नृत्य, संगीत या क्षेत्रात वैयक्तिक योगदान देणारे कलावंत चित्रपटसृष्टीकडे धावत असून ते बॉलिवूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अभिजात कलेची हानी होते आहे, असे मत पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटाला संगीत देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
रेमो फर्नांडिस हे "मॉन्टे व्हर्ट इस्टेट्स'ने आयोजित केलेल्या संगीत रजनीसाठी पुण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. बॉलिवूड, सध्याचे संगीत, परदेशातील संगीत क्षेत्र याबाबत त्यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, 'पूर्वी पॉप, रॉक अल्बमचे प्रमाण जास्त होते; परंतु आता हे अल्बमसाठी कष्ट घेणारे गायक, संगीतकार पूर्णवेळ बॉलिवूडमध्ये दाखल झाले आहेत. प्रसिद्धी, पैसा हे त्यामागील कारण आहे. यामुळे दर्जेदार अल्बम बाजारात येणे बंद झाले आहे. भारतीय पॉपची प्रगती खुंटली आहे. कलाकारांनी चित्रपटसृष्टीत काम करायला हरकत नाही; परंतु आपली कला त्यांनी वेगळी जोपासली पाहिजे.''
'मला चाकोरीबाहेरचे संगीत द्यायला आवडते. त्यासाठी मी प्रयत्न करतो. मग त्याला भाषेचा अडसर येत नाही. अगदी मराठी असो वा हिंदी, विषय वेगळा असेल, तर त्या चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल. प्रथम मला कॅसेट कंपन्यांनी नाकारले होते. परंतु, मी स्वत: कॅसेट ध्वनिमुद्रित करून स्कूटरवरून विकल्या आहेत. लोकांनी त्या ऐकल्यानंतर माझी ओळख निर्माण झाली. श्याम बेनेगल यांनी माझ्या संगीतरचना ऐकून मला त्यांच्या चित्रपटात संधी दिली होती,'' असे ते म्हणाले.
पुण्यातील फसलेल्या पहिल्या कार्यक्रमाची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. 'लहान असताना मला पुण्यात येण्याची संधी मिळाली. एका व्यक्तीने आमच्या बॅंडच्या संगीत रजनीचे आयोजन केले होते. परंतु, येथे आल्यानंतर तो गायब झाला. त्या वेळी पुरेसा पैसाही आमच्याकडे नव्हता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आमची कानउघाडणी केल्यानंतर मग आम्हाला गोव्याला पाठविण्यात आले,'' असे ते म्हणाले.
http://www.esakal.com/esakal/20110724/5335040805023219889.htm
'संगीत क्षेत्रातही कलावंत हि-यांची परंपरा'
' राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असे वर्णन केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दगडांच्या खाणीतील हिरेही निर्माण होतात. इतर सर्व कलाक्षेत्रांसोबतच संगीत क्षेत्रातही अशीच कलावंत हिऱ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो,' असे मत ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे भारत गायन समाजातर्फे आयोजित (कै.) सौ. वसुंधरा पंडित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राजदत्त बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की यांना या वर्षीच्या कै. सौ. वसुंधरा पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. वसुंधरा पंडित ट्रस्टच्या विश्वस्त अरुणा गवाणकर, पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष सुधाकर जोशी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
खरा कलावंत हा आपली कला कायम समृद्ध करायचा प्रयत्न करीत असतो. तेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. आपल्याकडे चांगल्या कलावंतांची खूप मोठी परंपरा आहे. त्यातल्याच एका आदर्श कलाकाराचा आपण आज गौरव करीत आहोत. अशाच माध्यमातून चांगल्या कलाकारांची उदाहरणे नव्या पिढीसमोर येणे आवश्यक आहे, असेही राजदत्त यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पत्की यांनी, 'अजून शिकण्याची आवड असल्याने मी स्वत:ला कधीच मोठे मानले नाही. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक गोड धक्का आहे,' असे सांगितले. पत्की यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच त्यांच्या प्रकट मुलाखतीचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9340288.cms
subhash inamdar
subhash inamdar
Saturday, July 23, 2011
संगीत सावित्री- अभिनव आविष्कार-३१ जुलैला
संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त नटसम्राट बालगंधर्वांनी रंगमंचावर आणलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवार
संध्याकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिरात सादर होणार आहे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा) यांच्या वतीने होणा-या या अभिनव प्रयोगाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि प्रस्तुती पं. जयराम पोतदार यांची आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत पोतदार अधिक माहिती देताना सांगतात, या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ६ मार्च 1932 रोजी करण्यात आला. नाटकात सत्यवान- गंगाधरपंत लोंढे, नारद-मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि सावित्रीच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व अशा भूमिका होत्या. नाटकाचे पहिले काही प्रयोग हाऊस फुल्ल झाले याचे कारण ही सारी तेव्हाची स्टार कास्ट. मात्र १९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे बोलपट पाहण्यासाठी नाट्य रसिकांचाही तिकडे ओढा वाढला.सहाजिकच नाटकाकडे रसिक येईनासा झाला.
संगीत सावित्री हे संगीत आणि कथानक दोन्ही दृष्ट्या उत्तम असूनही रसिकांनी याकडे पाठ फिरविली. नाईलाजाने बालगंधर्वांना या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले.
साबरमती नदीकाठी एक वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगत असताना १९२९ साली या नाटकाची गद्य संहिता खाडिलकरांनी लिहून काढली होती. पण नंतर बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांनी नाटकातील गाण्यांना चाली देण्याचे मान्य केल्यावर १९३३ साली खाडिलकरांनी नाटकातली पदे रचली.
नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने त्यातल्या गाण्यांचा दर्जा उत्तमच होता. मात्र या नाटकाचे पुन्हा प्रयोग झाले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. रसिकांच्या विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे पं. जयराम पोतदार यांनी सांगितले.
सादरीकरणात संगीत नाटकातील पारंपारिक पध्दतीप्रमाणे सूत्रधार-नटीच्या संवादातून नाटकाचे कथानक कथन केले जाणार आहे. संवादातून कथा पुढे सरकत राहिल आणि गायक-गायिका त्यातली पदे सादर करतील. संगीत नाटकाप्रमाणे ऑर्गन आणि तबला साथ पिटात असणारच आहे. कार्यक्रम नाट्यमय करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. अवघ्या अडीच तासात संगीत रसिकांना संगीत नाटकाचा पूर्ण अनुभव देण्याची ही पध्दत पुण्यात पं. पोतदार रूढ करू इच्छीत आहेत.
रविवार ३१ जुलैला संध्या. ५ वा, भरत नाट्य मंदिर,पुणे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा)
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक
संगीत सावित्री- कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार
संगीत दिग्दर्शन- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व
संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व प्रस्तुती- जयराम पोतदार
संगीत मार्गदर्शन- संजय हरिभाऊ देशपांडे
गायक- सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी
सूत्रधार- सुभाष इनामदार, नटी- विनया देसाई
तबला- संजय कंरदीकर. ऑर्गन- जयराम पोतदार
संध्याकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिरात सादर होणार आहे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा) यांच्या वतीने होणा-या या अभिनव प्रयोगाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि प्रस्तुती पं. जयराम पोतदार यांची आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत पोतदार अधिक माहिती देताना सांगतात, या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ६ मार्च 1932 रोजी करण्यात आला. नाटकात सत्यवान- गंगाधरपंत लोंढे, नारद-मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि सावित्रीच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व अशा भूमिका होत्या. नाटकाचे पहिले काही प्रयोग हाऊस फुल्ल झाले याचे कारण ही सारी तेव्हाची स्टार कास्ट. मात्र १९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे बोलपट पाहण्यासाठी नाट्य रसिकांचाही तिकडे ओढा वाढला.सहाजिकच नाटकाकडे रसिक येईनासा झाला.
संगीत सावित्री हे संगीत आणि कथानक दोन्ही दृष्ट्या उत्तम असूनही रसिकांनी याकडे पाठ फिरविली. नाईलाजाने बालगंधर्वांना या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले.
साबरमती नदीकाठी एक वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगत असताना १९२९ साली या नाटकाची गद्य संहिता खाडिलकरांनी लिहून काढली होती. पण नंतर बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांनी नाटकातील गाण्यांना चाली देण्याचे मान्य केल्यावर १९३३ साली खाडिलकरांनी नाटकातली पदे रचली.
नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने त्यातल्या गाण्यांचा दर्जा उत्तमच होता. मात्र या नाटकाचे पुन्हा प्रयोग झाले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. रसिकांच्या विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे पं. जयराम पोतदार यांनी सांगितले.
सादरीकरणात संगीत नाटकातील पारंपारिक पध्दतीप्रमाणे सूत्रधार-नटीच्या संवादातून नाटकाचे कथानक कथन केले जाणार आहे. संवादातून कथा पुढे सरकत राहिल आणि गायक-गायिका त्यातली पदे सादर करतील. संगीत नाटकाप्रमाणे ऑर्गन आणि तबला साथ पिटात असणारच आहे. कार्यक्रम नाट्यमय करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. अवघ्या अडीच तासात संगीत रसिकांना संगीत नाटकाचा पूर्ण अनुभव देण्याची ही पध्दत पुण्यात पं. पोतदार रूढ करू इच्छीत आहेत.
रविवार ३१ जुलैला संध्या. ५ वा, भरत नाट्य मंदिर,पुणे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा)
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक
संगीत सावित्री- कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार
संगीत दिग्दर्शन- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व
संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व प्रस्तुती- जयराम पोतदार
संगीत मार्गदर्शन- संजय हरिभाऊ देशपांडे
गायक- सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी
सूत्रधार- सुभाष इनामदार, नटी- विनया देसाई
तबला- संजय कंरदीकर. ऑर्गन- जयराम पोतदार
Friday, July 22, 2011
रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला
-प्र. के घाणेकर
पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.
इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.
सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.
यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.
समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.
सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com
मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....
पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.
इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.
सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.
यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.
समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.
सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com
Tuesday, July 19, 2011
रंगली झाकीरची मैफल
' बेटा अच्छे शागीर्द बनो, उस्ताद बनने की कोशिश न करो,' असा वडील अल्लारखाँ यांनी दिलेला गुरूमंत्र, अथक रियाज, बालपणातच पं. रविशंकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून मिळालेले धडे आणि अथांग संगीतसागरातील एक साधक असल्याची प्रांजळ भावना...
मंत्रमुग्ध करणारा तबला-डग्गा नव्हता, तरी उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. या खेपेस ठेका होता स्मरणरंजनाचा!
निमित्त होते पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कारप्रदान सोहळ्याचे. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतफेर् झाकीरजींचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश लळित, उपाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, सुहासिनी पुजारी, दादासाहेब नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. पं. योगेश सम्सी यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान झाकीरजींचे स्मृतिताल रंगले.
बेटा अच्छे शागीर्द बनो. उस्ताद बनने की कोशिश न करो, हे अल्लारखाँ यांचे बोल अजूनही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, असे सांगून झाकीर म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रात अजूनही बरेच काही करायचे आहे. वडिलांचा हा गुरूमंत्रच कलेचा साधक म्हणून आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. उस्ताद म्हणून तुम्ही गौरवित असला, तरी उस्तादगिरी गाजविण्यासाठी कधीच तबल्यावर थाप मारली नाही.
मोठ्या कलाकरांच्या सहवासातून संगीत शिक्षणास सुरवात झाली. विद्याथिर्दशेत पं. रविशंकर यांचे मार्गदर्शन लाभले नि त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच कलेची वाटचाल सुरू आहे. संगीत ही एका कप्प्यात बंद राहणारी कला नसून, तिला सागराची उपमाही थोडकीच आहे. भारतीय संगीताची परंपरा पुढे नेणाऱ्या माझ्यासारख्या कलासाधकांनी तिचा अहंभाव न मानता आंतरराष्ट्रीय संगीतातील नव्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. उत्तम तालीम हा जसा संगीताचा आत्मा आहे. त्याचप्रमाणे चांगली साथसंगत कलाकाराला पैलू पाडते आणि मैफल खुलविते, असेही झाकीर म्हणाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9276601.cms
मंत्रमुग्ध करणारा तबला-डग्गा नव्हता, तरी उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. या खेपेस ठेका होता स्मरणरंजनाचा!
निमित्त होते पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कारप्रदान सोहळ्याचे. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतफेर् झाकीरजींचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश लळित, उपाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, सुहासिनी पुजारी, दादासाहेब नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. पं. योगेश सम्सी यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान झाकीरजींचे स्मृतिताल रंगले.
बेटा अच्छे शागीर्द बनो. उस्ताद बनने की कोशिश न करो, हे अल्लारखाँ यांचे बोल अजूनही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, असे सांगून झाकीर म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रात अजूनही बरेच काही करायचे आहे. वडिलांचा हा गुरूमंत्रच कलेचा साधक म्हणून आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. उस्ताद म्हणून तुम्ही गौरवित असला, तरी उस्तादगिरी गाजविण्यासाठी कधीच तबल्यावर थाप मारली नाही.
मोठ्या कलाकरांच्या सहवासातून संगीत शिक्षणास सुरवात झाली. विद्याथिर्दशेत पं. रविशंकर यांचे मार्गदर्शन लाभले नि त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच कलेची वाटचाल सुरू आहे. संगीत ही एका कप्प्यात बंद राहणारी कला नसून, तिला सागराची उपमाही थोडकीच आहे. भारतीय संगीताची परंपरा पुढे नेणाऱ्या माझ्यासारख्या कलासाधकांनी तिचा अहंभाव न मानता आंतरराष्ट्रीय संगीतातील नव्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. उत्तम तालीम हा जसा संगीताचा आत्मा आहे. त्याचप्रमाणे चांगली साथसंगत कलाकाराला पैलू पाडते आणि मैफल खुलविते, असेही झाकीर म्हणाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9276601.cms
Monday, July 18, 2011
पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक
कस्तुरी पायगुडे-राणे
कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.
इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.
थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.
पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.
`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.
कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.
ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.
पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.
पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.
बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.
दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.
पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.
संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.
आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.
आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com
कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.
इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.
थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.
पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.
`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.
कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.
ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.
पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.
पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.
बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.
दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.
पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.
संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.
आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.
आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com
`मी प्रमिका`-सीडीचे प्रकाशन २४ जुलैला
पुणे-18, रचनाकार आणि संगीतकार अभिजित कुंभार कॅलिफोर्नियात तर गायिका कस्तुरी पायगुडे-राणे पुण्यात असताना आजच्या काळातल्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाची जोड घेऊन तयार झालेल्या `मी प्रमिका` या ध्वनिफितीचा प्रकाशन समारंभ २४ जुलैला पुण्यात होणार आहे,याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार आणि शरद पायगुड़े यांनी सोमवारी पत्रकारांना दिली .
आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या कस्तुरी पायगुडे-राणे यांनी प्रेमगीतांच्या ८ रचनांच्या ध्वनिफितीमधून आपल्या गायनाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आकांक्षा क्रिएशन्स निर्मित या सीडीचे प्रकाशन आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते होत आहे. एस एम जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणा-या समारंभाचे प्रमुख पाहुणे संगीतकार आनंद मोडक असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून लीला पूनावाला व फिरोज पूनावाला उपस्थित राहणार आहेत.
कस्तूरी पायगुड़े यांच्या बाबत सांगताना, शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करत कस्तुरी पायगुडे-राणे यांनी पुण्यात ,पुण्याबाहेर आणि परदेशात २००च्यावर कार्यक्रम सादर केले आहेत. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्यांनी गायलेला हा मराठी प्रेमगीतांचा हा अल्बम गायनाच्या वेगळ्या क्षेत्रातील आपले स्थान निर्माण करील अशी खात्री असल्याचे शरद पायगुड़े यांनी सांगितले.
`मी प्रमिका`चे संगीत संयोजक मिलिंद गुणे आहेत.ध्वनिमुद्रण शिवरंजनी स्टुडीओत करण्यात आले आहे.
अभिजित कुंभार यांचेही हे पहिलेच पाऊल आहे. आज ते परदेशात असले तरी या निमित्ताने मराठी भाषा जपण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न होत आहे.
याकार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक पुणे (सुभाष इनामदार) यांचे मार्फत केले गेले आहे. सर्वासाठी २४ जुलैचा कार्यक्रम विनामुल्य आहे.
आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या कस्तुरी पायगुडे-राणे यांनी प्रेमगीतांच्या ८ रचनांच्या ध्वनिफितीमधून आपल्या गायनाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आकांक्षा क्रिएशन्स निर्मित या सीडीचे प्रकाशन आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते होत आहे. एस एम जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणा-या समारंभाचे प्रमुख पाहुणे संगीतकार आनंद मोडक असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून लीला पूनावाला व फिरोज पूनावाला उपस्थित राहणार आहेत.
कस्तूरी पायगुड़े यांच्या बाबत सांगताना, शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करत कस्तुरी पायगुडे-राणे यांनी पुण्यात ,पुण्याबाहेर आणि परदेशात २००च्यावर कार्यक्रम सादर केले आहेत. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्यांनी गायलेला हा मराठी प्रेमगीतांचा हा अल्बम गायनाच्या वेगळ्या क्षेत्रातील आपले स्थान निर्माण करील अशी खात्री असल्याचे शरद पायगुड़े यांनी सांगितले.
`मी प्रमिका`चे संगीत संयोजक मिलिंद गुणे आहेत.ध्वनिमुद्रण शिवरंजनी स्टुडीओत करण्यात आले आहे.
अभिजित कुंभार यांचेही हे पहिलेच पाऊल आहे. आज ते परदेशात असले तरी या निमित्ताने मराठी भाषा जपण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न होत आहे.
याकार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक पुणे (सुभाष इनामदार) यांचे मार्फत केले गेले आहे. सर्वासाठी २४ जुलैचा कार्यक्रम विनामुल्य आहे.
Saturday, July 16, 2011
आनंद : रसिका जोशी
गहिवरलो
वाचलं
कॅन्सरने निधन
परवा - परवा पाहिलं तुला टीव्ही वर
आनंदाने बिनधास्त
मुलाखत देत होतीस
बिनधास्त हिंदी डायलॉग टाकत
तुझ्याच हिंदी चित्रपटातला
पुसटशीही कल्पना नव्हती
कॅन्सर तुला छळतोय
कणाकणाने घटवतोया
राजेश खन्नाचा "आनंद"
कॅन्सर पेशंटची भूमिका
फक्त भूमिका
तू ती जगलीस
गेली नऊ वर्षे
आनंदाने
टवटवीतपणे
खट्याळ, दिलखुलास हसू
लोपू न देता
उर्जेची अखंड ज्योत ;
जीवननिष्ठा
जागवित
खरंच ; आज तू
" आनंदला"
पोरकं केलंस
स्वः तास स्वीकारून
दुसर्यांना स्वीकारायला लावणारी
रणरागिणी
'स्व' त्व जपून
"माणूस" मूल्य जपणारी
हिरकणी
तुझ्यातली सृजनशील लेखिका
कोणास कळली ?
जुनाट सिस्टीम
यांत्रिकीकरणाचा रेटा
माणसाचं एकाकीपण, तुटलेपण
अस्थिरता
तुझ्या भेदक सत्यान्वेषी दृष्टीने टिपले
व्हाईट लिली नाईट रायडर
तुझ्या प्रतिभेचा उच्चतर आविष्कार
असा बोल्ड, हरहुन्नरी, कसदार अभिनय
आता कोण करणार ?
झालीस तू तुझ्या चाहत्यांच्या कुटुंबातली
एक सदस्य
असं यश - - - - - - -
तुला मोलाची साथ देणारे
गिरीश जोशीस सलाम
तुला सलाम
आता तुझी परवानगी घेऊन थांबतो
नाही तर म्हणशील :
किती लांबड लावली !
सुरेश टिळेकर
पुणे.
Subscribe to:
Posts (Atom)






