subhash inamdar

subhash inamdar

Sunday, January 23, 2011

एक संगीत पर्व संपले

भारतरत्न  पुण्याचे भूषण ,  महान गायक पंडित भीमसेन जोशी गेले. एक संगीत  पर्व कळाच्या गर्भात विलीन झालं. आज सारे  संपले . आत्ता या आठवणी राहिल्यात . त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली .......
<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/kdbvcbZdxtI" frameborder="0" allowFullScreen></iframe>

<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/8R2yZ6y3hh4" frameborder="0" allowFullScreen></iframe>

http://www.globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=Bhimsen%20Joshi&tids=0,5506712509135488087,5060566011251361294,5447696554755719603,5170635957767812886,5127359839747431259,5548366103156939539,5604804497845949342,5101812270810349130,4640785095341005123,5675418674567738575,4730031326987350216,4780720166056020515,4628038796222279931,5198858104487289086,5674668785249559224,5558074667278302018,5172064834922574394,5621702332139356724,4725697195635068073,5558925546597756296,5369305732371131333,5602772693526687996,5588948344007405878,5561211668557565560,4810319213738758682,5661161630309330377,5312962015630323190,5515997034722889046,5188397739653955290,4823246810731913828,5320844758689228211,4749239412603676997,5344266290381956696,5137212310423852887,5725003225769350762,5532498561920983606,5764352281756257896,5120882183704419468,5601993655609600935,4729040589313981387,5673544752702928854,5749543917518204904,4703408697083575156,4783576594666806986,4976462172605039391,5743443892838652993,5134092423991276153,4754

Wednesday, January 19, 2011

चंगळवादाच्या विळख्यात कलांची अवस्था बिकट

 डॉ. अरूणा ढेरे
डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठानामार्फत दिला जाणारा, साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा एक लक्ष रूपयांचा पुरस्कार डॉक्टर अरूणा ढेरे यांना रविवारी १६ जानेवारीला ज्येष्ठ समीक्षक-साहित्यिक चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आला. याप्रसंगी अरूणा ढेरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी हे प्रतिष्ठान साहित्याच्या गौरवाबरोबरच सामाजिक भान ठेवून ही परदेशस्थ माणसे कृतिशिल स्वायत्त संस्थांचा एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत याबद्दल अभिनंदनही केले.  त्यांच्या भाषणातला काही भाग मुद्दाम सर्वांसाठी देत आहे....


प्रेमाच्या पहिल्या उच्चाराइतकचं उत्कट गाईन म्हणते मी सारे काही स्वतःमधून
आणि देवाची फूलसुपारी पदरात न्यावी जपून, वारीच्या लोटत्या गर्दी मधून
तशी नेईन म्हणते कविता भवतीच्या कोलाहालातून...
ही दिंडी खरं तर अजून पंढरपूरला पोचलेली नाही. वाटेतच आहे. पण वाटेत कुणीतरी थांबते. ते जेऊ घालतं, पाणी पाजतं आणि म्हणतं, ` बाई, इथवर आलिस ! शाबास तुझा ! आता धरला नेम सोडू नको. `
आज मिळालेला हा पुरस्कार असा आहे... अशा पुरस्काराचं जसं व्यक्ति म्हणून लेखकाच्या वैयक्तिक वाटचालित स्थान असतं तसं आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जगातही एक स्थान असतं. एखादी मोठी पडझड चालू असताना जो गोंगाट आणि कोलाहाल असतो, त्यातून घातल्या गेलेल्या या दिलाशांच्या हाका असतात. काही चांगलं टिकलेलं आहे, वाचलेले आहे, काही सांभाळलं गेलं आहे, काही नव्याने निर्माण होत आहे- ह्यासाठी समाजाला हाक मारून हे सांगणं आहे.
पडझड तर गेल्या १००-१५० वर्षात अनेक प्रकारची झाली. घट्ट आणि चिरेबंदी कुटुंबव्यवस्थेची झाली. घातक आणि अन्यायी जातिव्यव्स्थेची झाली. आग्रही आणि एकाधिकारी धर्मव्यवस्थेची झाली. स्त्रीच्या कृतिम प्रतिमेची झाली. तिच्यासाठी निषिध्द अशा व्यवस्थेतल्या अनेक परिसरांमध्ये तिच्या अस्तित्वाला जागा निर्माण करून देण्यासाठी झाली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये झाली. साहित्य आणि इतर कलांमधल्या संकुचित भूमिकांचीही झाली.
ही पडझड आवश्यकच होती. पण त्याचबरोबर काही विधायक गोष्टींनाही धक्का लागला आहे. नुसत्या भौतिकवादाच्या नव्हे तर चंगळवादाच्या विळख्यात वाड्मयाची आणि खरे तर सर्वच कलांची अवस्था बिकट होत चालली आहे. जीवनाच्या संदर्भात कलेच्या निर्मितीचा आणि परिणामकतेचा विचार गौण ठरतो आहे आणि साहित्याला काय आणि इतर कलांना काय विक्रयमूल्य देण्याच्य़ा प्रक्रियेला गेल्या दोन दशकांमध्ये कमालीचा वेग आला आहे.
माणसाच्या जगण्यातही नैसर्गिकता नष्ट होण्याची प्रक्रिया काही आजच सुरू झालेली नाही. मानवी संस्कृतिच्या विकासात लगटूनच मानवेतर सृष्टीपासून माणूस दूर होण्याची प्रक्रिया अखंड सुरू आहे. आपला सांस्कृतिक विकास म्हणजे एका बाजूनं प्रचंड भौतिक प्रगतिचा इतिहास आहे. दुस-या बाजूने मानवजातीनं मानवेतर सृष्टीवर मिळवलेल्या वर्चस्वाचा इतिहास आहे.
आपण जीवनाच्या जवळ असण्याला, सृष्टीच्या लयीत असण्याला, चैतन्याचा विस्तारशील अनुभव घेण्याचा उर्मिला कसे पारखे आणि विन्मुख होत आलो आहोत याचा इतिहास आहे. आपण सर्जनाच्या प्रवाहांची मुखं बंद करीत आलो आहोत. शतकानुशतकं आपण स्त्रियांचा, आदिवासींच्या, व्यवस्थेच्या तळाशी असणा-या माणसांचा आवाज दडपत आहोत. आपण अत्यंतिक व्यक्तिवादाच्या टोकावर चढताना सामूहिक जगण्याचं वळण नव्हे तर भानही गमावत चाललो आहोत.
साहित्यिक म्हणून या भौतिक वास्तवाचा आवाज शब्दात उमटवण्याची जबाबदारीही आम्हा लेखकांची आहे. भोवतालच्या सपाटीकरणाच्या गजबज गर्दीत आपला आवाज आणि आपला अनुभव यांचं प्रामाण्य ठेवून मनुष्यकेंद्री निर्माणात गुंतलेला साहित्यकार हे काळानं निर्माण केलेल्या संहारप्रधान प्रश्नांना सगळ्यात समर्पक आणि सर्जक उत्तर असू शकते ,असा माझा विश्वास आहे.
माणसाला जगायला, टिकायला, समृध्द व्हायला उपयोगी पडणारा या जगातला प्रत्येक लहान मोठा स्त्रोत वाचवू पाहणा-यांची जी एक अल्पसंख्य जमात आहे त्यात मी अभिमानानं सामिल आहे.
यासाठी माझ्याजवळ मदतीला आहे तो शब्द आहे.  शेवटी आपलं साहित्य किती टिकेल किंवा किती गाजेल याचा विचार करून आपण लिहित नसतोच. समाजातल्या उदार, समन्वयशील, विधायक रीतीने बंडखोर आणि कसदारपणे परिवर्तनशील अशा विचारधारांचा, संस्थांचा आणि व्यक्तिंचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अभिजतांच्या संस्कृतिला बळ देणा-या लोकसंस्कृतीक बंध-अवबंधांचा शोध घेते आहे. परंपरेच्या जड अशा संदर्भाचौकटीतून भारतीय स्त्रीला बाहेर काढून तिचा जिवंत, संवेदनशील चेहरा न्याहाळण्यासाठी धडपडते आहे.
माझ्या कवितांमधून, कथांमधून, ललित-गद्यामधून—एकूणच सगळ्या लेखनातून स्त्रीविषयक आस्थेचा एक पाझर आहे असं इतरांप्रमाणे मलाही कळतं. पण मला असं खात्रीनं वाटतं की, प्रेम आणि सर्जन या दोन्ही गोष्टींशी आतड्यानं बांधली गेलेली स्त्री आजच्या अस्थिर, पोखरलेल्या आणि तुटलेपणाचा शाप भोगणा-या जगात निर्माणाच्या बाजूनं ठामपणे उभी राहू शकते.
साहित्य ही माणसाला माणूस बनवणारी गोष्ट आहे यावर माझा विश्वास आहे.
आण तूझ्या लालसेची, आण लोकांची आभागी
आण माझ्या डोळियांची, पापणी ठेवीत जागी
मर्ढेकरांच्या या शपथेवर माझा विश्वास आहे. कविता ही आयुष्याचा चेहरा उजळून टाकणारी सोबत आहे यावर माझा विश्वास आहे. माणसांमधल्या आणि माणूस आणि सृष्टी यांच्यामधल्या संवादाच्या शक्यता शोधत राहण्यावर माझा विश्वास आहे.
जातिवंत कार्यकर्त्यांप्रमाणेच जातिवंत लेखकालाही काळानं समोर उभ्या केलेल्या दुःखांचं आणि संकटांचं भय वाटता कामा नये. फक्त त्यातला मनुष्यमैत्रीचा स्पर्श घडविणारी दुःखं नेमकी हेरता आली पाहिजेत. चैतन्यशील संकटं हेरता आली पाहिजेत आणि इतिहासाचा कौल आपल्या बाजूनं मागता आला पाहिजे.
हे शब्द तुमच्या पर्यत पोचविणारा मी नाममात्र....
सुभाष इनामदार,पुणे
<iframe title="YouTube video player" class="youtube-player" type="text/html" width="440" height="240" src="http://www.youtube.com/embed/AY_Qd0-i7X4" frameborder="0" allowFullScreen></iframe>




-

Thursday, January 13, 2011

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला !

मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे. कट्यार सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे.....आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे....ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांचे निधन झाले...

आणि रंगभूमिवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.


तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...

ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले,,, काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.



नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक.....सारेच....पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले..सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी..इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोहा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रेंयांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.

पुरुषोत्तम दारव्हेकर..पं. वसंतरांव देशपांडे...पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले...याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच...

असा कलावंत...असा निर्मिता... फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे...नाट्यरिषदेला स्वतःचे बळ देणारे सामाजिक भान आणि मराठी समस्कृतीवर प्रेंम करणारे कलावंत म्हणून ...

आणि अवघ्या काही प्रयोगाचून तो एक राजहंस हे कर्णीच्या जीवनावरचे नाटक धाजसाने निर्माण करणारे....ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी...

सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने....

आज नाट्यसंपदा अवघा रंग एकची झाला...ने कार्यरत..आहेच

पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही...

मराठी रंगभूमिवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत...आज काळाच्या पडद्याआड गेला....
त्यांच्या आठवणीतून तो दिसणार...

त्यांच्या तो मीच... या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील...त्यांच्या भुमिकांची आठवण मनात साठवूल

या निर्माता, कलावंत आणि नाटकासाछी आयुष्य वेचणा-या या महान साधकाला....श्रध्दांजली.........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

www.culturalpune.blogspot.com

www.subhashinamdar.blogspot.com

Mob. 9552596276

Monday, January 10, 2011

www.culturalpune.blogspot.com

उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि  विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.
भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी  साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे...
हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद.

सुभाष इनामदार, पुणे

Thursday, January 6, 2011

मटा संस्कृतीचा `स्मार्ट` उदय

शुकवार पासून पुण्याच्या वृत्तपत्रसृष्टीत नवी मटा संस्कृती उदयाला आली आहे. तिचे अस्तित्व काही पारंपारिक पायंड्यांना कदाचित धोका निर्माण ठरू शकेल. याचे उत्तर काळच देईल. पण एक नक्की अशा नव्या रूपाची.. नव क्षितीजांची गरज पुण्याच्या वाढत्या शहराला नक्कीच होती. ती गरज महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीने ओळखली आहे.
तिचे रूप आकर्षित आहे.. तिचा चेहरा सुंदर मेकअप केलेल्या पुणेरी मुलीने अधुनिकतेचे पण साजेलशे रुप घेणा-या नवरूणीसारखे मोहक आहे. तिच्या मजकुरात नव्या तरूणाईचे पडसाद आहेत. तिला ज्यागोष्टी हव्याश्या वाटतात याचे सादरीकरण आहे....
मात्र परंपरेला जपणे ती वाढविणे आणि वृध्दिंगत करणेही तेवढेच महत्वाचे आहे..याची जाणीव या नव्या पारंपारिक वृत्तपत्रांच्या कचेरीतून काम करून समृध्द झालेल्या पत्रकारांनी जाणले असेलच...
काळाचा बोजा...आता दिवसेंदिवस वाढणारा आहे...तो न पेलणारा आहे.. नवी माध्यमे आपलेही काही  ठसे तरूणाईवर कोरणार आहे...तीही काळाची गरज आहे.
आकर्षक छपाईच्या तंत्रांनी अनेक ठिकाणी होणा-या छोट्या समारंभाची दखल इथे घेतली गेली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्राचा परिपूर्ण विचार करता..
आज वाचकात तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग आधिक आहे...जो आपल्या काही नवेपणाचे क्षेय सर्वापर्यंत जावे वाटणारा... ज्याला कलांच्या नवदालनात अजून अडखळल्यासारखे वाटते. ज्याला स्थानिकातही जागा हवी असते.. ज्याचे लक्ष सदाशिवपेठी पुणेरी माणसारखे चाणाक्ष असते....
`शीला की जवानी` बरोबरच त्याला विविध ठिकाणी घडणारे चांगल्या उपक्रमाला प्रसिध्दी हवी असते. त्याला त्या पारंपारिकतेचा ..तिथल्या मक्तेदारीचा....थोड्या आगावूपणाचा तिटकारा आहे...त्या सर्वांना ही नवी मटासंस्कृति कशी सामावून घेणार आहे ?
पुण्यात नवा `आदर्श` देताना ह्या आमच्या `स्मार्ट मित्रा`ला तमाशातला नाचा म्हणून मिरवायचे नाही तर त्याचे खरे सांस्कृतिक बळ सिध्द करायचे आहे..
आमच्यासारखे असंख्य मित्र साथीला आहेतच..पण त्याला नवेपणाचा भपका आणताना परंपरेला धरून प्रसंगी त्याची संस्कृतिक मूल्ये वाढवायची आहेत.
खात्रीने तो ती पूर्ण करेल आणि असंख्य वाचकांच्या घरात केवळ अकरा रूपयात चार महिने दिसणारा हा.. हा.. मित्र आपली खरी गरज भागवून तुमच्या घरचाच सखा बनेल.. तो बनावा हिच सदिच्छा.

आपला मटाप्रेमी,
सुभाष इनामदार, पुणे
9552596276

अभिवाचनातून वेदनेचा पुन:प्रत्यय

आदरणीय वीणाताई यांस,

मी केदार केसकर. पुण्याचा रहिवासी. पुण्यातील झेन्सार या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यामुळे मराठीची ओढ शांत बसू देत नाही. वेळ मिळेल तसा काहीतरी लिहित असतो, वाचत असतो, विचार करत असतो.

गोनीदांच्या साहित्यातील 'शितू' मी सर्वप्रथम वाचली. त्यानंतर - दिवस मी भयंकर काढले. शितू डोक्यावरून खाली उतरण्यास तयारच होईना. एखाद्या मुलीशी कधी संवाद करण्याचा प्रसंग आल्यास वाटायचं, 'शितू'इतकी सोशिकता, सोज्वळपणा, सौंदर्य, समजूतदारपणा या मुलीत असेल काय? बराच काळ मनात खोलवर कुठेतरी काहीतरी अगम्य चालू होतं. आजकाल ही अशी निरागस व्यक्ती मिळणं अवघड आहे. त्यात आमची पिढी संपणार्‍या स्पर्धेमुळे, आर्थिक ओढाताणीतून, पेलणार्‍या जबाबदार्‍यांमुळे त्रस्त आहे आणि या खरं तर नको असलेल्या अतिव्यस्ततेमुळे आम्ही थकून गेलो आहोत. म्हणून बोलता समजून घेणारं कोणीतरी असावं असं खूप वाटतं.

 शितू अजुनही मनाच्या कोपर्‍यात लपून बसलेली आहे ते त्यामुळेच. गोनीदा, कुसुमाग्रज, विंदा, पुल, ना. सि.फडके, भा. रा. तांबे या सार्‍या मोठ्या लेखकांना, कादंबरीकारांना, कविंना भेटण्याची संधी मिळणं ही आमच्या पिढीची मोठी शोकांतिका आहे आणि म्हणूनच हा अभिवाचनाचा कार्यक्रम पहाण्याची संधी मला लाभतेय हे मी माझं भाग्य समजतो.

परवा "पडघवली" ऐकण्यासाठी मी आलो होतो पण जागा मिळाली नाही म्हणून काल जरा लवकरच आलो. कुणा एकाची भ्रमणगाथा ऐकली. तशी ही कादंबरी मी बरीच आधी वाचलेली आहे. ही कादंबरी लिहीली गेली त्यावेळेस मी फक्त उणे २५ वर्षांचा होतो. पण आज ह्या कादंबरीचं तुम्ही केलेलं छंदबद्ध अभिवाचन ऐकून मी त्यात पुन्हा कुठेतरी हरवून गेलो. त्यातील वेदनेच्या नितळ दर्शनाने हरखलो. हादरलो. पुरता हादरलो. या अनुषंगाने मनात घोळणारे विचार आपल्याला कळवावेसे वाटले. मी वयानी लहान आहे म्हणून माझ्या बालबुद्धीला पेलणारे काही प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरेही बहूतेक त्या प्रश्नांमध्येच दडलेली असावीत. वेळ येईल तेव्हा ती मिळतील असं वाटतं.


"
विपदस्सन्तु : शश्वत्" या मागील कुंतीची भूमिका मला काल जाणवली. कळली असे मी म्हणणार नाही. वेदना... सार्‍या सुखाचा उगम बहूतेक या वेदनेपोटीच होत असावा. म्हणजे सुख हे सुद्धा वेदनेचे रूप? आणि आनंदाश्रू म्हणजे? का ती ही वेदना? म्हणूनचं का प्रसूतीच्या वेळेस होणार्‍या दु:खाला प्रसववेदना म्हणतात?मला दहावीत एक कविता होती. कुणाची होती हे आता आठवत नाही.
दु: नको टीचभर हृदयाचे
दु: नको ओंजळभर प्रीतीचे
दु: असे द्या विशाल निजकवेत
येईल क्षितिजासह हे वर्तुळ...

दु: जेव्हा व्यापक, सर्वसमावेषक आणि उदात्त होतं त्यावेळेस वेदनेचा जन्म होतो का? खरतर वेदना हे दु:खाचं बाळ. पण कधीतरी एखाद्या समंजस पोरीने आपल्या आईबापाला समर्थपणे साथ द्यावी असं हे रूप. दु:खापेक्षा वेदना अधिक जवळची वाटते ती बहूतेक यामुळे. पुन्हा वेदनेचा हुंकार वेदनेच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतो. वेदनेची प्रगल्भता जितकी अधिक तितका हुंकार अधिक स्पष्ट आणि जितका हुंकार अधिक स्पष्ट तितकी त्यातून उमटणारी स्पंदने अधिक तीव्र. मग ती स्पंदने दुसर्‍याला जाणवतात पण तोपर्यंत परिस्थिती गंभीर होऊन बसते. यशोदेने शेवटी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गोनिदांनी यशोदेला "नाही यशोदे, मी आता मागे फिरून तुला लहान करणार नाही" असं म्हटलं या वेळेस त्यांच्या वेदनेतील प्रगल्भतेचं दर्शन मला झालं. "दुरितांचे तिमिर जावो" हे मागणं माऊलींनी मागितलं ते या अलौकिक वेदनेच्या पोटीच का?

हे असे प्रश्न  माझ्या डोक्यात घोळत आहेत. तुमच्या अभिवाचनातून या नितांत सुंदर वेदनेचा पुन:प्रत्यय तुम्ही मला दिलात म्हणून मी तुमचा ऋणी आहे. जन्मच जर वेदनेपोटी होत असेल तर ही वेदना मनुष्यजन्माला कर्णाच्या कवच कुंडलांसारखी चिकटून रहाणार हे उघड आहे. पण त्या वेदनेचा हुंकार कान देऊन ऐकणारे जगात बोटांवर मोजण्याइतके आहेत. ज्यांना तो ऐकू येतो ते जाणतात की वेदना सरून गेली की संवेदना उरते आणि माणसाचा व्यास अजूनच मोठा होतो. आकाशावेरी गेलेली ही माणसं... यांना काय म्हणायचं?

दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करायचा एवढच्!

तुमचा नम्र,
केदार केसकर

Tuesday, January 4, 2011

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशे


ती पडघवली..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.

निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....
ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.


सुभाष इनामदार,पुणे
Mob. 9552596276