subhash inamdar

subhash inamdar

Monday, August 1, 2011

नाट्यसंगीताचा जुना खजाना

संगीत नाटकातले संगीत आजही ऐकले जाते
-डॉ. सुहासिनी कोरटकर

बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.



संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.



सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.

संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.

Wednesday, July 27, 2011

कलावंत विवेकाला स्पर्श करतो

-कवी ग्रेस



कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.

अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.


यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.

Tuesday, July 26, 2011

आजी मी नवल पाहिले....

संगणक क्षेत्रात मोलाचे काम करणारे दिपक शिकारपूर यांना मसाप तर्फे गो.रा. परांजपे पुरस्कार ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर यांचे हस्ते देण्यात मंगळवारी देताना गुरू-शिष्याचे एक वेगळे नाते मनाला अधिक भावले.

सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेतले शिक्षक तपस्वी सर. या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित होते.

त्यांनी दिपक माझा विद्यार्थी होता. पण मी आज त्याचा विद्यार्थी बनलोय. तो जेव्हा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणच्या व्याख्यानात संगणकावर भाषण देतो. त्यांना संगणकाचे ज्ञान देतो. आणि मराठीत संगणक साक्षर व्हावेत यासाठी प्रयत्न करताना पाहिले की मला तो माझा विध्यार्थी नसून मी त्याचा विद्यार्थी असून हे शिक्षण त्यांच्याकडे घ्यावे असे वाटते.

गुरूदक्षिणा द्यायची पण ती घ्यायची ही वेगळी पध्दत मलाही भावली
आणि मसापत उपस्थित साहित्य रसिकांना न आवडली तरच नवल.


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, July 25, 2011

शब्दप्रधान गायकीवर भर देणारे आजचे संगीत

-आरती अंकलीकर-टिकेकर

‘‘शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधीन गायकी, जी ख्याल गायकी म्हणूनही प्रसिध्द आहे. ती अतिशय सूक्ष्म आणि तरल आहे. तीला शब्दांची गरज नाही. पण आजचा प्रवास आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणूनच आज शास्त्रीय गायकालाही शब्दप्रधान गायकीकडे जावे वाटते. त्याचा अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.

‘सांस्कृतिक पुणे’च्या वतीने ‘आकांक्षा क्रिएशन’निर्मित ‘मी प्रेमिका’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन अंकलीकर यांच्या हस्ते रविवारी एस एम जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, अल्बमच्या गायिका कस्तुरी पायगुडे-राणे, संगीत संयोजक मिलिंद गुणे उपस्थित होते. अल्बमचे संगीतकार, गीतकार अभिजित कुंभार आहेत, मात्र ते कॅलिफोर्नियात असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे आई-वडिल हजर होते.

अंकलीकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा माईक संगीतात आला, तेव्हा शास्त्रीय गायकही आपला आवाज त्यातून कसा जातो, फ्रिक्वेन्सी कशी आहे या गोष्टींचा विचार करू लागला. तेव्हा शास्त्रीय गायकीत शब्दांच्या उच्चारावर भर देण्याचे वळण आले. त्यावेळी शास्त्रीय गायकही शब्दप्रधान गाणे उत्तम गाऊ शकतो हे समोर आले. शास्त्रीय गायक तसेच रागधारीची साधना करणारा प्रत्येक गायक हा उत्तम संगीत दिग्दर्शक असतो. कारण प्रत्येक आवर्तन म्हणजे एकेक क्रिएशनच असते.``

आजकाल कोणतेही गाणे अनेक वेळा ऐकले की, आपल्याला त्याची सवय होते आणि तो गायक/गायिका उत्तम गातात, असा समज होतो. मात्र, आजकाल गाणे येत नसलेलेही या ‘हॅमरिंग’मुळे प्रकाशझोतात येतात व त्यांचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. त्यामुळे पालकांना कळकळीचे सांगणे आहे की, मुलांना उगाच काहीही न ऐकवता दर्जेदार संगीत ऐकवा, अशी सूचना ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केली.

`कस्तुरीचा नितळ, निकोप व ताजा आवाज असून तो ध्वनीमुद्रणासाठी अतिशय उत्तम आहे.ही दैवी देणगीच आहे,`` असे मत आनंद मोडक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ताजेपणा, ताजगी सहसा सापडत नाही. कृत्रिमता वाढत आहे. जेव्हा माणसातील विद्यार्थी संपतो त्यावेळी त्यातील कलावंतही संपतो. कस्तुरीचा विद्या शिकण्याचा हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू रहावा,’’ असा आशिर्वादही मोडक यांनी दिला.

आपण अल्बममधील सर्व गाणी ऐकली असून पूनावाला म्हणाल्या, ‘‘.कलाकाराला सर्व प्रकारचे गाणे गाता येणे आवश्यक आहे. ज्यांना रसिकांच्या पसंतीप्रमाणे गाता येते तो खर्‍या अर्थाने कलाकार आहे असे मला वाटते. रसिकांना समाधान देता येणे आवश्यक आहे ’’ तशीच ती झाली असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखविले.


प्रकाशनानंतर या सीडीमधली तीन गाणी कस्तुरी पायागुडे-राणे यांनी प्रत्यक्ष सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवून आपली गायकीतली तयारी सिध्द करून दाखविली. .आपल्या गायकीचा प्रवास व सीडीच्या वाटचालीबद्दलचे मनोगतही सूत्रसंचालक अरूण नूलकर यांनी विचारलेल्या प्रश्नातून व्यक्त झाले .
संगीत संयोजक मिलिंद गुणे हे ही या संवादात सामिल झाले होते.
सीडीसाठी सहाय्य केलेल्या सर्वांचाच सक्तार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी एस एम जोशीत गर्दी केलेल्या उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट केले.

http://www.facebook.com/?sk=lf#!/photo.php?fbid=196818063706914&set=a.132694696785918.32502.100001361659055&type=1&theater

Saturday, July 23, 2011

बॉलिवूड हे सांस्कृतिक परंपरेचे भक्ष्यस्थान

नृत्य, संगीत या क्षेत्रात वैयक्तिक योगदान देणारे कलावंत चित्रपटसृष्टीकडे धावत असून ते बॉलिवूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अभिजात कलेची हानी होते आहे, असे मत पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटाला संगीत देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

रेमो फर्नांडिस हे "मॉन्टे व्हर्ट इस्टेट्‌स'ने आयोजित केलेल्या संगीत रजनीसाठी पुण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. बॉलिवूड, सध्याचे संगीत, परदेशातील संगीत क्षेत्र याबाबत त्यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, 'पूर्वी पॉप, रॉक अल्बमचे प्रमाण जास्त होते; परंतु आता हे अल्बमसाठी कष्ट घेणारे गायक, संगीतकार पूर्णवेळ बॉलिवूडमध्ये दाखल झाले आहेत. प्रसिद्धी, पैसा हे त्यामागील कारण आहे. यामुळे दर्जेदार अल्बम बाजारात येणे बंद झाले आहे. भारतीय पॉपची प्रगती खुंटली आहे. कलाकारांनी चित्रपटसृष्टीत काम करायला हरकत नाही; परंतु आपली कला त्यांनी वेगळी जोपासली पाहिजे.''

'मला चाकोरीबाहेरचे संगीत द्यायला आवडते. त्यासाठी मी प्रयत्न करतो. मग त्याला भाषेचा अडसर येत नाही. अगदी मराठी असो वा हिंदी, विषय वेगळा असेल, तर त्या चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल. प्रथम मला कॅसेट कंपन्यांनी नाकारले होते. परंतु, मी स्वत: कॅसेट ध्वनिमुद्रित करून स्कूटरवरून विकल्या आहेत. लोकांनी त्या ऐकल्यानंतर माझी ओळख निर्माण झाली. श्‍याम बेनेगल यांनी माझ्या संगीतरचना ऐकून मला त्यांच्या चित्रपटात संधी दिली होती,'' असे ते म्हणाले.

पुण्यातील फसलेल्या पहिल्या कार्यक्रमाची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. 'लहान असताना मला पुण्यात येण्याची संधी मिळाली. एका व्यक्तीने आमच्या बॅंडच्या संगीत रजनीचे आयोजन केले होते. परंतु, येथे आल्यानंतर तो गायब झाला. त्या वेळी पुरेसा पैसाही आमच्याकडे नव्हता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आमची कानउघाडणी केल्यानंतर मग आम्हाला गोव्याला पाठविण्यात आले,'' असे ते म्हणाले.
http://www.esakal.com/esakal/20110724/5335040805023219889.htm



'संगीत क्षेत्रातही कलावंत हि-यांची परंपरा'

' राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असे वर्णन केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दगडांच्या खाणीतील हिरेही निर्माण होतात. इतर सर्व कलाक्षेत्रांसोबतच संगीत क्षेत्रातही अशीच कलावंत हिऱ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो,' असे मत ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे भारत गायन समाजातर्फे आयोजित (कै.) सौ. वसुंधरा पंडित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राजदत्त बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की यांना या वर्षीच्या कै. सौ. वसुंधरा पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. वसुंधरा पंडित ट्रस्टच्या विश्वस्त अरुणा गवाणकर, पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष सुधाकर जोशी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

खरा कलावंत हा आपली कला कायम समृद्ध करायचा प्रयत्न करीत असतो. तेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. आपल्याकडे चांगल्या कलावंतांची खूप मोठी परंपरा आहे. त्यातल्याच एका आदर्श कलाकाराचा आपण आज गौरव करीत आहोत. अशाच माध्यमातून चांगल्या कलाकारांची उदाहरणे नव्या पिढीसमोर येणे आवश्यक आहे, असेही राजदत्त यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना पत्की यांनी, 'अजून शिकण्याची आवड असल्याने मी स्वत:ला कधीच मोठे मानले नाही. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक गोड धक्का आहे,' असे सांगितले. पत्की यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच त्यांच्या प्रकट मुलाखतीचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9340288.cms

संगीत सावित्री- अभिनव आविष्कार-३१ जुलैला

संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त नटसम्राट बालगंधर्वांनी रंगमंचावर आणलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवार

संध्याकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिरात सादर होणार आहे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा) यांच्या वतीने होणा-या या अभिनव प्रयोगाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि प्रस्तुती पं. जयराम पोतदार यांची आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत पोतदार अधिक माहिती देताना सांगतात, या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ६ मार्च 1932 रोजी करण्यात आला. नाटकात सत्यवान- गंगाधरपंत लोंढे, नारद-मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि सावित्रीच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व अशा भूमिका होत्या. नाटकाचे पहिले काही प्रयोग हाऊस फुल्ल झाले याचे कारण ही सारी तेव्हाची स्टार कास्ट. मात्र १९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे बोलपट पाहण्यासाठी नाट्य रसिकांचाही तिकडे ओढा वाढला.सहाजिकच नाटकाकडे रसिक येईनासा झाला.
संगीत सावित्री हे संगीत आणि कथानक दोन्ही दृष्ट्या उत्तम असूनही रसिकांनी याकडे पाठ फिरविली. नाईलाजाने बालगंधर्वांना या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले.

साबरमती नदीकाठी एक वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगत असताना १९२९ साली या नाटकाची गद्य संहिता खाडिलकरांनी लिहून काढली होती. पण नंतर बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांनी नाटकातील गाण्यांना चाली देण्याचे मान्य केल्यावर १९३३ साली खाडिलकरांनी नाटकातली पदे रचली.

नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने त्यातल्या गाण्यांचा दर्जा उत्तमच होता. मात्र या नाटकाचे पुन्हा प्रयोग झाले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. रसिकांच्या विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे पं. जयराम पोतदार यांनी सांगितले.

सादरीकरणात संगीत नाटकातील पारंपारिक पध्दतीप्रमाणे सूत्रधार-नटीच्या संवादातून नाटकाचे कथानक कथन केले जाणार आहे. संवादातून कथा पुढे सरकत राहिल आणि गायक-गायिका त्यातली पदे सादर करतील. संगीत नाटकाप्रमाणे ऑर्गन आणि तबला साथ पिटात असणारच आहे. कार्यक्रम नाट्यमय करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. अवघ्या अडीच तासात संगीत रसिकांना संगीत नाटकाचा पूर्ण अनुभव देण्याची ही पध्दत पुण्यात पं. पोतदार रूढ करू इच्छीत आहेत.

रविवार ३१ जुलैला संध्या. ५ वा, भरत नाट्य मंदिर,पुणे

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा)
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक
संगीत सावित्री- कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार
संगीत दिग्दर्शन- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व

संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व प्रस्तुती- जयराम पोतदार

संगीत मार्गदर्शन- संजय हरिभाऊ देशपांडे
गायक- सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी
सूत्रधार- सुभाष इनामदार, नटी- विनया देसाई
तबला- संजय कंरदीकर. ऑर्गन- जयराम पोतदार



Friday, July 22, 2011

रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला

-प्र. के घाणेकर

मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....


पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.

इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.

सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.

यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.

समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com