subhash inamdar
subhash inamdar
Monday, March 26, 2012
ग्रेस सरांची एक आठवण-चंद्रशेखर गोखले
सांगावीशी वाटते... आमची प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधी आला नाही पण त्याना कायम माझी खबरबात कळायची, त्याची सूरूवात झाली ते मी `सामना`त सदर लिहायला लागलो तिथपासून, म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी...माझा एक मित्र मला `सामना`मधे घेऊन गेला आणि माझं पान नावाचं एक सदर मी दर शनिवारसाठी लिहायला लागलो.
अल्पावधीतच ते सदर अपेक्षेपेक्षा लोकप्रियं ठरलं मग ज्याला मी माझा मित्र समजत होतो त्यालाच
त्याचा त्रास व्हायला लागला. थोडक्यात पोटात दुखायला लागलं आणि घाणेरडं राजकारण करून त्याने माझं सदर
परस्पर रद्द करून टाकलं.
त्या नंतर एकदा ग्रेससर राऊत साहेबांना भेटले तेंव्हा त्यानी आवर्जून माझ्य़ा सदराबद्दल विचारलं म्हणाले का बंद केल? फार वेगळं लिहित होते ते वगैरे वगैरे.. राऊत साहेबानी मला हे आवर्जून सांगितलं आणि पून्हा मी `सामना`मधे नियमाने लिहायला लागलो...नंतर माझा कथासंग्रह आला मनोगत, तेंव्हाही ग्रेस सरानी संग्रह वाचल्यावर मला लगेच निरोप पाठवला कथा वाचल्या आवडल्या... पवईला आम्हा दोघाना शेजारच्याच इमारतीत सदनिका मंजूर झाली होती सात वर्ष आम्ही तिथे राहिलो पण तरी भेट झाली नाही पूढे आम्ही ते घर विकून चारकोपला स्थाईक झालो आणि काही दिवसातच मेहेंदळे सरांबरोबर निरोप आला चारकोप आवडल का?
मी हो म्हणत त्याना आगत्याचं घरी यायचं निमंत्रण दिलं ... पण योग नव्हता... गेला आठवडा मी आणि उमा
" वा-याने हालते पान"या त्यांच्या संग्रहाचे पारायणच करतोय...
भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे पठडीतली भाषा त्याना रुचायची नाही...त्यांचं स्मरण हिच त्याना श्रद्धांजली ठरेल..
विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी
स्वतःच्या कोषात दंग राहून विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी-माणूस . ग्रेस.
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.
ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.
आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.
त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...
आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.
त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..
आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...
त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...
मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...
ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.
ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.
आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.
त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...
आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.
त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..
आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...
त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...
मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...
ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Sunday, March 25, 2012
कशीदाकाम केलेली साडी मन मोहवून घेते..
एके काळी घराघरात कशीद्याने काढलेले हातरुमाल, पडदे, टेवलक्लॉथ, इतकेच काय उशावरचे अभ्रे असायचे...पण आज ह्या सा-या घरगुती कला फारशा दिसत नाहीत. सारे काही.. नव्या दिशेला धावणारो..रंग, कलाकुलर आणि संगणकीय कळीतून उमटलेली डिझाईन...

आपण नव्याने तयार केलेल्या साडीवरचे कशीदाकाम दाखवून त्याचे टाके कसे असतात ते सांगत आहेत,,,पुष्पाताई बाक्रे.
अर्थात घरात नित्यकाळ असणारी महिला मंडळी आता फारशी घरात राहातात कुठे..?
प्रत्येक जण नोकरीच्या . काहीतरी मिळविण्याच्या मागे. म्हणूनच कदाचित या सा-यांकडे तेवढे लक्ष जात नाही. उन्हाळ्यात करायची कामे. वाळवणे. पापड. कुरडया. गव्हाचा चिक सारेच आता बाजारातून रेडिमेड आणले जाते. त्यासाठीची मेहनतही आता होत नाही..खरे ना?
आज आमच्या स्नेही कलावंत सौ. शैला दातार यांचा फोन आला..की की पुष्पाताई बाक्रे यांनी तयार केलेल्या कशीदा कामाचे प्रदर्शन आहे. जरा येशील काय...आता माझा दैनंदिन पत्रकारितेशी फारसा संबंध नसल्याने थोडे आढेवेढे घेतले..मात्र आज रविवारी दुपारी चक्क फिल्म इन्स्टिट्यूटच्या दाराच्या पुढच्या राजकमल बंगल्यापुढच्या बाक्रे बंगल्यात दाखल झालो.
सुमारे पंच्च्याहत्तरीच्या बाक्रे बाई आणि त्यांच्या दोन सहकारी भगिनी सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर यांच्यासह उत्साहाने बंगल्यात लावलेल्या कशिदा कामाचे वर्णन सांगत फिरत होत्या. काही काळाने बेदरकरांशी शैला दातारांनी ओळक करुन दिली. ज्यासाठी हे प्रदर्शन भरविले ती खजुराहो मधील वैष्णवमंदीरातील दशावतारांचा कशिदा काढून तयार केलेली साडी.. दाखविली..पाहिली...`ती एकमेव आहे. तिच्यासारखी दुसरी तयार करायची नाही. ती जगातील एकमेव असेल. `...बाक्रेबाई सांगत होत्या.
रुमाल, मोठे कापड. पडदा, आणि साड्यांवर काढलेली विविध चित्राकृती कशीदांचे नमुने मन मोहरुन घेणारे होते. तिथली रंगसंगती आणि विणकामातले कौशल्य कलेची उंची सिध्द करणारे होते. नक्कीच...
आज नवी पीढीतल् महिल्या या कशिदा कामासाठी फारश्या उत्सुक नसल्याचेही त्या सांगतात.
आधी कागदावर डिझाईन काझून मग त्यानुसार नेट लावून जाळीदार हे काम केले जाते.
सारी कशीद्यातूल रुपे भारतीय संस्कृतिचे महान प्रतिकेच समोर आणतात. ही शेली विशेषतः कर्नाटकातून आली. त्यावर कै. अहिल्याबाई किर्लास्करांनी तीन पुस्तके लिहली आहेत. चौथे आणि पाचवे पुस्तक स्वतः पुष्पाताई बाक्रे यांनी लिहली आहेत.
बाक्रे यांच्या माहेरी शंभर वर्षापासून कर्नाटकी कशीदा काम त्यांच्या आजी काशीबाई किर्लोस्करांपासून केले जाते. आईकडून वारसा घेऊन त्या आज साड्यांवर कशीदा काढून त्यांचे वेगळेपण जपत आणि ते पुढे नेण्याचा यत्न करीत आहेत. या कलेच तोच तो पणा येऊ नये म्हणून त्यांनी देशी-परदेशी संग्रहालयातली नमुने पाहिले. त्यांच्या कारीव काम, जुनी चित्रे , शिल्पकला यांचा अभ्यास केला. त्यातले काही चांगले ते आपल्या हाती आणले आणि आता ते नवीन पीढीकडे सुपूर्द केले आहे.
वीरशैव पंथाच्या देवळांमधले वैशिष्ठ्य त्यांना एका साडीवर उतरवून ती साडी एका परिचितांसाठी तयार केली. त्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला. हंपीतील विठठ्ल मंदिराच्या भिंतींचे स्केच बघुन त्याला कशीदात तयार केले ते फ्रेम स्वरुपात उतरविले आणि ते घरातल्या भिंतीवर दिमाखात उभे आहे.
अनेक ठिकाणी प्रदर्शने भरवून हे कशीदा काम दाखवावे..यातून कांहीना स्फूर्ती यावी. आणि ही भारतीय कला प्रगत देशात जावी आणि त्यासाठी अब्यासक्रम करावा त्यांचा विचार सुरु आहे.
त्यांची ही कला आज सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर या दोन सहकारी जपत पुढे नेत आहेत. ती अशीच वाढत राहणार आहे याची त्यांना खात्री आहे....
हे नमुने पाहताना जुन्य़ा सुंदर देवळातील शिल्पे पाहण्याचे समाधान मिळाले..ते तुम्हीही जमेल तेव्हा अनभवून घ्यावे हेच वाटते.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
आपण नव्याने तयार केलेल्या साडीवरचे कशीदाकाम दाखवून त्याचे टाके कसे असतात ते सांगत आहेत,,,पुष्पाताई बाक्रे.
प्रत्येक जण नोकरीच्या . काहीतरी मिळविण्याच्या मागे. म्हणूनच कदाचित या सा-यांकडे तेवढे लक्ष जात नाही. उन्हाळ्यात करायची कामे. वाळवणे. पापड. कुरडया. गव्हाचा चिक सारेच आता बाजारातून रेडिमेड आणले जाते. त्यासाठीची मेहनतही आता होत नाही..खरे ना?
आज आमच्या स्नेही कलावंत सौ. शैला दातार यांचा फोन आला..की की पुष्पाताई बाक्रे यांनी तयार केलेल्या कशीदा कामाचे प्रदर्शन आहे. जरा येशील काय...आता माझा दैनंदिन पत्रकारितेशी फारसा संबंध नसल्याने थोडे आढेवेढे घेतले..मात्र आज रविवारी दुपारी चक्क फिल्म इन्स्टिट्यूटच्या दाराच्या पुढच्या राजकमल बंगल्यापुढच्या बाक्रे बंगल्यात दाखल झालो.
सुमारे पंच्च्याहत्तरीच्या बाक्रे बाई आणि त्यांच्या दोन सहकारी भगिनी सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर यांच्यासह उत्साहाने बंगल्यात लावलेल्या कशिदा कामाचे वर्णन सांगत फिरत होत्या. काही काळाने बेदरकरांशी शैला दातारांनी ओळक करुन दिली. ज्यासाठी हे प्रदर्शन भरविले ती खजुराहो मधील वैष्णवमंदीरातील दशावतारांचा कशिदा काढून तयार केलेली साडी.. दाखविली..पाहिली...`ती एकमेव आहे. तिच्यासारखी दुसरी तयार करायची नाही. ती जगातील एकमेव असेल. `...बाक्रेबाई सांगत होत्या.
रुमाल, मोठे कापड. पडदा, आणि साड्यांवर काढलेली विविध चित्राकृती कशीदांचे नमुने मन मोहरुन घेणारे होते. तिथली रंगसंगती आणि विणकामातले कौशल्य कलेची उंची सिध्द करणारे होते. नक्कीच...
आज नवी पीढीतल् महिल्या या कशिदा कामासाठी फारश्या उत्सुक नसल्याचेही त्या सांगतात.
आधी कागदावर डिझाईन काझून मग त्यानुसार नेट लावून जाळीदार हे काम केले जाते.
सारी कशीद्यातूल रुपे भारतीय संस्कृतिचे महान प्रतिकेच समोर आणतात. ही शेली विशेषतः कर्नाटकातून आली. त्यावर कै. अहिल्याबाई किर्लास्करांनी तीन पुस्तके लिहली आहेत. चौथे आणि पाचवे पुस्तक स्वतः पुष्पाताई बाक्रे यांनी लिहली आहेत.
बाक्रे यांच्या माहेरी शंभर वर्षापासून कर्नाटकी कशीदा काम त्यांच्या आजी काशीबाई किर्लोस्करांपासून केले जाते. आईकडून वारसा घेऊन त्या आज साड्यांवर कशीदा काढून त्यांचे वेगळेपण जपत आणि ते पुढे नेण्याचा यत्न करीत आहेत. या कलेच तोच तो पणा येऊ नये म्हणून त्यांनी देशी-परदेशी संग्रहालयातली नमुने पाहिले. त्यांच्या कारीव काम, जुनी चित्रे , शिल्पकला यांचा अभ्यास केला. त्यातले काही चांगले ते आपल्या हाती आणले आणि आता ते नवीन पीढीकडे सुपूर्द केले आहे.
वीरशैव पंथाच्या देवळांमधले वैशिष्ठ्य त्यांना एका साडीवर उतरवून ती साडी एका परिचितांसाठी तयार केली. त्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला. हंपीतील विठठ्ल मंदिराच्या भिंतींचे स्केच बघुन त्याला कशीदात तयार केले ते फ्रेम स्वरुपात उतरविले आणि ते घरातल्या भिंतीवर दिमाखात उभे आहे.
अनेक ठिकाणी प्रदर्शने भरवून हे कशीदा काम दाखवावे..यातून कांहीना स्फूर्ती यावी. आणि ही भारतीय कला प्रगत देशात जावी आणि त्यासाठी अब्यासक्रम करावा त्यांचा विचार सुरु आहे.
त्यांची ही कला आज सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर या दोन सहकारी जपत पुढे नेत आहेत. ती अशीच वाढत राहणार आहे याची त्यांना खात्री आहे....
हे नमुने पाहताना जुन्य़ा सुंदर देवळातील शिल्पे पाहण्याचे समाधान मिळाले..ते तुम्हीही जमेल तेव्हा अनभवून घ्यावे हेच वाटते.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Friday, March 23, 2012
`व्हायोलीन गाते तेव्हा...`आता कोल्हापूरात
लोकबिरीदरी प्रकल्पास ५८ हजारांची मदत
प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलीन गाते तेव्हा...` या कार्यक्रमातून जमा झालेला ५८ हजार रुपयांचा निधी हेमलकसा इथल्या डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधी साठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने पाठविला गेला. हाच कार्यक्रम कोल्हापूरच्या कोशवराव भोसले नाट्यगृहात ८ एप्रिल २०१२ ला रात्री ९ वाजता आयोजित केला आहे. लोकबिरादरीच्या कार्यासाठी तो आयोजित केला आहे. त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल अशी खात्री सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांना वाटते.
फेब्रुवारीच्या १२ तारखेला पुण्यात व्हायोलीन वरील मराठी-हिंदी गीतांचा सौ. चारुशीला गोसावी यांचा `व्हायोलीन गाते तेव्हा... `हा शुभारंभाचा कार्यक्रम लोकबिरादरीच्या निधीसाठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने आयोजित केला होता. त्यातून खर्च वजा जाता राहिलेला ५८,३०६ रुपयांचा निधी लोरबिरादरीसाठी जमा झाला.
कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद आणि समाजिक कार्यसाठी केलेल्य़ा कलासेवेचे काही प्रमाणात का होईना चिज झाल्याचे समाधान चारुशीला गोसावी व आयोजक सुभाष इनामदारांना वाटते. कोल्हापूर शहरातील जाणकार व मदत करु इच्छीणा-यांनी आर्थिक सहभाग द्यावा असो आवाहन सुभाष इनामदार यांनी केले आहे.
पुण्यातल्या पहिल्या १२ फैब्रुवारी २०१२ च्या कार्यक्रमाचा ऑडियो एकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
http://soundcloud.com/subhash-vishwanath-inamdar/violin-gaate-tenvha-now-in?fb_action_ids=10150656465448172&fb_action_types=soundcloud%3Alisten&fb_source=recent_activity&code=AQChzPT-2tcWbSATv0fQs1hE71WSpNeCQoim5MrJ3pyGaaAje_Ruk4mL8nMg4kSl9Yuy__lvkLgLN2L6M5il8LsUxMVe1qDQda8KP9ofkH1ckrxYICXu3IMJPBwNsZYbeyOUOJSg-DGB4Nwhe_KWy1FWGBsey5gNEZPkGnVPZEI7zd3fFv8S5C6URfyLpBZFlaA#_=_
Friday, March 9, 2012
विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतीला खरे अभिवादन

`जेथ राघव तेथे सिता`

गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा यांच्यामागे आपल्या गाण्याची आवड बाजुला ठेऊन कुणी खंबीर साथ दिली असेल तर त्या विद्याताई माडगूळकर यांनी. पूर्वाश्रमीच्या त्या पद्मा पाटणकर. उत्तम आवाजाची देणगी असूनही आपल्या पतीचे कर्तृत्व बहरावे. त्याला आपली अबोल साथ मिळावी यासाठी माउलीने लग्नानंतर केवळ गदिमांच्या पत्नीच्या रुपात स्वतःला झिजविले. त्यांची म्हणजेच आपल्या आईच्या अबोल प्रेमाच्या आणि आईच्या आणि वडिलांच्या स्नेहमय जीवनाच्या आठवणी रंगवीत आणि त्याला गीतरामायणातील गीतांची जोड जुळवित जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ७ मार्चला पुण्यात सादर झालेला कार्यक्रम म्हणजे सौ. जयश्री कुलकर्मी यांनी सादर केलेला `जेथ राघव तेथे सिता` हा कार्यक्रम.
विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हा खास कार्यक्रम केवळ
गीते. या रामाच्या आयुष्यातील प्रसंगाचे चित्रण शब्दात करणा-या थोर महाकवीचे ते महाकाव्य. त्यातून केवळ स्त्रीयांच्या विविध स्वभाव आमि भावनांचे वर्णन यथार्थ शब्दात गदिमांनी ती गीते रचली.
आणि सुधीर फडके यांच्या ध्येयवादी , श्रेष्ठ संगीतकाराने दिलेल्या चालीतून ती अजरामर झाली.
पाहुनी वेलीवरची फुले, राम जन्मला ग सखी, सावळा ग रामचंद्र, मोडू नका वचनाला नाथा, निरोप कसला, कोण तू कुठली राजकुमार, सूड घे त्यांचा लंका पती पासून, डोहाळे पुरवा रघुतीलका माझे पर्यंत सारीच गाणी आपल्या सुस्वर आवाजात मूळात बार्शीच्या पण गेली अनेक तपे पुण्यात रुळलेल्या नावाजलेल्या गायीका सौ. जयश्री कुलकर्णी यांनी हळूवारपणे आणि प्रसंगी तेवढ्याच झोकात. दमदार आणि टेचात सादर करुन रसिकांची मने जिंकून घेतली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा खालचा सारा प्रेक्षागृह त्या गीतांना दाद देत माना आणि हाताने ताल देत डोलत होता.
राजेंद्र दूरकर (तबला), जयंत साने (हार्मानियम) आणि दर्शना जोग (सिंथेसायझर) यांनी गीताला साज उत्तम देऊन गाणी अधिक श्रवणीय केली.
मात्र वेगळेपण उमजले ते गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांचे. त्यांची ओघवती भाषा. जीवंत अनुभव. त्यातून गदीमांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची गुंफण . एवढेच नव्हे तर गीतरामायणातल्या त्या त्या गीताला पुरेसे पोषक भाष्य. सारेच अप्रतिम आणि सहज. यातून स्त्रीची वेदना, तीचे अबोल श्रम आणि आपल्या आईने गदिमांना दिलेल्या साथीचे यथार्थ दर्शन उलगडत त्यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवविले.
मध्यंतरात `नामाची आवडी` या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ्य़ पत्रकार अनंत दिक्षित यांच्या हस्ते करुन एक वेगळा आनंद रसिकांना देऊ केला. प्रा. मिलिंद जोसी यांनीही जयश्री कुलकर्णींच्या गायनातल्या तयारीचे कौतूक करुन गदिमा महती आळविली.
एक वेगळा गान-आनंदाचा सोहळा अनुभवताना रसिक यात पूर्णपणे दंग होऊन गेले. गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रात विविध गाण्यांनी रसिकांचा परिचित असलेल्या या गायिकेने स्वतःचे वेगळेपण यातून सिध्द केले.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Sunday, March 4, 2012
कोश ४५३ संगीतकारांचा
नावाजलेल्या तब्बल ४५३ संगीतकाराचा समावेश असलेला कोश तयार झाला आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संगीतकारांवर अशा प्रकारचा कोश प्रथमच तयार झाला आहे. त्याचे प्रकाशन प्रभाकर जोग, अशोक पत्की आणि आनंद मोडक या तीन संगीतकारांच्या उपस्थितीत शनिवारी झाले.
प्रतीक प्रकाशनातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी कोशाचे लेखक मधू पोतदार आणि अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे उपस्थित होते. पत्की म्हणाले, 'कोश तयार करणे हा कटकटीचा विषय आहे. पण, तो पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. इतिहास समजण्यास कोश उपयोगी ठरतात.''
मोडक म्हणाले, 'ध्यास, कामावर निष्ठा आणि उत्तमतेची निष्ठा असेल तरच असे कोश तयार होऊ शकतात. कोश काही वर्षांत तयार होत नसतात, त्यासाठी आयुष्य वेचावे लागते.'' पोतदार म्हणाले, 'एका-एका संगीतकारावर पूर्ण ग्रंथ लिहावा, इतक्या ताकदीचे कलावंत मराठी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. त्यांची दखल योग्य वेळी घ्यायला हवी.''
प्रतीक प्रकाशनातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी कोशाचे लेखक मधू पोतदार आणि अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे उपस्थित होते. पत्की म्हणाले, 'कोश तयार करणे हा कटकटीचा विषय आहे. पण, तो पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. इतिहास समजण्यास कोश उपयोगी ठरतात.''
मोडक म्हणाले, 'ध्यास, कामावर निष्ठा आणि उत्तमतेची निष्ठा असेल तरच असे कोश तयार होऊ शकतात. कोश काही वर्षांत तयार होत नसतात, त्यासाठी आयुष्य वेचावे लागते.'' पोतदार म्हणाले, 'एका-एका संगीतकारावर पूर्ण ग्रंथ लिहावा, इतक्या ताकदीचे कलावंत मराठी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. त्यांची दखल योग्य वेळी घ्यायला हवी.''
Tuesday, February 28, 2012
दैवतासमान कुसुमाग्रज....
फेब्रुवारी २७ सन २०११ ही तारीख म्हणजे कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाची आठवण मनावर कोरुन ठेवलेली. या निमित्ताने `गतिमान प्रॉडक्शन प्रस्तुत`, `रसयात्रा` ही अत्यंत साधेपणाने आलेली जाहिरात आकर्षून गेली. त्या कार्यक्रमाला मी वेदशास्त्रोजक सभेतल्या सभागृहात गेले होते. कुसुमाग्रजांचे सर्व साहित्य वाचून मानसी आपटे यांनी त्यांचे निवडक साहित्य या निमित्ताने समोर मांडले. वर्षापूर्वीचा तो कार्यक्रम आवडला पण भावला नव्हता.
बरोबर वर्ष झालं आणि मटातली जाहिरात बघितली आणि टिळक स्मारक मंदिरात निवडक कविता, नाट्यप्रवेश, कथा आणि गीतांवर आधारित `रसयात्रा` कार्यक्रमाला गेले.
अध्यक्ष सुधीर मोघे, ते स्वतःच स्फूर्तिचं उत्तमस्थान असल्याने त्य़ांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी नेहमी जातच असते. आजही त्यांनी आपल्या वेगळेपणाच्या भाषणात कुसुमाग्रजांनाही माहिती नसलेली कविता म्हणून दाखविली. ५० वर्षापूर्वीची कविता. ह्या कवितेने त्यांच्या मनात घर करुन ठेवलेले नी म्हणूनच ते कवी झाले. कुसुमाग्रजांच्या संस्काराने.
कुसुमाग्रजांच्या अनेक आठवणी माझ्याही मनात घर करुन गेल्या.
मी त्यांना प्रथम भेटले ती प्रभाकर पाध्येंकडे. प्रभाकर पाध्यांकडे दरमहा इंडियन रायटर्स तर्फे अनेक मोठमोठे लेखक जमत असत. त्यात कुसुमाग्रजही मुद्दाम नाशिकहुन येत. बापट, पाडगावकर, श्री.पु.भागवत, मे.पुं. रेगे, अशोक केळकर, दि.के बंडेकर..असे कितीतरी.. आणि त्यात कुसुमाग्रजांचे देखणे सात्विक व्यक्तिमत्व कुणालाही भारवून टाकणारे. तेथील पुंडलिकांच्या वेगळ्या विचारांवर ते भारावून गेलेलेही आठवतात. पुंडलिकांनाही त्यांच्याविषयी खूप आदर. विशेषकरुन चक्र, माता दौपदी, चार्वाक नाटकांवर खूष होऊन ते बोलत राहात. त्यांच्या आवाजातही.. बोलण्यातही गोडवा असे. हा कार्यक्रम बघत असताना मला हे सारं आठवत राहिलं.
त्यांच्या `गर्जा जयजयकार`शी मला सातवीपासूनची ओळख.पाठांतराला हीच कविता होती.
त्यांचा `दुसरा पेशवा`ही बघायला गेलेलो. आठवले. त्यातील त्यांच्या संवादाने. त्यावेळेलाही भारालेपण आले होते. त्यांनी बारकाव्यानी केलेल्या इतिहास वाचनाचेही कौतुक वाटलेले. आणि काशीबाईबद्दलही पेशव्यांच्या भावना खूप बारकाईने न्याहाळलेल्या. विशाखा हा कवितासंग्रह अनंतराव कुलकर्णींनी कुसुमाग्रजांच्य़ा सांगण्यावरुन पाठविलेला. त्या कवितांचे वाचन कितीतरी वेळा झालेले.
त्यांचे `विज म्हणाली धरतीला..`हे मला सर्वात आवडलेले नाटक. त्याच्या पहिल्या प्रयोगाला बालगंधर्वाला आम्ही गेलेलो. त्यातील काव्यमय भाषा आणि नाटकाच्या शेवटी आलेले कुसुमाग्रज आठवले. हा कार्यक्रम बघताना जणू ते स्वतः शेवटी येऊन बसलेले आठवले.
मानसी आपट्यांनी एवढ्या मोठ्या कुसुमाग्रजांच्या साहित्यातून निवडलेले तुकडे खूपच महत्वाचे आणि सामान्य वाचकांपर्यत पोचतील असे वाटते. त्यांच्या सगळ्या साहित्याची लयमयता, शब्दयोजना..जोरदार व ठशीव भाषाप्रभुत्व आहे. वर्षभर सततच्या त्यांच्या कार्यक्रमांना जाऊनही कुठेही तोच तोचपणा ..कंटाळवाणेपणा.. वाटला नाही., त्याचे हेच कारण.
पाठ्यपुस्तकातील कवितांमुळे प्रत्येक विद्यार्थ्य़ांच्या तोंडावर कुसुमाग्रज हे गोड व्यक्तिमत्वाच्या कविचे नाव परिचयाचे झाले. अनेक प्रेमगीते, प्रेमकथा ऐकल्या पण कुसुमाग्रजांनी `पृथ्वीचे प्रेमगीत` लिहून त्याला लखलखीत नक्षत्राचे अढळस्थान दिले. ही कल्पनाच जगाविरहित आहे. या गीताने कुसुमाग्रज हे नाव कवितेइतकेच तोंडातच बसले.
त्यांच्या लेखणीला जणू कालिदासापासून ते शेक्सपीअर पर्यंतच्या नाटककारांचा स्पर्श आहे. त्यानी कुठल्याही विषयावर चार ओळी लिहिल्या तरी त्यात काव्यात्मकता असते. मराठी भाषेबाबात बोलताना ते म्हणतात.. भरजरी वस्त्राच्या जोडीला लक्तरांना आणले.. ...हे एकमेव वाक्य सुभाषितासारखे रसात्मक बनले.....जणू ही मराटी मनासाठी आताच्या सद्यपरिस्थितील मराठी भाषेच्या संदर्भात अंतर्मुख करणारे काव्यच बनले. `मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात मस्तकी राजमुकुट घालून आणि अंगावर लक्तरे लेवून उभी आहे......या वाक्याने मराठीचा उपेक्षा करणारे शासन. मराटी समाज थरथरून चळचळ कापत..विचार करायला लागला.
त्यांचे लेखन आजच्या पिढीने मनलावून अभ्यासले तर ते अनुपमेय असे सांस्कृतिक वाड्मयीन उच्च दर्जाचे संचितच ठरेल.
बालगंधर्व आणि लो. टिळक यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले... टिळक म्हणजे मार्तंड की सूर्यतेजाईतके तेजस्वी असूनही ते तापहिन होते. तर बालगंधर्व म्हणजे शीतल, अलांछन चंद्रमा होते....
आजच्या पिढीने या दोघांना न पाहताही त्यांच्या या वाक्याने या दोन महान देवतासमान पुरुषांपुढे आपोआपच मस्तक लवून त्यांना वंदन करतील अशी त्यांची थोडक्याच शब्दात केलेली वाखाणणी.
या महापुरुषाची भेट झाली की त्यांच्याबद्दल इतका आपलेपणा वाटायचा की ते आपल्याच कुटुंबातील एक आहेत असे त्यांच्या लेखनावरुन वाटत राहते. असे निर्विष. स्वच्छ मनाचा. गोडवाणीचा साहित्यिक आजपर्य़ंत झालेला नाही. म्हणूनच ते सर्वांना साहित्यातून प्रत्यक्ष भेटीतून दैवतासमान वाटत गेले.
आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर जे कार्यक्रम पाहिले त्यातून ते मनात ठासून पक्के झाले. त्यांच्या नावाचे जन्मस्थान, गोदावरी पुरस्कार असले तरीही ते समारंभ स्टेजवर हजर न राहता पहात..ऐकत. आले आहे.....
अशी त्यांची थोरवी गाताना आपल्या मनाला खरा आनंदयुक्त आदर वाटून आपोआपच मान वाकते हे त्यांचे श्रेष्ठत्व!
-रागिणी पुंडलिक,
१४५६, सदाशिव पेठ, पुणे-३०
फोन. ०२०- २४४६०२३८
V V Shirwadkar / “Kusumagraj” is a gem of a person, a poet, a social and cultural personality born in Nashik.
The original name of V V Shirwadkar was Gajanan Ranganath Shirwadkar that changed after after adoption.
He was born on 27th February 1912 in Pune.
Kusumagraj completed his primary education in Pimpalgaon and high school education in New English School, now J.S. Rungtha High School of Nashik. He then passed matriculation from Bombay University.
His poems and articles were first published in “Balbodhmewa ” magazine when he was hardly 17 years old. Later these were published in “Ratnakar” magazine.
In 1932, he participated in the “Satyagraha” for allowing untouchables to enter Kala Ram Temple. Kusumagraj had no looking back, he began writing poems, stories, plays for the news papers like Weekly Prabha, Sarathi, Navyug etc.
Some of this well acclaimed poem collections are “Vishakha”, “Marathi Mati”, “Swagat”, “Himraesha”, “Yayati Ani Devayani”, “Veej Mhanali Dhartila”.
His eye-opening play “Natsamrat” which fetched him the Sahitya Academy Award in 1974, is regarded as a milestone by the Marathi population till date.
The other awards confernend on Kusumagraj include : Ram Ganesh Gadkari Award, honourable degree of D.Lit. from the Poona University, Sangeet Natya Lekhan Award, Dnyanpeeth Award and above all the Padmabhushan.
This great personality left us on 10 March 1999.
See Also
Subscribe to:
Posts (Atom)


