subhash inamdar

subhash inamdar

Saturday, January 14, 2012

हृषीकेश बोडस-गंधर्व गायकीची मोहक छाप

शनिवारी संध्याकाळी( शनिवार १४ जानेवारी २०१२) पुण्यातल्या भारत गायन समाज या शताब्दी पाहिलेल्या वास्तूत मिरजेचा गायक कलावंत हृषीकेश बोडस जेव्हा छोटा गंधर्वांच्या नटखट सौंदर्यपूर्ण पध्दतीने सौभद्र या संगीत नाटकातले `लाल शोलजोडी जरतारी` हे पद रंगवत होता तेव्हा भारत गायन समाजात स्मृतीत गेलेले थोर गायक नट, साथीदारही त्यांचे गाणे एकूण तृत्प मनाने या गुणी गायकाला आशीर्वादच देत असतील.....
खरेच आजची ती संध्याकाळ उपस्थित संगीत रसिकांसाठी वेगळी आठवण जपली जाणारी होती. मिरजेचा गायक अतिशय जिद्दीने आणि मनापासून सुरांना कुरवाळत आपल्या गायनात रंग भरत होता. स्वरराज छोटा गंधर्व, तात्यासाहेब पित्रे आणि संस्थेच्या एक देणगीदार शांताबाई अण्णेगीरी यांच्या स्मरणार्थ हा गायनाचा जलसा आयोजित केला होता.
आरंभी मुलतानी रागाच्या विविध आलापींनी बोडसांनी गाणे खुलविले..आपल्या लयादार आदाकारीच्या सुरेल फिरतीमधून गळ्याची गोड जात सर्वपरिचित होऊन गेली.. आणि मग स्वरांशी आणि लयींशी खेळत आपला राग डौलदार पध्दतीने सादर करुन त्यांनी श्रोत्याकडून दाद मिळविली.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनितीबाई खाडीलकर यांच्या हस्ते कलावंतांचा आणि साथीदार राजीव परांजपे( हार्मोनियम) आणि तबला साथीला बसलेले संस्थेचे कार्यवाह विद्यानंद देशपांडे यांचा सन्मान केला गेला.
`या नव नवल नयनोत्सवा` आणि छोटा गंधर्वांनी गायलेल्या अभंगाच्या रचनेतून गंधर्व गायकीची मोहक छाप त्यांनी रसिकांच्या मनावर कोरुन दाखविली.
एकूणच पुण्यात अनेक ठिकाणी अनेक गायकांच्या मैफली झडत असतात...पण ही ह्षीकेश बोडसांची गायनाची रंगत काही वेगळी आणि लडीवाळ पणाने स्वरांना कुरवाळत बहारदार सादर होत होती.
मला तर बुवा त्यांच्यातल्या कृष्णाच्या रुपाने एकेकाळी मोहवून टाकले होते...आजही सौभद्र आठवले की त्यांनी केलेला कृष्ण आणि वर्षा खाडीलकर (आता भावे) यांनी सादर केलेली रुक्मीणी आजही लक्षात रहाते.

सुभाष इनामदार,पुणे

Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवण

उदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली....



संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.

आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.

दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.


`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

`या गोल गोल डब्यातला`

वृध्दांसाठी दिशादर्शविणारा



वृध्दांनी केलेल्या कष्टाची जाणीव न ठेवता तरुण मुलगा जेव्हा त्यांना न विचारता . त्यांच्याकडे न लक्ष देता स्वतःला वाटेल तसे जगत रहातात.. त्यात ना स्वतःला आनंद..ना आपल्या आई-वडिलांना समाधान..सारेच आधंतरी... मग त्यांनी मुलाकडे रितसर कोर्टाकडून पोटगी घेऊन स्वतंत्र व्हावे काय?

कितीतरी प्रश्न..वृध्द आणि तरुण पिढीतला संघर्ष दाखविणारा तुमच्या घरचा चष्माच वाटावा असा चित्रपट २० जानेवारी पासून येतोय.


चित्रपटातली भूमिका वेगळ्या बाजाची आहे.. माझ्या संवादातून अशोक सराफ डोकावेल..पण थोडा गंभीरतेकडे झुकणारी भूमिका...जरा वेगळा रोल...म्हणून मी या चित्रपटाकडे पहातोय..असे अशोक सराफ सांगतात.

त्यांची पत्नी झालेल्या स्मिता तळवलकरांना आई-वडिलांचे करियरच अमान्य करणारा..आणि मुलाचीही घुसमट दाखविणारा हा चित्रपट ..आणि ही वेगळी कलाकृती वाटते...तर असा रोल मी यापूर्वी केलाच नव्हता असे त्या सांगतात.


संतोष जुवेकर यांना या दोन दिग्गज कलावंतासमवेत भूमिका करण्याचे भाग्य लाभल्याचा अधिक आनंद होतो आहे.. आत्तापर्यंतच्या चित्रपटांतल्या भूमिकांपेक्षा वेगळा टाईपबाज कॅरेक्टर न करता स्वतःला सिध्द करणारी भूमिका करायला मिळाली असा वेगळा हा चित्रपट आणि आज्या तरुण पिढीचे नेतृत्व करायला मिळाल्याचे समाधान वाटतेय..
एकूणच स्मिता तळवलकर सांगतात त्याप्रमाणे आज आई-वडिलांया मुलांशी संवादच हरविला आहे...हे स्पष्टपणे दाखविणारा आजच्या काळाशी सुसंगत चित्रपट आहे.

गोवोगावी फिरून मुलांना डबड्यातला चित्रपट दाखविणारा बजाबा या चित्रपटातून प्रथम मराठी पडद्यावर नायक होतोय..हे वेगळेपण...

आसित रेडीज यांची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन...सारेच..ते याबाबत फारच समाधानी आहेत. हा प्रश्न घेऊन ते आलेत. अशोक सराफ असल्यामुळे यात मनोरंजन तर नक्की मिलेल..पण वेगळ्या बाजाची ही कथा तुम्हाला स्वतःकडे पहायला लाविल असा विश्वास वाटतो. मुख्य तीन कलाकारांशिवाय स्मिता शेवाळे, आसालता वाबगावकर, विजय चव्हाण, आकांक्षा ठाकूर या कलावंताच्या यात भूमिका आहेत.

रिध्दी एन्टरटेन्मेंटची ही निर्मिती सतीश चंद्र यांनी संगीत दिले आहे. समीर आठल्ये यांचे छांयांकन आहे तर राजेश राव यांचे संकलक आहेत...आता उत्सुकता आहे ती पर्त्यक्ष प्रदर्शित होण्याची..

पुण्यातल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती सांगण्यात आला...त्यावरुन चित्रपट वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडणार हे नक्की वाटते.. पाहू..




सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 26, 2011

योग्य वयात तरुणांच्या पाठीवर शाबासकी थाप

`स्वरानंद` या पुण्यातल्या संस्थेने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त चार तरुण कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या कामगिरीचा गौरव पुरस्कार देऊन सोमवारी २६ डिसेंबरला (२०११) केला. यात

गायक आनंद भाटे,


संगीतकार निलेश मोहरीर,



रसिकप्रिय गायिका योगिता गोडबोले-पाठक, आणि



गिटारवादक ज्ञानेश देव

यांना संगीतकार आनंद मोडक यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी सरदेशमुख महाराज आणि युसूफभाई मिरजकर यांच्या स्मृतीनिमित्त २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती कोल्हापूरची हार्मानियम वादक मुलगी शामिम मोमिन हिला याचवेळी प्रदान करण्यात आली.



ज्यांच्या अनेक रचनांनी मराठी मनावर भूरळ घातली असे संगीतकार यशवंत देव या समारंभासाठी तब्येत बरी नसूनही हजर होते. त्यांनीही या समारंभात आपले मनोगत मांडले . त्यांच्या मते गुरू तुम्हाला मार्ग दाखवितो. पण तुम्ही स्वतः त्या मार्गावर चालायचे असते.. पुरस्कार मिळालेल्या कलावंतांच्या वतीने योगिता गोडबोले-पाठक यांनी अशा पुरस्काराने बळ मिळते. कौतुकाची थाप माठीवर पडते. त्यामुळे पुढच्या काळासाठी एक जिद्द निर्माण होते... रसिकांचे रंजन करण्य़ासाठी प्रोत्साहनही यातून मिळते...


स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी संस्थेत वीसएक वर्ष विविध कार्यक्रमातून व्हायोलिनची साथ करणारे निष्ठावान कलाकार पं. भालचंद्र देव यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्त य़शवंत देवांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती केली. भोंडे यांनी असे निष्ठावान साथीदार मिळाले हे संस्थेचे भाग्य असल्याचे सांगितले.. आणि त्यांची

पं. भालचंद्र देवांची कन्या सौ. चारुशीला गोसावी हिचाही उत्तम व्हायोलिनची साथ करणारी स्वरानंदची कलाकार म्हणून रसिकांना परिचय करुन दिला.


एकूणच सुगम संगीच्या क्षेत्रात ४१ वर्षे सातत्याने काम करणारी ही `स्वरानंद` आजही वेगवेगळे उपक्रम घेऊन मराठी रसिकांची पसंती मिळविते... दरवर्षाला नवीन आणि ज्यांची कला रसिकांनी पसंत केली आहे आणि ज्यांच्या गायनात, वादनात ,कलेत उद्याची उमेद आहे आशा तरुण कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव करते....


हे संगीतकार आनंद मोडक यांच्या शब्दात सांगायचे तर....`योग्य वयात या तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप संस्था देत आहे..हे उचित आहे. त्यांच्या प्रवासाच्या योग्य वयात त्यांना शाबासकी दिली जाते. तरुणाईत दिलेले पुरस्कार महत्वाचे वाटतात`.... असा उल्लेख केला.


पुरस्कारानंतर सर्वच पुरस्कार विजेत्या कलावंतांनी आपल्या गुणांची उधळण आपापली पेशकश सादर करुन रसिकांची दाद घेतली. या सर्वच कार्यक्रमाची सूत्रे अरुण नूलकर यांनी पुणेरी चिमटे काढत कार्यक्रम य़शस्वी करण्यात मोलाची भर घातली.



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596176

Friday, December 23, 2011

खरी कला आणि खरा कलाकार

नटसम्राटाचे चिंतन....



`कलायात्री` हा संस्कार भारतीनं
केलेला फार मोलाचा उपक्रम आहे...


कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराच्या
कलाजीवनांत खोलवर शिरुन विचार व्हावा.
करायचे ठरविले तर ते जरुर करता येईल.
वास्तविक कलाकार हा गौरवार्थी शब्द आहे.


खरा `कलाकार` म्हणजे कोण ?
तर `तो` एखाद्या कलेनं भारलेला आहे.
त्या कलेचा त्याने ध्यास घेतलेला आहे तो !
जो आपल्या कलेद्वारे आपले म्हणणे प्रभावीपणे,
परिणामकारकरित्या मांडू शकतो तो !
अंगभूत प्रतिभेचे दर्शन जो घडवू शकतो , तो !
त्याला कालाकार म्हणता येईल.

कला म्हणजे काय ?
याची व्याख्या सांगणं फार अवघड आहे.
मलाही खरं तर ते निटसं सांगता येणारं नाही.
चित्रकला पाहिली तर भिंती, पाट्या रंगविणा-या पासून
पिकासो सारख्या जगद्विख्यात चित्ररकारापर्यंत सारे कलाकारच आहेत.
मॉडर्न आर्टही त्यातच येते.

मग ख-या प्रतिभावंताचे जी कला अंगीकारली, त्यात प्रगती करावी
त्या कलेमध्ये रमून जावे. सामाजबांधिलकीची जाण ठेवून स्वतःच्या बुध्दीला पटेल तेच करावं,
ती खरी कला आणि ते खरा कलाकार !

तर, प्रामाणिकपणे स्वतःचा शोध घ्यावा. कलात्मक आनंद मिळवावा.
त्यात्तली आद्भूतता अनुभवावी, आणि निर्मिती करावी...




-डॉ. श्रीराम लागू.

कलायात्री...दैनंदिनी २०१२ मधून साभार
संस्कार भारती,(पश्चिम प्रांत)

वेळेचे भान अन् रसिकांची सल

वाढलेल्या पुणे महानगरात संध्याकाळी-रात्री ८ नंतर रिक्षा मिळणे ही एक कठीण आणि धावपळीची गोष्ट आहे. पैसा तर जातोच पण अनेकविध संवादांची देवाण घेवाण होते. याचा फटका बसतो तो पुण्यात दररोज होणा-या विविध कार्यक्रमांना. मनात इच्छा भरपूर असते पण परत घरी जायचे कसे हा प्रश्न कार्यक्रमातही सतावतो. याची दखल वाहन सेवेनी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांनी घ्यावी यासाठी लेखन प्रपंच.....




शहर वाढले. पसरले. अगदी नको तेवढ्या प्रमाणात विस्तारलेही. पण अनेकविध कार्यक्रमांच्या दृष्टीने सारे जणू एकवटले गेले ते पुणे शहराच्या महत्वाच्या भागात. पुण्यातल्या कार्यक्रम स्थळांचा विचार केला तर....

एस. एम. जोशी सभागृह,
निवारा वृध्दाश्रम,
पत्रकार संघाचे सभागृह,
लोकमान्य सभागृह, नारायण पेठ,
भरत नाट्य मंदीर, सदाशिव पेठ,
भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ,
बालशिक्षण संस्थेचे, मयूर कॉलीनीतले सभागृह,

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर आमि य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह आहेतच....

पण प्रत्येक ठिकाणापासून घरी परतणा-या रसिकांची, वाचकांची, श्रोत्यांची निरासा होते, जेव्हा कार्यक्रम संपवून ते घरी जायला निघतात.
रिक्षावाल्यांशी सुसंवाद घडून त्यांची घरी जाण्याची सोय होण्यासाठी खदी कधी तर रक्तही आटवावे लागते....मिलाली बुवा एकदा रिक्षा....असे हुश्श...व्हायला होते..पण बरेचवेळा जायची मोठी पंचाईत. आठ-साडेआठनंतर होते. कधातरी सुखद अनुभवही येतो..पण तो विरळाच...
बर- सार्वजनिक वाहने सेवा तरी धड आहे....वेळेवर आहे..की सगळ्या रुटला जाणा-या बसेस आहेत...विसरा ते सारे... इतर साधनेही तशी दुबळीच...
मात्र थोडा दिलासा यात संयोजक आणि कार्यक्रमाचे आयोजकच देऊ शकतील. जर त्यांनी ठरविले की कार्यक्रम वेळेत सुरू ,करून वेळत संपवायचा.... तरच.
अनुभव असा की ५ ची वेळ असली तर समजावे ५.३० शिवाय जाण्यात काही अर्थ नाही.
सहाचा असेल तर साडेसहा धरुन चाला..
तीच गोष्ट वेळत सुटण्याची... तिकडेही कानाडोळा होतो..कलावंताच्या आणी रसिकांच्या आग्रहामुळेही कार्यक्रम लांबतो....आणि कधी कधी संयोजकांच्या हाताबाहेरही जातो...
संयोजक मंडळी याबाबत वेळेचे बंधन पाळले..तर रिक्षाही किंवा इतर सुविधा घरी जाणा-यांना सहजपण मिळतील.
खरं म्हणजे येणारा प्रेक्षक अनेक आवडत्या मालिका टाळून ...तकर कुणी घरचे अर्धवट टाकून....तर इतर मोहातून वेळ काढून खास कार्यक्रमांसाठी गर्धी करतात..तो तन्मयतेने ऐकतात...
मात्र वेळेचे गणीत आणि नाघण्याची वेळ जुळली की सारे कसे सुरळीत..होईल...
पाहू या या आमच्या विचाराची दिशा कोण पकडतो ते...मात्र काळाप्रमाणे फार लांबलेला कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो..तर वेळेत सुरु झालेला कार्यक्रम आयत्यावेळी गुंडाळाव लागतो...
काय आमचे हे टिपण दखल घेण्यासारखे वाटते काय...?
असल्यास प्रतिक्रिया कळवा..मी ते संयोजकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 22, 2011

किरणांच्या छेडीत तारा....




पुण्याच्या प्रतिभा इनामदार यांनी दोन प्रतिभावंतांना वाहिलेली ही स्वरांजली...अतिशय बोलकी आणि हळवी आणि शब्द स्वरांच्या दोन नायकांना त्यांच्या आठवणी जागवून सादर केलेली आदरांजली.

महांबरेंच्या तिस-या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिभा संपन्न कवीला आदरांजली वाहतांना त्यांचे स्मरण करत खळे काकांच्या प्रतिभेचा साक्षात्कार घडविला तो या पुण्याच्या कलावंतांनी आणि प्रतिभा इनामदार यांच्या सहगायकांनी...

किरणांच्या छेडीत तारा..कंठातच रूतल्या ताना..पूर्वेच्या देवा तुला..देवाघरच्या फुला..धुंद धुंद ही हवा..पाण्यातले पाहता..आणि रसिका तुझ्याचसाठी सारखी एकापेक्षा एक श्रेष्ठ काव्ये जी पुढे गीते झाली ता सारी इथे लोेकमान्य सभागृहात गुरुवारी सादर झाली. पुणेकरांनीही त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.





श्रीनिवास खळे आणि गंगाधर महांबरे यांची मैत्रीही तेवढीच..निरंतर...खळे बरेच वेळेला आजारी असायचे...पण महांबरे गेल्यानंतर महांबरेंच्या पत्नीला फोन करुन दिलासा देताना त्यांनी आवर्जून विचारले कशानं गेले हो....बोलतानाही त्या आठवणीत स्नेह होता.....

खळे काका आमच्या घरातलेच होते. लता मगंशकर आणि भीमसेन जोशी या दोघांनी आपली गीते गायल्याचे समाधान दोघांनाही होते.जाहल्या कांही चुका या गीतांच्या रेकॊर्डिंग वेळी बरे नव्हते तरी खळे काका हॊस्पीटलमधून कसे आले याची आठवण श्रीमती महांबरे यांनी सांगीतली.
जुने विसरताना दुःख होते...पण ते स्मरतानाही आनंद होतो...या कार्यक्रमाने तो दिला.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276