आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...
प्रिय विजय,
परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो. पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला. नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो. चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले. आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे, अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्याभूमिकेत वावरणे...कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो. आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. नाना आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला. पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले. अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस...क्वचित मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....
तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. नानांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली. तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली. विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.
विजय, शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पत्करली. चार-पाच वर्षे केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस. लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्ती, वर्षें. मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे. आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.
दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास.दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव जागृत करून नवे क्षेत्रात पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले. हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला. खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.
विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर, विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य, आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.
मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..
पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्ककर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.
तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे. म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस. केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बाधणी करणारा सूत्रधार तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले. नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण कुणाला न सांगता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार बनलास.
तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले
विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी.. कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर. निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे. कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.
तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,
तुझाच,
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com
subhash inamdar
subhash inamdar
Wednesday, June 15, 2011
Thursday, June 9, 2011
नविन चालींवर आधारित -अमृताचा कल्लोळू
काही महिन्यापूर्वी झलक संस्थेच्या तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सादर झालेल्या अमृताचा कल्लोळू या अभंगवाणीच्या कार्यक्रमाने मला एक वेगळाच आनंदाचा धक्का दिला. त्याविषयीच मी आज लिहिणार आहे.
हा पूर्णतः नविन चालींवर आधारित कार्यक्रम असूनही प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते.सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर आणि सौ. मंजुषा पाटील. गायक कलाकार तर उत्तमच होते, परंतु मन उल्हसित झाले ते अत्यंत अप्रतिम, वेगळ्या आणि बुध्दीप्रधान चाली ऐकून.
संपूर्णपणे रागदारीवर आधारित असलेल्या त्या नाविन्यपूर्ण रचनांनी माझ्यासारख्या जयपूर गायकीचा अभ्यास करणा-या कलावंताला तर भुरळच पडली. रचनाकार प्रा. केशव परांजपे त्यांच्या रसाळ, प्रभावी, अभ्यासपूर्ण, ओघवत्या शैलीत ज्ञानदेवांच्या अभंगाचे रंग उलगडून दाखवत होते. रसिकांच्या कानांना ही एक मेजवानीच मिळाली होती.
मीही संतकवींच्या अनेक रचना गाते, परंतु रचनांमधली आशयघनता. विषयाच्या गाभ्याला ङात घालण्याची हातोटी आणि अवघड वळणे असूनही थेट ह्दयाशी संवाद साधणा-या रचना . असा सुंदर संगम पाहून भारावल्यासारखे झाले.
रचनाकारांची भेट घेतल्याशिवाय राहवेना. निरनिराळे राग, निरनिराळ्या वजनाचे ठेके. कधी लोकसंगीताचा बाज घेउन येत होते. रागदारीचा तर सखोल अभ्यास जाणवत होता. भूप रागातल्या सकळ मंगळनिधी या नामाच्या अभंगातून मूर्छना तत्वाने साकारलेले वैविध्य जाणवत होते.
त्यानंतरच्या मन तुरंबा काहो, अनुपम्य नेने, सुखाचिये आवडी, कृपाळू माझा ज्ञानेश्वर या विशेष उल्लेखनीय रचनांमध्ये तोडी, मारवा, ललत, गोरखकल्याण, केदार, भैरवी अशा अनेक रागांच्या छटा मन मोहविणा-या होत्या.
घडचक्री कुंभार घडीतसे माती, ही सात मात्रांच्या ठेक्यातली लोकसंगीताचा बाज घेऊन आलेली रचना तर खूपच मनाला भिडली.
सुरवातीचा शुध्द स्वरांचा आणि शेवटचा भैरवीमधला गजरही नेहमी आपण ऐकतो त्या गजरांपेक्षा निराळी छाप मनावर ठेऊन गेला.
तुझा आण वाहिन गा देवराया, नी तर डोळ्यात पाणी आणि अंगभर रोमांच आणले.
कॉमर्ससारख्या विषयाचे प्राचार्य असूनही सौंदर्यपूर्ण कलात्मक दृष्टी, सांगीतीक विचार इतका परिपूर्ण कसा असे आश्चर्य वाटून मी केशवजींची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. अत्यंत सुरेल आणि अगत्यशील असा परांजपे दांपत्याकडून पाहुणचार घेत असताना माहिती कळली, की इतक्या सुंदर रचनांमागे तीस वर्षांचा अभ्यास आहे. संगीतावरच्या नितांत प्रेमामुळे त्यांनी मुंबई विलेपार्ले येथे स्वरमाऊली हा शास्त्रीय संगातासाठीची संस्था स्थापन केली. ही संस्था मुख्यतः उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा वरदहस्त केशवजींना लाभला आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
किशोरीताईंच्या गायकीचा त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या रचनांतून जाणवतो. स्वरमाऊलीच्या वतीने २५० हून अधिक कार्यक्रम. ५० पेक्षा अधिक कार्यशाळा. मुलाखती झालेल्या आहेत. सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे, हा त्यांचा हूतू सफल झाला आहे. केशव परांजपे यांनी विविध वृत्तपत्रे,. अनुभवसारख्या मासिकातून किशोरीताईं, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, शोभा गुर्टू, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारख्या दिग्गजांच्या संगीतविषयक सविस्तर मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. समीक्षालेखन, कवितालेखन हे साहित्यातील प्रांतावरही त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
अमृताचा कल्लोळू या कार्यक्रमाप्रमाणेच ज्ञानेश्वरांच्या विराण्या, अभंग, रामदास, संत तुकाराम त्याचप्रमाणे ग्रेस, बोरकर, बहिणाबाई चौधरी, आरती प्रभू, मर्ढेकर, पाडगावकर या कर्व कवींच्या काव्यांना त्यांनी चाली लावल्या आहेत.
केशवजी म्हणाले की, रांगांकडे पाहण्याची उत्कट, सुंदर, संवेदनाक्षम दृष्टी त्यांना किशोरीताईंच्या गायकीमध्ये मिळाली. एखाद्या रचनेसाठी चाल सुचणे यासाठीही जन्मजात देणगीच असावी लागते. त्यामुळे त्यांचा चालींमध्य़े आत्म्याची कहन जाणवते. प्रसरणशील, विस्तारक्षम चाली, काही भाग रांगांसाठी मोकळा तर काही भाग विविध रागांच्या pharses घेऊन येतो. त्यांचा भावनिक प्रभाव, रागांमधल्या स्वरचित्रांचा प्रभाव चालींमध्ये नक्कीच प्रतित होतो.
कवितेचे, शब्दांचे म्हणणे स्वरातून व्यक्त करण्याइतक्या समर्थ चाली केशवजींच्या आहेत. त्यांच्या मते कविता गुणगुणताना अनेक विचार सुचतात. त्यातून सर्वंकश भावना ज्यातून प्रकट होतील ती चाल तयार होते. म्हणूनच ह्यातून निर्माण होणा-या कलाकृतीला बुध्दीमत्तेच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेल्या ह्या चाली आहेत.
अनेक भावना, अनेक रंग, अशा मिश्र चाली असूनही त्यात एकजिनसीपणा जाणवत रहातो. कधी थेट संवाद तर कधी आर्त व्याकुळता त्यात जाणवते.
केशव परांजपे अत्यांत साधे, मितभाषी परंतु बहुआयामी व्याक्तिमत्व.
कधी कधी दुर्गम वाटणा-या चाली असूनही स्वतःला भावले ते मांडले, असा व्यवहारीपणाचा स्पर्शही नसलेला दृष्टीकोन.
म्हणूनच पैसा, प्रसिध्दी यांच्यामागे लाहहलेल्या आजच्या जगात कोणताही व्यावसायिक हेतू न ठोवता संगीतासाठी, संगीत करणा-या अशा लोकांचे मोल अधिक वाटते.
सौ. सानिया पाटणकर, पुणे
(शास्त्रीय गायिका)
मोबा- ९४२२५२३४९१
हा पूर्णतः नविन चालींवर आधारित कार्यक्रम असूनही प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते.सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर आणि सौ. मंजुषा पाटील. गायक कलाकार तर उत्तमच होते, परंतु मन उल्हसित झाले ते अत्यंत अप्रतिम, वेगळ्या आणि बुध्दीप्रधान चाली ऐकून.
संपूर्णपणे रागदारीवर आधारित असलेल्या त्या नाविन्यपूर्ण रचनांनी माझ्यासारख्या जयपूर गायकीचा अभ्यास करणा-या कलावंताला तर भुरळच पडली. रचनाकार प्रा. केशव परांजपे त्यांच्या रसाळ, प्रभावी, अभ्यासपूर्ण, ओघवत्या शैलीत ज्ञानदेवांच्या अभंगाचे रंग उलगडून दाखवत होते. रसिकांच्या कानांना ही एक मेजवानीच मिळाली होती.
मीही संतकवींच्या अनेक रचना गाते, परंतु रचनांमधली आशयघनता. विषयाच्या गाभ्याला ङात घालण्याची हातोटी आणि अवघड वळणे असूनही थेट ह्दयाशी संवाद साधणा-या रचना . असा सुंदर संगम पाहून भारावल्यासारखे झाले.
रचनाकारांची भेट घेतल्याशिवाय राहवेना. निरनिराळे राग, निरनिराळ्या वजनाचे ठेके. कधी लोकसंगीताचा बाज घेउन येत होते. रागदारीचा तर सखोल अभ्यास जाणवत होता. भूप रागातल्या सकळ मंगळनिधी या नामाच्या अभंगातून मूर्छना तत्वाने साकारलेले वैविध्य जाणवत होते.
त्यानंतरच्या मन तुरंबा काहो, अनुपम्य नेने, सुखाचिये आवडी, कृपाळू माझा ज्ञानेश्वर या विशेष उल्लेखनीय रचनांमध्ये तोडी, मारवा, ललत, गोरखकल्याण, केदार, भैरवी अशा अनेक रागांच्या छटा मन मोहविणा-या होत्या.
घडचक्री कुंभार घडीतसे माती, ही सात मात्रांच्या ठेक्यातली लोकसंगीताचा बाज घेऊन आलेली रचना तर खूपच मनाला भिडली.
सुरवातीचा शुध्द स्वरांचा आणि शेवटचा भैरवीमधला गजरही नेहमी आपण ऐकतो त्या गजरांपेक्षा निराळी छाप मनावर ठेऊन गेला.
तुझा आण वाहिन गा देवराया, नी तर डोळ्यात पाणी आणि अंगभर रोमांच आणले.
कॉमर्ससारख्या विषयाचे प्राचार्य असूनही सौंदर्यपूर्ण कलात्मक दृष्टी, सांगीतीक विचार इतका परिपूर्ण कसा असे आश्चर्य वाटून मी केशवजींची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. अत्यंत सुरेल आणि अगत्यशील असा परांजपे दांपत्याकडून पाहुणचार घेत असताना माहिती कळली, की इतक्या सुंदर रचनांमागे तीस वर्षांचा अभ्यास आहे. संगीतावरच्या नितांत प्रेमामुळे त्यांनी मुंबई विलेपार्ले येथे स्वरमाऊली हा शास्त्रीय संगातासाठीची संस्था स्थापन केली. ही संस्था मुख्यतः उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा वरदहस्त केशवजींना लाभला आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
किशोरीताईंच्या गायकीचा त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या रचनांतून जाणवतो. स्वरमाऊलीच्या वतीने २५० हून अधिक कार्यक्रम. ५० पेक्षा अधिक कार्यशाळा. मुलाखती झालेल्या आहेत. सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे, हा त्यांचा हूतू सफल झाला आहे. केशव परांजपे यांनी विविध वृत्तपत्रे,. अनुभवसारख्या मासिकातून किशोरीताईं, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, शोभा गुर्टू, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारख्या दिग्गजांच्या संगीतविषयक सविस्तर मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. समीक्षालेखन, कवितालेखन हे साहित्यातील प्रांतावरही त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
अमृताचा कल्लोळू या कार्यक्रमाप्रमाणेच ज्ञानेश्वरांच्या विराण्या, अभंग, रामदास, संत तुकाराम त्याचप्रमाणे ग्रेस, बोरकर, बहिणाबाई चौधरी, आरती प्रभू, मर्ढेकर, पाडगावकर या कर्व कवींच्या काव्यांना त्यांनी चाली लावल्या आहेत.
केशवजी म्हणाले की, रांगांकडे पाहण्याची उत्कट, सुंदर, संवेदनाक्षम दृष्टी त्यांना किशोरीताईंच्या गायकीमध्ये मिळाली. एखाद्या रचनेसाठी चाल सुचणे यासाठीही जन्मजात देणगीच असावी लागते. त्यामुळे त्यांचा चालींमध्य़े आत्म्याची कहन जाणवते. प्रसरणशील, विस्तारक्षम चाली, काही भाग रांगांसाठी मोकळा तर काही भाग विविध रागांच्या pharses घेऊन येतो. त्यांचा भावनिक प्रभाव, रागांमधल्या स्वरचित्रांचा प्रभाव चालींमध्ये नक्कीच प्रतित होतो.
कवितेचे, शब्दांचे म्हणणे स्वरातून व्यक्त करण्याइतक्या समर्थ चाली केशवजींच्या आहेत. त्यांच्या मते कविता गुणगुणताना अनेक विचार सुचतात. त्यातून सर्वंकश भावना ज्यातून प्रकट होतील ती चाल तयार होते. म्हणूनच ह्यातून निर्माण होणा-या कलाकृतीला बुध्दीमत्तेच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेल्या ह्या चाली आहेत.
अनेक भावना, अनेक रंग, अशा मिश्र चाली असूनही त्यात एकजिनसीपणा जाणवत रहातो. कधी थेट संवाद तर कधी आर्त व्याकुळता त्यात जाणवते.
केशव परांजपे अत्यांत साधे, मितभाषी परंतु बहुआयामी व्याक्तिमत्व.
कधी कधी दुर्गम वाटणा-या चाली असूनही स्वतःला भावले ते मांडले, असा व्यवहारीपणाचा स्पर्शही नसलेला दृष्टीकोन.
म्हणूनच पैसा, प्रसिध्दी यांच्यामागे लाहहलेल्या आजच्या जगात कोणताही व्यावसायिक हेतू न ठोवता संगीतासाठी, संगीत करणा-या अशा लोकांचे मोल अधिक वाटते.
सौ. सानिया पाटणकर, पुणे
(शास्त्रीय गायिका)
मोबा- ९४२२५२३४९१
Tuesday, May 31, 2011
पं.मुकुंद मराठे -सी.डी. प्रकाशन ९ जूनला
पं. मुंकुद मराठे. गेली १६ वर्षे शास्त्रीय संगीताचे एकनिष्ठपणे अध्यापन करणारे गुरू म्हणून परिचित. कसदार व दमदार गायकीने त्यांची मैफल ऐकणा-यांच्या नेहमीच लक्षात रहाते. शास्त्रीय संगीताची गायकी ग्वाल्हेर घराण्याची. पण बनारसच्या ठुमरी आणि दादरावर वेगळी हुकमत.
त्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आविष्कार घडविणारी रागरंग ही सीडी तालयोगी पं, सुरेश तळवलकर यांच्या हस्ते गुरूवार ९ जूनला पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे.यावेळी चित्रकार रवि परांजपे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी व आकाशवाणी पुणे केंद्रांचे संचालक पतंजली मादुस्करविशेष उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी पं. मुकुंद अनंत मराठे यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय रागांची मैफल आयोजित केली आहे. याला हार्मेनियमची साथ करतील डॉ. अरविंद थत्ते आणि तबल्यावर साथ करणार आहेत पं. अरविंदकुमार आझाद. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
त्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आविष्कार घडविणारी रागरंग ही सीडी तालयोगी पं, सुरेश तळवलकर यांच्या हस्ते गुरूवार ९ जूनला पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे.यावेळी चित्रकार रवि परांजपे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी व आकाशवाणी पुणे केंद्रांचे संचालक पतंजली मादुस्करविशेष उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी पं. मुकुंद अनंत मराठे यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय रागांची मैफल आयोजित केली आहे. याला हार्मेनियमची साथ करतील डॉ. अरविंद थत्ते आणि तबल्यावर साथ करणार आहेत पं. अरविंदकुमार आझाद. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
Wednesday, May 25, 2011
गंधर्वयुगाच्या पुनःप्रत्ययाचा 'आनंद'
बालगंधर्व चित्रपट पाहून आलेल्या युवकांच्या घोळक्यातून एक आवाज उमटला, "काय, आवाज लागलाय यार! मस्तच. एक नंबर. आपल्याला तर जाम आवडलं बुवा.....'
तितक्यात दुसरा आवाज उमटला, "अगदी खरंय, मी आधी नाट्यसंगीत फारसे ऐकायची नाही; पण या गाण्यांची गोडी लागली.' दुसरीकडे याच प्रेक्षकांच्या घोळक्यात मिसळलेले दोन आजोबा गप्पा मारत होते, "गाणी ऐकताना अगदी बालगंधर्वांचीच आठवण झाली. हे शिवधनुष्य चांगले पेलले......'
बालगंधर्वांच्या गाण्याची नव्या पिढीला ओळख करून देणारा आणि जुन्या पिढीला पुन्हा त्या संगीतनाटकाच्या सुवर्णयुगात नेणारा आवाज आहे, आनंद भाटे यांचा.
बालगंधर्व यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे अनेक आव्हाने नक्कीच समोर असणार; पण त्यातील सगळ्यात मोठे आव्हान असणार ते बालगंधर्वांची गायकी पुन्हा नव्याने उभी करण्याचे. बालगंधर्वांच्या ध्वनिफिती न वापरता, गायकाकडून ही गाणी गाऊन घेण्यात आली. यामध्ये दुहेरी आव्हान होते. बालगंधर्व हे केवळ गायक-नट नव्हते तर अनेकांचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भक्तांच्या अपेक्षांना उतरण्याचे आव्हान त्यात होतेच; पण त्याचबरोबर नव्या पिढीलाही ही गाणी आपली वाटली पाहिजेत, बालगंधर्वांची शैली जपत त्यात नावीन्यताही जपली पाहिजे. भाटे यांनी या सर्व आव्हानांचा अत्यंत आत्मविश्वासाने सामना केला आणि त्याला यश आल्याचे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. बालगंधर्व हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे ही खूप चांगली आणि आव्हानात्मक गोष्ट होती. निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत सगळी भट्टी जमून आली. त्यामुळे प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी आनंद यांना मिळाली हे त्यांचे मोठे भाग्य आहे. बालगंधर्व यांची जी गायकी कळली ती कशी मांडता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चित्रपटात वेळेचे बंधन, दृष्याची सुसंगती या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यादृष्टीने त्यांनी गाण्यात योग्य ते बदल केले. या बदलांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
"चिन्मया सकल हृदया....' हे गाणे बालगंधर्व म्हणतात असे दृष्य चित्रपटात आहे. हे खरे बालगंधर्वांचे गाणे नाही. संगीतकार कौशल इनामदारने नवीन चाल देऊन भजन चित्रपटात आणले. परंपरेशी सुसंगत चाल करणे आव्हान होते. आनंद, आदित्य ओक व कौशल अशी त्यांची चांगली टीम जमली होती. तिघांनी मिळून या गाण्यांविषयी, सादरीकरणाविषयी विचार केला. बालगंधर्वांच्या गाण्यात हे विसंगत वाटता कामा नये हे आव्हान स्वीकारले. अनेक लोकांना ते आवडले. चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. बालगंधर्वांच्या सुवर्णकाळाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांना दिल्याबद्दल वेगळेच समाधान "बालगंधर्व'च्या टीमला मिळाले आहे यात शंका नाही.
-वसुधा जोशी
http://www.esakal.com/esakal/20110521/4751203579187930167.htm
तितक्यात दुसरा आवाज उमटला, "अगदी खरंय, मी आधी नाट्यसंगीत फारसे ऐकायची नाही; पण या गाण्यांची गोडी लागली.' दुसरीकडे याच प्रेक्षकांच्या घोळक्यात मिसळलेले दोन आजोबा गप्पा मारत होते, "गाणी ऐकताना अगदी बालगंधर्वांचीच आठवण झाली. हे शिवधनुष्य चांगले पेलले......'
बालगंधर्वांच्या गाण्याची नव्या पिढीला ओळख करून देणारा आणि जुन्या पिढीला पुन्हा त्या संगीतनाटकाच्या सुवर्णयुगात नेणारा आवाज आहे, आनंद भाटे यांचा.
बालगंधर्व यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे अनेक आव्हाने नक्कीच समोर असणार; पण त्यातील सगळ्यात मोठे आव्हान असणार ते बालगंधर्वांची गायकी पुन्हा नव्याने उभी करण्याचे. बालगंधर्वांच्या ध्वनिफिती न वापरता, गायकाकडून ही गाणी गाऊन घेण्यात आली. यामध्ये दुहेरी आव्हान होते. बालगंधर्व हे केवळ गायक-नट नव्हते तर अनेकांचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भक्तांच्या अपेक्षांना उतरण्याचे आव्हान त्यात होतेच; पण त्याचबरोबर नव्या पिढीलाही ही गाणी आपली वाटली पाहिजेत, बालगंधर्वांची शैली जपत त्यात नावीन्यताही जपली पाहिजे. भाटे यांनी या सर्व आव्हानांचा अत्यंत आत्मविश्वासाने सामना केला आणि त्याला यश आल्याचे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. बालगंधर्व हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे ही खूप चांगली आणि आव्हानात्मक गोष्ट होती. निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत सगळी भट्टी जमून आली. त्यामुळे प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी आनंद यांना मिळाली हे त्यांचे मोठे भाग्य आहे. बालगंधर्व यांची जी गायकी कळली ती कशी मांडता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चित्रपटात वेळेचे बंधन, दृष्याची सुसंगती या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यादृष्टीने त्यांनी गाण्यात योग्य ते बदल केले. या बदलांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
"चिन्मया सकल हृदया....' हे गाणे बालगंधर्व म्हणतात असे दृष्य चित्रपटात आहे. हे खरे बालगंधर्वांचे गाणे नाही. संगीतकार कौशल इनामदारने नवीन चाल देऊन भजन चित्रपटात आणले. परंपरेशी सुसंगत चाल करणे आव्हान होते. आनंद, आदित्य ओक व कौशल अशी त्यांची चांगली टीम जमली होती. तिघांनी मिळून या गाण्यांविषयी, सादरीकरणाविषयी विचार केला. बालगंधर्वांच्या गाण्यात हे विसंगत वाटता कामा नये हे आव्हान स्वीकारले. अनेक लोकांना ते आवडले. चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. बालगंधर्वांच्या सुवर्णकाळाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांना दिल्याबद्दल वेगळेच समाधान "बालगंधर्व'च्या टीमला मिळाले आहे यात शंका नाही.
-वसुधा जोशी
http://www.esakal.com/esakal/20110521/4751203579187930167.htm
Friday, May 20, 2011
भेट दोन गंधर्व युगांची
मी नाटकाचा वेडा माणूस...बालगंधर्व मुंबईला आमच्या मामाकडे यायचे. त्यावेळी लांब बसून त्यांना ऐकायचो...मध्येच खुळ्यासारखा एखादा प्रश्न विचारायचो...आमच्यातले अंतर कमी होत गेले. १९३२ मध्ये एका चटईवर बसून गप्पा मारण्याइतके आमचे संबध जमले...माझं आणि बालगंधर्वाचे नात हे भक्त आणि दैवतासारखे होते ...
आयुष्याची शताब्दी गाठलेले बुजूर्ग कलाकार अण्णासाहेब शिरगावकर जुन्या आठवणींना उजाळा देत होते...हेच बालगंधर्व समर्थपणे साकारणारा अभिनेता सुबोध भावे समीप आला आणि अण्णासाहेबांनी त्याला चक्क वाकून नमस्कार केला!
बालगंधर्व चित्रपटातील सुबोध भावे, आनंद भाटे, माधव वझे, अथर्व कवेर्, राहुल सोलापूरकर या कलाकारांचा सत्कार संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
बालगंधर्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रेक्षकांना गंधर्वयुगात नेले. बालगंधर्व आणि शाहू महाराज यांची झालेल्या भेटीपासून ते त्यांच्या संगीताच्या बैठकांचे वर्णन करत त्यांनी कार्यक्रमात रंग भरला. त्याकाळात महाराष्ट्रात बालगंधर्वांचा फोटो नाही असं एकही घर नव्हतं. बालगंधर्वांची फॅशन त्या काळातल्या बायका करायच्या. शिरगावकरांनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या या आठवणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. बालगंधर्वांची भूमिका केलेला सुबोध भावे प्रेक्षकातून उठून शिरगावकरांकडे गेला. त्यावेळी आताच्या चित्रपटातील बालगंधर्व हेच, अशी ओळख त्यांना करून दिल्यावर या बुजूर्ग कलाकाराने चित्रपटातल्या बालगंधर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सभागृहातले वातावरण नि:शब्द झाले होते.
राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे तीन युगपुरुष होऊन गेले, त्यांचे कर्तृत्त्व मराठी माणसाच्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे पांडुरंग हे जसे दैवत आहे, तसेच संगीत नटांचे बालगंधर्व दैवत आहे. शास्त्रीय संगीतातला अवघडपणा बालगंधर्वांनी नाट्य संगीतात जोपासला. शास्त्रीय संगीत रसिकांपर्यंत पोहोचवले ते बालगंधर्वांनीच, असा गौरव या वेळी कामत यांनी केला.
आयुष्याची शताब्दी गाठलेले बुजूर्ग कलाकार अण्णासाहेब शिरगावकर जुन्या आठवणींना उजाळा देत होते...हेच बालगंधर्व समर्थपणे साकारणारा अभिनेता सुबोध भावे समीप आला आणि अण्णासाहेबांनी त्याला चक्क वाकून नमस्कार केला!
बालगंधर्व चित्रपटातील सुबोध भावे, आनंद भाटे, माधव वझे, अथर्व कवेर्, राहुल सोलापूरकर या कलाकारांचा सत्कार संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
बालगंधर्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रेक्षकांना गंधर्वयुगात नेले. बालगंधर्व आणि शाहू महाराज यांची झालेल्या भेटीपासून ते त्यांच्या संगीताच्या बैठकांचे वर्णन करत त्यांनी कार्यक्रमात रंग भरला. त्याकाळात महाराष्ट्रात बालगंधर्वांचा फोटो नाही असं एकही घर नव्हतं. बालगंधर्वांची फॅशन त्या काळातल्या बायका करायच्या. शिरगावकरांनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या या आठवणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. बालगंधर्वांची भूमिका केलेला सुबोध भावे प्रेक्षकातून उठून शिरगावकरांकडे गेला. त्यावेळी आताच्या चित्रपटातील बालगंधर्व हेच, अशी ओळख त्यांना करून दिल्यावर या बुजूर्ग कलाकाराने चित्रपटातल्या बालगंधर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सभागृहातले वातावरण नि:शब्द झाले होते.
राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे तीन युगपुरुष होऊन गेले, त्यांचे कर्तृत्त्व मराठी माणसाच्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे पांडुरंग हे जसे दैवत आहे, तसेच संगीत नटांचे बालगंधर्व दैवत आहे. शास्त्रीय संगीतातला अवघडपणा बालगंधर्वांनी नाट्य संगीतात जोपासला. शास्त्रीय संगीत रसिकांपर्यंत पोहोचवले ते बालगंधर्वांनीच, असा गौरव या वेळी कामत यांनी केला.
"पांगिरा' -20 मेपासून
"आयड्रीम प्रॉडक्शन'चा "पांगिरा' हा बहुचर्चित चित्रपट येत्या 20 मेपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.
किशोर कदम, प्रशांत पाटील प्रमोद पवार, शशांक शेडे, मीता सावरकर, नंदिनी जोग यांच्यासह संगीतकार विजय नारायण उपस्थित होते.
"जोगवा'सारखा आशयघन चित्रपट बनविणाऱ्या टीमनेच "पांगिरा' हा चित्रपट बनविला आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या "पांगिरा' या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले आहे. संवाद-गीते, कविता तसेच प्रस्तुतकर्ते संजय पाटील आहेत. पटकथा राजीव आणि संजय पाटील यांनी लिहिलेली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, प्रमोद पवार, मिता सावरकर, स्मिता तांबे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.
बदलत्या गावपांढरीची कहाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वेदना त्यात मांडण्यात आली आहे. चित्रपटाला विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये चोवीस नामांकने आणि अकरा पारितोषिके मिळालेली आहेत. विश्वास पाटील यांनी 1980 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. सोन्यासारखा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसविणाऱ्या भूमिपुत्रांची ही उद्ध्वस्त जत्रा अजून किती पिढ्यांनी कोडग्या नजरेने बघायची, असा प्रश्न पाटील यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
किशोर कदम, प्रशांत पाटील प्रमोद पवार, शशांक शेडे, मीता सावरकर, नंदिनी जोग यांच्यासह संगीतकार विजय नारायण उपस्थित होते.
"जोगवा'सारखा आशयघन चित्रपट बनविणाऱ्या टीमनेच "पांगिरा' हा चित्रपट बनविला आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या "पांगिरा' या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले आहे. संवाद-गीते, कविता तसेच प्रस्तुतकर्ते संजय पाटील आहेत. पटकथा राजीव आणि संजय पाटील यांनी लिहिलेली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, प्रमोद पवार, मिता सावरकर, स्मिता तांबे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.
बदलत्या गावपांढरीची कहाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वेदना त्यात मांडण्यात आली आहे. चित्रपटाला विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये चोवीस नामांकने आणि अकरा पारितोषिके मिळालेली आहेत. विश्वास पाटील यांनी 1980 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. सोन्यासारखा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसविणाऱ्या भूमिपुत्रांची ही उद्ध्वस्त जत्रा अजून किती पिढ्यांनी कोडग्या नजरेने बघायची, असा प्रश्न पाटील यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
Monday, May 16, 2011
जिद्द कमी पडते- पं. भालचंद्र देव
शाहरूख खान चित्रपटात व्हायोलिनवर स्वर काढतो. त्याचे आकर्षण बाळगून अनेक विद्यार्थी व्हायोलिन शिकायला येतात. मात्र या वाद्यात स्वर शोधायचा असतो. त्यासाठी लागते ती कमालीची चिकाटी आणि जिद्द. थोडक्या वेळात येणारे हे वाद्य नाही. प्रथम अकर्षणाने आलेला विद्यार्थी पुढे वाद्याचे धडे गिरवायला येत नाही. शिकायला येणारे शार्गिद अर्धवट सोडून जातात. म्हणूनच सौ. चारूशीला गोसावी, अविनाश द्रवीड, सुरेश गुजर यांचे सारखे विद्यार्थी, शिष्य व्हायोलिनमध्ये पुढे चमकताना दिसतात. तीन हजारात तीन-चारच स्वतःचे नाव कमावतात याची खंत पं. भालचंद्र दामोदर देव यांनी व्यक्त केली.
पं. देव यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात पं. देव यांनी मनमोकळी उत्तरे देत शब्द-सूरांची मैफल रंगवित नेली. पुण्याचे सांस्कृतिक पत्रकार सुभाष इनामदार यांनी पं. देव यांच्याशी बातचित केली. त्यांच्याकडून काही आठवणी रसिकांना ऐकता आल्या.
ज्येष्ठ रसिक, समिक्षक, कलावंत आणि व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते स्वरबहार संस्थेच्या वतीने शनिवारी ( १४ मे) पं. देव आणि त्यांच्या पत्नी सौ. निला भालचंद्र देव यांचा सत्कार केला गेला.
स्वरानंदचे प्रकाश भोंडे, ज्येष्ट व्हायोलिन वादक पं. फैय्याज हुसेन खॉं यांना देवांविषयीचे विषेश सांगितले..
पं. गजाननबुवा जोशी यांचेकडे पं. देव यांनी व्हायोलिनचे धडे गिरविले. त्यांचे सांगणे होते की, तु व्हायोलिनीस्ट होण्यासाठी अजून ५ वर्षे रिय़ाच कर. पण परिस्थितीमुळे आपल्याला टेलिफोन खात्यात नोकरी पत्करावी लागली. मात्र व्हायोलिन शिकण्याची जिद्द. तेच एकमेव व्यसन जडले. आयुष्यभर तेच केले. आज मी तृत्प आहे. माझ्या मेहनतीला फळ आले. माझ्या मुलीचा काल (शक्रवारी ) व्हायोलिन गाते तेव्हा...कार्यक्रम ऐकला आणि तिने कलेचे चिज केले असे वाटले., असे विचार पं. भालचंद्र देव यांनी सत्कारप्रसंगी मांडले.
शास्त्रीय संगीताची आवड असली तरी नोटेशन लिहण्याची सवय सुगमसंगीताकडे वळल्याने झाली. याचे श्रेय ते स्वरानंद या संस्थेला देतात. अरुण दाते, वि.र.गोडे, विसुभाऊ बापट, आनंद माडगूळकर, यशवंत देव, बबनराव नावडीकर, मालती पांडे अशा कित्येक कलावंतांना पं. देव यांनी व्हायोलिनची साथ केली. पण हिराबाई बडोदेकरांबरोबर केलेल्या साथीची आठवण त्यांच्या लेखी वेगळी होती. ती आठवण सांगताना हिराबाईंच्या लडीवाळ स्वरांची यादगार त्यांना सांगावाशी वाटली. नागेश खळीकर यांचेबरोबर भारत गायन समाजात १९६१ साली केलेल्या साथीची पसंती आणि त्यावेळी मिळालेल्या १५ रुपयांच्या बिदागीचा किस्साही पं. देव यांनी ऐकविला.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुणे आकाशवाणी, आणि भारत गायन समाज या संस्थाना आवर्जून उल्लेख केला. आपल्या वादनाला यामुळे दिशा प्राप्त झाल्याचे ते सांगतात. आयुष्यातही गेली ४९ वर्षे सौ.ची साथ मोलाची मिळाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
व्यासपीठावर, कार्यक्रमात चमकतो तो गायक किवा संगीतकार. पण गाण्याला उठाव देणा-या साथीदारांची ओळख किती जणांना असते, असा प्रश्न उपस्थित करून श्री. मंगेश तेंडूलकरांनी अनेक चित्रपटात व्हायोलिन आणि सारंगी वादकांनी कमाल वादन करून गाण्याला उठाव दिला आहे.पण त्यांचे नाव माहित नसते. ते अज्ञात असणारे असंख्य कलावंत गाण्यात कलाकुसर करतात. जीव ओततात. यानिमित्ताने पं. देव यांचे नाव समोर आले. त्यांच्या कलेची स्वतंत्र ओळख झाली. त्यांच्या वादन कलेचा गौरव झाल. गाण्याला नटविणा-या अशा साथीच्या कलावंताचा सन्मान व्हायला हवा , असे सांगून तेंडूलकरांनी पं. देव यांचा सत्कार केला.
फैय्याज हुसेन खॉं यांनी व्हायोलिनमुळे आपल्याला भरभरून आनंद-प्रेम मिळाल्याचे सांगितले.
निवारा वृध्दाश्रमाच्या सभागृहात सत्कार कार्यक्रमाची सुरवात पं. देव यांची कन्या आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी यांनी व्हायोलिनवर सादर केलेल्या श्यामकल्याण रागाने झाली.
पं. देव यांनी आरंभी राग यमन आणि नंतर तीन नाट्यपदे व्हायोलिनवर रंगवून रसिकांना स्वरांची ओंजळ अर्पण केली.
शुक्रवारी ( १३ मे) व्हायोलिन गाते तेव्हा...हा हिदी-मराठी गीतांचा नजराणा व्हायोलिनच्या स्वरातून आविट गोडीत रसिकांना बहाल केला. गांधर्व महाविद्यालयात सादर झालेल्या कार्यक्रमाला भरभरून दाद मिळाली. वन्समोअरची शिफारीशही झाली. शब्देविणे स्वरातून बोलणारे व्हायोलिन एकेका गाण्यातून बहरत होते. सौ. चारूशीला गोसावी यांची वाद्यावरील हुकूमत आणि मेहनतीचा कस प्रत्येक रचनेतून सिध्द होत होता. संथ, उडत्या चालींच्या रचना सादर करून रसिकांना टाळ्या द्यायला भाग पाडले. सौ. विनया देसाई यांचे निवेदन आणि ताल व साथीच्या वाद्यांच्या सुरेल आविष्कारातून सारे श्रोते तृप्त झाल्याचे दिसत होते.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Subscribe to:
Posts (Atom)






