subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 9, 2011

प्रभात’काळात रमले रसिक

शांताराम आठवले जन्मशताब्दी

प्रभात फिल्म कंपनीच्या मराठी चित्रपटांच्या गीता द्वारे काव्यपूर्ण चित्रपटगीतांचे 'बीज' पेरून तीनशे चित्रपटगीते लिहिणारे गीतकार.
ग दि माडगुळकर यांनी आदर्श मानलेले गीतकार.

‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक दिवंगत शांताराम आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता नुकतीच मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर येथे एका कार्यक्रमात झाली. शांताराम आठवले यांच्या लेखणीतून साकारलेल्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाद्वारे त्यांचे उचित स्मरण व्हावे, या विचाराने प्रेरित होऊन येथील उदयोन्मुख गायक श्रीरंग भावे याने ‘‘बीज अंकुरले रोप वाढले’’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या निमित्ताने शांताराम आठवले यांच्या उज्ज्वल कारकीर्दीची व चित्रपटसृष्टीच्या रम्य प्रभातकालाची उपस्थितांना प्रचिती आली. आठवले यांचे चिरंजीव सुदर्शन आठवले व ज्येष्ठ कन्या मंगला काकनूरकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. दरवर्षी आम्हीच आमच्या बाबांप्रित्यर्थ कार्यक्रम करतो, पण या वर्षी एका तरूण गायकाने जन्मशताब्दीचे निमित्त साधून असा कार्यक्रम करायचे ठरवले, हे पाहून आम्ही आठवले कुटुंबीय श्रीरंग भावेचे कौतुक करतो व त्याचे आम्ही आभारी आहोत, असे मनोगत सुदर्शन आठवले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात अवीट गोडीच्या विविधरंगी गाण्यांचा समावेश होता. माधुरी करमरकर यांची ‘आला वसंत ऋतू आला’,‘तुझा नि माझा एकपणा’, केतकी भावे-जोशी हिचे ‘भाग्यवती मी’,‘राधिका चतुर बोले’, पूर्वजा पाध्येची ‘अहा भारत विराजे’, ‘हासत नाचत जाऊ’, चिन्मय लेले व पूर्वजाचे ‘दोन घडीचा डाव’ आणि श्रीरंग भावेची ‘आनंद आनंद अवघा’ व ‘आधी बीज एकले’ ही गाणी विशेष रंगली. ‘बघत राहूदे तुझ्याकडे’, ‘उमलली एक नवी भावना’ या सारख्या द्वंद्व गीतांबरोबर ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रुती भावे, सागर साठे, वरद कठापूरकर, हनुमंत रावडे, प्रसाद पाध्ये, अनंत जोशी आणि निषाद करलगीकर या वादकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. धनश्री लेले यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढली.
रंगश्रुती म्युझिकची निर्मिती व श्रीरंग भावे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे सुभाष सराफ, अरूण फडके, हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे उदय दिवाणे, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचे सहकार्य  होते.

हा कार्यक्रम मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी व्हावा, असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले.

Shantaram Athavale is a name associated with Marathi literature and film industry. Marathi is a regional language from the state of Maharashtra, known to the world due to it’s famous capital city of Bombay (Mumbai), in India. He has written 300 film songs, directed six and acted in 2 Marathi films, written 200 poems (with 2 published books) and 10 books on various subjects.

http://www.shantaramathavale.com/

Tuesday, February 8, 2011

स्मरण गुरूंचे

गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.
कार्यक्रमाच्या पूर्वाधात  अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी  भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.
उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.
गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला. 

<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/PPOXM4hpHeY" frameborder="0" allowfullscreen></iframe>




Monday, February 7, 2011

पावले मंचावर थिरकली

'जीवन के हर मोड पे...' या गाण्यावर अमितकुमार आणि आशा भोसलेंची पावले मंचावर थिरकली, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद देऊन अख्खं मैदान डोक्‍यावर घेतले. "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा..', आशा आणि जॉली यांचे "जब अंधेरा होता है...' आणि जॉलीचे "शोले'तील "मेहबुबा...मेहबुबा...' या गाण्यांना श्रोत्यांच्या तालबद्ध टाळ्यांची साथ मिळाली. "पंचम'दांबद्दलच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील प्रसंगांचे दाखले देत या कलाकारांनी ही संगीतरंजनी रंगविली. आर. डी. बर्मन यांना अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या पंधरा कलाकारांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते. "पंचम'दांनी प्रत्येक गाणे रचताना वापरलेल्या वाद्यांसह सर्व गाणी सादर करण्यात आली.

ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात बिनाका गीतमालाद्वारे असंख्य गाणी लोकांपर्यंत पोचविणारा एक आवाजही श्रोत्यांना आज "पाहायला' मिळाला. तो आवाज म्हणजे अमीन सयानी. तेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. आर. डी. बर्मन, किशोरकुमार यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. पंचमदा आणि गुलजार हे एक अजब "कॉंबिनेशन' होते. त्या दोघांच्या मैत्रीच्या आठवणींना आशा भोसले यांनी उजाळा दिला. "दो लब्जों की है', "आपके कमरेमे कोई रेहता है', "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा' अशी एकाहून एक सरस गाणी आशाताईंनी सादर केली. "दम मारो दम'ने कार्यक्रमाचा कळस गाठला.
सौ. अरुणा नाईक मेमोरिअल फाउंडेशन आणि लायन्स क्‍लब, मुकुंदनगर यांनी आशा भोसले यांच्या "राहुल ऍण्ड आय' या सूरमयी संगीत रजनीचे शनिवारी आयोजन केले होते

Friday, February 4, 2011

भीमसेन जोशी कलादालन

भव्य ऑडिटोरीयम ... ३०० पेटिंग्ज लावता येतील अशी आर्ट गॅलरी ... चार लाखांच्यावर संग्रह असणारी म्युझिक गॅलरी ... अशा वैशिष्ट्यांसह सहकारनगर येथील वसंतराव बागूल उद्यानात उभारण्यात आलेल्या ' भारतरत्न पं . भीमसेन जोशी कलादालना ' चे उद्घाटन पंडितजींच्या ९० व्या जयंती दिवशी १० फेब्रुवारीला करण्यात येणार आहे .

पंडितजींच्या उपस्थितीत ९०व्या वाढदिवशी कलादालनाचे उद्घाटन करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प होता . मात्र , ते नियतीला मान्य नव्हते , अशी खंत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी व्यक्त केली . पालिकेचे विरोधी पक्षनेते आबा बागूल यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवण्यात आला आहे . या प्रकल्पात मिनी थिएटर , म्युझिक आणि आर्ट गॅलरी , डॉक्युमेंटरी पहाण्याची व्यवस्थाही कलादालनात करण्यात आली आहे , असे राजपाल यांनी सांगितले . भारतीय संगीताचा गेल्या अनेक वर्षातला प्रवास , पुणे शहराचे संगीत क्षेत्रातले योगदान , कलाकार आणि त्यांच्या कारकिदीर्ची माहिती कलादालनात मिळेल . तसेच छोटे सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्याची सोय इथे करण्यात आली असल्याचे ते म्हणाले .

शहरातल्या शौकिनांना इथे हवे ते संगीत ऐकता येईल . मराठी , हिंदी , इंग्लिश सिनेमांची गाणी , भावगीते , पॉप , रॉक , शास्त्रीय संगीताचा खजिना म्युझिक गॅलरीच्या माध्यमातून पुणेकरांसाठी उघडत असल्याचे बागुल यांनी नमूद केले . या म्युझिक गॅलरीत २८ क्युबिकल्स करण्यात आली आहेत . प्रत्येक क्युबिकलमधे कम्प्युटर आणि हेडफोन्स आहेत . याच कम्प्युटरवर पुस्तकेही डाऊनलोड करण्याची योजना आहे . रसिकांना संगीताचा आस्वाद घेताघेता आवडीची पुस्तके वाचण्याची सोयही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

कलादालनाच्या प्रवेशद्वारावर पंडितजींचे विठ्ठल आणि संत तुकारामांसमवेत भव्य शिल्प साकारण्यात आले आहे . १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन होईल . यावेळी पुण्याचे सर्व खासदार , आमदार आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत . उद्घाटनानंतर कलादालन सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत सर्वांसाठी नाममात्र शुल्कात खुले होईल .

ऐका , दुमिर्ळ ग्रामोफोन रेकॉर्डस्ही !

दुमिर्ळ शास्त्रीय संगीताच्या मैफली , जुन्या गाण्यांचा हजार ५०० ग्रामोफोन रेकॉर्डस्चा वैयक्तिक संग्रह रमेश गणेश देव यांनी पुणेकरांसाठी खुला केला आहे . या कलादालनात ग्रामोफोन ऐकण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे . या रेकॉर्ड्स ऐकण्यासाठी मात्र अगाऊ नोंदणी करावी लागेल .

Around 12,000 sq ft area in the garden has been dedicated to the art gallery named after the late Pandit Bhimsen Joshi. It will showcase the best in performing and visual arts.

Addressing a news conference here on Friday, Congress leader Aba Bagul said the gallery has an 80-seater amphitheatre, 28-cubicle music library, 3,000 sq ft of art display space and another 3,000 sq ft for arts-related programmes that will be held on a regular basis. A collection of around 7,000 records on stalwarts of Indian classical music, donated to the gallery by Ramesh Ganesh Deo and other music connoisseurs, will be used for music appreciation sessions.

"This has been our most ambitious project worked out during the last two years at a cost of Rs 3.5 crore. We will be requesting the chief minister to appoint an independent agency to manage this huge facility, instead of inviting tenders," said Bagul.

The civic garden department undertook the job of constructing the gallery and other improvements at the Bagul garden, over two years ago. "This gallery is a unique project dedicated to arts and this facility should be taken care of in the right manner. I will also be seconding the request to the CM regarding appointment of a separate agency for proper management," said mayor Mohansingh Rajpal, who was also present for the news conference.

At the gallery's entrance, a mural of Pandit Bhimsen Joshi welcomes visitors. The music library comprises a collection of around four lakh songs that can be heard on the headphones and videos on different genres of Indian music that can be seen on the latest flat screen monitors. Fitted with the state-of-the-art acoustics, the amphitheatre will screen documentaries and short films on arts.

"We will be issuing time-based smart cards to those who want to make use of our music library. There will also be a nominal entry charge. We will organise regular exhibitions on the first floor that can display around 300 paintings. We have ensured special lighting for a better display," said Bagul.

The Mandhre Art Gallery on the second floor, has been named after the late Marathi film actor Suryankant Mandhre. It will showcase Mandhre's personal collection of photographs and paintings done by him.

The gallery's inauguration will be attended by artistes from the field of music, art, dance, theatre and cinema. "Beautification work at the garden is also on. We are in the process of fitting lights for a special evening fountain show that we hope to begin soon," said Bagul. After the inauguration, the gallery will be open from 6 am to 6 pm.
(http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pt-Bhimsen-art-gallery-to-open-on-Feb-10/articleshow/7428186.cms)
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7429325.cms)

Tuesday, February 1, 2011

"आता नीरव शांती...."

वडिलांना मी लहानपणापासून 'अहो' म्हणायचो.
कारण आई त्यांना अशीच हाक मारायची.२००५ला आई गेली.
आता वडील गेले.माझी मनःस्थिती आत्ता,आज कशी आहे,हे सांगणे अवघड जात आहे.

वडिलांना भूतकाळाच्या स्मरणरंजनात रमणे आवडत नसे.
पण त्यांच्या गाण्यात,स्वरविस्तारात सर्वरसपरिपोष व्हायचा,
आणि भावनांची अनुभूती,एकाग्रतेने ऐकणाऱ्याला येत असे.
शब्दात न मावणाऱ्या संवेदना,अक्षरांनी न सांगता येणारे
अमूर्त विचार,प्रेम,वेदना हे सर्व साकारण्याची दार्शनिक सिद्धी त्यांच्या गाण्यात होती,आहे.
त्याचे इंग्रजी हस्ताक्षर फार सुंदर होते आणि खूप झरझर पत्र लिहित असत.

आयुष्यात मी पाहिलेला अतिशय शुद्ध मनाचा माणूस असे त्यांचे वर्णन होऊ शकेल. 
या शुद्धतेनेच आणि दृढ श्रद्धेने त्यांना संगीत सिद्धी लाभली.सर्व वेळ मनात गाणेच असायचे.
मनाने फार कणखर होते.फक्त माझी बहिण शुभदा हिचे कन्यादान करताना खूप हळवे झाले होते.डोळ्यातून पाणी वहात होते.
अतिशय कमी बोलायचे पण जे बोलायचे ते नेमके आणि मार्मिक असे.
फार थेट विनोदबुद्धी होती.युक्तिवाद आणि शब्दांचे खेळ त्यांना फारसे रुचत नसत.
खरे स्थितप्रज्ञ आणि गाणे इतके रोमारोमात की कितीही विचित्र आपत्तींमध्ये त्यांच्या कलाविश्कारामध्ये 
काहीही फरक पडला नाही.रोजच्या आयुष्यातही अतिशय निडर आणि साहसी होते.हे सगळे बघत बघत मी वाढलो.
व्यवहारी जगाच्या रोखठोकपणाचे वास्तव,त्यातले हीण याची झळ त्यांनी आम्हा मुलांना कधीच लागू दिली नाही.

मला गाण्याचे अतोनात वेड.गाणे हा आमचा,घराच्या सर्वांचा स्थाईभाव.घरी आईसुद्धा कायम रियाझ करत असे.
वडिलांच्या गाण्यामुळे मला कलेची उंची म्हणजे काय असते ते लवकर कळले.
आपल्याला आयुष्यात फक्त गायचं आहे  हा साक्षात्कार वडिलांना वयाच्या नवव्या वर्षी झाला.
मला तस काही इतक्या लवकर कळल नाही.
१९५२ साली माझा जन्म झाला.तेव्हापासून आत्तापर्यंत गाणे हा माझ्या आयुष्यातला श्वासासारखा साथीदार आहे.
गाण्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करु शकत नाही.पण वडिलांसारखे गाणे आपण गाऊ शकत नाही असे त्यावेळी वाटले.मी या भावनेवर मात करायला हवी होती.
आईवडिलांना मी व्यावसायिक गायक व्हावे असे वाटत नव्हते.असो.
वडिलांच्या गाण्याचे तेज,त्याची धग आणि शीतलता - यांनी मी समृध्द झालो.
वाचनाची आवड होतीच.त्यात भर,मला गाण्याचे,पेंटिंगचे,फोटोग्राफीचे भूत लागले.दृश्यकलेची प्रकृती,रचना,रंगांची गूढता,सांकेतिकता 
आणि परिणाम शोधताना मी खुळा होऊ लागलो.तेच आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिकलो.तरी कलावंताला जगण्यासाठी 
सोसावी लागणारी धावपळ माझ्या वाट्याला यावी आणि बेभरवश्याचे जिणे मी जगावे हे वडिलाना फारसे पसंत नव्हते.पण त्यांनी विरोध केला नाही.
पुढे मला जगण्याची काही कोडी उलगडली,व्यावहारिक यश मिळाले.थोडी मान्यता लाभली. तेव्हा मला झालेला आनंद आईवडिलांनी पाहिला.
काही मोठ्या कलावंतांनी,समीक्षकांनी माझे कौतुक केलेले त्यांनी ऐकले.माझी चित्रे विकली जाताना पाहिली.त्यांना बरे वाटले असणार.
मला काही बोलले नाहीत.मी त्यांचाच मुलगा असल्यामुळे एक स्वतंत्र,निर्भीड मुक्तपणा माझ्यात संचारला असावा.
त्यांचे गाणे हा माझ्या मनाचा कणा आहे.हे सर्व संस्कार आणि त्यातून मला आकळलेले जग हीच माझी प्रेरणा.
मुंबईतल्या माझ्या पेंटिंगच्या पहिल्या प्रदर्शनाला ताजमहाल हॉटेलमध्ये ते आले होते.पण १९८६ साली मक्स म्युलर भवनतर्फे पुण्यात झालेल्या 
माझ्या पहिल्या आर्ट फोटोग्राफीच्या प्रदर्शनाच्यावेळी ते लांबच्या दौऱ्यावर होते.ते प्रदर्शन त्यांनी मग घरीच पाहिले.
पेंटिंगवर,चित्रकलेवर मात्र आमचे कधीच फारसे संभाषण झाले नाही.पण समकालीन सर्व नामवंत चित्रकार,शिल्पकार 
त्यांच्या मैफलींना हजर असायचे.त्यांच्याशी ते माझी ओळख करून द्यायचे.

वडील खूपच झपकन निर्णय घ्यायचे आणि त्यावर ठाम असायचे.गम्मत अशी की 
त्यावेळी वेडेपणाचा casual वाटणारा तो निर्णय नंतर परिस्थितीशी अनुरूप मिळताजुळता ठरायचा.
जणू परिस्थितीनी त्यांच्या विचारांना सुसंगत रूपात स्वतःला बदलून घेतले आहे असे वाटावे इथपर्यंत.
इतकी त्यांची इच्छाशक्ती बलदंड होती.

वयाच्या अगदी लहानपणापासून सर्व भारतभर मी त्यांचाबरोबर प्रवास केला.तुफान प्रवास.
गाणे हा त्यांचा शरीरधर्म होता.गाण्यातून त्यांना उत्तम प्राणायामसुद्धा व्हायचा त्यामुळे खूप छान तीन चार तासांचा 
कार्यक्रम झाला की ते खूप ताजेतवाने होत असत.एरवी अगदी साधे दिसणारे त्यांचे व्यक्तिमत्व ते स्टेजवर गायला बसले 
की तेजःपुंज भासू लागे.हा चमत्कार मी खूप वेळा पाहिला आहे.जबरदस्त गाणे झाल्यावर मैफलीमध्ये 
श्रीत्यांच्या मनात एक निशब्द आनंदाचे नीरव समाधान पसरत असे.मी अनेकदा त्या आनंदाच्या शांततेत गेलो आहे.
असा अनुभव की ज्यातून मी दिवस दिवस बाहेर येऊ शकत नसे.जागेपणी आणि झोपेतसुद्धा गाणे ऐकू यायचे.
अशा स्वप्नमय आभासात मी अगदी आत्ता आत्तापर्यंत जगलो.
गेली काही वर्षे आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व घर आणि आम्ही?
आम्ही आजारलो.
वडिलांचा आवाज,त्यांच्या गाण्याची दुनिया..तिने आम्हाला शक्ती दिली.
ते गेले.त्यांच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण आपल्याबरोबर असणारच आहे. अगदी हवे ते,हवे त्या वेळी.
पण त्यांच्या प्रत्यक्ष  मैफलीचे स्वरवैभव आणि तो परिणाम आता फक्त कल्पनेत आणि आठवणीत रहाणार.
त्यांच्या केवळ घरात असण्यामुळे खूप बरे असायचे.
मी आयुष्यभर ज्या वात्सल्याच्या कृपाछायेत होतो तिला मी अंतरलो आहे हे मानायला मन तयार नाही.

त्यांच्या व्यक्तीमत्वात अथांग प्रेमाचे तेज होते आणि ते देशात,विदेशात समाजातल्या सर्व थरातील माणसांना जाणवत असे.
त्यांच्या इतके अफाट प्रेम फार कमी कलावंतांना लाभले.ते काहीतरी असाधारण अध्यात्मिक पातळीवर होते.
संगीताच्या,गाण्याच्या उत्तुन्गतेच्या ,खोलीच्या परिपूर्णतेच्या नव्या व्याख्या आणि शक्यता त्यांनी रसिकांना दाखवल्या.
परंपरेला सांभाळून तिच्या नव्या क्षितिजांचा विस्तार त्यांनी श्रोत्यांच्या नजरेत आणला.माझी आई स्व.वत्सला त्यांच्या 
या शोधयात्रेतील खरी सोबती आणि त्यांची खरी समिक्षक होती.तिच्या मतांचा ते आदर करीत असत.फक्त गाण्याच्या प्रेमानेच 
ते एकमेकांच्या जवळ आले होते.उत्तम संगीत ,उत्तम गाणे हाच आई वडिलांच्या जगण्याचा,आमच्या घराचा आशय होता.वडिलांना भेटायला आमच्याकडे
वेगवेगळ्या क्षेत्रातली फार मोठी माणसे घरी यायची.खूप थोर कलाकार जवळून बघायला मिळायाचे.त्यांचा सहवास मिळायाचा.
साधू,सत्पुरुषांचे,कलावंतांचे आदरातिथ्य करण्यात वडिलांना विशेष आनंद व्हायचा.हा आनंद घरातल्या आम्हा
सर्वाना जाणवायचा आणि सर्वांमध्ये तो उतरत असे.फार साधे आणि निरागस स्वभावाचे होते.फील लेव्हलवर माणसांची पारख होती.
लहानपणापासून सर्व देश त्यांनी एकट्याने पालथा घातला होता.नैसर्गिक शहाणपण आले होते.तसे बहुभाषिक होते.
जग कळायचे.भिडस्त होते पण मी भिडस्त नाही असे सांगायचे.

त्यांना भटकायला खूप आवडायचे.पण साधा माणूस कसा जवळच्या बागेत फिरून येईल तसे हे दुसर्या गावालाच जाऊन यायचे.
अतिकाळजीने आईची प्रकृती बिघडायची .त्यांचेही गणित चुकायचे.पण नंतर त्यांच्या सोबत जाऊन त्यांची काळजी घेण्याचा निर्णय तिने घेतला.
वडिलांनाही तिच्या बरोबर असण्याचा आधार वाटायचा.वडिलांना,त्यांच्या गाण्याला त्या गाण्याच्या दर्जाइतकी 
प्रतिष्ठा मिळावी असे आईला खूप वाटे.पण माझ्या लहानपणी त्यांचे  मोठेपण,त्यांच्या गाण्याचा दर्जा 
इथे पुण्यात सर्वांना कळत नव्हता.अभिजात कलेविषयी तशी अनास्थाच होती.आधुनिक चित्रकलेबद्दल अजूनही आहे तशी.
पण शास्त्रीय संगीताच्या बाबतीत हे चित्र बदलले.वडिलांनी अभिजात गाणे हे सर्वांच्या जवळ नेऊन ठेवले.
आज सर्व जगात जिथे जिथे लोकांना गाण्याचा कान आहे तिथे तिथे भीमसेन जोशी हे नाव लोकांना माहित आहे.
वडिलाना लोकमान्यता,प्रेम,वैभव,राजमान्यता आणि उंचच उंच प्रतिष्ठा सर्व काही मिळाले.
आणि माझ्या आईची  इच्छा सर्वार्थांनी साकार झाली.

अभिजात कलेला आणि कलावंताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळण्यासाठी भीमसेन जोशी यांच्या
हातून देवाने फार मोठे काम करून दाखवले आणि त्यांचा मुलगा म्हणून हे सर्व 
ही आनंदयात्रा मी अगदी जन्मापासून जवळून पाहू शकलो.मी भाग्यवान आहे.
-जयंत जोशी ,

पुणे.

Saturday, January 29, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात

नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी 
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.

वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून  ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा  आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.

नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक  वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते  ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद  दिला.

देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....

मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली 

देऊळ 
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....

सुभाष इनामदार,पुणे. 

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
http://www.culturalpune.blogspot.com/
Mob. 9552596276

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त!

मन अस्वस्थ झालं.  काय करू काही सुचेना.  बाइकवर टांग टाकली आणि थेट 'कलाश्री' गाठला.
अण्णांचं दर्शन घेतलं. त्यांच्या नावामागे 'कैलासवासी' लावण्याइतका मी अजून सावरलेलो नाही. सावरणारही नाही.

ती गर्दी, ते हुंदके, ते डोळ्यातून आपसूक ओघळणारे पाणी, पोलीसांची अमाप गर्दी,
मिडीयाच्या मोठ्ठी डिश .टपावर लावलेल्या गाड्या,  कलाकारांची झुंबड, रसिकांची हळहळ....
आणि बरेच काही.

सुन्न होऊन बराच वेळ इथे तिथे फिरत राहीलो.  त्या सगळ्या गर्दीत जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा मनात अश्रुंचे कढ घेऊन फिरत होतो.
अण्णांना वैकुंठात नेले. तिथे त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात सुरू झाला.
 त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ बंदूकीच्या फैरी झाडल्या, मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या
आणि हे सगळे संपल्यावरती त्यांना हळूहळू विद्यूत दाहीनी कडे घेऊन चालले.

माझ्या डोळ्यांसमोरून जेव्हा त्यांचं पार्थिव जाऊ लागलं त्यावेळेस मात्र माझा धीर सुटला
आणि मी ढसाढसा रडू लागलो.
ते थोडे पुढे गेल्यानंतर तसाच मागे वळलो.
मनात विचारांचे काहूर माजले होते.
आज मावळतीच्या सूर्याबरोबर स्वरभास्कर लोप पावला. सूर्य सूर्याला मिळाला.
चंद्राची आभा आता अजूनच धीरगंभीर अन् अधिक वलयांकीत भासेल.

अण्णा स्वप्नांतून त्यांच्या सुरांच्या चांदण्याची रात्ररात्रभर पखरण करतील.
मायेनं सांगतील, बाळांनो, स्वरांतील सच्चेपणा जपा, सच्चेपणानी जगा!
पं. सी. आर. व्यास त्यांच्या एका सत्कार समारंभात म्हणाले होते.

भीमसेनजींनी 'तोडी'तला पंचम असा काही लावला की मला 'अहम् ब्रम्हास्मि' चा प्रत्यय आला.

आज त्यांना निरोप देतांना, त्यांचं शेवटलं दर्शन घेत असते वेळी
मलासुद्धा अगदी तोच अनुभव आला.
स्वर ना कोमल होते ना तीव्र होते.
भीमण्णांनी यावेळेस 'पंचम'ही लावला नव्हता.
ते निघाले होते निरामय षड्जाच्या वाटेवर...

तुमचा,
केदार केसकर , पुणे