subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, April 3, 2012

अजुनही काम करण्याची जिद्द असणारे डॉ. लागू

मसालात तिन दिग्गज एकत्र

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे तीन दिग्गज कलाकार मसाला चित्रपटाच्या बॅनवर झळकणार आहेत. डॉ..श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि दिलिप प्रभावळकर.

२० एप्रिलपासून महाराष्ट्रात प्रदर्शीत होणा-या मसाला या प्रविण मसालेवाल्यांची निर्मिती असलेल्या आणि संदेश कुलकर्णी यांनी प्रथमच दिग्दर्शन शक्षेत्रात पाऊल टाकलेल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी आयोजित केलेल्या संवादाच्या निमित्ताने एकत्र एकाच व्यासपीठावर झळकले.

ह्या तिन्ही थोर कलाकारांनी चित्रपटात असणं हेच आमच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श भारावलेला आणि मोहारलेला आहे. त्यांच्या असण्यानं आम्ही पुवकित झालोय असं गिरीश कुलकर्णी यांना वाटतं.


नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या भूमिकांची वजने सांभाळणारे हे तिन्ही कलाकार कुठल्याही भूमिकेत कसे वावरतात. त्याचा आभ्यास ते कसा करतात. हे सांगताना या चित्रपटात डॉ. लागूंनी अत्तरवाल्या दुकानदाराची भूमिका वठविली आहे. ते ज्या पध्दतीने भूमिकेचे आकलन करुन घेतात..ते आजही अनेक नट गंभीरपणे घेत नाहीत असे डॉ. आगाशे यांना वाटते.

स्वतः डॉ. लागू पॉल मुनीच्या अभिनयाने भारावलेले आहेत. मराठीत गजानन जाहगिरदार यांचेही ते नाव घेतात. कुठलिही भूमिका करताना त्या भूमिकेचे तुम्ही घटक बनता. तुम्ही ती व्यक्तिरेखा बनता. तुम्ही कोण हे विसरुन त्या व्यक्तित्वात स्वतःला पाहता. यातही एक छोटी भूमिका केली आहे. अजूनही मी माझे आतले मन जेव्हा एखाद्या भूमिकेत काम कर असा कौल देते तेव्हा मी ती स्वीकारतो. आजही आपण भूमिका करतो आणि पुढेही करणार असेच त्यांनी सांगितले.


डॉक्टरांच्या सोबत आपले नाव झळकणे आणि ते भूमिका करताना अनुभवणे हा एक चांगला अनुभव या निमित्ताने आपण घेतल्याचे मोहता या भूमिकेतू मसाला मध्ये झळकणारे डॉ. आगाशे अभिमानाने सांगतात.


दिलिप प्रभावळकर एका संशोधकाची भूमिका करताहेत. चित्रपट आनंदासाठी तयार केला आहे. जीवनाक़डे आनंदी पाहण्य़ाची वृत्ती त्यांच्याकडून प्रेक्षकांना मिळणार आहे. वेगळ्या भूमिकेचा हा रोल आहे. आम्ही तिघे या निमित्ताने प्रथमच एकत्र आलो आहोत. असेही प्रभावळकर सांगतात.

अशा कलावंतांचा स्पर्श लाभून आम्हीला प्रेरणा मिळाली. त्यांचा आशीर्वाद यानिमित्ताने मिळाल्याचे भाग्य शब्दातून उमेश कुलकर्णी प्रकट करतात.

subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276



`मसाला’ चित्रपटात डॉ. लागू `इद्रीस भाई’ नावाच्या एका `अत्तरवाल्याच्या’ भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. लागू यांच्या या भूमिकेबाबत बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, की जेव्हा त्यांना आम्ही मसालातील या भूमिकेबाबत विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार तर दिलाच शिवाय या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता दर्शविली.
ज्या दिवशी त्यांचे चित्रीकरण होते त्यादिवशी या वयातही त्यांचा उत्साह पाहून सर्वजण आचंबित झाले होते. दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगितल्यानंतर त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांनी शॉट्स दिले. त्यांची कामाची शिस्त आणि कामावर असलेली निष्ठा खूपच प्रेरणा देणारी होती. त्यामुळे सेटवरील त्यांची उपस्थिती ही आमच्या दृष्टीने अतिशय प्रसन्नदायी ठरली.
`मसाला’मध्ये गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषीकेश जोशी, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे आदी कलाकारांसोबत डॉ. लागूचे दर्शन चित्रपट रसिकांना घडणार आहे.
मसाल्याची सिनेमॅटोग्राफी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर एच.एम. रामचंद्र यांची असून संकलक अभिजीत देशपांडे यांचे तर संगीत आनंद मोडक यांनी दिले आहे.

Monday, April 2, 2012

`व्हायोलिन गाते तेव्हा...`चा शुभारंभ ८ ला कोल्हापूरात

लोकबिरादरीच्या नीधीसाठी खास आयोजन
कोल्हापूर,१ एप्रिल- हेमलकसा इथल्या डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील प्रसिध्द व्हायोलिन वादक सौ. चारुशीला गोसावी आपला कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाटय्गृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. यात मराठी व हिंदी लोकप्रिय गाणी सादर केला जाणार आहेत. या कर्यक्रमाचा शुभारंभ कोल्हापूरातील ज्येष्ठ व्हायोलीन कलावंत आदरणीय श्री. डी. एन .जोशी यांच्या हस्ते होत आहे.

याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी कोल्हापूरात आज पत्रकार परिषदेत दिली.
हेमलकसा इथल्या आदिवासी भागात आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या कार्याला आपण कलेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा या हेतूने सो. चारुशीला गोसावी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
व्हायोलिन वादन क्षेत्रात सौ. गोसावी गेली ३२ वर्षे विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला पोचविली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनइल) मध्ये त्या कार्यरत असून त्यांना खात्या अंतर्गत होणा-या अ.भा. स्तरावरील शास्त्रीय संगीताच्या व्हायोलीन वादनाच्या स्पर्धेत सलग २२ सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत २५०० कार्यक्रमामधून व्हायोलीनचा साथ केली असून १०० चे वर स्वतंत्र व्हायोलीनवादनाचे कार्यक्रमही केले आहेत. आपले वडील व गुरू पं. भालचंद्र देव यांचेकडून त्यांनी हा कलेचा वारसा घेतला आसून भारभतभर विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमात अभंग, नाट्य़गीत, लावणी इत्यादी प्रकारही त्या व्हायोलीनमधून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक आनंद देशमुख यांचे असून त्याशीवाय इतर सहभागी कलावंतांमध्ये रविराज गोसावी (तबला), अमृता ठाकूरदेसाई ( सिंथेसायझर) आणि राजेंद्र साळुंके (तालवाद्ये) यांचा सहभाग असणार आहे.
कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. त्याची तिकीटे रूपये. १०० व ५० अशी असून ती शुक्रवार पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील. कोल्हापूरच्या गायन समाज देवल क्लबच्या सभासदांसाठी या कार्यक्रमासाठी विशेष सवलत दिली जाणार असून त्यांनी आपली तिकीटे देवल क्लबचा शिक्का मारुन थिएटरवरुन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा खर्च वजा जात सर्व रक्कम लोकबीरादरी प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. ज्यांना धनादेशाद्वारे मदत करायची आहे त्यांनी तो महारोगी सेवा समिती, वरोरा (Maharogi Sewa Samiti, Warora) या नावावर काढला तर तो स्विकारण्याची व्यवस्था नाट्यगृहावर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५९६२७६ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी केले आहे .
`सांस्कतिक पुणे`च्या वतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचे विविध शहरात करण्यात येणार आहेत.त्यातलाच हा कोल्हापूरात होणारा कार्यक्रम आहे.



आपले,

सुभाष इनामदार
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
सौ. चारुशीला गोसावी
Mob.9241019499
charusheelagosavi@gmail.com

Thursday, March 29, 2012

निळू फुले अकादमी पुण्यात



चित्रपट-नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला... ते बहुआयामी, बहुरूपी व्यक्तिमत्त्व होते... खरेतर अभिनयाचे विद्यापीठच होते... ते होते निळू फुले अर्थात, निळूभाऊ. त्यांच्या नावाची अकादमी पुण्यात उभी राहतेय.

"सामना', "सिंहासन', "जैत रे जैत' हे मराठी चित्रपट असोत किंवा "कुली', "सारांश', "मशाल'सारखे हिंदी चित्रपट असोत अथवा "सखाराम बाईंडर'सारखे नाटक असो. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी, नव्या पिढीला "अभिनय' समजण्यासाठी सेवा दलाने त्यांच्या नावाची अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
निळूभाऊंच्या अभिनयाचा प्रवास सेवा दलातील कलापथकापासून झाला.राष्ट्र सेवा दलाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, १५ एप्रिलपासून या अकादमीचा प्रारंभ होत आहे.



Nilu Phule was an Indian actor known for his roles in the Marathi language movies and Marathi theatre. Nilu Phule had acted in around 250 Marathi and Hindi movies during his film career.Nilu Phule began his theatrical career with the Marathi folk performances (loknatya).His first professional drama was Katha Akalecha Kandyachi, which went on to have over 2000 shows. It was based on this success that he was offered his first movie Ek Gaav Baara Bhanagadi, by Anant Mane in 1968.Nilu often played villains; most notably his portrayal of Sakharam Binder, an exploiter of women for sexual desires.Some of his notable film roles include: a power-drunk politician in Mahesh Bhatt's Saaransh, a political journalist in Jabbar Patel's Sinhasan, and a sugar tycoon in Jabbar Patel's Saamna.One of Phule's most notable theatrical performances include his role as the eponymous hero of Vijay Tendulkar's Sakharam Binder.Kamlakar Sarang, who directed the first production of the play in 1972, was apprehensive of Phule's reticence. However, he was convinced that Phule would be fit for the role, when Vijay Tendulkar reminded him of Phule's aggressive performance as a minister in another play, Katha Aklechya Kandyachi.According to Phule, his acting style was influenced by Hollywood films like Double Life, Gone With The Wind and Roman Holiday.Nilu Phule died on 13 July 2009, aged 78, from esophageal cancer. He is survived by his wife, Rajani Phule, and their daughter, Gargi Phule Thatte.

Wednesday, March 28, 2012

मृगजळाचे बांधकाम करणारे कवी ग्रेस


ग्रेस कुणाला कळले आणि कुणाला कळले नाहीत या युक्तिवादात आता तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण हा संध्यासूक्ताचा यात्रिक आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. तो निघून गेला आहे महानिर्वाणाच्या दिशेकडे. त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारणार्या अनेकांचे डोळे ते गेल्याने भरून आलेले असतील. ते मान्य करण्यासाठी सुद्धा दिलदारी लागते.

ग्रेस यांची कविता मला एक दिवस सहज भेटली. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि त्यातील गर्भितार्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्यानंतर हळूहळू जाणवत गेलं. कविता कुठलीही असू दे, त्यातील गूढरम्यता, भावविश्वता आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि सहसा तिथवर पोचू शकणार नाही अशा अमर्त्य भावविश्वाचं दर्शन घडवते.
हृदय कोरून बाहेर काढावं, त्याचे ठोके आपल्या समोर पडतांना पहावेत आणि आपण जिवंत आहोत का निवर्तलोय या असल्या संभ्रमात आपण पडावं असं काहीसं देखणं, मोहून टाकणारं, बर्याकच अंशी ठाव न लागणारं किंबहूना ठाव न लागु देणारं लेखन हे खूप आतूनच उमटावं लागतं. म्हणजे...

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
नभातूनही मंद तार्यावप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

ही कविता असू दे किंवा

देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही कारूण्याची धार


ही असू दे, त्यातील गांभीर्य आणि भावानुभुती हा केवळ अनुभव नाही. तो साक्षात्कार आहे. अनुभव शिळे होतात, साक्षात्कार नव्हेत.

अगदी त्यांच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सुद्धा ग्रेस म्हणतात...

संध्यामायेच्या शुभमकरोती ओंजळीतून सांडताना
तू अचानक, अवाक होऊन,
दरदरून थरथरलीस... मला प्रयाणाची दिशा दाखवीत...
तू थांबली असतीस तर या मृगजळात
एखादा रंगीत मासा तरंगू शकला असता...
तिरीप एकदा बुबुळात शिरली की मग ती
अश्रूंच्या आदेशानेही पापण्यातून खाली
सांडतच नाही; या सबब, शरमेवर तू नाही
थांबलीस !
पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे
शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच
अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पणही
यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ
असतात काय ? संभवतात काय?

माझ्या मते भाषेनी बहाल केलेली चौकट बर्या च वेळेला वर्तुळाकार असते. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कौशल्य स्वतःला अभिमन्यू समजणार्याट बर्यायच साहित्यिकांकडे नसतं. तीच करामत या भाषेच्या जादूगाराने करून दाखविली. वेदनेला केवळ दु:ख समजणार्याि महाभागांना ग्रेसची कविता समजायची नाही. अ़ज्ञाताच्या तळाशी बुडी मारण्यासाठी साहस लागतं. मनस्वीता लागते.

पुन्हा कवितेचं गाणं झालं, तरी गाणं त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यात शब्दकाराचा विजय आहे. तो विजय आहे या अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरूषाचा. ग्रेस जिंकले. मृत्युंजय ठरले ते त्या अर्थीसुद्धा.

ग्रेस म्हणजे एक गूढ. एखाद्या शापीत देवाच्या टेकडीवरील, वार्याववर किंचितही न हलणार्याा एका पोक्त, अनासक्त वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी ओलेती दिवा लावून जाते तसं काहीसं!



-केदार केसकर
keskarkedar@gmail.com




Tuesday, March 27, 2012

व्हायोलिन गाते तेंव्हा... कोल्हापूरात

कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत

दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे कोल्हापूरातल्या कै. केशवराव भोसले नाट्यगृहात
८ एप्रिल २०१२ रोजी ``सांस्कृतिक पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.

पुण्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ १२ फेब्रुवारीला झाला.त्यातून जमा झालेल्या रकमेतून
खर्च वजा जाता रुपये ५८,००० लोकबिरादरी प्रकल्पासाठी देण्यात आले.

सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.


वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी
येणारा अपेक्षित खर्च रु. ४०,००० (चाळीस हजार) एवढा आहे.
आपल्या सारख्या जाणकार आणि उदार संस्थांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.

`व्हायेलिन गाते तेव्हा.. `या आणि इतरही कार्याला व उपक्रमांना आपण
आपल्या सढळ आर्थिक सहकार्याची अपेक्षा बाळगून इथेच विराम घेतो.

आपला विश्वासू,



सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
9552596276

*( त्यांचा परिचय देणारी माहिती जोडत स्वतंत्रपण देत आहोत)

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशीला गोसावी

कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या
वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या
चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा
होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा
व्यक्तल करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही
ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत.
गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण
झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी
वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या
वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी
यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची
गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर
आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव
झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती
त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर"
आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी
एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी
दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र
शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार
व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे
महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार
म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन
मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले.
त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून
व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता
नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर
मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे
व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा
होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या
स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या
त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या
आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या
स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या
या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे
तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा
मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा
असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा
अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे





सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत

दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे कोल्हापूरात ८ एप्रिल २०१२ ला कै. केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता ``सांस्कृतिक पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.


सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.

वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत.

आपल्या सारख्या जाणकार आणि उदार रसिक आश्रयदात्यांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.या साठी आपणतर मदतीचा हात द्यालच.
पण इतरांना सांगून स्व.बाबा आमटेंनी स्थापन केलेल्या कार्यासाठी आपल्या मित्रांना
आणि माहितीच्या संस्थांनाही मदतीचे आवाहन कराल याची खात्री बाळगतो.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीही मदत स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे.




सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, March 26, 2012

ग्रेस सरांची एक आठवण-चंद्रशेखर गोखले


सांगावीशी वाटते... आमची प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधी आला नाही पण त्याना कायम माझी खबरबात कळायची, त्याची सूरूवात झाली ते मी `सामना`त सदर लिहायला लागलो तिथपासून, म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी...माझा एक मित्र मला `सामना`मधे घेऊन गेला आणि माझं पान नावाचं एक सदर मी दर शनिवारसाठी लिहायला लागलो.

अल्पावधीतच ते सदर अपेक्षेपेक्षा लोकप्रियं ठरलं मग ज्याला मी माझा मित्र समजत होतो त्यालाच
त्याचा त्रास व्हायला लागला. थोडक्यात पोटात दुखायला लागलं आणि घाणेरडं राजकारण करून त्याने माझं सदर
परस्पर रद्द करून टाकलं.

त्या नंतर एकदा ग्रेससर राऊत साहेबांना भेटले तेंव्हा त्यानी आवर्जून माझ्य़ा सदराबद्दल विचारलं म्हणाले का बंद केल? फार वेगळं लिहित होते ते वगैरे वगैरे.. राऊत साहेबानी मला हे आवर्जून सांगितलं आणि पून्हा मी `सामना`मधे नियमाने लिहायला लागलो...नंतर माझा कथासंग्रह आला मनोगत, तेंव्हाही ग्रेस सरानी संग्रह वाचल्यावर मला लगेच निरोप पाठवला कथा वाचल्या आवडल्या... पवईला आम्हा दोघाना शेजारच्याच इमारतीत सदनिका मंजूर झाली होती सात वर्ष आम्ही तिथे राहिलो पण तरी भेट झाली नाही पूढे आम्ही ते घर विकून चारकोपला स्थाईक झालो आणि काही दिवसातच मेहेंदळे सरांबरोबर निरोप आला चारकोप आवडल का?

मी हो म्हणत त्याना आगत्याचं घरी यायचं निमंत्रण दिलं ... पण योग नव्हता... गेला आठवडा मी आणि उमा
" वा-याने हालते पान"या त्यांच्या संग्रहाचे पारायणच करतोय...
भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे पठडीतली भाषा त्याना रुचायची नाही...त्यांचं स्मरण हिच त्याना श्रद्धांजली ठरेल..

विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी

स्वतःच्या कोषात दंग राहून विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी-माणूस . ग्रेस.


दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.

ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.

आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.

त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...

आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.

त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..

आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...

त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...

मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...

ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276