाहिले की मला तो माझा विध्यार्थी नसून मी त्याचा विद्यार्थी असून हे शिक्षण त्यांच्याकडे घ्यावे असे वाटते.
गुरूदक्षिणा द्यायची पण ती घ्यायची ही वेगळी पध्दत मलाही भावली
आणि मसापत उपस्थित साहित्य रसिकांना न आवडली तरच नवल.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेतले शिक्षक तपस्वी सर. या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित होते.
त्यांनी दिपक माझा विद्यार्थी होता. पण मी आज त्याचा विद्यार्थी बनलोय. तो जेव्हा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणच्या व्याख्यानात संगणकावर भाषण देतो. त्यांना संगणकाचे ज्ञान देतो. आणि मराठीत संगणक साक्षर व्हावेत यासाठी प्रयत्न करताना पाहिले की मला तो माझा विध्यार्थी नसून मी त्याचा विद्यार्थी असून हे शिक्षण त्यांच्याकडे घ्यावे असे वाटते.
गुरूदक्षिणा द्यायची पण ती घ्यायची ही वेगळी पध्दत मलाही भावली
आणि मसापत उपस्थित साहित्य रसिकांना न आवडली तरच नवल.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Monday, July 25, 2011
शब्दप्रधान गायकीवर भर देणारे आजचे संगीत
-आरती अंकलीकर-टिकेकर
‘‘शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधीन गायकी, जी ख्याल गायकी म्हणूनही प्रसिध्द आहे. ती अतिशय सूक्ष्म आणि तरल आहे. तीला शब्दांची गरज नाही. पण आजचा प्रवास आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणूनच आज शास्त्रीय गायकालाही शब्दप्रधान गायकीकडे जावे वाटते. त्याचा अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.
‘सांस्कृतिक पुणे’च्या वतीने ‘आकांक्षा क्रिएशन’निर्मित ‘मी प्रेमिका’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन अंकलीकर यांच्या हस्ते रविवारी एस एम जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, अल्बमच्या गायिका कस्तुरी पायगुडे-राणे, संगीत संयोजक मिलिंद गुणे उपस्थित होते. अल्बमचे संगीतकार, गीतकार अभिजित कुंभार आहेत, मात्र ते कॅलिफोर्नियात असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे आई-वडिल हजर होते.
अंकलीकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा माईक संगीतात आला, तेव्हा शास्त्रीय गायकही आपला आवाज त्यातून कसा जातो, फ्रिक्वेन्सी कशी आहे या गोष्टींचा विचार करू लागला. तेव्हा शास्त्रीय गायकीत शब्दांच्या उच्चारावर भर देण्याचे वळण आले. त्यावेळी शास्त्रीय गायकही शब्दप्रधान गाणे उत्तम गाऊ शकतो हे समोर आले. शास्त्रीय गायक तसेच रागधारीची साधना करणारा प्रत्येक गायक हा उत्तम संगीत दिग्दर्शक असतो. कारण प्रत्येक आवर्तन म्हणजे एकेक क्रिएशनच असते.``
आजकाल कोणतेही गाणे अनेक वेळा ऐकले की, आपल्याला त्याची सवय होते आणि तो गायक/गायिका उत्तम गातात, असा समज होतो. मात्र, आजकाल गाणे येत नसलेलेही या ‘हॅमरिंग’मुळे प्रकाशझोतात येतात व त्यांचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. त्यामुळे पालकांना कळकळीचे सांगणे आहे की, मुलांना उगाच काहीही न ऐकवता दर्जेदार संगीत ऐकवा, अशी सूचना ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केली.
`कस्तुरीचा नितळ, निकोप व ताजा आवाज असून तो ध्वनीमुद्रणासाठी अतिशय उत्तम आहे.ही दैवी देणगीच आहे,`` असे मत आनंद मोडक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ताजेपणा, ताजगी सहसा सापडत नाही. कृत्रिमता वाढत आहे. जेव्हा माणसातील विद्यार्थी संपतो त्यावेळी त्यातील कलावंतही संपतो. कस्तुरीचा विद्या शिकण्याचा हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू रहावा,’’ असा आशिर्वादही मोडक यांनी दिला.
आपण अल्बममधील सर्व गाणी ऐकली असून पूनावाला म्हणाल्या, ‘‘.कलाकाराला सर्व प्रकारचे गाणे गाता येणे आवश्यक आहे. ज्यांना रसिकांच्या पसंतीप्रमाणे गाता येते तो खर्या अर्थाने कलाकार आहे असे मला वाटते. रसिकांना समाधान देता येणे आवश्यक आहे ’’ तशीच ती झाली असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखविले.
प्रकाशनानंतर या सीडीमधली तीन गाणी कस्तुरी पायागुडे-राणे यांनी प्रत्यक्ष सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवून आपली गायकीतली तयारी सिध्द करून दाखविली. .आपल्या गायकीचा प्रवास व सीडीच्या वाटचालीबद्दलचे मनोगतही सूत्रसंचालक अरूण नूलकर यांनी विचारलेल्या प्रश्नातून व्यक्त झाले .
संगीत संयोजक मिलिंद गुणे हे ही या संवादात सामिल झाले होते.
सीडीसाठी सहाय्य केलेल्या सर्वांचाच सक्तार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी एस एम जोशीत गर्दी केलेल्या उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट केले.
http://www.facebook.com/?sk=lf#!/photo.php?fbid=196818063706914&set=a.132694696785918.32502.100001361659055&type=1&theater
‘‘शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधीन गायकी, जी ख्याल गायकी म्हणूनही प्रसिध्द आहे. ती अतिशय सूक्ष्म आणि तरल आहे. तीला शब्दांची गरज नाही. पण आजचा प्रवास आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणूनच आज शास्त्रीय गायकालाही शब्दप्रधान गायकीकडे जावे वाटते. त्याचा अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.
‘सांस्कृतिक पुणे’च्या वतीने ‘आकांक्षा क्रिएशन’निर्मित ‘मी प्रेमिका’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन अंकलीकर यांच्या हस्ते रविवारी एस एम जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, अल्बमच्या गायिका कस्तुरी पायगुडे-राणे, संगीत संयोजक मिलिंद गुणे उपस्थित होते. अल्बमचे संगीतकार, गीतकार अभिजित कुंभार आहेत, मात्र ते कॅलिफोर्नियात असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे आई-वडिल हजर होते.
अंकलीकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा माईक संगीतात आला, तेव्हा शास्त्रीय गायकही आपला आवाज त्यातून कसा जातो, फ्रिक्वेन्सी कशी आहे या गोष्टींचा विचार करू लागला. तेव्हा शास्त्रीय गायकीत शब्दांच्या उच्चारावर भर देण्याचे वळण आले. त्यावेळी शास्त्रीय गायकही शब्दप्रधान गाणे उत्तम गाऊ शकतो हे समोर आले. शास्त्रीय गायक तसेच रागधारीची साधना करणारा प्रत्येक गायक हा उत्तम संगीत दिग्दर्शक असतो. कारण प्रत्येक आवर्तन म्हणजे एकेक क्रिएशनच असते.``
आजकाल कोणतेही गाणे अनेक वेळा ऐकले की, आपल्याला त्याची सवय होते आणि तो गायक/गायिका उत्तम गातात, असा समज होतो. मात्र, आजकाल गाणे येत नसलेलेही या ‘हॅमरिंग’मुळे प्रकाशझोतात येतात व त्यांचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. त्यामुळे पालकांना कळकळीचे सांगणे आहे की, मुलांना उगाच काहीही न ऐकवता दर्जेदार संगीत ऐकवा, अशी सूचना ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केली.
`कस्तुरीचा नितळ, निकोप व ताजा आवाज असून तो ध्वनीमुद्रणासाठी अतिशय उत्तम आहे.ही दैवी देणगीच आहे,`` असे मत आनंद मोडक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ताजेपणा, ताजगी सहसा सापडत नाही. कृत्रिमता वाढत आहे. जेव्हा माणसातील विद्यार्थी संपतो त्यावेळी त्यातील कलावंतही संपतो. कस्तुरीचा विद्या शिकण्याचा हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू रहावा,’’ असा आशिर्वादही मोडक यांनी दिला.
आपण अल्बममधील सर्व गाणी ऐकली असून पूनावाला म्हणाल्या, ‘‘.कलाकाराला सर्व प्रकारचे गाणे गाता येणे आवश्यक आहे. ज्यांना रसिकांच्या पसंतीप्रमाणे गाता येते तो खर्या अर्थाने कलाकार आहे असे मला वाटते. रसिकांना समाधान देता येणे आवश्यक आहे ’’ तशीच ती झाली असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखविले.
प्रकाशनानंतर या सीडीमधली तीन गाणी कस्तुरी पायागुडे-राणे यांनी प्रत्यक्ष सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवून आपली गायकीतली तयारी सिध्द करून दाखविली. .आपल्या गायकीचा प्रवास व सीडीच्या वाटचालीबद्दलचे मनोगतही सूत्रसंचालक अरूण नूलकर यांनी विचारलेल्या प्रश्नातून व्यक्त झाले .
संगीत संयोजक मिलिंद गुणे हे ही या संवादात सामिल झाले होते.
सीडीसाठी सहाय्य केलेल्या सर्वांचाच सक्तार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी एस एम जोशीत गर्दी केलेल्या उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट केले.
http://www.facebook.com/?sk=lf#!/photo.php?fbid=196818063706914&set=a.132694696785918.32502.100001361659055&type=1&theater
Subscribe to:
Posts (Atom)














